स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - रणदीपनं यशस्वीरीत्या पेललेलं आव्हान.
मी स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आल्यामुळे पारतंत्र्याच्या अनुभवातून होरपळून निघालेले नाही. तरीही बालभारतीच्या पुस्तकात वा इतिहासविषयक ग्रंथांत तत्कालीन भारताबद्दल वाचनात आलेलं. त्यामुळे स्वा. सावरकर हे नाव तेव्हापासून परिचित. मराठीच्या पुस्तकात 'माझी जन्मठेप' मधले एक- दोन प्रसंग होते. त्या संदर्भात पुढे मूळ पुस्तक वाचलं. 'काळे पाणी' व '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' अशी पुस्तकं वाचल्यानंतर मग वीर सावरकरांची लेखनशैली व एकंदर देशकार्य व तत्संबंधी लेखनाचा सूर आणखीन थोडा उमगत गेला.
अर्थात् वाचकांचा गोंधळ उडाला असेल, की हे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल लेखन आहे कि त्यांच्या लेखनाबद्दल.. हो ना?
तर लेख चित्रपटाबद्दलच आहे. परंतु मी हा चित्रपट बघण्यासाठी प्रवृत्त कशी झाले, याचा थोडा धांडोळा घेतला, एवढंच. स्वा. सावरकर हे नाव आणि कलाकार रणदीप हुडाच्या यातील कामाबद्दल कानांवर आलेले प्रशंसोद्गार ह्या दोन्ही कारणांमुळे आज चित्रपट पाहिला.
त्याबद्दल इथे लिहिण्याची उर्मी निर्माण झाली खरी, पण मग वाटलं की त्यावरून 'विशिष्ट' शिक्कामोर्तब तर होणार नाही!
तर, एक डिस्क्लेमर - वीर सावरकर ही व्यक्ती, तिचे व्यक्तिगत गुणविशेष व तिची देशभक्ती यांपैकी - देशभक्ती हा पैलू ,( ज्यावर भाष्य करण्याचा माझा अधिकार नव्हे तरीदेखील) तो अतिशय प्रभावीपणे या चित्रपटात मांडलेला आहे आणि वर नमूद केल्याप्रमाणे, पूर्वी वाचन केल्यावर वीर सावरकर या जाज्वल्य देशभक्ताचं जे व्यक्तिमत्त्व मनात नोंदलं गेलेलं, ते प्रस्तुत चित्रपटात अतिशय मेहनतीने रणदीप हुडा नं साकारलेलं आहे. किंबहुना, ते इतकं भावलं, त्यायोगे लेखणी हाती घेतली आहे.. (या सदरात लिहिण्याचा एकदाच अनुभव घेतला होता. उंबरठा बद्दल लिहिताना. त्यामुळे चु. भू. द्या. घ्या.)
वीर सावरकरांच्या जीवनाचा, चरित्राचा आणि त्यांनी भारतासाठी केलेल्या कार्याचा असा वेगवेगळा आढावा घेणं अर्थातच अवघड आहे. त्यामुळे इथे त्यांच्या अगदी जन्मापासून नव्हे, तर त्यांच्या वडिलांच्या प्लेगमुळे झालेल्या मृत्यूपासून चित्रपट सुरू होतो. कोविड काळात आपल्याला ऐतिहासिक, स्वातंत्र्यपूर्व काळात प्लेगमुळे काय नि कसा हाहाकार उडाला होता, याबद्दल वाचायला मिळालं होतं. टिळकांवरील काही लेख व चित्रपटातही याचा संदर्भ आलेला आहे. म्हणजे हा काही नवीन विषय नाही. तरीही इथल्या दृश्यांचा मनावर परिणाम झाला. कदाचित संपूर्ण चित्रपट एका विशिष्ट रंगछटेचा तंत्रात्मक वापर करून चित्रित केल्यामुळे असेल. मला या क्षेत्रातील काही गंध नसला तरी, दृश्यात्मक परिणाम साधण्यासाठी किंवा विशिष्ट विचार वा व्यक्तीची भव्यता दर्शविण्यासाठी, गांभीर्य ठसविण्यासाठी, राखाडी छटा /अंधाराच्या पार्श्वभूमीवर कालानुरूप योजलेले प्रकाशाचे माफक स्त्रोत इ. तांत्रिक गोष्टी संपूर्ण चित्रपटभर जाणवल्या. तिन्ही सावरकरबंधूंचं आणि येसूवहिनी व माई सावरकरांचं अनुक्रमे सक्रिय व अप्रत्यक्षपणे क्रांतिकार्यास जोडून घेणं, वि. दां चं लंडनला कायद्याच्या अभ्यासाकरता प्रयाण, तिथून भारतीय क्रांतिकार्यास प्रेरणा व सहाय्य, पुढे प्रसिद्ध अशी मार्सेय ची उडी, काळ्या पाण्याची शिक्षा इ. वाचलेल्या गोष्टी बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर 'पाहिल्या'. अर्थातच दीर्घकाळ अंदमानला कारागृहात राहिल्याने तिथलं जीवन अधिक तपशीलांसह दाखवलंय. कोलू, बारी साहेब, खोड्याची शिक्षा, काथ्याकूट, मारहाण जिवंत अळ्यांसहित निकृष्ट दर्जाचं (किमान माणुसकीही न दाखवता)जेवण(मूळ पुस्तकात तर गोम, पाल, इ. चा उल्लेख वाचलेला), विशेषतः ते राजकीय कैदी असूनही तशा निर्धारित दर्जाची वागणूक न देणं इ. वाचणं जितकं क्लेशदायक होतं त्याहून अधिक त्रास ते इथे बघताना झाला. माध्यम शक्तिशाली असल्याने की आणखी कशामुळे याचा अंदाज आला नाहीये अजून. म्हणजे, देशाच्या न्याय्य स्वातंत्र्यासाठी लढत असताना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणं दिली जाणारी वागणूक सहन करणं, तरीही मनाचं खच्चीकरण होऊ न देणं हे पाहताना सतत "अनादि मी, अवध्य मी.." या त्यांच्या ओळी आठवत होत्या, नव्हे, ते अशाच भावनेनं अंदमानमधल्या छळातून टिकून राहिले असतील, असं वाटलं.
(स्पॉयलर टाळण्यासाठी) सगळ्याच घडामोडी लिहीत नाही.
दिग्दर्शक म्हणून रणदीप हुडा चं हे पदार्पण असलं, तरी कलाकार म्हणून मला त्याचे काही चित्रपट आधीही आवडलेले आहेत. पण वीर सावरकर साकारताना त्यानं जी मेहनत, गृहपाठ केलाय आणि जी देहबोली साधलेली आहे, ती अतिशय आवडली. म्हणजे ते वीर सावरकर म्हणून दिसत राहतात, हुडा म्हणून नव्हे. (अवांतर - स्वदेस मध्ये शाखा बद्दल असंच वाटलेलं) फक्त मराठी उच्चारांवर अधिक काम करायला हवं होतं.
रंगभूषाकारानंही कमाल केली आहे. त्या मानाने अंकिता लोखंडेला फूटेजही कमी आहे आणि रंगभूषाकारानं तिच्या बाबतीत तितकं बारीक काम केलेलं जाणवलं नाही. तरीही लक्षणीय गोष्ट म्हणजे माई व येसूवहिनी कोरीव भुवयारहित व अगदी साध्या परिधानात (वस्तुनिष्ठपणा जपलेला आहे) वावरताना दिसतात.
तो काळ उभा करताना काही तपशिलांवर लक्ष दिलेलं आहे. उदाहरणार्थ कंदील, भारतातील ब्रिटिशांची चैनीची राहणी (पायपंखे? चालवणारा एतद्देशीय माणूस), लेखणी, शाई वाळवण्याची पद्धत, इ.
मराठी मध्यमवर्गीय ब्राह्मणी कुटुंबातील पती-पत्नींची संवाद साधण्याची पद्धत थोड्या दिग्दर्शकीय स्वातंत्र्यानं दाखवली असली तरी अगदी 'तान्हाजी' मध्ये दाखवल्याप्रमाणं पारावार गाठलेला नाही.
एकुणात चित्रपट प्रभावशाली वाटला, घरी आल्यावर पुन्हा एकदा 'माझी जन्मठेप' उघडून बघण्याची उत्कंठा वाटली,'सागरास' कवितेतील भावतरंग पुन्हा मनीं खळबळ माजवते झाले, पण...
"रणाविण स्वातंत्र्य कोणास मिळाले" हे खरं असलं तरी नेसत्या वस्त्रानिशी माई व येसूंना घराबाहेर पडताना पाहून कळवळायला झालं. सर्वच क्रांतिकारकांच्या कुटुंबाची त्या वेळी थोड्याफार फरकाने अशीच दुरवस्था झाली असणारे, याचा विषाद वाटला.
त्यामुळे लेखाच्या शेवटास येता येता, एवढं नक्की म्हणावं वाटतंय, की हा चित्रपट पाहण्यासाठी वीर सावरकरांचे अगदीच भक्त असण्याची आवश्यकता नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या मूल्याची पुनः जाणीव होण्यासाठी, किंवा किमान रणदीप हुडा याच्या चांगल्या अभिनयासाठी तरी चित्रपट पहाण्यास हरकत नसावी.
इति अलम् |
प्रत्यक्षासम प्रतिमा उत्कट :स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट
Submitted by प्राचीन on 29 March, 2024 - 09:35
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फे फ +1
फे फ +1
फा, पोस्ट आवडली.
फा, पोस्ट आवडली.
पहिले पंतप्रधान होण्याचा अधिकार सावरकरांचाच होता असे बर्याच सावरकर भक्तांना वाटत असते. माहूरकर तर The man who could have prevented partition असे पुस्तकच लिहितात, सुधीर फडके यांच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो तर ते सांगत होते की 'अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचा' ही ओळ गाताना त्यांना सावरकरांचीच आठवण येत असे.
For the record ,
गांधी हत्येच्या खटल्यातून सावरकर टेक्निकॅलिटी वर सुटले, तेव्हाचे जज कलेक्टिव्ह काँशंस वगैरे कोलांट उड्या मारत नसत. त्या नंतर आलेल्या कपूर कमिशन ने तो आरोप सिद्धच केला असे मानावे लागेल. अगदी १९८० पर्यंत संघ परिवार सावरकरांना कटाक्षाने दूर ठेवत असे. पण त्यानंतर सावरकरांना गांधींच्या बरोबरीचे, किंबहुना त्यापेक्षा मोठेच असे ठरवायचा प्रयत्न सुरू झाला आणी मग हे माफीवीर वगैरे आले.
कॉंग्रेस ने राजिनामा दिला तेव्हा दोन राज्यात हिंदुसभेने मुस्लिम लीग बरोबर सरकार स्थापन केले होते.
स्वातंत्र्यानंतर देशाने नेपाळ च्या राजाच्या अधिपत्याखाली हिंदु राष्ट्र बनावे असे त्यांचे मत होते.
त्रावणकोर च्या दिवाणाने ने स्वतंत्र रहायचा निर्णय घेतला तेव्हा सावरकरांनी अभिनंदनाची तार केली होती.
आपली घटना मनुस्मृती वर असावी असेही त्यांनी सुचवले होते.
त्यांचे काही लेखन पाहिले तर ते जिवंत असते तर त्यांनी नरेंद्र दाभोलकरांना शाबासकीच दिली असती असे वाटते. पण दाभोलकरंच्या हत्येनंतर बहुसंख्य सावरकर भक्तांना आनंद का झाला ? त्यांचे गायीविषयक विचार किती जण मान्य करतील ?
>>पण गांधी व नेहरूंनी किंवा
>>पण गांधी व नेहरूंनी किंवा काँग्रेसने त्यांची काही उपेक्षा केली व आवर्जून डावलले...<<
अच्छा, मग त्या लियाकत खानाच्या भेटि दरम्यान स्वा. सावरकरांना अटक झाली तो बहुतेक प्रँक असावा..
कॉंग्रेसने स्वा. सावरकरांची केलेली उपेक्षा ब्रिटिश सरकारच्या तोडिची होती. उगाच ताकाला जाउन भांडं लपवु नका..
>>अगदी १९८० पर्यंत संघ परिवार सावरकरांना कटाक्षाने दूर ठेवत असे. पण त्यानंतर सावरकरांना गांधींच्या बरोबरीचे, किंबहुना त्यापेक्षा मोठेच असे ठरवायचा प्रयत्न सुरू झाला आणी मग हे माफीवीर वगैरे आले.<<
अरे, हेच तर मी किती दिवसां पासुन सांगतोय. तुम्हाला आता उपरती आली होय? तुम्हि हि त्या मश्रुम गटात सामील होता इतके दिवस, माफिवीर, माफिवीर असा डंका पिटत; आता साक्षात्कार झाल्याबद्दल अभिनंदन..
यु कॅन फूल ऑल ऑफ द पिपल सम ऑफ द टाइम; यु कॅन फूल सम ऑफ द पिपल ऑल ऑफ द टाइम; हौएवर यु कॅनाट फूल ऑल द पिपल ऑल द टाइम...
कॉंग्रेसने स्वा. सावरकरांची
कॉंग्रेसने स्वा. सावरकरांची केलेली उपेक्षा ब्रिटिश सरकारच्या तोडिची होती. उगाच ताकाला जाउन भांडं लपवु नका.. >>> काय होती नक्की उपेक्षा? १९५० ची अटक ओव्हर रिअॅक्शन असेल. मुद्दाम केले असेल. पण गांधीहत्येच्या खटल्यातील संशय पूर्ण फिटलेला नसल्यानेही असेल. तेव्हाचा माइण्डसेट आता कसा कळणार. पण निदान नंतर पुस्तकात धडे बिडे ठेवले नसते. आकाशवाणीवर "स्वातंत्र्यवीर" म्हणून उल्लेख केला नसता.
तुमची मश्रूम कॉमेण्ट आहे त्याचा संदर्भ माझ्या कोणत्याही पोस्टशी नाही, त्यामुळे ती माझ्याबद्दल नाही असे गृहीत धरतो
मी मुळात कधी माफीवीर म्हंटलेलो नाही.
फारएंड
फारएंड
अतिशय उत्तम व संयत प्रतिसाद
फारेण्ड>>> पोस्ट आवडल्या.
फारेण्ड>>> पोस्ट आवडल्या. बारिंग दोन पॉईंटस.
कॉंग्रेसच्या नेत्यांना व्हिशिअस नॅरेटीव्हज् सेट करता येत नाहीत. कदाचित महाराष्ट्रातले नेते सेट नसतील करत (जनरली महाराष्ट्रातील कॉंग्रेसी प्रक्षोभक वक्तव्य किंवा जाहिर वर्तन करण्यासाठी ओळखले जात नाहीत.) पण मजबूरी किंवा पक्षाची भुमिका म्हणून साथ दिलेली आहे. उदाहरणे देऊ शकते पण विषयाशी संबंधित नाहीत. महाराष्ट्र कॉंग्रेसमधे जी काही २-४ घेण्यासारखी नावं उरली आहेत ती बर्यापैकी सुज्ञ आहेत व आत्ताच्या रणधुमाळीत कोणतंही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं नाही हे ही खरं.
दुसरा पॉईंट, सावरकर बॅशिंग ब्रिगेडींनी सुरू केले. ब्रिगेडींनी अनेक थोर व्यक्तिमत्वांवर अत्यंत गलिच्छ राळ उडवलेली आहे आणि ब्रिगेडींचा कर्ताकरविता पक्ष कोण याबद्दल शंका नाही. पण महाराष्ट्रात अशा टीकेचा मतांच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो हे ओळखून निदान इथे तरी सावरकरांवर टीका होऊ नये याचा प्रयत्न त्याच पक्षाच्या अर्ध्वयुने केला अशी हाकाटी आहे. या नेत्याचा एकंदरीत राजकारणावरील होल्ड लक्षात घेता व न्याय यात्रेच्या सांगता सभेतील या विषयाचा अनुल्लेख लक्षात घेता हे खरं असावं असं वाटतं.
फारएण्ड खुप संयत आणी
फारएण्ड खुप संयत आणी मुद्देसूद विवेचन. माझे मन तुमचे ही प्रतिसाद आवडले.
फारेंड,प्रतिसाद आवडला.तरीही
फारेंड,प्रतिसाद आवडला.तरीही काही गोष्टी खटकतात.
१९५० ची अटक ओव्हर रिअॅक्शन असेल. मुद्दाम केले असेल. पण गांधीहत्येच्या खटल्यातील संशय पूर्ण फिटलेला नसल्यानेही असेल....... न्यायव्यवस्था म्हणून काही प्रकार त्यावेळीही असेल ना. संशयावरून एखाद्याला डांबून ठेवणे कितपत योग्य होते?
हृदयनाथ मंगेशकरांनी ने मजसी ने या गाण्याला आकाशवाणीवर सादर केले.तेव्हा त्यांना show cause
notice स्वतंत्र भारतात मिळाली.ती कशासाठी? हा आकस नव्हे तर आणि काय होता?
TRS clips che Nathuram godse conspiracy Theory+ Gandhi VS.Veer Savarkar पहा.
प्राचीन,तुमच्या धाग्यावर अवांतर लिहिल्याबद्दल क्षमस्व!
>> हृदयनाथ मंगेशकरांनी ने
>> हृदयनाथ मंगेशकरांनी ने मजसी ने या गाण्याला आकाशवाणीवर सादर केले
https://www.tv9marathi.com/politics/know-the-fact-did-aakashwani-really-...
टिपिकल व्हॅट्सॅप फॉरवर्ड !
भगत सिंग हेही क्रांतीकारक होते, त्यांचाही मार्ग गांधीजींच्या विरुद्ध होता, पण त्यांच्यावर गांधीवादी टीका करत नाहीत, किंबहुना इतर कोणत्याही क्रांतीकारकावर. भगत सिंग यांच्यावर सिनेमा आला तेव्हा त्यात ते गांधींपेक्षा ( किंवा इतर कुणापेक्षा) मोठे आहेत असे दाखवायचा प्रयत्न झाला नव्हता. सावरकरांचा हिंदुसभा नावाचा पक्ष होता, तो निवडणुका लढवत असे. काँग्रेस ने बंदी वगैरे घातली नव्हती. बीयर बायसेप वाल्याचे व्हिडिओ पहायचेच तर मग निरंजन टकले यांचेही पहा.
टिपिकल व्हॅट्सॅप फॉरवर्ड !...
टिपिकल व्हॅट्सॅप फॉरवर्ड !.... नाही हे मी दुसरीकडे लेखात वाचले होते.
निरंजन टकले यांचेही व्हिडियो जरूर बघेन.
>>ते रॅप मलाही विचित्र किंवा
>>ते रॅप मलाही विचित्र किंवा अस्थानी वाटलं.<< +१
हृदयनाथ मंगेशकरांनी ने मजसी
हृदयनाथ मंगेशकरांनी ने मजसी ने या गाण्याला आकाशवाणीवर सादर केले.तेव्हा त्यांना show cause
notice स्वतंत्र भारतात मिळाली.ती कशासाठी? हा आकस नव्हे तर आणि काय होता?
TRS clips che Nathuram godse conspiracy Theory+ Gandhi VS.Veer Savarkar पहा.
प्राचीन,तुमच्या धाग्यावर अवांतर लिहिल्याबद्दल क्षमस्व!
शुध्द फेक आणि व्हॉटस अॅपीय दावा. पंडीत हृदयनाथ मंगेशकर आणि सुरेश वाडकर हे झी मराठीवरील गायकांच्या सारेगमप पर्वाचे परिक्षक होते तेव्हा त्यांनी आकाशवाणीवर तीन भावगीतांना चाली लावल्याची आठवण सांगितली होती, त्यात त्यांनी आपण आकाशवाणीवर नोकरीला असल्याचे कोठेही सांगितले नव्हते. सावरकरांच्या गीतांना चाली लावण्यापुर्वी खुद्द सावरकरांना भेटल्याची आठवणही त्यांनी सांगितली होती, मात्र नोकरीतून काढले वगैरे चुकीची माहिती आहे. त्यांच्या जेष्ट भगिनी मीना खडीकर यांनी लिहीलेले आत्मचरित्र नुकतेच वाचनात आले, त्यात लहानपणापासूनच्या अनेक आठवणी आहेत, त्यातही आकाशवाणीवरची नोकरीची कोणतीही आठवण नाही.
बाकी चर्चेत रस नाही. पण
बाकी चर्चेत रस नाही. पण हृदयनाथ मंगेशकरांचा किस्सा व्हॉट्सअॅपीय फॉरवर्ड नाही. तो त्यांनी ‘माझा कट्टा‘ वर सांगितला होता. ते तिथे खोटं बोलले असा दावा होऊ शकेल. पण केवळ आपण असहमत असलेल्या गोष्टीला व्हॉट्सअॅप फॉरवर्ड म्हणू नये इतकंच.
https://www.google.com/gasearch?q=hridaynath%20mangeshkar%20lost%20akash...
एक शंका आहे, 17 वर्षे वयात
एक शंका आहे, 17 वर्षे वयात सरकारी नोकरी मिळायची का?
>>कॉंग्रेसने स्वा. सावरकरांची
>>कॉंग्रेसने स्वा. सावरकरांची केलेली उपेक्षा ब्रिटिश सरकारच्या तोडिची होती. उगाच ताकाला जाउन भांडं लपवु नका.. >>> काय होती नक्की उपेक्षा? १९५० ची अटक ओव्हर रिअॅक्शन असेल. मुद्दाम केले असेल. पण गांधीहत्येच्या खटल्यातील संशय पूर्ण फिटलेला नसल्यानेही असेल. तेव्हाचा माइण्डसेट आता कसा कळणार. <<
सिरियस्ली? स्वातंत्र्योत्तर काळात स्वा. सावरकरांना त्यांच्या त्यागाचं श्रेय सरकारी दरबारात मिळालं असं तुमचं निरिक्षण असेल तर काय बोलणार? आणि हो, तेंव्हाचा माइंडसेट आजहि आहे, जो इथेहि लख्ख दिसुन येतोय. मागे मणिशंकर अय्यर ने सेलुलर जेलमधुन स्वा. सावरकरांचा स्मृतीफलक काढुन टाकण्यामागे त्यांच्याप्रति दाखवलेला सविनय आदर होता, बरोबर ना?..
फेफ यू आर म्हणिंग राईट.
फेफ यू आर म्हणिंग राईट.
मी सावरकरांचा माफीवीर असा उल्लेख कधीच केलेला नाही, पण संसदेच्या ज्या सभागृहात गांधीजींचे चित्र आहे त्याच सभागृहात गांधी हत्येच्या कटातून केवळ corroborative पुराव्याअभावी सुटलेल्या व्यक्तीचे चित्र लावणे अयोग्य आहे व विरोधी पक्षने केलेला वॉक ऑट योग्यच होता या मतावर ठाम आहे.
“ एक शंका आहे, 17 वर्षे वयात
“ एक शंका आहे, 17 वर्षे वयात सरकारी नोकरी मिळायची का?” - भ्रमर, हा प्रश्न ज्याने प्रसंग सांगितला त्याला विचारायला हवा. इथे मायबोलीवर ते नसावेत. किंवा आकाशवाणीला विचारून बघा, त्यांचे १९५५ साली नियम, पोटनियम काय होते ते.
मायबोलीवर असलेल्या लोकासंबंधी
मायबोलीवर असलेल्या लोकासंबंधी शंका विचारायची असेल तर माझा माफीनामा
भ्रमर, नेमका मुद्दा काय आहे?
भ्रमर, नेमका मुद्दा काय आहे? काही आहे का? का फक्त सार्कॅझमचा खेळ खेळायचाय? माझा प्रतिसाद नीट वाचा. मुद्दा नसेल तर सोडून द्या.
“ हृदयनाथ मंगेशकरांचा किस्सा व्हॉट्सअॅपीय फॉरवर्ड नाही. तो त्यांनी ‘माझा कट्टा‘ वर सांगितला होता. ते तिथे खोटं बोलले असा दावा होऊ शकेल. पण केवळ आपण असहमत असलेल्या गोष्टीला व्हॉट्सअॅप फॉरवर्ड म्हणू नये इतकंच.”
मी तुम्हाला उद्देशून काहीही
मी तुम्हाला उद्देशून काहीही विचारलं नव्हतं. त्यांच्या मुलाखतीमध्ये उल्लेख आहे की 17 वर्षाचा असताना आकाशवाणीवर 500 रु पगारावर नोकरीला होते, म्हणून ती शंका आली आणि इथे विचारली.
https://www.google.com/url?sa
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https:...
भरल्या पोटी, निवांत वेळात
भरल्या पोटी, निवांत वेळात गांधीजींच्या असहकार आणि उपोषणाची थट्टा, टिंगल करणारे आणि स्वतः च्या (अगदी सात जमत नाहीत म्हणून जमेल तेव्हढी) पुढच्या पिढीची सोय करून, "शिवाजी असावा तर दुसऱ्याच्या घरात" म्हणत, सावरकरांसारख्या जहालांवर टीका करणारे आम्ही सर्व स्वतंत्र भारतातील नागरिक, आम्हाला (आयात्याच) मिळालेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर (गैर) फायदा करून घेत आहोत. "शेळी जाते जिवानिशी खाणारा म्हणतो वातड" हे तर आमच्या रोमा रोमात भिनलेले आहेच .. त्यामुळे मग ते ( उणे तापमान का असेल म्हणून काय झालं??) १०० च मीटर तर पोहोले, माफीनामा तर मागितला काय मोठे वीर, कोलु तर फक्त एकदाच फिरवला, एका गालावर मारले तर दुसरा पुढे करायचा हीच ह्यांची शिकवण.. ह्या व अशा हजारो पिंका येता जाता टाकत आम्ही आमचा जास्तीचा/ उरलेला वेळ अगदी मजेत घालवत आहोत.
कपूर कमिशनचा रिपोर्ट
कपूर कमिशनचा रिपोर्ट
All these facts taken together were destructive of any theory other than the conspiracy to murder by Savarkar and his group.
अभिनव भारतच्या पंकज फडणीस यांनी गांधीजींना चौथी गोळी लागली असल्याने गांधीहत्या खटला हा मिसट्रायल होता, परत चालवावा अशी पीआयएल टाकली व त्यात सावरकरांना कपूर कमिशनने हत्येचा आरोपी मानले आहे तेही काढून टाकावे अशीही मागणी केली. कोर्टाने अमिकस क्युरी नेमुन गांधीहत्येचे पुरावे धुंडाळले व पीआयएल खारीज केली. फडणीस यांना दंडही ठोठावला. खटला परत चालवावा ही मागणी कोर्टाने फेटाळून लावली.
सावरकरांचे नाव कपूर कमिशन रिपोर्टमधे येण्यासंबंधी कोर्टाचे निरीक्षण…
The SC said that it ‘is a general observation probably made since Godse and others found to have associated with Savarkar. It can’t have the effect of overturning of the finding of the criminal court which acquitted Savarkar’
https://www.advocatekhoj.com/library/judgments/announcement.php?WID=9905
यात सरकारही प्रतिवादी होते व सरकारचे कोर्टातील निवेदन खालीलप्रमाणे…
This (kapoor commision)finding was rendered after the demise of Shri Savarkar and no opportunity was given to Shri Savarkar or any of his representitive. The finding is unfair since Shri Savarkar was acquitted at the trial.
सुरेख लिहिले आहे, परिक्षण
प्राचीन,
सुरेख लिहिले आहे, परिक्षण आवडले.
<< 17 वर्षे वयात सरकारी नोकरी
<< 17 वर्षे वयात सरकारी नोकरी मिळायची का? >>
------ हृदयनाथ मंगेशकरांना AIR ने काढून टाकले होते. १९५५ साल, ५०० रु नोकरी , वय १७,
दुसर्या दिवशी कारणे दाखवा नोटीस मिळाली, आठव्या दिवशी AIR मधून बाळासाहेब बाहेर... कारण काय होते त्या गाण्याला "संगित" दिल्याचे निमीत्त असे ते म्हणतात. १९५५ च्या घटनेबद्दल १९२१ मधे हृदयनाथ खोटे कशाला सांगतील?
अरे पण ते काव्य पुढे अनेक दशके, कोट्यावधी लोकांनी रेडिओवर एकले आहे...
संगित दिले म्हणून संगितकाराला शिक्षा झाली पण गाण्यावर बंदी कधी नव्हती.
माझेमन - प्रतिसाद नोटेड.
माझेमन - प्रतिसाद नोटेड. त्यात काही वाद नाही.
देवकी/फेफ - हृदयनाथ मंगेशकरांबद्दलची माहिती वाचली. त्यांना याबाबत खोटे बोलायचे काही कारण नाही असे धरू. त्या माहितीवरून हे घडले ते १९५४-५५ च्या आसपास असेल. तेव्हा तत्कालीन सरकारचा सावरकरांबद्दलचा रोष बघता आकाशवाणीतील एखाद्या उत्साही व्यक्तीने तसे केले असल्याची शक्यता आहे.
काँग्रेसने कधीच आकस दाखवला नाही असा माझा दावा नाही. साधारण ५० च्या दशकात नक्कीच आकस असेल. एकतर सावरकर स्वातंत्र्यलढ्यात त्यांच्या विरोधात होते. त्यात गांधीहत्येच्या कटात सामील असल्याचा संशय. त्यामुळे तसा आकस असण्यात मला काहीच आश्चर्य वाटत नाही. काँग्रेसच्या जागी कोणताही पक्ष, कोणतीही संघटना असती, तरी त्यांनी हेच केले असते.
चार मुख्य मुद्दे आहेत
- १९२० पासून पुढे देशव्यापी हिंसक लढा उभारायला सावरकरांना ब्रिटिश सरकार सोडले तर कोणी रोखले नव्हते. हे मी हेटाळणीच्या टोन मधे लिहीत नाहीये. त्यांनी केले तेवढे खूप आहे आणि त्याचा आदर आहेच. पण तो लढा तसा उभा राहिला नाही याचे कारण गांधी नक्कीच नव्हते.
- १९४७ नंतर काँग्रेसने सावरकरांना श्रेय दिले नाही वगैरे यात लोकांना आश्चर्य का वाटते हे मला समजत नाही. सावरकर काँग्रेसचे कट्टर विरोधक होते व स्वातंत्र्यानंतर पहिली काही वर्षे गांधीहत्येबद्दलचा संशयही होता.
- पण साधारण ७०-८० नंतर ती धार कमी झाली व त्यापुढे काही वर्षे सावरकरांचे उल्लेख सहसा आदरार्थीच केले जात होते. माझ्या शाळा कॉलेजच्या काळात मला सावरकरांबद्दल काहीही निगेटिव्ह वाचल्याचे आठवत नाही. ते अगदी साधारण २००४ पर्यंत.
- मग २००४ नंतर ब्रिगेड्यांनी एकेक टार्गेट करायला सुरूवात केल्यावर माफीवीर वगैरे निघाले. मणिशंकर अय्यर सारख्या राजापेक्षा राजनिष्ठ लोकांनी मग काड्या करायला सुरूवात केली. आता दोन्ही पार्ट्या एकमेकांवर चिखलफेक करताना इकडे माफी तर तिकडे नेहरूंची सिगारेट किंवा एडविना माउन्टबॅटन, किंवा गांधीचे एकेक प्रयोग वगैरे काढले जाते.
बाकी मी एकच मताची खुंटी कायम धरून बसलेलो नाही. जशी नवीन माहिती मिळते तसे माझे मत बदलायला मला काहीही प्रॉब्लेम नाही.
चित्रपटाच्या टीझरमधे " मै
चित्रपटाच्या टीझरमधे " मै गांधीसे नही अहिंसासे नफरत करता हू.... " असे दाखविले आहे.
गांधी या महात्म्याला जिवाने मारल्यावर अहिंसे विरुद्धचा लढा ते जिंकले?
वल्लभ भाई पटेल यांच्या, २७ फेब्रुवारी १९४८, नेहरु यांना लिहीलेल्या पत्रातली वाक्य.
" ..... It w'as a fanatical wing of the Hindu Mahasabha directly under Savarkar that [hatched] the conspiracy
and saw it through.... "
हे पत्र आंतरजालावर उपलब्द आहेत. Sardara Patel's correspondence , 1946-1950, vol 6
https://ia601002.us.archive.org/9/items/sardar_patels_correspondence_vol...
पटेल त्यावेळचे गृहमंत्री होते. गांधी हत्या कटातले सर्वच आरोपी सावरकरांना भेटलेली आहे. हत्येमधे प्रत्यक्ष सहभाग घेणारे गोडसे आणि आपटे हे १४ जानेवारी तसेच १७ जानेवारी १९४८ ला सावरकर सदनांत भेटलेले होते. सोबत माफीचे साक्षिदार ठरलेले बडगे पण होते. खटल्याशी निगडीत प्रत्येक आरोपीचा संबंध सावरकरांशी आलेला आहे, त्यांच्या सोबत अनेक वैचारिक बैठका अनेक वेळा झाल्या होत्या.
गांधी यांच्या शरिराच्या आत अहिंसेचा आत्मा लपलेला होता, त्या सोबत कसे लढावे याबाबत या चर्चा असतील.
जस्टिस आत्मचरण यांच्या कोर्टाने सावरकर यांना पुराव्या अभावी मुक्त केल्यावर पुढे केंद्राने त्या निकाला विरोधात अपिल केले नाही हे नमूद करतो.
चित्रपटांतल्या टीझरमधे मै अहिंसासे नफरत करता हूं असे म्हणतांना दाखविलेल्या सावरकर यांनी आयुष्याच्या शेवटच्या काळांत तब्बल २६ दिवस अन्न -पाणी त्यागले आणि आपल्या जिवाला संपविले..... जिव संपविण्यासाठी अहिंसक मार्ग पत्करला.
प्राचीन यांची क्षमा मागून -
प्राचीन यांची क्षमा मागून - कारण त्यांचा हा धागा पूर्ण हायजॅक झाला आहे आणि त्यात मी दोषी आहेच.
@फारएण्ड >>> कपूर कमिशनचा रिपोर्ट हा तुमच्या किंवा इतर कुणाच्या मुद्द्याचा प्रतिवाद नाही. एक जनरल माहिती म्हणून लिहिले आहे.
पुढील कमेंट मुक्त चिंतन समजा.
महाराष्ट्रात सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हटले जाते, त्यांचे पुस्तकात धडे होते वगैरे खरेच. पण हे महाराष्ट्रापुरते असू शकते कारण त्या त्या राज्याचा इतिहास जनरली शिकवला जातो, नंतर एकदम अक्ख्या भारताचा आणि जगाचा. (अर्थात मी स्टेट बोर्डमध्ये होते. सीबीएसईवाले कुणी असतील तर सान्गा प्लीज.)
पण महाराष्ट्राबाहेर सावरकरांविषयी गैरसमज होते कारण ते गांधीजींच्या हत्येतील आरोपी होते. हा चित्रपट डिक्लेअरही झाला नव्हता, तेव्हा सोमिवर इतरांशी सावरकरांच्या गाण्याच्या बाबतीत झालेल्या चर्चेवरून सांगते आहे.
सुटकेनंतर सावरकरांनी हिंसक चळवळीला बळ का दिले नाही याबद्दल विचार करताना य. दि. फडक्यांनी मांडलेली एक इंटरेस्टिंग थिअरी आठवते. फडक्यांच्या मते ‘तरुणपणी अननुभवी सावरकरांनी चुका केल्या व त्यामुळे अंदमानात खितपत पडावे लागले. पण मुक्ततेची संधी मिळाल्यावर त्यांच्यासारखा चाणाक्ष माणूस कमालीचा सावध झाला. इंग्रज सरकार सुटका झाल्यावरदेखील त्यांच्याविषयी संशय बाळगून होते. पण शस्त्राचारी मार्गाने जाणाऱ्या लोकांना त्यांनी चिथावणी दिली किंवा मार्गदर्शन केले यासंबंधी कसलाही पुरावा इंग्रजांच्या हाती लागला नाही. वेळोवेळी घराची झडती घेणे, काही दिवस अटक करणे यापलीकडे इंग्रज काही करू शकले नाहीत.’
आज काल गांधी, नेहरू, सावरकर
आज काल गांधी, नेहरू, सावरकर वगैरे प्रभुतींवर अन्याय झाला हे सिद्ध होणे राजकीय गरज आहे. सावरकर वगैरे ना पूजनीय मानणाऱ्यांना जेट विमानाला लिंबू मिरची लावताना तात्यारावांनी पहिले असते तर जोड्यांची मारले असते. आणि गांधींचा वारसा सांगणाऱ्यांच्या भ्रष्टाचारातल्या लीला पहिल्या असत्या तर बापूजींना आजीवन उपोषण करावे लागले असते.
त्यामुळे अराजकीय लोकांनी या सगळ्याकडे आपल्यामध्ये ही भावना आणून राजकीय पक्ष काय सध्या करायचा प्रयत्न करतायेत हे विचारले पाहिजे. तुम्हाला पूजनीय वाटणाऱ्या व्यक्तींचा अपमान करतायेत किंवा तुम्हाला चांगले वाटेल असा बोलून राजकीय पक्ष आपला काय हेतू सध्या करतायेत हे आपण समजून घेतले पाहिजे. आपल्या आयुष्यात महत्वाच्या गोष्टींवरून लक्ष विचलित करण्यासाठीच्या हजार गोष्टींपैकी एक या पेक्षा याला जास्त महत्व द्यायची गरज वाटत नाही.
बाकी माणूस म्हणून पाहावे. माणसे चुका करू शकतात. सावरकर आणि गांधी दोघेही वेगळ्या परिस्थितीतुन आले होते. त्यांनी त्यांच्या काळात त्यांच्या परीने प्रयत्न केला. चुका देखील केल्या. त्याकडे तटस्थपणे पाहावे. प्रोपोगंडा ला बळी पडून आपण कोणाच्या कार्यक्रमात सतरंजीवाहक होणे टाळयाचा प्रयत्न करावा.
Well said Chidku!
Well said Chidku!
Pages