शेतकरी आमचा बाप
कधी राहिल टिपटाप ?
आज सगळ जग डेवलप होतय ,
इमान अण राकेटात बसुण आभालाळा गवसणी घालतय ,
अशा या बदलत्या काळात रात्रीचं पण येगळच विश्व सुरू होतय |
तरी माझा शेतकरी बाप अजुन मातीतच घाम गाळतोय ,
रात्रीच पाणी द्यायला इच्चुकाड्याची सोबत घेतोय,
दिवसा ना त्याला उन्हाचा ताप ना रात्रीची त्याला झोप ||
असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ?
मोठाले यापरी ब्यांकीची हाजारो कोटी बुडवतात,
देश सोडुन पळुन जातात न देश खड्ड्यात घालुन मजा मारतात |
पन बी अन् खतासाठी घेतलेले पन्नास हाजार
न फेडता आल्या मुळे तो स्वाभीमानी घेतो गळफास, ||
त्याला होती एकच आस माझ पिक येईन खास ,
अन् सार्या जगाच्या पोटात जाईल सुखाचा घास |
आज तोच झाला खाक अन् त्याची स्वप्न झाली राख,
आज पोर त्याच पोरक कोण देईल त्याला खुराक ||
पाणी नव्हत त्याच्या आडात तरी शेती केली जोमात,
शेवटी अवकाळी आला अन् तोंडातला घास घेउन गेला,
हाच तो सुखाचा घास नाही आज त्याच्या पोराच्या पोटात |
त्याच्या या पोराला आता कोण देइल पाठीवर थाप,
असा हा शेतकरी बाप कधी राहिला नाही टिपटाप ||
टिप:
ही माझी पहीलीच कविता आहे जस सुचल तस लिहल चु.भू माफ असु द्या, काही चुका असतिल तर मोठ्या मनाने सांगा.
वास्तवदर्शी कविता आहे.
वास्तवदर्शी कविता आहे. शेतकऱ्याची व्यथा ज्यांनी शेतात काम केलयं तेच जाणू शकतात असं मला वाटतं.
छान
छान
@रुपाली पाटिल,, @गणक धन्यवाद
@रुपाली पाटिल,, @गणक धन्यवाद