२०२४ पंतप्रधान कोण असेल

Submitted by कटप्पा on 8 June, 2019 - 10:31

मित्रानो, २०१९ निवडणुका संपल्या आहेत आणि जनतेने भाजपा ला भरभरून मते दिली आहेत
विरोधी पक्षाकडे चांगले नेतृत्व नसल्यामुळे मोदींचा एकहाती विजय झाला. भाजपा चे काही निर्णय लोकांना पटले नाहीत पण भारतासारख्या देशाचे भविष्य समोरच्या माणसाच्या हातात देणे म्हणजे खूप मोठी चूक ठरली असती हे जाणून लोकांनी कल दाखवला. वाईट आणि आणखी वाईट मधून काय निवडणार?
२०२४ मध्येही भाजपा सत्तेत येईल हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्या वेळी पंतप्रधान कोण असेल?
परत एकदा मोदीच ?
की शाह किंवा गडकरी यांना संधी मिळेल?
की योगी किंवा साध्वी?

सांगा अंदाज।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मी आधी सुचविल्याप्रमाणे पकोड्याला ओलान्डुन पुढील चर्चा करा. रस्त्यावरची घाण चुकवायची असते, तिच्यावर दगड मारायचा नसतो.

कहां गये वो लोग असा धागा काढायची वेळ आली आहे

2014 ला जागता पहारा असा धागा काढला होता ज्याच्या चिंध्या झाल्या, आता घाबरा शहारा असा धागा काढा म्हणावं

मी चुकून घागरा छरारा वाचले Lol
जाळीदार टोपी झाली
सदऱ्यावर जानवे झाले
आता हेच २ आयटम शिल्लक आहेत तेही हौसेने करून घ्या म्हणावे पूर्ण लगोलग २०२४ पर्यन्त Wink

2014 ला जागता पहारा असा धागा काढला होता ज्याच्या चिंध्या झाल्या, आता घाबरा शहारा असा धागा काढा म्हणावं
Submitted by बेफ़िकीर on 11 June, 2019 - 10:30
<<

Lol

तो अड्डा कि कोणतातरी धागा होता, तो मे २३ च्या आधी पर्यंत 'माझ्यासाठी नवीन' मधे नेहमी दिसायचा. मात्र मे २३ नंतर तो धागा अक्षरश: ओस पडला आहे. त्या धाग्यावरचे मेंबर कुठे पसार झालेत हेच कळायला मार्ग नाही तर 'जागता पाहारा' कोण काढणार !

एक पकोडावाला नामक डमी मेंबर इथे ठेवला आहे त्यांनी, मात्र ह्या पकोड्याच्या क्षमते बाहेरच काम आहे जागता पहारा देण्याचे, बिचारा पकोडे विकेल की पहारा देईल.

गिरण्या उठला भज्याच्या ठेल्यावर गेला .भजे खात भाजपला शिव्या देऊ लागला. भज्यावाला आधीच भंजाळेल व्हता. तो बी याची री ओढू लागला. तिकडून इकडे एक काळाबोका उड्या मारीत व्हता. तो भज्यावाल्याने पाळेल व्हता. बाजूला टोणगा चरत व्हता. भरत नावाचा पोऱ्या फडकं मारीत व्हता. पाऊस आल्याने त्यांच्या चर्चेत व्यत्यय आला. संध्याकाळी डीजे लावून पार्टी करू असा बेत त्यांनी केला.
संध्याकाळी डीजे लावून गांजा मारून गावठी पाच्ची वढून भाजपच्या नावानं शिमगा करायला लागले.
पोलिसांना कुणीतरी खबर दिली. पोलिस आले नि यांच्या पार्श्वभागावर काठीचे निबार फटके दिले.
दुसऱ्या दिवशी गिरण्या ठेल्यावर आल्यावर भजेवाल्यानं त्याला झाऱ्यानं झोडलं.

>>> काहिहि झाले की जातीपातीवर येणार चड्डी. दुसरे डोक्यात येतच नाहि याच्या, आरक्षणाची थापेबाजी केलीच आहे धनगरांना , आता अपमानहि करायला लागला हा ! >>>

अरेरे, घाव खूप खोलवर गेलेला दिसतोय. पण घाबरू नकोस. धनगराच्या जडीबुटीने बरं वाटेल. किंवा एखाद्या युनानी हकिमाकडून सेक्युलर औषध घे.

पण उपचार सुरू ठेव. २०२४ च्या निवडणुकीपूर्वी बरं व्हायला पाहिजे. पप्पूचा प्रचार करायचाय ना.

चड्ड्या आल्या पिंका टाकत टाकत !
मोदीला खुप सारे मेंटल होस्पिटल बनवावी लागणार आहेत. सगळ्या चड्ड्यांना टाकयला. Proud

मोदींच्या दणदणीत विजयामुळे व पप्पूच्या दारूण पराभवामुळे सांगता येत नाही व सहनही होत नाही अशी मोदीद्वेष्ट्यांची अवस्था झालीये. हे आता ५ वर्षे सहन करावे लागणार आहे. कुरुंदवाडचा धनगर किंवा एखादा युनानी हकीम किंवा गजानन विनायक कागलकरच यावर उपचार करून आजाराची तीव्रता कमी करू शकेल.

५ बर्षे काय, २५ वर्षे सोसावे लागणार आहे, आत्ता जे उड्या मारत आहेत त्यांच्या आधी खाकी असलेल्या चड्द्या पिवळ्या झाल्या तरी मोदी पाणीहि देणार नाहि धुवायला.

आता हेच २ आयटम शिल्लक आहेत तेही हौसेने करून घ्या म्हणावे पूर्ण लगोलग २०२४ पर्यन्त

लोकहो, हा वक्ष म्हणतो त्यात तथ्य वाटते का ?

2024 चा पेशवा कुणी का असेना, काय फरक पडणार आहे ?

पर्वा मोदीजी बोलले, नेहरूंच्या मार्गावर चालू,
काल योगीजींनी उर्दू युनिव्हर्सिटीला मोठा भूखंड दिला,
गोरक्षकाकडून लिंचिंग होण्याविरोधात शहा नवीन कायदा तयार करणार आहेत.

आता साध्वीने कॉन्व्हेंट स्कुलचे उद्घाटन करताना, रविवारी चर्चला गेले की बीपी कमी होतो , असे भाषण दिले की झाले,

तुम्ही नाचा, काँग्रेसमुक्त भारताच्या नावाने, तुम्हाला मोहराचा सुनील शेट्टी बनवून तुमचा नेपाळी गुरखा सगळ्या मायाबाजारचा नसिरद्देन शहा बनला आहे,
( हायला, त्यात देखील तो नसीहृददिन बायकोला ढकलून उच्च पद मिळवतो. !)

नवीन Submitted by BLACKCAT on 29 June, 2019 - 23:18 >>

भाऊ तुमचा खूपच तिळपापड झालेला दिसतोय, शांत व्हा, 2024 यायला आणखी 5 वर्षे आहेत. तोपर्यंत तीळपापडाचा कोळसा होऊ देऊ नका.

२०१९ ची निवडणुक ही शेवटची निवडणुक असेल असे सगळे बोलले होते>>> Being a former Union Minister, a Chief Minister and a veteran Congress party member, we should not accept Pruthviraj Chavhan's this comment as gospel truth. Ask all opponents of Modi and they will say the same thing without any convincing argument or proof.

यावेळेस काँग्रेस व इतरच जिंकणार, भाजपचा दणदणीत पराभव होणार असे काँग्रेसच्या अध्यक्षांपासून सगळे जण म्हणत होते हेही वाचलेय. सो सगळ्या बातम्या आपल्याला झेपेल इतके मीठ टाकून वाचाव्या.

ज्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी BJP la मदत केली आहे त्यात कार्यकर्ते असतील,उद्योगपती असतील ,पत्रकार असतील,गुंड असतील,नेते असतील .
त्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला द्यावाच लागेल आणि तो देताना जनहिता चा बळी सुद्धा द्यावा लागेल .
नेहमी विजयी पक्षा बाबत असेच घडते त्या मुळे bjp बाबतीत सुद्धा हेच घडण्याची शक्यता आहे .
जनहित न झाल्यामुळे bjp २४ ला निवडणूक हरू शकते .
फक्त भावनिक प्रश्न म्हणजे हिंदुत्व,पाकिस्तान ह्यांच्या पुढे जनहित ला जास्त किंमत मिळणार नाही

<< यावेळेस काँग्रेस व इतरच जिंकणार, भाजपचा दणदणीत पराभव होणार असे काँग्रेसच्या अध्यक्षांपासून सगळे जण म्हणत होते हेही वाचलेय. सो सगळ्या बातम्या आपल्याला झेपेल इतके मीठ टाकून वाचाव्या. >>
------- कट्टर भाजपा समर्थकाला पण ते सपाटून मार खाणार असेच वाटत होते.... " मोदी शहा" यांच्यावर आणि त्यांच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवा. ते सर्व व्यावस्थित करतील... अजुन पुढची ३० वर्षे चिंता करु नका...

विकासासोबत आता जनतेचा विश्वासही मिळवायचा आहे... खोटे वागायचे नाही, खोटे बोलायचे नाही...

कट्टर भाजपा समर्थकाला पण ते सपाटून मार खाणार असेच वाटत होते। >>

आयला कायच्या काय लिहायला लागलेत हे लोक ! पराभवाचा खूप खोलवर परिणाम झालेला दिसतोय..

>>>>>>>>>कुरुंदवाडचा धनगर किंवा एखादा युनानी हकीम किंवा गजानन विनायक कागलकरच यावर उपचार करून आजाराची तीव्रता कमी करू शकेल.<<<<<<<<<

गजानन विनायक कागलकरलाच उपचाराची गरज आहे तो काय कुणाचा उपचार करणार ?

Pages