Submitted by दत्तात्रय साळुंके on 15 March, 2023 - 09:56
अंगणात वृंदावन
त्यात तुळस देखणी
वारीयाने पान हाले
विठ्ठलाचे संकिर्तनी
जरी बाबा परलोकी
येतो पहाटे उठोनी
प्रात:स्नान उरकोनी
घाली तुळसीला पाणी
मग जागतो मुकुंद
दारी वाजता मृदंग
बाबा नाचतो अंगणी
मुखी तुक्याचा अभंग
असे रोजचेच चाले
बाबा विठूसंगे डोले
बघताच तुळसीला
मन वारकरी झाले
पान तुळसा माईचे
बाबा प्रसाद सेवतो
दुःख सागर संसार
विठू पैलतीरा नेतो
तोच क्रम रोजचाच
परी उत्साह आगळा
तुळसीच्या वृंदावनी
वेणूनादी घननीळा
तेजोप्रभा वृंदावनी
कर्म कृष्णार्पण झाले
भोवताली तुळसीच्या
नित्य वैराग्य जागले
© दत्तात्रय साळुंके
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुःख सागर संसार
दुःख सागर संसार
विठू पैलतीरा नेतो
ज्यांना विठू भेटला त्यांचे जीवन पावन झाले.
आपण अजूनही कोरडे ...
उत्तम !
उत्तम !
वा वा! सुंदर.
वा वा! सुंदर.
सुंदर!!
सुंदर!!
क्या बात है! सुंदर कविता
क्या बात है! सुंदर कविता दत्तात्रयराव.
सुंदर आहे, सहसा तुळस/वृंदावन
सुंदर आहे, सहसा तुळस/वृंदावन म्हटलं की कवितेत आई असते म्हणून वेगळी आणि छान वाटली.
केशवकूल
केशवकूल
कुमार१
शर्वरी
सामो
ह.पा.
अस्मिता
आपणा सर्वांचे अनेकानेक आभार....
भक्तीमय कविता... छान रचना..!!
भक्तीमय कविता...
छान रचना..!!
सुंदर !
सुंदर !
सुंदर रचना.. शेवटच्या ओळीनं
सुंदर रचना.. शेवटच्या ओळीनं कळस चढवला आहे.
खुप छान कविता!!!
खुप छान कविता!!!
आंबा
आंबा
प्राचीन
sanjana25
रूपाली ताई
अनेकानेक धन्यवाद
छान
सुंदर
सुंदर !
सुंदर !
मन वारकरी झाले>>> आहा !
निवीदा हा.आ. खूप धन्यवाद....
निवीदा
हा.आ.
खूप धन्यवाद....