Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे
"शर्मिष्ठा राऊत"
'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आयाया..
आयाया..
जरा तरी लाज बाळगा!
एवढी इज्जत काढल्यावर तरी सुशा शेलार सुधारला का बघा..
एक नंबरचा माजोर्डा, स्वतःचीच लाल म्हणवणारा, रेराचा चमचा आणि वर म्हटल्याप्रमाणे एमसीपी आहे..
आज एक वेळ जुई राहिली तरी ठीक पण सुशा जायला पाह्यजे.
नळावरची भांडणे मारामार्या
नळावरची भांडणे मारामार्या करणारे आधी आपण काय झोपडपट्टी टाईप म्हणून हिणवत होते!
आता बंद केले जागरण करून बघणे! अत्यन्त टाकावू शो...
सॉरी, अवांतर आहे, पण अलीकडे
सॉरी, अवांतर आहे, पण अलीकडे माबोवर इतर कुठल्याच मालिकांवर धागे चालू नाहीत का? नवीन चित्रपटांचे रसग्रहणसुद्धा येत नाहीय. आता राझी इतका सुंदर चित्रपट, पण त्यावर धागा नाही. माबो थंड पडल्यासारखी वाटतेय.
ह्यावेळी रे रा पैकी कोणीतरी
ह्यावेळी रे रा पैकी कोणीतरी पडायलाचं हवं बाहेर, खरं खुरे, नो सिक्रेट रूम. रा चं पडायला हवाय. रे रा सुशांत आता पहिले बाहेर जायला हवेत कायमचे.
मामी मला पण प्रदीप भिडे यांचा
मामी मला पण प्रदीप भिडे यांचा आवाज वाटला पण पहिल्यापासून नाही, हल्लीचं strike झालं.
राजेश आणि सुशांत यांना खरं म्हणजे उद्या काढून टाका, अगदी खालच्या लेवलला जाणारे आहेत.
राजेश बद्दल डीजेला +१११ सांड
राजेश बद्दल डीजेला +१११
करेक्ट आहे.
सांड! दुर्योधन ..
त्याचा गैरसमज झालेला आहे की कुस्तीने सर्व टास्क जिंकता येतात. तो तसे रेशम ला म्हणत पण होता काल. रेशम पण तू खेळ रे तुला घाबरले पाहिजेत सगळे असे म्हणाली.
यापुढचे टास्क्स काय असतील काय माहित पण असेच फिजिकल असतील तर काही अर्थच उरलेला नाहीये मेघा, सईच्या टीम ने खेळण्यात.
बिचारा पुष्कर! किती फ्रस्ट्रेट झाला होता! बरे झाले सुशांत ला विनर नाही ठरवले ते. त्याला तर काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे असे वाटते. रडतो काय, ओरडतो काय. सायको कुठला. हाकला त्याला. जुई च्या आधी तोच जायला हवा. ती तरी बरी आहे, थोडी नॉर्मल. ती पण मस्तपैकी बॅकस्टॅबिंग करत आहेच. राजेश बद्दल बिचिंग करत होती हखाबरोबर. पण एकटीने उभे राहण्याची ताकद नसल्याने कन्विनियन्टली स्ट्राँग कंपूसोबत राहते.
आस्ताद गेला आठवडा आणि हा आठवडा तरी नीट प्रामाणिकपणे खेळला असे वाटले. सिगारेट फुंकून फोफ्श्या झाल्यामुळे अंगात ताकद नाहीये मात्र कुणाला टॅकल करण्याची.
जुई ला आधी हाकला..
जुई ला आधी हाकला..
सुशांत त्या नंतर..
नंतर राजेश..
मग डबल ढोलकी आस्तिन
मग भीषण..
>>मामी मला पण प्रदीप भिडे
>>मामी मला पण प्रदीप भिडे यांचा आवाज वाटला पण पहिल्यापासून नाही, हल्लीचं strike झालं.<<
नोप. बिग्बॉसचं ओवरऑल डिक्शन भिड्यांशी जुळत नाहि. बिग्बॉसने केलेले काहि जड शब्दांचे उच्चारहि ऐकायला विचित्र वाटतात. अनंत भावे आता हयात नाहित पण त्यांचा आवाज मस्त सुट झाला असता...
बिग्बॉस टीममे थोडं क्रियेटिव होऊन काँटॅक्ट्लेस टास्क आणायला हवेत. फिजिकल असावेत पण काँटेट्क्ट स्पोर्ट्स सारखे नको. काल केलेला क्विज प्रॉग्रॅम चौथीच्या मुलांकरता होता कि काय अशी शंका घ्यायला वाव आहे. असे टास्क्स ठेवले तर बिग्बॉसच्या घराला टाळं लावावं लागेल. आउंना घाटकोपर-कांजुर मधलं स्टेशन सांगता आलं नाहि, या धक्क्यातुन मी अजुन सावरलेलो नाहि...
स्टेशनपण विचारलेलं आणि आलं
स्टेशनपण विचारलेलं आणि आलं नाही सांगता, अरेरे ते missed. तो गेम येता जाता बघत होते. मराठी भाषा दिन आला नाही सांगता हे बघितलं.
राजेश ध चा मा करण्यात हुशार.
राजेश ध चा मा करण्यात हुशार. उना कडून big boss चे लेटरमधले नियम त्याने आपल्याबाजूने फिरवले.
सगळया टास्कमध्ये राडा करायलाच हवा का? तरी नशीब क्विज प्रॉग्रॅम मध्ये राडा नाही केला.
त्या टास्कमध्येही राजेशच जिन्कला. 
क्विज प्रॉग्रॅम चौथीच्या मुलांकरता होता कि काय अशी शंका घ्यायला वाव आहे. >>> +१ प्रश्न कठीण घ्यायला हवे होते.
अरे बाबानो तस खेळायचं नसत.
अरे बाबानो तस खेळायचं नसत. गेम मध्ये दिसलं तर पाहिजे पण इतकं नाही कि इन्जुर्ड होऊ आणि पुढच्या राहिलेल्या भागात भागच घेऊ शकणार नाही >>> सई काल तेच म्हणत होती.
फिल सॅड फॉर सई ! >>> आय होप की भविष्यात तिला त्या Injury त्रास होऊ नये. तरुण आहे ती, पुढच करियर बाकी आहे अजून तिच. सेम अबाउट ऋतूजा.
राजेश आज क्विझ च्या वेळी काही डंब वाटला नाही, हा माणुस खरच एक चांगला स्पर्धक होऊ शकला असता जर अशी भयंकर लो लेव्हल भाषा, डॉन तोडफोड इमेज बनवली नसती तर ! >>>> +१ Actually राजेश खरच खुप Talented आहे. सिक्रेट रुममध्ये त्याने महाभारताच्या एका प्रसन्गावर छान डान्स केला होता.
गातोही छान. पहिल्या दिवशी मला तो डिसेन्ट वाटला होता.
मे, स, पु, ऋ, उना टिमने जुईसारखं मला लागलं मला लागलं अस म्हणत त्याच भांडवल करायला पाहिजे.. >>> उनाने केल होत अस त्या ठोकळयान्च्या टास्कमध्ये.
कुणाकुणाची वाट लावू मोडमध्ये
कुणाकुणाची वाट लावू मोडमध्ये 'हर्षदा खानविलकर' उर्फ आक्कासाहेब >>>>
स्मिता, जुई, भूषण यांचे
स्मिता, जुई, भूषण यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात त्यांना रेरासु हा ग्रुप खुप ताकदवर आणि म्हणून सेफ राहण्यासाठी योग्य वाटला. तिघांनाही या ग्रुपकडून सिक्युरिटी मिळाली. आता, रेरासु कंपू प्रचंड अनपॉप्युलर, अवाजवी आक्रमक आणि निगेटिव्ह एनर्जीनी भरलेला असल्याचे त्यांनाही दिसत असेलच मात्र ग्रुप सोडणं त्यांना जमत नाहीये. स्मिताला तुलनेने बाहेर पडणे सोपे होते. पंचिंग बॅगच्या टास्कनंतर स्मिताने उघड उघड पुष्करची बाजू घ्यायला हवी होती. कमजोर पण पॉप्युलर टीमबरोबर राहिल्याचे फायदे तिला मिळाले असते, शिवाय टास्कमध्ये ती एकदम चिकाटीने अन जिद्दीने खेळते, लूझर रेरासुच्या कंपूत तेवढ्या क्षमतेचं कुणीच नसल्याने तो लंगडा झाला असता. पण, ती नक्की कुठल्या स्ट्रॅटेजीने खेळतेय काय माहित!
ऋतुजा व सै जर जायबंदीच राहतील आणि त्यांना काढून टाकतील तर हा शो बघण्यात काहीच अर्थ उरणार नाही.
कदाचित सई किंवा ऋतुजाला जायला
कदाचित सई किंवा ऋतुजाला जायला सांगतिल. कारण त्यांना पुढचे टास्क्स खेळणे कठीण आहे. अशीच मारामारी करून जर रा ग्रूप टिकणार असेल तर शोला काही अर्थ नाही. पुढच्या सीज़न मधे तसही कोणी येणार नाही. अनफेयर बिगबॉस्स, इज्जतीचे वाभाडे आणि एवढी हिंसा... मराठी इंडस्ट्री तशीही छोटी आहे. एवढी मोठी रिस्क कोण घेणार पुढे..
आणि कॅप्टन साठी सरळ सरळ वोट का नाही घेत, कारण तासेही मेजॉरिटी रा कडेच असते. पण मला पुष्कर, मेघा, ऋुतुजाचे फाइटिंग स्पिरिट आवडते. हरणार हे ठाउक असूनही खेळतात मनापासून.
पण बागेतील फुले कोण तोडत असेल
पण बागेतील फुले कोण तोडत असेल तर त्याला कसा बाहेर काढणार..त्याच्या पाया पडून का??
त्याला बाजुला ढकलून.
त्याला बाजुला ढकलून. त्याच्याशी कुस्ती खेळून किंवा जमीनीवर आडवापाडून, त्याच्यावर बसून नाही ना.
अरे बाबानो तस खेळायचं नसत.
अरे बाबानो तस खेळायचं नसत. गेम मध्ये दिसलं तर पाहिजे पण इतकं नाही कि इन्जुर्ड होऊ आणि पुढच्या राहिलेल्या भागात भागच घेऊ शकणार नाही >>> सई काल तेच म्हणत होती.>> पण इतक्या उशिरा समजलं त्यामुळे त्यांचा नुकसान होईल कदाचित . यापुढे नीट खेळू शकतील का ? हे प्रशचिन्ह आहेच . किती दिवसांनी व्यवस्थित टास्क मध्ये भाग घेऊ शकतील ?
आणि मारामारी न करता युक्तीने गेम खेळायचा म्हणजे कसा ? ते या स्पर्धकांना सांगा जरा बिग बॉस
त्यांना कळतच नाहीये काय युक्ती करावी ते
बापरे, मला तरी वाटतंय तो
बापरे, मला तरी वाटतंय तो मांज्या नसून मायबोलीवरचे एक एक त्याच्या अंगात घुसून रे रा ला जाब विचारताहेत
रेशम किती नालायक बाई आहे, काय
रेशम किती नालायक बाई आहे, काय सारखी बोलते की लोकांचा मला काय पडलं नाय, लोकं काय बोलतात त्याने काय फरक नाय पडत, लोकांच्या जीवावर ही एव्हडी मोठी झाली. लोकांनी हिचा फालतू अभिनय खपवून घेतला म्हणून नायतर हिरोईन नाचते त्या लायनीत शेवटी पण उभ्या राहण्याच्या लायकीची न्हवती ही. मजोरडेपणा आहे सगळा हा.
जाऊद्या हो. आता लोक मत देणार
जाऊद्या हो. आता लोक तिला मत देणार नाही.
एक काम करा फक्त 4 लोकांमध्ये
एक काम करा फक्त 4 लोकांमध्ये बिग बॉस खेळा..नाहीतर सगळ्यांना तेच हवं आहे..ममा पण किती ते एका ग्रुप चा कौतुक..मला वाटलं आता सांगतील या 4 जणांना माज्या पुढच्या फिल्म मध्ये काम देणार आहे..त्या पुष्कर ने ड्रम पहिला पाडला तर त्याला काहीच बोलले नाहीत..
बापरे, मला तरी वाटतंय तो
बापरे, मला तरी वाटतंय तो मांज्या नसून मायबोलीवरचे एक एक त्याच्या अंगात घुसून रे रा ला जाब विचारताहेत >>>+11111
पब्लिक जाम विरोधात गेलंय ते
पब्लिक जाम विरोधात गेलंय ते बघून बऱ्यापैकी झाडाझडती, झोडाझोडी केली म मां ने. पण बरेच जण गिरे तो भी टांग उपर मोड मध्ये.
सुशांत म्हणाल्यावर आता
सुशांत म्हणाल्यावर आता राजेशला प्रश्न पडलेत मुली त्याच्या काय फेस करत असतील बाहेर, रेशम क्लियर आहे तशी. ती म्हणाली आधी विचार करायला हवा होतास. तुझी बायको पण एकटी तोफेच्या तोंडी जात असेल.
काय मला काही कळत नाही bb सांगतय तसे वागतायेत, bb आता कसं जागे झाले, सिक्रेट रूममधेच रा ला सांगायला हवं होतं, बाहेर वातावरण विरोधात आहे, सुधारणा कर etc. तो काय जास्तचं बिथरला स्वतः चं स्वत: की bb ने सांगून मग अजून जोरात टीका झाली मग हर्षदा येऊन harshly बोलली आणि आता म मां.
कोणीतरी लिहिलं आहे कलर्सच्या
कोणीतरी लिहिलं आहे कलर्सच्या पेजवर की राजेश बाहेर पडला, काय माहिती ख खो.
मला वाटत मराठी बिग बॉस चा हा
मला वाटत मराठी बिग बॉस चा हा शो पहिल्या सिझन मधेच आटोपता घ्यावा लागणार असं दिसतंय . राजेश / रेशम /सुशांत /आस्ताद आणि त्या सगळ्याच टीम बद्दल लोकांच्या इतक्या हिडीस कॉमेंट्स आहेत कलर्स पेज वर की वाचवत नाहीत . दुसरा सिझन आणण्याची हिम्मतच होणार नाही चॅनलची . हिंदी सारख्या चॅनल पुरस्कृत प्रेमकहाण्या मराठी मध्ये चालत नाहीत हे आता त्यांच्या लक्षात येतंय आणि लोकांचा हा राग / क्षोभ कसा कंट्रोल मधे आणायचा हे चॅनल वाल्याना सुचत नाहीये . सैरभैरलेत ते . म्हणजे रा- रे ला फेक प्रेमाची परवानगी दिली तर खरी पण आता पुढे काय ? मला तर वाटायला लागलय पूर्ण तरी करतील कि नाही देवचं जाणे . खाडकन बंद करून टाकतील . टीआरपी असतानाही बंद करावा लागणारा हा एकच शो असेल माझ्या मते
लोकं फार असभ्य भाषेत
लोकं फार असभ्य भाषेत लिहितायेत, वाचवत नाहीयेत कमेंट्स. राजेशला सिक्रेट रूम मध्ये ठेवल्यावर सांगायला हवं होतं, लवस्टोरी आवडत नाहीये. तो परत आल्यावर जास्त बिथरला, फेक असेल खरं असेल काहीही. आपली जोडी आवडतेय म्हणे, फेकाफेकी केली. त्यामुळे पब्लिक अजून चिडले. टीका करताना फार मर्यादा सोडतायेत काहीजण. फार उतरलेत खाली.
हो राजेश बाहेर पडणार अशी
हो राजेश बाहेर पडणार अशी कन्फर्म न्यूज आली आहे म्हणे . आधी जुई बाहेर जाणार होती पण चॅनेल ने विचार बदलला आणि आता राजेशला घराबाहेर काढणार असं बोलल जातंय . लोकांची मत बिट सगळं झूट आहे . चॅनल ठरवणार आता कोणाला बाहेर काढायच आणि त्याप्रमाणे बाहेर काढणार . त्यावेळी राजेशला सिक्रेट रूम मध्ये ठेवण्याची आयडिया ही चॅनल चीच होती आणि आता जुई च्या जागी राजेशला घराबाहेरचा रस्ता दाखवण्याची आयडिया पण चॅनल चीच आहे . आता हळू हळू शो ओढून नेतील . लोकांनी चॅनल ला त्यांची मत बदलायला लावली . दमवलं चांगलंच . खर काय ते रविवारी कळेल. जुई का राजेश ?
सिक्रेट रूममधून आल्यावर राजेश
सिक्रेट रूममधून आल्यावर राजेश काही फार चांगला वागला नाही, तो कबुल करत नाहीये, रे रा प्रकरण सोडून पण दादागिरी सुरूच होती त्याची.
लोकांच्या कमेंट्सपेक्षा केस टाकलीय ना कोणीतरी नाशिकमध्ये channel आणि ह्या दोघांवर त्यामुळे असेल हे सर्व.
channel चा अंदाज चुकलाचं.
लोकांच्या कमेंट्सपेक्षा केस
लोकांच्या कमेंट्सपेक्षा केस टाकलीय ना कोणीतरी नाशिकमध्ये channel आणि ह्या दोघांवर त्यामुळे असेल हे सर्व.>> सगळं बनावट असुनही अंगावर शेकतय त्यांच्या अस दिसतय.. खरतर अश्या फॉल्स पब्लिसिटीचा फायदा व्हायला हवा ना चॅनेलला.. ते केव्हापासुन लोकांच ऐकायला लागले? आणि तसपन लोक कितीपन कुंथले कि शो वर बहिष्कार टाकू अन हँव अन त्यँव तरी ते काय शो पाहायचं सोडणारे का.. असो..
Pages