सोशल मीडीयात ट्रोल्सना का फटके पडताहेत ?

Submitted by थॅनोस आपटे on 16 December, 2018 - 06:52

मोदी, केजरीवाल आणि बाबा रामदेव यांनी ट्रोल्सची फॅक्टरी काढली. बनावट आयडीजने शिवीगाळ, फोटोशॉप, खोट्या बातम्या, तथ्यहीन भडकाऊ संदेश यांच्या सहाय्याने वातावरण निर्माण केले गेले. पुढे तिघे वेगवेगळे झाले. यांना सेवा देणा-या कंपन्या सामाईक होत्या. वेगवेगळे झाल्यानंतर यांचे वेगवेगळे अजेण्डे ते जपत बसले.

साधारण दीड दोन वर्षे त्यांनी सोशल मीडीयावरून एक लाट निर्माण केली. याचा फायदा तिघांनाही झाला. त्या आधी संघी ट्रोल्स होतेच सोशल मीडीयावर. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर झुंडीने फिरताना त्यांना पाहीले नाही. स्तर तोच होता. ना कम ना जादा. यांना ट्रेनिंग देणारेच ट्रोल्सना ट्रेनिंग देत असावेत इतका यांचा अजेण्डा सेम होता. नंतर अनेक नेत्यांना विविध पोर्टल्सवर सर्रास शिवीगाळ सुरू झाली. महिलांचा फक्त अनादरच नाही तर उघडपणे रंडी म्हणणे, बलात्काराच्या धमक्या देणे हे पहायला मिळाले.

मोदींच्या विजयानंतर कुठेतरी अंथरूणात लोळणारे पुरोगामी सोशल मीडीयात येऊ लागले. त्यांनी सावकाश हा अपप्रचार खोडून काढायला सुरूवात केली आणि त्यांना प्रतिसाद मिळू लागला. सुरूवातीला ट्रोलधाडीचा त्यांना त्रास झाला. काही वेळा घाऊक रिपोर्टिंगने आयडी उडवणे असे प्रकारही झाले. पण नंतर या ट्रोल्सकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्या पातळीवर न उतरता फक्त मुद्यांना उत्तरे देणे यामुळे पुरोगाम्यांच्या विरोधात फेसबुक इंडीयानेही सबुरीचे धोरण घेतले. सुरूवातीच्या चुका होऊ दिल्या नाहीत.

त्यामुळे ट्रोल्सची अवस्था बिकट झाली. दोनच वर्षात ट्रोल्स फेसबुकवरून नाहीसे झाले. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप कडे मोर्चा वळवला. तिथे दुतर्फा संभाषण नाही. अजून तरी पुरोगाम्यांनी व्हॉट्सअ‍ॅप कडे पाहीलेले नाही. मात्र फेसबुक सारख्या समाजमाध्यमात आता ट्रोल्स ना फटके पडताना दिसताहेत. त्यांचे तेच तेच मुद्दे (जे कधी काळी नवीन असल्याने गडबडून टाकत) आता घासून गुळगुळीत झालेले आहेत. ज्याप्रमाणे भाजपच्या ट्रोल्सना फटके पडताहेत त्याचप्रमाणे मध्यंतरी काँग्रेसनेही एडीटेड व्हिडीओज आणि फोटोजचा सहारा घेतला. त्यांनाही फटके पडले.

भाजपच्या असत्य प्रचाराची पिसं निघताहेत. गोबेल्सनीती + दंगली + ध्रुवीकरण एकीकडे आणि दुसरीकडे मिथ्य विकासाच्या बाता या समीकरणाच्या चिंधड्या उडताना दिसताहेत.

एकंदरीत ट्रोल्सना फटके पडणे हे त्यांच्यासाठी अच्छे दिन आले असे म्हणता येत नाही.
अजून काय कारणे असतील ट्रोल्स नाहीसे होण्याची ?

Group content visibility: 
Use group defaults

ट्रोल्सना ट्रोल हे नाव मिळण्यापासून ते भारतात अस्तित्वात आहेत,
संघी कुजबुज ब्रिगेड होतीच की,
कुजबुज करणाऱ्या माणसाच्या विश्वाअर्हतेवर हा प्रकार धकुन जायचा, वरती इंटरनेट नसल्याने बातम्या सहज सहजी खोडता येत नसत, गांधींचे मूळ, इंदिरेने कुणाचा कसा अपमान केला, सोनिया गांधी बद्दल चे प्रवाद, हे सगळे असेच पद्धतशीर पसरवले गेले आहे. 26 jan परेड मध्ये RSS चा सहभाग हा सर्वात यशस्वी हल्ला म्हणावा लागेल.

ट्रोल्सना फटकवले गेलेच पाहिजे पण त्या फटकवण्याच्या उन्मादात आपण स्वत: देखील एक प्रकारचे ट्रोलींगच करतोय हे लोकांना कळेल तो सुदिन!

आपला एकंदर सोशल मिडीयावरचा वावर काय प्रकारचा आहे हे जरा प्रत्येकाने एकदा स्वताशीच ताडून बघावे!

सार्वजनिक निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसा ट्रोल्स चा प्रादुर्भाव वाढेल.
नवीन Submitted by जावेद_खान on 16 December, 2018 - 18:10
<<

सार्वजनिक निवडणुका व ट्रोलिंगचा काही संबध असावा असे मला तरी वाटत नाही. फक्त या धाग्यावर एकदा नजर टाका, एका बहुसंख्यकांच्या धर्माबद्दल व एका राजकिय पक्षाची व एका सांस्कृतिक संघटनेची २४*७ ट्रोलिंग सुरु असते.

एका बहुसंख्यकांच्या धर्माबद्दल
<<
Lol बहुसंख्यांक आहेत ते सगळे तुमच्यासारखे अंधभक्त हिंदुत्ववादी आहेत का? अन तिथे तुम्हाला ह २४*७ आहेर देणारे कोणत्या अल्पसंख्यांक धर्माचे आहेत?

रच्याकने. ते हिंदू नावही बदलायचं बघा जमलं तर. सनातन धर्म वगैरे पहा. कारण हिंदू हा शब्दच मुळात बाहेरचा आहे. तसाच हिंदूस्थानही.

ट्रोल्स ना फटके पडत नसतील तर "का पडू नयेत?" असा धागा समजू शकतो.
पण "का पडत आहेत?' या धाग्याचे प्रयोजन काही कळले नाही.
बहुतेक माबुदो.

फक्त या धाग्यावर एकदा नजर टाका

>>

दोनदा नजर टाकली. एकद उकिरडा समजून आणि आज परत. त्या धाग्यावर माझ्यामते तरी कुठल्याच धर्माबद्दल किंवा (सांस्कृतिक) संस्थेबद्दल चर्चा नाही. बहुतेक तुमचा काही तरी गैरसमज होतोय, किंवा त्या धाग्यावरील सभासदांबद्दल तुम्ही अगोदरच तुमचं मत बनवून ठेवलंय. कोणत्याही धर्माला शिव्या घातलेलं मला ही आवडत नाही, पण उगाच ते हिंदुराष्ट्र, हिंदू जागा हो वगैरे वगैरे दिसलं कि डोक्यात जातं.

<<<ते हिंदू नावही बदलायचं बघा जमलं तर.>>>
अगदी निराळ्या कारणासाठी प्रचंड अनुमोदन.
हा शब्द हिंदू आला कुठून? आपल्या जुन्या वेद पुराणांत, उपनिषदात कुठेहि नाही. उगाच कुणि परकीय लोकांनी हा शब्द काढला नि आपण तो मानला!

ऑSSS अहो नंदया तुम्ही आधी मोड बदलायचं बघा.
परकीय लोकांनी आणलं म्हणजे ते भारीच असणार आणि भारतीय ते फॉलो करणार ना??? Proud

उघड उघड ट्रोल्स परवडले. पण तटस्थ म्हणवून घेणारे आणि उजवीकडे सांडलवंड करत मॉबलिंचींग सहीत सगळ्या घटनांवर मिठाची गुळणी धरणारे उघडे पडलेत. सुरूवातीला फसले लोक पण सोंग उघडे झाल्याने आता फार वाईट दिवस आले आहेत अशांना.

ते एक आपले संतुलित होते ना? नाना पाटेकर सारखे तूही चांगला, तूही चांगला , तू तर चांगलाच चांगला. असे म्हणायचे. त्य्यम्ची नंतर पक्षी-प्राणी युद्धातल्या घुबडा सारखी स्थिती झाली...

समजलं. पण ते ट्रोल नव्हते. त्यांना राजकीय भूमिका होती. मात्र ते राजकीय धाग्यांपासून दूर होते. नंतर तर मतंही बदलत गेली त्यांची.

स्वत: ट्रोलिंग करणार्‍यांनी दुसर्‍यांना ट्रोल म्हणून धागे काढावे याची गंमत न वाटता आता कीव वाटते.

राफेलच्या धाग्यावरच्या लेखकाच्या या कॉमेंटनंतर माझ्या कीव येते या बोलण्याचा अर्थ सर्वांनाच व्यवस्थित कळला असेल अशी अपेक्षा आहे.
नसेल, तर ग्रो अप!

आर्मीत नवे पद
ट्रोलकर्नल
भक्तकर्नल

Submitted by मेरीच गिनो on 16 December, 2018 - 17:47

स्वत: ट्रोलिंग करणार्‍यांनी दुसर्‍यांना ट्रोल म्हणून धागे काढावे याची गंमत न वाटता आता कीव वाटते.
Submitted by रिव्हर्स स्वीप on 16 December, 2018 - 22:15
<<

इतरांचे ट्रोलिंग करताना, त्यांना देखील कुणीतरी जोरदार फटके दिले असावेत व
त्याचाच राग त्यांनी हा धागा काढून इथे व्यक्त केला असावा. Proud

यशवंत सिन्हा, अरुण शौरींच्या मुद्द्यांत दम नाही कारण त्यांना मंत्री न केल्याने ते बिथरलेत.
राहुलच्या मुद्द्यांत दम नाही कारण त्याला अक्कल नाही.
पृथ्वीराज चव्हाणांच्या मुद्द्यांत दम नाही कारण ते माझ्या नावडत्या राहुलच्या पक्षात आहेत.
इतकं मुद्देसूद लिहिणार्‍या व्यक्तीला ट्रोल आणि भक्त म्हंटलं तर कीव आलीच पाहिजे.

नवीन Submitted by भरत. on 17 December, 2018 - 11:40
>>

यशवंत सिन्हा, अरुण शौरींच्या मुद्द्यांत दम नाही कारण त्यांना मंत्री न केल्याने ते बिथरलेत.
<<
या दोघांच्या मुद्द्यात जर दम असता तर सुप्रिम कोर्टात तोंडघशी पडायची वेळ यांच्यावर आली नसती. फक्त पंतप्रधान मोदींबाबत असलेली असुया व केंद्रात मंत्रीपद न मिळाल्याने सध्या "महा ठग" बंधनांतील नेत्यांबरोबर यांची नौटंकी सुरु आहे.
--
राहुलच्या मुद्द्यांत दम नाही कारण त्याला अक्कल नाही.
<<
हे अगदी खरे आहे.
असल्या बेअकली माणसाच्या कोणीही नादाला लागणार नाही.
---
पृथ्वीराज चव्हाणांच्या मुद्द्यांत दम नाही कारण ते माझ्या नावडत्या राहुलच्या पक्षात आहेत.
<<
एका बाईच्या तालावर नाचणार्‍या व सत्तेत असूनही "लोकांचा हात सही करताना लकवा लागल्याप्रमाणे थरथरतो. ... बरोबर जायचे आहे म्हणून आम्ही काही बोलत नाही" अश्या शब्दात, त्यांच्याच मित्रपक्षाच्या सर्वौच्च नेत्यांने ज्यांची संभावना केली अश्या माणसाच्या मुद्द्यात दम असणार तो कीती ! फक्त पप्पू गांधीचा सर्वौत्तम भाट हे बिरुद मिरवण्याकरता त्याच्या हो ला हो मिळवत असतो.

इतरांचे ट्रोलिंग करताना, त्यांना देखील कुणीतरी जोरदार फटके दिले असावेत

-- अनिरुद्ध च्या मागे लपलेली व्यक्ती स्वत:चादेखील अनुभवसांगत आहे बहुतेक.. Rofl

एका बाईच्या तालावर नाचणार्‍या --- अरे रे किती हि हीन पातळीची भाषा... शाखेत हेच शिकवतात ना?
नवीन Submitted by हेला on 17 December, 2018 - 12:10
<<
त्यात काय हिन भाषा ?
या देशातील कॉंग्रेसचा एक तरी नेता आधी सोगा व आता रागा यांच्या परवानगी शिवाय, स्वत:च्या बुद्धीने एकादा तरी निर्णय घेऊ शकतो काय? आणि जी माणसे स्व:बुद्धीने कोणता ही निर्णय घेऊ शकत नाहीत त्यांना इतरांच्या तालावर नाचणारे असेच म्हणतात.
-
जेंव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेंव्हा कॉंग्रेस अध्यक्षपदी सोनिया गांधी होत्या, म्हणून "एका बाईच्या तालावर नाचणार्‍या"असे म्हटले तेंव्हा रागा अध्यक्ष असता तर "'एका अर्धवटाच्या तालावर नाचणार्‍या" असे म्हटले असते.

पेड ट्रोल्सना विशेषणं वापरण्याचे जादा पैसे मिळत असावेत.

राकुंकडचा विशेषणांचा स्टॉक संपलासुद्धा.

Pages