तालिबानची सुरुवात, अंत आणि उदय
तालिबानची सुरुवात  देवबंदी विचारधारेत झालेली आहे असे मानले जाते. ही  विचारधारा  १८६७ मध्ये दिल्लीच्या उत्तरेकडील देवबंदमध्ये उदयास आली. देवबंदी दृष्टिकोन हा काही बाबतीत सौदी अरेबियातील वहाबी पध्दतीच्या  विचारधारेसारखा होता. देवबंदी विचारानुसार, प्रत्येक मुस्लिमाने पैगंबर मुहम्मद यांच्या जीवन पद्धतीचे अनुकरण करावे असे होते. इस्लामिक दृष्टिकोनातून स्पष्ट केले आहे  की स्वतःच्या  धर्मावर निष्ठा ठेवणे हे प्रत्येक मुसलमानाचे मूलभूत कर्तव्य असून  स्वतःच्या   देशाशी निष्ठा ठेवणे  दुय्यम आहे. काही देवबंदी लोकांचा असा विश्वास होता की जगभरातील सर्व मुस्लिमांच्या संरक्षणासाठी जिहाद करणे  पवित्र कार्य  असून  हा  त्यांचा  अधिकार  आणि त्यांचे  कर्तव्य आहे. ही देवबंदी विचारधारा  वायव्य भारतात ( जो  प्रदेश   फाळणीनंतर  पाकिस्तानातं  गेला )  प्रसिद्ध झाली. त्यांनी अनेक उलेमा (इस्लामिक विद्वान) तयार केले जे विविध प्रकारच्या मुद्द्यांवर फतवे (कायदे) जारी करू शकत होते . समाजातील इस्लामी नियमांचे पालन करण्यावर उलेमा लक्ष ठेवतील आणि धार्मिक सिद्धांताचा कठोर आणि पुराणमतवादी पद्धतीने अर्थ लावतील असे या विचारधारेत ठरले.
पाकिस्तानला १९४७  मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानचे संपूर्ण  इस्लामीकरण करण्याच्या मोहिमेत अनेक धार्मिक गटांनी भाग घेतला.सुरुवातीच्या काही  गटांनी  आपल्या कल्पना सैय्यद अबुल अला मौदुदी यांच्या  १९२०  च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या   जिहाद इन इस्लाम या  पुस्तकातून  घेतल्या  .मौदुदी यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य आणि  त्यांचे  पूर्वज   सूफीआध्यात्मिक  आदेशांचे पालन  करणारे  होते.  मौदुदी, एक पत्रकार होते  आणि  त्यांचा   जन्म १९०३  मध्ये भारतात झाला. ते   मुस्लिम आणि अल-जमियतसह भारतीय वृत्तपत्रांसाठी लिहित असत.  शरिया कायदा समाजात लागू करावा आणि अल्लाहच्या नावाने सार्वभौमत्वाचा वापर करावा असे आवाहन मौदुदींनी केले. राजकारण हा "इस्लामचा  अविभाज्य भाग आहे आणि इस्लामिक राज्य बनवणे हा त्यांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे," असे त्यांनी लिहिले.
मौदुदीसाठी, इस्लामची पाच प्राथमिक तत्त्वे - शहादा (श्रद्धा ), सलात (प्रार्थना), स्वाम (रमजान दरम्यान उपवास), हज (मक्का तीर्थयात्रा), आणि जकात (भिक्षा देणे) - जिहाद शिकण्याचे प्राथमिक टप्पे होते. इस्लामिक क्रांतीचा अग्रदूत म्हणून मौदुदीनी जिहाद करण्यासाठी १९४१ मध्ये जमीयत-ए-इस्लामीची स्थापना केली. पक्षाच्या सदस्यांनी इस्लामी कायद्याद्वारे शासित इस्लामिक राज्य स्थापनेची बाजू मांडली. त्यांनी भांडवलशाही आणि समाजवाद पद्धतीच्या शासन व्यवस्थेला पाश्चात्य पद्धतीचे सरकार म्हणून विरोध केला.
जमात-ए-इस्लामी तसेच अनेक राजकीय पक्षांनी देवबंदीचे हित कसे होईल या कडे  लक्ष दिले.
 देवबंदी समाजाचा एक विभाग,जमियत उलेमा-ए-इस्लाम, मुख्य पक्षात सामील झाला  होता. या पक्षाची स्थापना १९४५  मध्ये झाली आणि हा सर्वात मोठा देवबंदी पक्ष ठरला .काही काळानंतर  या  गटाचे  दोन  मुख्य  भाग  झाले (१) जमियत उलेमा-ए-इस्लाम(F) आणि  (२)जमियत उलेमा-ए-इस्लाम.  ते  अनुक्रमे   मौलाना फजलूर रहमान आणि मौलाना सामी उल हक यांच्या नेतृत्वाखाली होते. १९व्या शतकाच्या अखेरीस, पाकिस्तानने काश्मीर आणि अफगाणिस्तानातील अतिरेकी इस्लामिक गटांना पाठिंबा देण्यासाठी तसेच पाकिस्तानातील शियांचा मुकाबला करण्यासाठी देवबंदी कट्टरतावादाला प्रोत्साहन दिले. याव्यतिरिक्त, देवबंदींना सौदी अरेबिया  कडून  येणाऱ्या   निधीचा बराच  फायदा झाला कारण सौदी अरेबिया मदरशांच्या उभारणीसाठी सढळ  हाताने  मदत  करत  होते . स्वतःच्या अभिव्यक्तींमध्ये हिंसा वापरून   समाजात  वावरणाऱ्या  आणि  अशा   तर्हेने   प्रगती  करू  इच्चीणाऱ्या  तरुणांना प्रमुख देवबंदींनी सक्रियपणे स्वीकारले.या काळात देवबंदी मदरशांची भरभराट झाली परंतु  त्यांना अधिकृत  रित्या मंजुरी किंवा पाठिंबा मिळत  नव्हता. मौदुदीवर  खास  मर्जी  असणारे   पाकिस्तानचे  मुहम्मद झिया-उल-हक जेंव्हा राष्ट्रपती झाले तेंव्हा  देवबंदी मदरशांना अधिकृत  मंजुरी  मिळाली.झिया  यांच्या   हुकूमशाहीत  शरिया कायद्याची    अंमलबजावणी आकाराला आली. त्यांनी इस्लामाबादमध्ये १९८०  साली   आंतरराष्ट्रीय इस्लामिक विद्यापीठ उभे केले. या  विद्यापीठात   वहाबी आणि मुस्लिम ब्रदरहुड यांच्या  चर्चा  होऊ  लागल्या . झिया यांनी जमीयत-ए-इस्लामी पक्षाला   मंत्रिपदाची जबाबदारी देऊन  इस्लाम धर्माची, अधिकृत राज्य विचारधारा म्हणून अंमलबजावणी करण्यासाठी बरीच मदत केली. अस्तित्वात  असलेल्या   कायद्यांचे पुनरावलोकन आणि मूल्यमापन शरियत कायद्यानुसार  नुसार करण्यात आले, शारीरिक शिक्षेसह दंड संहिता (Penal  Code) स्थापन करण्यात आली आणि शिक्षणाचे   इस्लामीकरण करण्यात आले.याव्यतिरिक्त, झिया सरकारने रमजानच्या काळात  जकात आकारणी  करण्याकरता   बँक खात्यांवर दरवर्षी २.५  टक्के कर लावला ज्या मुळे धर्मादाय देणगीला   कायदेशीर दर्जा मिळाला. या  पूर्वी, बहुतेक मुस्लिम देश अशा  देणगीला   खाजगी बाब मानत  असत  मदरशांना निधी देण्याव्यतिरिक्त, जकातचा उपयोग उलेमांना पाठिंबा देण्यासाठी केला जात होता, त्यापैकी बरेच उलेमा  देवबंदी चळवळींचे कार्यकर्ते  होते. झिया सरकारने अफगाण आणि पाकिस्तानी तरुणांना इस्लामचे नियम शिकवण्यासाठी, त्यांना सोव्हिएतविरोधी जिहादसाठी तयार करण्याकरीत   अफगाण सीमेवर मदरसे उभारली. १९७९   मध्ये अफगाणिस्तानवर रशियाचे  आक्रमण झाल्यानंतर   सोव्हिएत सैन्याविरोधात  जिहाद पुकारला  गेला  त्यामुळे   देवबंदी आणि इतर अतिरेकी गट आणखी कट्टर बनले. या  जिहादने भविष्यातील अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली  .याव्यतिरिक्त, पाकिस्तानच्या आयएसआयने   त्याच्या क्षेत्रीय धोरणांचा पाठपुरावा करण्यासाठी या  जिहादला   मदत केली   होती. आयएसआयने शेकडो प्रतिकार गटांपैकी अर्ध्या  अधिक  गटांना पाठिंबा  देऊन  त्यांच्यासाठी गुप्त  कार्यालय स्थापन केले होते . बहुतेक गट  कट्टर  धार्मिक होते तर काही  गट वांशिकतेवर आधारित होते. वांशिकतेवर आधारित सात जमांतींपैकी तीन जमातींचे नेतृत्व घिलझाईं जमातीने  केले होते. घिलझाईं जमातीचे विरोधी असणाऱ्या  दुर्रानी जमातीला आयएसआयने मुद्दाम उपेक्षित केले होते. १९७९ च्या इराणी क्रांतीनंतर इराणी सरकारने  पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील शियांचा  वापर करून आपल्याला हवे तसे वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली ज्या मुळे  पाकिस्तान सरकार चिंताग्रस्त झाले. पाकिस्तानमधील  शिया जमातीला धमकी देण्यात आली. १९८५  मध्ये सिपाह-ए-सहबा-ए-पाकिस्तान (पाकिस्तानमधील पैगंबराचे सैनिक) नावाचा   एक देवबंदी अतिरेकी गट स्थापन करण्यात आला, ज्याने सर्व शियां हे  काफिर आहेत  असे  म्हंटले   आणि त्यांच्यावर अनेक हल्ले केले. आर्मी ऑफ झांगवी (लष्कर-ए-झांगवी) हा आणखी एक गट  तयार झाला आणि त्यांनी  शियांच्या विरोधात जिहाद पुकारला. १९८२  ते  १९८८ पर्यंत झिया-उल-हक यांनी   राष्ट्रपती म्हणून काम केल्यानंतर, अमेरिकेचे राजदूत अर्नोल्ड राफेल आणि पाकिस्तानमधील पेंटागॉनचे वरिष्ठ अधिकारी जनरल हर्बर्ट वासोम यांच्यासह ते एका रहस्यमय विमान अपघातात ठार झाले.
क्रमशः
 
 
>>दोन मुख्य भाग झाले (१)
>>दोन मुख्य भाग झाले (१) जमियत उलेमा-ए-इस्लाम(F) आणि (२)जमियत उलेमा-ए-इस्लाम. << ???
>>दोन मुख्य भाग झाले (१)
>>दोन मुख्य भाग झाले (१) जमियत उलेमा-ए-इस्लाम(F) आणि (२)जमियत उलेमा-ए-इस्लाम. << ??? F for Fazloor. Just like Congress ( I ) and Congress.
जगात ज्या ज्या देशात कट्टर
जगात ज्या ज्या देशात कट्टर धार्मिक सरकार सत्तेवर आहेत त्या देशातील लोकांची अवस्था अत्यंत बिकट आहे.
पाकिस्तान,बांगलादेश,आता अफगाणिस्तान ह्या देशात एक धर्मीय आहेत ,
कट्टर धार्मिक सत्तेवर आहेत ह्या देशात लोकांची अवस्था अत्यंत बिकट आहे.
गरिबी मध्ये सडत आहेत हे देश.
दुबई,सौदी हे पण मुस्लिम देश आहेत पण सर्व समावेशक आहेत.जगातील सर्व देशातील लोक तिथे आहेत.
अतिशय समृद्ध जीवन तेथील जनता जगत आहे.
भारतात कट्टर हिंदू वादी BJP सत्तेवर आहे लोकांची आर्थिक स्थिती खराब झाली आहे.
धार्मिक कट्टर वाद सामान्य लोकांच्या बिलकुल हिताचा नाही
सस्या सारखे कमजोर आणि अतिशय
सस्या सारखे कमजोर आणि अतिशय भित्र्या लोकांना कट्टर वाद का आवडतो हे
मात्र समजत नाही.
कारण कट्टर वादाला समर्थन करणारे हे कमोजोर लोक असतात.
म्हणून तर त्यांच्या वर कट्टर वादी सत्ता गाजवता त.