ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग ५

Submitted by बेफ़िकीर on 24 September, 2010 - 03:00

कॉलेज सुरू होऊन पंधरा दिवस झाले आणि रूम नंबर २१४ मधील चारही मने एकमेकांमधे मिसळून एक पाचवाच रंग तयार होऊ लागला. रोज निदान अर्धी बाटली तरी संपायला लागली. आता आत्मानंदच्या कानावर ओल्ड मंक, नंबर वन व्हिस्की, ओ.सी., ब्ल्यु रिबॅन्ड वगैरे नावे पडू लागली. तो अजूनही लांब बसून सर्वांकडे टक लावून बघत बसायचा आणि मनातल्या मनात जप करायचा. सगळ्यांचे पिणे झाले की हातातल्या भांड्यातील पाणी सगळ्या खोलीत शिंपडायचा अन मगच झोपायचा. कित्येकदा त्याची थट्टा करण्यासाठी मग वनदास पुन्हा त्याने शिंपडलेल्या पाण्यावरून बाटलीतले काही थेंब शिंपडायचा. दारू अशी शिंपडल्यामुळे मग दिल्या वनदासला एक फटका लावायचा. मग तिघेही हसत हसत झोपायचे.

आत्मानंद प्रत्येक लेक्चरला मात्र बसायचा. अगदी सिन्सियरली बसायचा. त्याच्या वह्या भरू लागल्या होत्या. अक्षर मोत्याच्या दाण्यांसारखे होते. स्पेलिंग मिसटेक नाही, खाडाखोड नाही. प्रत्येक वहीच्या पहिल्या पानावर गणेशाची व स्वामी समर्थांची प्रार्थनेची एक एक ओळ! सुबक प्रकरण होते सगळे! त्याला खोलीचा एक कोपरा मिळाला होता. त्या कोपर्‍यात त्याच्या दोन बॅगा आणि सर्व किरकोळ सामान, कपडे वगैरे असायचे. अभ्यास नसेल तेव्हा तो नामस्मरण करत बसायचा. पण लक्ष सगळं या तिघांकडे ठेवायचा. लक्ष ठेवण्याची तीन प्रमुख कारणे होती. एक म्हणजे दिल्या कधीही कुणालाही फटका लावायचा. तो आपल्याला बसू नये असे आत्मानंदला प्रामाणिकपणे वाटायचे. दुसरे म्हणजे स्त्री या विषयावर काही अद्भुत चर्चा व्हायची अन त्यातून मन सुखवायचे. आणि तिसरे म्हणजे पिऊन ते तिघे गोंधळ घालायला सुरुवात करायचे. या गोंधळात काहीही व्हायचे. आपली कोणतीही वस्तू त्यात नष्ट होऊ नये अशी इच्छेने आत्मानंद सगळे झोपेपर्यंत जागाच राहायचा.

आत्मानंद ठोंबरे! आजवर अत्यंत सुरक्षित वातावरणात व धार्मिक संस्कारात वाढलेल्या या मुलावर त्याच्या आजी आजोबांच्या जुन्या वळणाचा फार प्रभाव होता. त्यामुळे आपले बोलणे चालणे हे इतर समवयीन मुलांसारखे नाही आहे हे त्याच्या लक्षातच यायचे नाही. तो प्रॉपर चतुर्थी वगैरे करायचा. मंगळवार करायचा. आणि हे तिघे त्याची थट्टा करत करत त्याच्यासमोर अपेयपान आणि अभक्ष्यभक्षण करायचे. पण अंगात दम नसल्यामुळे तो बिचारा सहन करायचा ते! पण त्याच्या आता लक्षात यायला लागले होते. तिघे जरी व्यसनी असले तरीही तिघांचेही आत्मानंदवर खूप प्रेम बसलेले होते. आणि त्यामुळे आता त्याचेही त्या तिघांवर प्रेम बसलेले होते.

आजही तिघांना रात्री साडे आठलाच पूर्ण चढलेली होती आणि आत्मानंद त्याच्या पलंगावर बसून रोखून प्रत्येकाकडे पाहात होता. आत्मानंदच्या मसाजमुळे दिल्या आठ दिवसांपुर्वीच टुणटुणीत झाल्यामुळे आता शिर्के वचकून होता. पण दिल्या भाकड नव्हता. कुठेतरी बेसावध असताना शिर्केला तुडवायचा ही अशोकची कल्पना त्याने साफ फेटाळून लावलेली होती. त्याच्या मते समोरासमोर आव्हान देऊन सर्वांसमक्ष तो शिर्केला धडा शिकवणार होता. पण तो विषय आता चर्चेत फारसा येत नव्हता. कारण दिल्याने सांगून टाकले होते की शिर्केचे जे करायचे ते तो एकटाच करणार आहे. त्या गोष्टीचा बाकीच्यांशी संबंध नाही.

आजच्या चर्चेचा... खरे तर आज'ही' पिण्याचे कारण ठरणारा विषय फार वेगळा होता.

दीपा बोरगे नावाची वर्गातील एक गोरी पान मुलगी वनदासला फारच आवडलेली होती व ती त्याच्याकडे पाहाते हे त्याचे आज ठाम मत झाले होते. आणि त्यावरूनच गदारोळ चाललेला होता.

अशोक - तिने नेमकं कसं पाहिलं तुझ्याकडे??

वनदास - म्हणजे ... काय झालं ते मी सांगतो...मी चाललो होतो ना क्लासमधून बाहेर.. तेव्हा ती आत येत होती... ती अन ती उर्मिला.. दोघीही... एकदम समोरासमोर आल्यावर मी तरी काय करणार रे?? मी एकदम बघायलाच लागलो तिच्याकडे...

दिल्या - हेच... अश्क्या मी हेच तुला म्हणतोय मगाचपासून...

अशोक - थांब ना... हां ... बोल रे..

वनदास - तर तिने जायचं की नाही निघून पुढे??

अशोक - सरळ आहे...

वनदास - तर ती उर्मिला गेली पुढे.....

अशोक - अन ही??

वनदास - अरे तिथेच... असे... हे बघ हे असे डोळे मिसळून पाहात राहिली...

दिल्या - फेकतंय सालं...

अशोक - किती वेळ...

वनदास - आता किती वेळ... असेल दोन अडीच सेकंद... मी काय मोजणार आहे का??

अशोक - नाही पण दोन अडीच सेकंद ट्रॅफिक जॅम म्हणजे फार झालं वन्या...

दिल्या - अरे कसलं ट्रॅफीक जॅम? हा फेकतोय अन तू ऐकतोयस...

अशोक - तिने काय घातलंवतं??

दिल्या - त्याचा काय संबंधय??

वनदास - ड्रेसरे.. चक्क ड्रेस घालून बघत होती माझ्याकडे...

दिल्या - म्हणजे काय? तू दिसल्यावर काय कपडे बदलून येऊन बघायचं का तुझ्याकडे...

वनदास - अश्क्या... हा नाही त्या गोष्टीत अश्लील बोलतो हां... आधीच सांगतोय..

अशोक - ए दिल्या.. तू गप पी ना... इथे गंभीर बोलणी चाललीयत अन तुझं काय हे मधेमधे..??

दिल्या - अरे हा वाटेत उभा होता.. सरकत नव्हता म्हणून ती पाहात होती...

वनदास - हे बघा.. हे बघा... च्यायला एखाद्याचं चांगलं होतंय ते बघवत नाही यांना...

अशोक - घाल रे यात एक लार्ज....

वनदास - तर तुला सांगतो...काय लेका तिचे डोळे आहेत...

अशोक - नेमके कसे आहेत...??

वनदास - म्हणजे असं एखादं खोल तळं असतं ना??

अशोक - तळं??

वनदास - हां.. म्हणजे असं... असं एकदम खोल खोलच गेल्यासारखं वाटतं तिच्या डोळ्यात पाहिलं की

अशोक - किती ??

वनदास - खूपच रे... तसं मांडता नाही येणार शब्दात....

अशोक - पण... म्हणजे ... भावना काय होत्या डोळ्यातल्या??

दिल्या - हा कोण छपरी आला मधेच समोर...

वनदास - अश्क्या हा नाठ लावणारे माझ्या निष्पाप प्रेमाला....

दिल्याने 'निष्पाप' हा शब्द ऐकून भिंतीवर एक मुष्टीप्रहार केला व हासला.

अशोक - तू मला सांग रे... हां... भावना काय होत्या डोळ्यांत..??

वनदास - जणू काही याच नजरानजरीच्या खेळाची मी कित्ती कित्ती जन्म वाट पाहात होते...

अशोक - वन्या... मला चढते हे ठीक आहे... पण एवढी नाय चढत...

वनदास - विश्वास नाही ना?? तुझाही विश्वास नाही ना??

अशोक - लेका पहिल्या नजरेत तुला एवढं कळलं होय??

वनदास - अरे... मी कविता केलीय कविता तिच्यावर....

'कविता' हा शब्द ऐकल्यावर मात्र दिल्याने एक सण्णकन वाजवली वन्याच्या पाठीत...

दिल्या - असले फालतू प्रकार मला या रूमवर चालायचे नाहीत... कविता बिविता...

वनदास - दिल्या.. तुला प्रेमातल्या भावना नाही कळणार... अरे कविता स्फुरते अशी...

'कविता स्फुरते' हे दोन शब्द वनदासने म्यानातून तलवार किंवा प्यान्टीतून बेल्ट ओढून काढावा तशी हालचाल करत उच्चारले.

अशोक - ऐकव..

वनदास - खरंच..??

अशोकने फर्माईश करणे व वन्याने खिशातून कागद काढणे या अपराधांसाठी दोघांनाही दिल्याकडून एक एक अस्सल शिवी भेट मिळाली.

आत्मानंद - यांना कविता पठण करूदेत... मनुष्याचे सर्वात सुंदर व्यक्तीकरण म्हणजे कविता...

आता मगाचपेक्षा जहरी शिवी आत्मानंदला मिळाली. दिल्याला घाबरून वन्या कविता बाहेर काढत नव्हता खिशातून!

अशोक - तू वाच रे कविता...

वनदास - अरे हे मारतं ना पण??

अशोक - ए दिल्या... च्यायला दादागिरी करू नको हां...

आता दिल्यालाही उत्सुकता वाटू लागली होती की आपल्या रूममधे चक्क एकाने कविता केली?? कशी आहे ती कविता??

दिल्या - मला जर आवडली नाही ना? तीन दिवस दारूला स्पर्श करू देणार नाय तुला..

वनदास - आवडेल आवडेल...

अशोक - अरे वाच ना...

वनदास - हां! ऐका...

दीपा माझी राणी...
.... आज तुला पाहिलं वर्गाच्या दारात... आणि....
मी... मलाच हरवून बसलो बघ... ते तुझे बदामी... गुलाबी... स्वप्नील चक्षू...

दिल्या - चक्षू म्हणजे काय??

अशोक - डोळे डोळे...

दिल्या - च्यायला डोळे गुलाबी असतात का??

वनदास - अरे प्रेमात पडलेल्या युवतींचे डोळे गुलाबी दिसतात... ऐकवू का पुढचं??

अशोक - बिनधास्त!

वनदास - दीपा माझी राणी.... आज तुला....

दिल्या - अबे पुढे चल ना?? तिथेच अडकतंय ग्रामोफोन सारखं..

वनदास - ऐका...

ते तुझे बदामी... गुलाबी... स्वप्नील चक्षू...
त्यातील ती आळसटलेली छटा... एक अखंड इंतजार... टिळकांनी सांगीतलेल्या मार्गावर समाजाला न्यायची...एक दुर्दम्य इच्छा....

हे ऐकून दिल्याने लाथ घातली वनदासला..!

वनदास - क... आता काय झालं??

दिल्या - टिळक कुठे आले इथे??

अशोक - दिल्या तू मारतोस फार हां पण याला...

दिल्या - आधी मला सांग तिच्या डोळ्यांवर कविता केली त्यात टिळकांचा संबंध काय??

वनदास - दिल्या... ही आपल्या समाजाची दारूण शोकांतिका आहे....

दिल्या - कसली??

वनदास - साहित्यात जोवर थोरांचे उल्लेख होत नाहीत तोवर त्या साहित्याची नोंद घेतली जात नाही...

दिल्या - म्हणून टिळक??

वनदास - टिळकांचा उल्लेख रिप्लेसेबल आहे..

दिल्या - म्हणजे काय??

वनदास - टिळकांऐवजी कोणतेही थोर नाव चालेल..

दिल्या - लय ब्येक्कार मार खाणारेस तू....

अशोक - ए ऐकव रे...

वनदास - ऐका...

तू जागी होताच.... पहाट सुगंधी होते... कोकिळा मधूर कूजन करतात...
... मला तर वाटतं... तू सारखी जागीच होत राहावंस...
ती तुझी अंगडाई... दवाला ज्यापासून नशा मिळते...
ते तुझे ओठ... ज्यांच्यापासून मॅक्डोवेल नंबर वन व्हिस्की कैफ चोरते...
ते तुझे कोमल हात... जे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ... आ SSSSSSSSSSS

ए... आपण नाय वाचणार... च्यायला.. कविता करायची अन मार खायचा होय???

दिल्या - अश्क्या... तूच सांग... टिळक, कोकिळा, व्हिस्की अन स्वातंत्र्य यांचा काही संबंधय का??

आता अशोक गदगदून हसू लागला. वनदासला राग आलेला होताच.

वनदास - एक मारतं, एक तिथे शिवायचं नसल्यागत लांब बसतं अन एक कविता ऐकून हसतं...तिच्यायला होस्टेल आहे का इस्पीतळ??

अशोक - वन्या... तू काही म्हण लेका... पण.. टिळक कोकिळा व्हिस्की अन स्वातंत्र्यलढा हे काय एकत्र बसत नाय राव...

वनदास - मला वाटलंच होतं.. खेचतायत माझी... भर.. लार्ज भर...

दिल्या - हात लावायचा नाय दारूला आता तीन दिवस....

वनदास - हा घोर अन्याय आहे...

दिल्या - हाच न्याय आहे.. कविता ऐकवतो काय???

दिल्याने कवितेचा कागद हातात घेऊन त्याचा बोळा करून फेकला. आत्मानंदने तो घाईघाईत उचलला अन नीट सरळ करून घडी घालून खिशात ठेवला. तिकडे कुणाचे लक्षच नव्हते.

पण उदार मनाने वन्याला दारू प्यायची परवानगी मात्र दिली दिल्याने!

आत्मानंद - तुमच्या वाचास्वातंत्र्यावर गदा आली असे वाटत नाही का तुम्हाला??

वनदास - आली ना राव... गदाच काय.. भाले आले.. तोफा आल्या..

अशोक अजून हसतच होता.

दिल्या - पुन्हा या रूममधे कवितेतला 'क' काढायचा नाय..

आत्मानंद - त्यांचं पुढे काय झालं??

वनदास - कुणाचं?

आत्मानंद - दीपाताईंचं???

दीपाला 'ताई' लावलेलं पाहून आता दिल्याही हसायला लागला. भिंतीवर दोन बुक्या बसल्या. एवढंच काय वनदासही हासला!

अशोक - वहिनी म्हण लेका वहिनी...

आत्मानंद - छे छे! विवाहापुर्वी असे संबोधन एखाद्या युवतीच्या नाहक बेअब्रूस कारणीभूत ठरेल..

अशोक - ह्याचं बोलणं एकदा टेप करून ठेवायचंय राव मला...

आत्मानंद - मी स्वतःच करून देईन... टेप रेकॉर्डर आणू परवडेल तेव्हा..

अशोक - वन्या.. पण खरंच... पुढे काय झालं रे?

वनदास - अरे ती बेंचवर बसल्यावर मी दाराबाहेर दोन मिनीटे थांबलो ना?? त्या दोन मिनिटांमधेही आमची तीन वेळा नजरानजर झाली...

अशोक - दिल्या.. हे गंभीर आहे हां??

वनदास - तुला सांगतो... इतकी मधाळ बघते रे...

अशोक - लेका उद्या यावर बसलं पाहिजे...

आत्मानंद - मग आज कशावर बसला आहात??

अशोक - तुम्ही मधे अडथळे आणू नका...

वनदास - मला तर काही सुचतच नाय राव... काय करू रे आता दिल्या? पुढची स्टेप काय??

दिल्या - मार खाणे...

वनदास - याला विचारण्यात काय अर्थच नाय...

अशोक - मला वाटतं तू बोल एकदा तिच्याशी...

वनदास - काय बोलू??

अशोक - मन मोकळं कर ना??

वनदास - एवढं सोपंय होय??

अशोक - त्यात काय? सांगायचं.. बरेच दिवस आपण एकमेकांकडे पाहतो आहोत... आज मला वाटले की आपल्याशी बोलावे.. खूप इच्छा आहे मनात बोलण्याची...

वनदास - दार वाजतंय... ए आत्म्या... दार उघड की????

रात्रीचे साडे दहा वाजलेले होते. आत्मानंदने दार उघडले. बाहेर शिपाई होता.

"आत्मानंद ठोंबरे???"

आत्मानंद - मीच....

शिपाई - फोन आहे...

आत्म्याला आलेला फोन हा त्या रूममधील या वर्षीचा पहिला फोन होता. सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. पाच मिनिटांनी आत्मानंद रूममधे आला... शांत होता...

अशोक - काय हो?? काही विशेष...

त्यानंतर आत्म्याने उच्चारलेले वाक्य ऐकून ताडकन सगळे उभे राहिले अन खोली आवरायला लागले...

"बाबा येतायत.. उद्या पहाटे चारला..."

गुलमोहर: 

अरभाट व वगैरे,

१. वाचनाने जाण वाढते वगैरे विधाने व चर्चा मी यापुर्वी कोळून प्यायलेलो आहे. माणसाला कंटाळा आणायचा म्हणजे किती आणायचा राव? हे सात सक्कं अन कोसला काय आहे ते जाणण्याची मला आवश्यकता नाही. तुम्हाला साधं इतकं समजत नाही का? (खालील...)

अ - मला होस्टेलचा अनुभव नाही, मला मूलबाळ नाही, मी कोणत्याही ढाब्यावर आजवर तीन तासांहून अधिक थांबलेलो नाही, बुधवार पेठेत १९८६ अन १९८७ साली मोठ्या मुलांबरोबर 'नुसते लांबून बघायला' गेलेलो होतो हे सोडले तर तिथल्या एकाही व्यक्तीशी माझा संबंध नाही आणि मुलींना फसवून त्यांची सी.डी. बनवण्याचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय आहे हे मला अजिबात माहीत नाही, असे असताना मी पाचवी कादंबरी लिहीत आहे. हा सगळा 'कचरा' काही जणांना कचरा वाटतो, काही जणांना 'बरे, मनोरंजक' असा वाटतो. ज्या दिवशी मला कादंबरीवर एकही प्रतिसाद येणार नाही त्या दिवसापासून ती कादंबरी हातावेगळी करून मी 'कादंबरी' हा प्रकार माझ्याकडून थांबवेन! हे सगळे लिखाण करताना मला तुमची, तुम्ही अन काही जण ज्यांच्या आंतरजालीय प्रतिमेच्या सन्मानाला जोपासण्यासाठी हातातली सगळी कामे सोडून येथे धावून आला आहात त्यांची काहीही गरज भासलेली नाही. कोणतेही वाचन, मनन केलेले नाही. आज ओल्ड मंकच्या आठव्या भागात काय लिहायचे आहे ते माझे या क्षणी ठरलेले नाही.

ब - मुळात मी काय वाचावे, काय लिहावे, काय बोलावे हे सांगायला तुमच्या सामुहिक ' टोळीबचाव' संघटनेतल्या कुणाचीच मला गरज भासत नाही राव! अ‍ॅडमिन बघतील की? तुम्ही सगळे एकमेकांची त्वचा व प्रतिमा जपण्यासाठी एवढे का घोळ घालताय काही समजत नाही. वाचायचे तर वाचा नाहीतर नका वाचू! द्यायचा प्रतिसाद तर द्या नाहीतर नका देऊ!

२. 'वाचन हा व्यवसाय' असणार्‍यांकडूनच मला माझी उपजीविका मिळते ! कमल देसाई कोण आहेत ते मला माहीत नाही. खरच माहीत नाही. मी अत्यंत नम्रपणे लिहीत आहे की त्यांचे ते वाक्य मला लिहायलाच प्रवृत्त करते. वाचायला वगैरे प्रवृत्त करत नाही. अर्थात, त्यांच्या स्वतःचा मताचा पूर्ण आदरच आहे.

=====================================

मायबोलीवर एकासाठी दुसरा धावून येणे हे पुन्हा पाहिले. वरील दोन चार प्रतिसादांमध्ये तर मूळ लेखनावर काहीच म्हंटलेले नाही. (अर्थात, बाळबोध वगैरे अपेक्षा नाहीच आहेत की लिहावे, व लिहिलेच तर कितीही टीका झाली तरी मला वाईटही वाटणार नाही.)

आता कुठल्यातरी विडंबनात, विनोदी लेखनात वगैरे काहीतरी लिहून ' वैयक्तीक' सूड उगवण्याच्या आंतरिक उर्मीला शांत केले जाईल. मग टोळीबचाव संघटनेचे ८८९ प्रतिसाद वगैरे आले की जरा बरे वाटेल. हा हा हा हा! काय चाललंय? अरे मी लिहीतोय ना? चांगलं वाईट म्हणायचं तर म्हणा नाहीतर नका म्हणू! मला कशाला पुचाट, फालतू, शालेय लेखन करणारा, बाळबोध, अ‍ॅटिट्यूड असलेला वगैरे म्हणताय??

असो!

कोण येते पेरणीला प्रश्न हा शेतापुढे...
टाकुनी लेंड्या खताला चालल्या मेंढ्या पुढे....

-'बेफिकीर'!

>>>> आत्ममग्न असणे व आत्मकेंद्री असणे यात फरक असावा असे वाटते. आत्ममग्नतेतून बेफिकिरी येते, आत्मकेंद्री असण्यातून 'मला काय घेणेदेणे, माझी जी स्थिती आहे तीच उत्तम' अशी भावना येते. तिलाही बेफिकिरी म्हणता येतेच. <<<<
डिस्क्लेमरः माझा कादम्बरी वा त्यावरील चर्चेशि तसा दुरान्वयानेही सम्बन्ध नाही, मात्र प्रतिक्रियेतील एका वाक्यातील तीन शब्द मला जरा जास्तच खटकले म्हणून ही पोस्ट! वर ठळक करुन दाखवलेत
तर;
आत्ममग्नता म्हणजे काय हे समजुन घेतल्यास, त्यातुन "बेफिकीरी" वा तत्सम काहीच नि:ष्पन्न होऊ शकत नाही हे कळून येईल.
सर्वान्चे आत्मे शेवटी एका इश्वराचेच अनेक अन्श असल्याने ते एकाअर्थी समान आहेत अशी अध्यात्मातील मान्यता आहे, मात्र दैहिक जाणीवात गुरफटलेल्या प्राण्यास, स्वतःची ओळख देहभावनेतून होत राहून मूळ "आत्म्याची" ओळख विसरली गेलेली असते, किम्बहुना देहाधिष्ठीत जाणिवा, अन वास करीत असलेला आत्मा यान्चा सम्बन्ध बराचसा गुन्त्याच्या स्वरुपात असून, मी म्हणजे देह हेच समिकरण पक्के झालेले अस्ते, मात्र देहविषयक सर्व जाणीवा, भावभावना यान्चा त्याग करीत, तरीही देहाच्याच आश्रयाने अस्लेल्या परमात्म्याच्या अन्शस्वरुपी स्व आत्म्यास कोणी ओळखुन त्याचेशी मग्न होईल, तर तो आत्ममग्न झाला असे म्हणावे लागेल. ही अवस्था समाधी अवस्थेच्याच जवळपास जाणारी असल्याने त्यातुन "बेफिकीरी" वा तत्सम दुर्गुणान्ची ओळख तिर्‍हाईतास का व कशाप्रकारे बर व्हावी?
(मात्र उपरनिर्दिष्ट वाक्याचा लेखक "आत्ममग्न असणे व आत्मकेंद्री असणे यात फरक असावा असे वाटत"" असे सुरवातीसच मान्य करतोय, व तसा तो फरक आहेच, मात्र कदाचित लिहीण्याच्या ओघात वैचारिक कल्लोळामुळे मुद्दा मान्डताना गल्लत झालेली असेल असे मानण्यास जागा आहे.)

आत्ममग्न हा शब्द चूकिच्या अर्थाकरता - अर्थ दर्शविण्याकरता, चूकीच्या पद्धतीने वापरला जाऊ नये हे सान्गण्याकरता वरील विवेचन केले असे.

बाकि आत्मकेन्द्री या शब्दाबाबत मात्र वरील "आत्म्याचे" विवेचन वापरण्याचा प्रघात नाही, येथिल आत्म'केन्द्रीतता ही दैहिक जाणिवान्शीच, अर्थात "स्व" ने निर्दिष्ट होणार्‍या स्वार्थबुद्धीशी निगडीत आहे/असते असे मानले जाते, सबब आत्मकेन्द्रितता या शब्दातुन जे अर्थ काढले आहेत त्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही.

(बाकि तिकडे कोणससं कालपरवा म्हणल तसच, आत्मा परमात्मा दुरात्मा म्रुतात्मा प्रेतात्मा वगैरे आत्म्यान्च्या असन्ख्य स्वरुपा विषयी कोण काही बोलले की लिम्ब्या तिथे लगोलग हजर होतोच! म्हणूनच तर ही पोस्ट केली असे!
बाकी तुमचे चालूद्यात

धन्यवाद लिंबुटिंबू! आपल्या विचारांशी पूर्णपणे सहमत!

बेफिकिरी हा निश्चीतपणे दुर्गुण असेलच असे मात्र वाटत नाही.

'बाकी तुमचे चालूद्यात' या परवानगीने मात्र हुरूप आला. धन्यवाद!

-'बेफिकीर'!

टण्या, साजिरा, अर्भाट तुम्ही तद्दन मूर्ख आहात.
तुम्हाला स्पेनात/ लातिन अमेरिकेत लाल झूल देऊन पाठवले पाहिजे.

ह्या आल्या आता!

लोकहो, आजच ओल्ड मंकचा नववा भाग प्रकाशित झालेला आहे. एक आपली माहिती! पाचव्या भागावरचे प्रेम जरा 'आटवायला' हरकत नाही.

-'बेफिकीर'!

टण्या, साजिरा, अर्भाट तुम्ही तद्दन मूर्ख आहात.
तुम्हाला स्पेनात/ लातिन अमेरिकेत लाल झूल देऊन पाठवले पाहिजे
>>>>

एक नम्र विनंती! आपापसातील वैयक्तीक भांडणे, तद्दन मुर्ख असल्याचे आरोप करणे, विविध देशात लाल झूल देऊन पाठवण्याची मनोकामना व्यक्त करणे यासाठी कृपया माझ्या या पुचाट, बाळबोध व शालेय कादंबरीचा पाचवा भाग वापरू नयेत!

बाकी मर्जी आपलीच!

-'बेफिकीर'!

तुम्ही तुमच्या कादंबरीला काय विशेषणे वापरावीत हा तुमचा मुद्दा. मी मायबोलीवरच्या कुठल्या धाग्यावर काय लिहावे हे सांगण्याचा तुमचा मुद्दा नाही. वरती घडलेल्या एकतर्फी चर्चेच्या अनुषंगाने जर मला काही म्हणायचे असेल या तिघांना तर ते मी इथेच म्हणणार. ही कादंबरी तुम्ही रंगीबेरंगी मधे प्रकाशित करत असतात किंवा तुमच्या विचारपूस मधे येऊन मी काही म्हणाले असते तर तुमच्या मनाई हुकूमाला अर्थ असता. अन्यथा मायबोली ही साईट एका व्यक्तीच्या मालकीची आहे आणि ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीने ज्या काही लोकांना अधिकार दिले आहेत अश्या एक दोन व्यक्ती सोडल्यास कोणी कुठल्या धाग्यावर काय लिहावे हे सांगण्याचा कुणालाच अधिकार नाही. अगदी तुम्ही लिहित असलेल्या कादंबरीच्या धाग्यावर सुद्धा.

आणि हो कादंबरीवर प्रतिक्रिया न देणे हासुद्धा सर्वस्वी माझा प्रश्न आहे.

अगदी अगदी! म्हणून तर 'नम्र विनंती' म्हणालो मी!

म्हणा म्हणा, काहीही म्हणा त्या तिघांना!

कुठेही पाठवा!

-'बेफिकीर'!

सगळी मोठी माणसं का भांडताहेत मला भीती वाटते? भांडू नका प्लिज...आपण भरपूर वाचाव..आवडलं तर मनात जपून ठेवावं..नाही आवडलं तर सोडून द्यावं..आपण वाचनालयातून पुस्तक आणतो..नाही आवडलं तर अर्धवट सोडतो.आवडल तर पारायण करतो..नाही आवडलं तर लेखकाशी भांडायला जातो का ? इथे उगाच सोय आहे म्हणून भांडत राहायच आणि वाचक आणि लेखकानेही त्याला तितकच गंभीरपणे घ्यायच याला काही अर्थ आहे का ? साहीत्य लेखनाच समिक्षण झालच पाहीजे...मला बेफिकरजींच्या दोन कादंब-या प्रचंड आवडल्या...नव्याशी अजून रिलेट नाही करु शकत आहे..पण मला त्यांची एकही कादंबरी आवडली नसती तरीही मी हेच म्हटलं असतं की उगाच सोय आहे म्हणून वाद घालत बसू नका...कारण या वादातून समिक्षा होत नसुन एकमेकांवर वयक्तिक टिका होतेय आणि शब्दांचा किस काढला जातोय..बाकी तुम्ही मोठी माणसं बघा काय ते?

गाजवलं तर कोसला होईल आणि दाबलं तर सात सक्कं त्रेचाळीस. >>>>
टण्या, Lol Rofl Biggrin Proud
जीव गेलाय हसून हसून, इतकं मार्मिक, विनोदी, भन्नाट विधान माबोवर आजवर वाचलेलं नाही.

सगळी मोठी माणसं का भांडताहेत मला भीती वाटते>>>>

शामा, आपण घाबरू नयेत. माकडाच्या हातात कोलीत मिळावे तशी काही मोठ्या माणसांना ही कादंबरी मिळाली आहे. हा हा हा हा! त्यामुळे अजून राहिलेले मोठे तर यायचेच आहेत. मी आणि तुम्ही आता फक्त मजा बघायची. एक एक अ‍ॅड झाला मी तुम्हाला प्रतिसादात लिहीत जाईन, शामा, नवीन अ‍ॅड झाला.

घाब्रायचं काय त्यात??

-'बेफिकीर'!

Pages