ग्रामव्यवस्था...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

(गम्भीर मोड ऑन , च्यायला हेबी वरडून सांगावा लागतय )वाहून जाईल जाऊद्या. खरे तर सगळे कुळकरणीच. पूर्वी ग्रामव्यवस्थेत जमीनेचे सर्व रेकॉर्ड शिक्षणाची परम्परा असल्याने ब्राम्हण कुळकरणी ठेवत . ज्या ब्राम्हणाला हे कुळ्करणीपद मिळालेले असे ते ट्रॅडिशनल असे.जमिनीवर लागलेल्या कुळाची नोन्द व तत्सम जमिनीचे रेकॉर्ड ठेवणे हे त्यांचे काम. त्याबद्दल त्याना वेगळी जमीन उपजिवीकेसाठी मिळे त्याला कुळकरणी इनाम म्हणत. मुलकी पाटील हे दुसरे वतनदार. त्यांचे काम शेतसार्‍याची वसूली करून सरकारात भरणे. आणि तिसरे पोलीस पाटील गावातील तंटे मिटवणे. गुन्ह्यांची खबर पोलीस स्टेशनला देणे, प्रेतांचे पंचनामे इ. फौजदारी स्वरूपाची कामे . या तिघानाही पगार नसे. जमिनी इनामस्वरूपात मिळत आणि ही पदे त्या घराण्यात वंश परम्परेने चालत. पुढे नवीन प्रशासकीय बदलात ही पदे शासनाचे नोकर या स्वरूपात बदलण्यात आली ते पगारी नोकर झाले आहे . जमीनीचे रेकॉर्ड आता तलाठी ठेवतात आणि त्यांच्या बदल्याही होतात त्याना पगार मिळतो. मउलकी पाटील गेले आता वसूलीचे काम तलाठीच करतात. पोलीस पाटील आहेत पण त्यांची नेमणूक जाहिरात देऊन रिक्रुटमेन्ट रुल्प्रमाने होते त्यात आरक्षणे वगरे आहेत. महिला पोलीस पाटीलही आहेत. जुन्या कुलकरण्यांचे व पाटलांचे इनाम अल्प पैसे भरून घेऊन म्हनजे २००-३०० रुपये भरून घेऊन त्यांच्या घराण्याना कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यात आल्या आहेत.

तात्पर्य जमीनींच्या कुळाचे रेकॉर्ड ठेवणारा तो कुळकरणी . पुढे इन्ग्रजीच्या व प्रादेशिक प्रभावाने त्याचे कुलकर्णी झाले एवढेच....

सीकेपी कुळकएणी पदावर असू शकतील त्या भागात...

पाटील, देशमुख, कुलकर्णी ही सगली ऑफिसेस आहेत. आडनावे नव्हेत . पण इतर सामान्य मराठे(खरे तर कुणबीच), ब्राम्हण यापासून वेगळेपणा ठसविण्यासाठी किंवा मिरविण्यासाठी म्हणा ते मुदाम नावापुढे लावण्याची पद्धत सुरू होऊन शेवटी आडनावातच रूपान्तर झाले. यांची मूळ आडनावे आणखी वेगळीच असतात. शिवाय पुढे तर ज्यांच्या घरात पाटीलकी अथवा कुळकर्ण असेल त्यांचे भाऊ विभक्त झाल्यावर सन्मानदर्शक आडनावही 'वाटपा'त घेऊन ही आडनावे लावू लागले
माझ्या कामाचा भाग म्हणून मला जातीव्यवस्थेचा सखोल अभ्यास करावा लागतो. त्यात जुन्या रेकॉर्डाचा अभ्यास करावा लागतो. मोडी शिकणे भाग आहे. दुसर्‍या कुठल्या तरी बीबी वर कुणीतरी मुस्लीमात जातीव्यवस्था नसते असे अज्ञान मूलक विधान केले आहे. त्यात ह्या आडनावांचा बर्‍याच्दा उपयोग होतो. पाटील, देशमुख्,देशपान्डे ही नावे मुसलमानांच्यात देखील आहेत. कारण एकच. ही नावे नसून ऑफिसची नावे आहेत. खानदेशात ह्या पिढीत देखील जातीवाचक आडनाव लावण्याची पद्धत आहे. ऊदा. माळी, सोनार, न्हावी,भावसार्,तेली इत्यादी.

विषय: 
प्रकार: 

माळीसमाजाचे चे दोनच नाहीत पुढील प्रकार आहेत.
माळी, फुले, हळदे,काच्,कडु,बावने,आधप्रभू,जिरेमाळी, उन्डे,माळी, बागवान(मुस्लिम),भरत बागवान,मरार, मराळ,कोसरे,गासे वनमाळी,सावतामाळी, पाचकळशी,वाडवळ,चौकळशी,रायन बागवान,:)

येवढे प्रकार आहेत माळी समाजाचे? तर मग तेवढी वैशिष्ट्ये पण असतील, ती कशी माहित व्हावीत?

हे सगळं वाचलं की वाटतं ज्या महाराष्ट्रात आपण राहतोय त्या महाराष्ट्राविषयी आपल्या कितपत माहिती आहे ? >> वेल सेड श्री!
वासुदेव, पिंगळा, भोप्या ~ बर्‍याच दिवसांनी आठवले!
एकदा एक पिंगळा घरी येऊन आईला सांगत होता - "तुमच्या सासरच्या नात्यातल्या बाईचं काम आहे - तिनं लिंबू मारलय वगैरे वगैरे"
आई हसली- त्याला ५-१० रु दिले आणि बोळवणी केली त्याची Happy
हे साधारण सायकॉलोजी काय असेल ह्याचा अंदाज घेऊन सांगत असावेत भविष्य!

असाच जागोजागी भटकून भविष्य सांगणारा आणखीन एक प्रकार आहे - त्यांना काय म्हणतात आठवत नाहीये.. कुणी मदत करेल का? Sad

ही सगळी माहिती नाहिशी होण्याआधी नोंद करून ठेवली पाहिजे आपल्यासाठी- आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी.
माझी पणजी पहाटे एक कृष्णाचं गाणं म्हणायची - त्यात बर्‍याच जातींची तत्कालीन कामं काय ह्याची झलक मिळते (छोटासा कृष्ण नाचतो आणि सगळं जग नाचायला लागतं अशा अर्थाचं गाणं - मग त्यात प्रत्येक जण आपले उद्योग सोडून नाचतो अशा संदर्भात जातींचा/कामाचा उल्लेख येतो).
साधचं गाणं, साधीच चाल, पण ऐकायला फार गोड वाटतं.

हा बाफ इन्टरेस्टिंग होत चाल्लाय!

नीधप. रत्नागिरीत देसाई मराठाच आहेत!! >>>>> नंदिनी, रत्नागिरी जिल्ह्यातले पावसचे देसाई बंधू आंबेवाले कोकणास्थ आहेत की..

हुड, पुढचं कधी लिहिणार?

पण जात या विषयावरून एकदा का चर्चा सुरु झाली की वस्तुनिष्ठ अभ्यासापेक्षा अभिनिवेश, बोचरे शेरे असा बराच कचरा येतो.

होऊदे, ते सगळीकडेच होते, पण निदान ज्याना ह्याच्यात रस आहे त्यांना माहितीतरी मिळेल.

आणि वाचणा-यानीही वाचताना आपण एकुणच जातींची माहिती वाचतोय, आपलीही जात त्याच्यात येणार आणि परंपरागत जे काही त्या जातीचे गुण्/अवगुण्/कामे/रिती ह्या बद्दल लिहिले जाणार हे भान ठेवावे.

सध्या फूड सिक्युरिटी अ‍ॅक्टच्या प्रेझेन्टेशन मध्ये जाम अडकलोय. यशदाला लेक्चर आहे माझं Sad

मला पण लेख आवडला...
वरती पटवेकर म्हणजे पोती शिवणारे असा उल्लेख आहे.
कोल्हापूरात २-३ पटवेगार अशा फॅमिलीज आहेत. पण ते रंगाचा बिझनेस करतात.
नक्की आडनाव्/पदवी काय? पटवेगार की पटवेकर?

हूडा मस्त लेख आणि चर्चाही उत्तम चाललीय.
माझे पूर्वज कुठून आले,त्यांचे कुळाचार काय होते याबद्द्ल मला कायमच कुतूहल वाटत आले आहे. आमचे मूळ आडनाव जोशी,जोशी लोकांचे गावगाड्यात नक्की काय काम असे?

हेळव हा शब्द कानडी क्रियापद हेळ वरुन आला आहे. हेळ - सांगणे.

लिंगायत आणि जैन (हे गुजराती जैन नसतात बहुदा - पण नक्की माहिती नाही) समाजातल्या नावांची सरमिसळ कोल्हापूर-सांगली-बेळगाव भागात पहायला मिळते. यांचा इतिहासही रोमांचकारी आहे अगदी.

वा छान ! जात या विषयाला स्पर्श करत आडणावांचा ढांडोळा घेताना कुणी कुणाची जात काढली नाही. चर्चा अतिशय चांगली व माहितीजनक होत आहे.

हूडा मस्त लेख आणि चर्चाही उत्तम चाललीय.
माझे पूर्वज कुठून आले,त्यांचे कुळाचार काय होते याबद्द्ल मला कायमच कुतूहल वाटत आले आहे. आमचे मूळ आडनाव जोशी,जोशी लोकांचे गावगाड्यात नक्की काय काम असे?

जोशी हे भिक्षुकी करायचे माझ्या माहितीप्रमाणे. १०० वर्षापुर्वी अनेक ब्राम्हण कुटुंबे भिक्षुकी करीत. एखाद्या गावात जर जास्त ब्राम्हण असतील तर भिक्षुकी करीता अन्य गावात जात. काहींनी सोयिनुसार गावे वाटुन घेतली होती. ग्रामजोशी हे नाम यातुन निर्माण झाले असावे.

शेखर रबडे अद्याप चिंचवडचे ग्रामजोशी म्हणुन ओळखले जातात.

चिंचवडला सुध्दा बलुत होती. आम्ही कधिच कोंबड्या कापुन घेत नव्हतो. ( ब्राम्हण असल्यामुळे - आता हॉटेलमधे खातो हा भाग वेगळा ) पण साधारण ४० वर्षापुर्वी एक मुसलमान दिवाळी मागायला आमच्याकडे यायचा. आई हे कारण सांगुन त्याला दिवाळी बलुत कधी द्यायची कधी नाही.

पर्वाच आयदान वाचलं त्यातल्या काही उल्लेखांनुसार देवाधर्माची कामे, लग्नासारखे संस्कार, पुजाअर्चा करणार्‍या पासून देवाशी संपर्क साधून काय ती मांडवली करणे जे काय असे ते म्हणजे जोयीशपण किंवा जोशीपण.
यामुळेच जोशी लोक हे केवळ ब्राह्मण नसून इतर जातीत ही असावेत.

भारतात बहुसंख्य राज्यात जोशी ब्राम्हण आहेत. महाराष्ट्रातील जोशीचा उच्चार 'जहाज' मधल्या ज सारखा होतो. इतर रत्र तो ज्योशी असा होतो. जोशी हे व्यावसायिक असल्याने कर्हाडे ,चित्पावन ,देशस्थ कोकणस्थ सर्वात आढळतात . भविष्य सांगणे व तिथी दिनविशेष सान्गून उदा. एकादशी , अमावस्या कधी आहे ते अशिक्षित शेतकर्‍याना सा.न्गने हे त्यांचे काम . त्याबाब्त त्याना धान्यरूपात मोबदला मिळे. मात्र हे अलुतेदार अथवा बलुतेदार नव्हेत.बाकी नीधपने म्हटलेले देवकार्ये पूजा वगैरे ते स्वतःपुरते करीत असतील पन जातीवैशिष्ट्ये म्हणून नाही.

महाराष्ट्रात जोशी नावाची एक भटकी जात आहे. कुडमुडे जोशी हा त्यांचा एक प्रकार. जेजुरीच्या आसपास हासमाज जास्त आहे. त्यांचा संचार सर्वत्र असे/आहे. लोकाना खरे खोटे भविष्य हात पाहून सांगून रुपया आठाणे मिळतील ते घेऊन गुजराण करणारा हा अनिकेत समाज. गावाबाहेर पाले टाकून हे भविष्य सांगत फिरत. व पुढच्या गावाला जात.पूर्वी/अजूनही भोळसट लोक यांच्याकडून भविष्य ऐकत..
हे पोपट, भाडळी ग्रंथ अथवा पंचांगाच्या साह्याने भविष्य कथन करीत. नन्दीबैल वाले ही यात मोडतात. सहदेव जोशी सहदेव भाडळी च्या सहायाने कथन करीत

भटक्या जोशी समाजाच्या उपजाती/समकक्ष जाती पुढीलप्रमाणे
जोशी, बुडबुडकी,डमरूवाले, कुडमुडे जोशी,मेढंगी, सरोदे,सहदेव जोशी, सरवदे,सरोदी, सरोदा

ह्या जाती पाले टाकून अत्यन्त निकृष्ट प्रतीचे जीवन जगतात. त्यांच्या वस्तीला गबाळ म्हणतात. या समाजात दादासाहेब मोरे या लेखकाने 'गबाळ' नावाचे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहीले आहे. जिज्ञासूनी वाचावे.

हे जरा विषयान्तरच झाले. या बीबीचा विषय जातीव्यवस्था नसून ग्रामव्यवस्था असा होता Happy

आमचे मूळ आडनाव जोशी,जोशी लोकांचे गावगाड्यात नक्की काय काम असे?

>>
आता तुम्ही कोणते जोशी आहात ते कळले नाही. पण वरील वर्णनानुसार तुम्ही कोठे बसता ते पहा.

या बीबीचा विषय जातीव्यवस्था नसून ग्रामव्यवस्था असा होताआ<<
कसं वेगळं काढणार? जातीव्यवस्था समजून घेतल्याशिवाय ग्रामव्यवस्था समजणार नाही आणि व्हाइस व्हर्सा!!

या बीबीचा विषय जातीव्यवस्था नसून ग्रामव्यवस्था असा होताआ<<
कसं वेगळं काढणार? जातीव्यवस्था समजून घेतल्याशिवाय ग्रामव्यवस्था समजणार नाही आणि व्हाइस व्हर्सा!!
१०० अनुमोदन नीधप

जाता जाता व्हाइस व्हर्सा ला मराठी पर्यायी शब्द कुणी आठवाना किंवा सुचवाना.

रायरन्द म्हणजे बहुरुपी
<<<
लहानपणी आजीकडून 'काय सजलंय रायरंगाचं सोंग' असा शब्दप्रयोग ऐकला आहे. तो रायरंग म्हणजे रायरन्द च असणार असा जस्ट उजेड पडला.

गोनिदांचं महाराष्ट्र दर्शन पुन्हा एकदा वाचावं म्हणतोय. शोधावे लागेल..

<पाटील, देशमुख, कुलकर्णी ही सगली ऑफिसेस आहेत. आडनावे नव्हेत . पण इतर सामान्य मराठे(खरे तर कुणबीच), ब्राम्हण यापासून वेगळेपणा ठसविण्यासाठी किंवा मिरविण्यासाठी म्हणा ते मुदाम नावापुढे लावण्याची पद्धत सुरू होऊन शेवटी आडनावातच रूपान्तर झाले.>
हे नाही पटल. येका मोठ्या गावात ज्याला अनेक छोट्या छोट्या वाड्या असायच्या (आमच्या गावाला १२ वाड्या आहेत) त्या गावात पण मोजुन २-४ घर ब्राम्हणाची असायची.(आमच्या गावात ३ घर आहेत ब्राम्हणांची) त्यांच्यापासुन काय वेगळेपण ठसवायच आणि काय मिरवायच. मराठा घरात काही भाउ लढायला जायचे तर काही शेती सांभाळायचे. जे भाउ लढायला जायचे त्यांना मानपान मिळायचा आणि त्यामुळ शेती करणार्या मराठ्यांना कुणबी अस संबोधन्यात यायच. मानपान चालायचा तो मराठा मराठ्यांतच. ब्राम्हणांपासुन वेगळेपण ठसवण्यासाठी नाही तर आपापल्यातल्या मानपानासाठी पाटील/देशमुख्/नाईक अस मुळ आडनावापुढ लावल जायच.

Pages