‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’

Submitted by shantanu paranjpe on 13 May, 2018 - 03:11

aurangzeb-1.jpg

या टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –

“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने विध्वंस केला. हिंदू तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या यात्रा भरत त्याला त्याने बंदी घातली. सर्वसाधारण जीवनात हिंदूंचे स्थान हे अतिशय कमी प्रतीचे आहे हे दर्शविणारी निशाणी त्याना आपल्या अंगावर बाळगावी लागत असे आणि त्याशिवाय राज्यातील हिंदू प्रजेवर एक तर्हेचा खास आर्थिक बोजा लावण्यात येई. याशिवाय औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदुना फक्त एकाच तर्हेने जगण्याचा अधिकार होता. जोपर्यंत एखादा माणूस हिंदू म्हणून जीवन जगत होता तोपर्यंत त्यांना स्वर्ग व पृथ्वी ही सारख्याच तर्हेने बंद होती.”

- संदर्भ- औरंगजेबाचा इतिहास (A Short History Of Aurangjeb) – सर जदुनाथ सरकार, अनुवाद भ. ग. कुंटे. (पृ. क्रमांक. ९६१)

याच ग्रंथात आणखी अनेक वाक्ये आहेत, ती अशी
-
“त्याच्या अंगातील हे सारे गुण पक्षपाती होते. त्याचे मन हिंदूंच्या द्वेषाने भरलेले असे” – पृ. क्रमांक. ५

- "कालांतराने प्रत्यक्ष सत्ता हातात आल्यावर त्याने हिंदुंवर जिझीया कर लावून त्याचा मनसुबा दाखवला. इतकेच नव्हे तर कशी विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यात आणि छत्रपती संभाजी यांना कैद केल्यावर ‘राजकीय विरोधक’ नव्हे तर हिंदूधर्मीय म्हणून हाल हाल करून मानण्यात औरंगजेबाने धन्यता मानली.” – पृ. क्रमांक. १७
-
“औरंगजेबाच्या पालमाऊ मोहिमेत त्याने पाठवलेल्या पत्रात तो असे म्हणतो की, “राजा मुसलमान होत नसल्यास त्याचा नाश करावा.” – पृ. क्रमांक. २२५

याउपर औरंगजेबाने केलेल्या हिंदू मंदिरांच्या नाशाची उदाहरणे पाहू –

1. १६४४ मध्ये गुजरातच्या सुभादारीवर असताना औरंगजेबाने अहमदाबाद येथील चिंतामणीचे नवीन बांधलेले देवालय एका गायीची कत्तल करून बाटवले आणि पुढे त्याचे मशिदीत रूपांतर केले. त्यावेळी त्यानी गुजरात मधली अनेक देवालये पाडली.

2. ओरिसा प्रांतातील कटकपासून मेदिनीपुरच्या दरम्यान असणाऱ्या प्रत्येक खेड्यातील अधिकाऱ्यांना त्याने निरोप पाठवला की मागील १०-१२ वर्षात बांधण्यात आलेले प्रत्येक देऊळ पाडून टाका.”

3. ९ एप्रिल १६६९ रोजी त्याने एक सर्वसाधारण फतवा काढला त्यानुसार ‘काफरांच्या सर्व शाळा व देवालये’ पाडून टाकण्यात यावी.

4. दारा शुकोहने मथुरेच्या मंदिराला एक दगडी कठडा बांधला आहे असे जेव्हा याला कळले तेव्हा त्याने तो कठडा पाडून टाकण्याचा हुकुम काढला.

5. याउपर त्याने १६७० च्या जानेवारीत ते देऊळ साफ पाडून टाकण्यात यावे आणि मथुरेचे नामकरण इस्लामाबाद असे ठेवण्यात यावे असा हुकुम पाठवला.

6. १६८० मध्ये जयपूर या राज्याची राजधानी असलेल्या अंबर येथील देवळांचा विध्वंस केला. लक्षात घ्या जयपूर हे मांडलिक होते मुघलांचे.

7. १६७४ मध्ये गुजरातच्या सुभ्यातील धार्मिक सनदांच्या रूपाने हिंदूंच्या ताब्यातील सर्व जमिनी जप्त करण्याचा हुकुम याने दिला.

अजून काही औरंगजेबाची ‘राजकीय कृत्ये’

१. ९ मे १६६७ रोजी मुसलमान विक्रेत्यांना द्यावी लागणारी जकात त्याने पूर्णपणे रद्द केली पण हिंदुना ती कायम ठेवण्यात आली.

२. एखादा हिंदू मुसलमान झाल्यास त्यांना मोठ्या मोठ्या बक्षीसा तो देत असे तसेच सरकारी नोकरीत मोठ्या मोठ्या जागा देत असे.

३. हिंदूंचा सण दिवाळी आणि होळी हे सण गावाबाहेर साजरे करण्यात यावेत असा हुकुम त्याने काढला.

४. सरकारी नोकरीत मुसलमान असले पाहिजेत असा नियम त्याने काढला.

उदाहरणे देऊन हात थकतील पण उदाहारणे संपणार नाहीत. एवढी सारी उदाहरणे देऊन सुद्धा काही जण औरंजेबाच्या दरबारातील एका फारसी फर्मानाचा उल्लेख करतात ज्यात ‘औरंगजेबाने पैसे घेऊन मंदीर पाडले नाही’ असा उल्लेख असतो आणि त्यावरून औरंगजेबाचा राज्य विस्तार हा फक्त राजकीय होता आणि धर्माची जोड नव्हती असे प्रतिपादन करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. एक उदाहरण ते ही लाचखोरीचे आणि त्याच्या विरुद्ध ही इतकी सारी!!! श्री. गजानन मेहेंदळे सरांच्यामते असे कोणतेही फर्मान नाही हे विशेष.

मला औरंगजेबाबद्दल वैयक्तिक वाद मुळीच नाही. तो किती साधा होता, त्याला खर्च करायला आवडत नसे, फलाण-बिलाण जरूर असेल. औरंगजेब इतिहास आहे आणि इतिहास म्हणूनच वाचला गेला पाहिजे हे खरे आहे. पण मज सारख्या सामान्य वाचकाला इतक्या स्वच्छपणे जे दिसू शकते ते शिवाजी राजांचा अनेक वर्षे अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना कळू नये यात दुर्दैव आहे. यापेक्षा सर जदुनाथ सरकारांचे पुस्तक एकदा वाचले असते तर कदाचित औरंगजेब नकीच कळला असता. औरंगजेबाचे स्वधर्मवेड लपवून पुढच्या पिढीला सांगून काय हाशील?? अनेक जण म्हणतात शिवाजी कळण्यासाठी औरंगजेब कळायला हवा, अगदी खरे आहे ते. औरंगजेबाचे धर्मवेड पाहून राजांना समर्थांनी दिलेले विशेषण लागू पडते ते म्हणजे ‘या भूमंडळाचे स्थायी धर्मरक्षी ऐसा नाही’....!!

www.shantanuparanjape.com

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< छत्रपती धर्मनिरपेक्ष असोत वा नसोत, पण एक गोष्ट नक्कीच आहे, शांतता प्रिय धर्माचे लोक कधीच धर्मनिरपेक्ष नव्हते आणि नसतात. >>
--------- त्या धर्मातले सर्वच लोक तसे नाही आहेत. बहुतेक लोक शांतता प्रियच आहेत. पण असा खोटा प्रचार केला... सतत केला... तरच लोकान्ना पटेल.

एकवेळा वातावरण व्यावस्थित तापवण्याची क्रिया पुर्ण केल्यावर, द्वेषाच्या दारुने भरलेला बॉम्ब मग काळ/ वेळ बघुन फोडता येतो. आपल्यातलाच य व्यक्ती प्रार्थना स्थळी (मन्दिर, मस्जिद) समोर गाईचे/ डुकराचे मान्स टाकतो किव्वा पवित्र ग्रन्थाची विटम्बना करतो.

तुम्ही सुरक्षित नाही आहात हे सान्गण्याचे अनेक फायदे आहेत.

--------- त्या धर्मातले सर्वच लोक तसे नाही आहेत. बहुतेक लोक शांतता प्रियच आहेत. पण असा खोटा प्रचार केला... सतत केला... तरच लोकान्ना पटेल.

<<
ते फक्त त्यांची संख्या कमी असे पर्यंत शांताताप्रिय वगैरे असतात. एकदा त्यांची संख्या वाढून, इतर लोक अल्पसंख्यक झाले की ह्यांचे प्रताप काय असतात ह्याची अनेक उदाहराणे जगभरात आहेत. फक्त डोळे उघडून, ती पाहायची आवश्यकता आहे, डोळ्यांना झापडे बांधलेल्याना अर्थातच ती दिसणार नाहीत.

श्री. परान्जपे यान्चे उत्तर वाचल्यावर माझ्या मनात त्यान्च्याविषयी अपार करुणाभाव दाटून आला आहे
<<अर्थात मी ते नवीन पुस्तक वाचले नाही किंबहुना त्याचे नावही पहिल्यांदा ऐकले. मी ते जरूर मिळवून वाचेन. >> हा तर हायलाईट आहे. अहो, सन्षोधन तर जाउचद्या पण साधे दररोजचे वर्तमानपत्र वाचणार्‍या माझ्यासारख्या लसावि माणसालाही हा वाद माहिती होता.

नका हो छळू आता त्यांना.. त्यांनी सांगितले ना ते मध्ययुगात फिरत असतात.. वर्तमानपत्र आणि करंट बातम्या त्या तुमच्याआमच्यासारख्या क्षुद्र लोकांसाठी महत्त्वाच्या...

त्यांचा तर एकपात्री प्रयोग सुरु असतो. "कुणी संदर्भ देता का रे संदर्भ"

अनिरुद्ध. , तुम्हाला स्वता:ला, तुमच्या नातेवाईकांमधे काही उदाहरण आहे का त्या शांतताप्रिय व्यक्तींकडुन त्रास वगैरे झाल्यची?

सॉरी, मी या वादात पडलो नाही, आणि पडणारही नाही. पण एक सामान्य वाचक म्हणून काही गोष्टी जाणवल्या, हे प्रांजळपणे नमूद करतो.
१. कुणी कुठलाही मुद्दा मांडला, की लगेच त्याला संघिष्ट, भाजपेयी अशी लेबलं का लावायची? आणि त्यात हिंदू हा शब्द असला तर विचारायला नको.
२. सार्वजनिक वावरात काही संकेत असतात. काही नियम असतात. मात्र इथे अभ्यासपूर्ण चर्चा तर सोडाच, प्रतिसादांची पायरीच इतकी घसरत गेली, की शेवटी वीट आला सगळ्यांचा. काहीतरी अभ्यासपूर्ण वाचायला मिळेल, पण जाऊ दे...
३. सुरुवातीला चर्चा होते. नंतर वाद होतात. विवाद होतात. समजू शकतो आपण. पण काही आय डी नी सुरुवातीलाच अगदी खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक हल्ला सुरू केला . का? समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा आहे म्हणून?
४. वरदा यांचा प्रतिसाद पटला. पूर्णपणे संतुलीत. पण काही लोकांनी त्याचाही वापर स्वतःला हवा तसा अर्थ काढण्यासाठी आणि समोरच्याला मूर्ख ठरवण्यासाठी केला.
५. आणि अजून काही आय डी, फक्त एका आय डी ने प्रतिसाद दिला म्हणून त्याला ट्रोल करण्यासाठी म्हणून धाग्या वर आले. अरे पर्सनल स्कोअर सेटल करण्यासाठी ही जागा नाहीये ना?

असो. यातून माझ्यावर आता काहीही शिक्का बसेल. पण बहुतेक हा माझा धाग्यावर शेवटचा प्रतिसाद ही असेन. पण काही लोकांच्या तोंडी लागण्या इतका माझ्याकडे अभ्यासही नाही, वेळही नाही आणि इच्छाही नाही.

कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर सॉरी.....

मिस्टर आयर्नमॅन. तुमचे पाचही मुद्दे हे तुम्ही मारलेले पाच शिक्के आहेत. पण तुम्ही स्वतःवर शिक्के मारले जातील याबद्दल मात्र काळजी करत आहात. अशा वागणूकीतूनच कोण कुठे उभा आहे हे पहिल्या फटक्यात कळते. जसे पहिल्याच मुद्द्यात आपण संघिष्ट भाजपेयी पर्यंत थांबलात.. फुरोगामी, शिकुलर, हिंदुविरोधी वगैरे पर्यंत काही गेला नाहीत. त्यातून आपला बायस कळतो आणि मग आपण एक प्रतिसाद जरी दिला तरी शिक्का बसतोच आपसूक... धुळवडीत रंग फक्त मीच लावणार मला कुणी लावायचा नाही असे करुन चालत नाही, तसे करायचे असेल तर आपआपले ब्लॉग आहेतच की मनासारखा प्रोपगंडा करायला.

पण तिथे टीआरपी मिळत नाही, लोक वाचत नाहीत मग इथे आयत्या जमलेल्या लोकांसमोर आपला डोंबार्‍याचा खेळ दाखवायची इच्छा होते, आता इथे आल्यावर लोक अंडीटमाटर हाणतील तर तेही पटत नाही... कसं व्हायचं?

तरीही आपल्या प्रचंड बिझी शेड्युलमधून वेळात वेळ काढून गहनथोर विचार करुन वगैरे पाच मूलभूत शिक्के मारण्याची प्रामाणीक इच्छा तुम्हाला झाली आणि तुम्ही इथे आलात याबद्दल लै धन्यवाद!

Pages