Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 November, 2012 - 10:51
नाथाप्रती प्रीती मनात होती
जरी नव्हती वाचली पोथी
कसला गूढ असावा संकेत
नाही उमजत आज मज
वाचला पंथ दडला कथेत
वरील उलटीत रंजक प्रसंग
साधने विन न मिळे ज्ञान
सद्गुरू वाचून न होये सोय
मागील जन्माची असून शिदोरी
या जन्मी परी लागे कष्टावे
इतुके पक्के ठसले मनात
झालो शरणागत नाथापायी
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला वाटतेश्री. रिसबूड यांनी
मला वाटतेश्री. रिसबूड यांनी गुरुचरित्राचा संक्षेप करून स्त्रियांना वाचता येईल अशी एक पोथी तयार केली आहे.
वेदाक्षरे स्त्रियांनी का वाचु
वेदाक्षरे स्त्रियांनी का वाचु नयेत?
मच्छिंद्रनाथाने तिलोत्तमेशी लग्न केले होते ना?
चिखाल्याजी,दत्त संप्रदाय आणि
चिखाल्याजी,दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय वेगळे नाहीत,नाथांचे गुरु दत्तात्रेय आहेत..चमत्कार म्हणजे सिद्धी त्या समान असणारच आणि .म.टा.तील चांगला लेख वाचायला मिळाला .त्या बद्दल धन्यवाद .
aschig http://www.maayboli.co
aschig
http://www.maayboli.com/node/13818?page=19 आणि 20 वर उपासनात यावर चांगली चर्चा आहे ,जरूर वाचा .
आज वरूथिनी एकादशी. श्री
आज वरूथिनी एकादशी. श्री गोरक्षनाथांचा जन्म दिवस.
पसद, आठवण करून दिल्या बद्दल
पसद, आठवण करून दिल्या बद्दल अनेक धन्यवाद .अलख निरंजन .
धन्यवाद पसद! आ.न., -गा.पै.
धन्यवाद पसद!
आ.न.,
-गा.पै.
रंगावधूत महाराजांची
रंगावधूत महाराजांची 'दत्तबावनी' प्रसिद्ध आहे आणि गुजराथेत ती खूप प्रमाणात वाचली जाते. गुजराथमध्ये दत्तगुरूंचा प्रसार वासुदेवानंद सरस्वती आणि रंगावधुत महाराजांनी केला.
माझी आई बडोद्याची असल्याने त्यांच्या कुटुंबांचे रंगावधुत महाराजांकडे येणे जाणे होते त्यामुळे आई त्यांना जवळून ओळखायची. नोव्हेंबर १९६८पर्यंत रंगावधुत महाराज होते.
अश्विनी, रंगावधुत महाराजांचा जन्म गुजराथमध्येच ' गोधरा' येथे झाला आणि मूळचे ते कोकणातले होते.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मढी हे
लहानसं गाव आहे. तिथे चैतन्य कानिफनाथ यांची संजिवनी समाधी आहे. तिथून जवळ सावरगाव नावाचं ठिकाण असून तिथं मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. हि दोन्ही ठिकाणं प्रचंड जागृत आहेत.
बाकी
नवनाथ पोथी स्त्रिया वाचू शकतात. सश्रद्ध असणं आणि पावित्र्य राखणं गरजेचं..
नाथपंथानं जगाला वारकरी सांप्रदाय दिलेला आहे. संत ज्ञानेश्वर हे, मच्छिंद्रनाथ→गुरू गोरक्षनाथ→गहीनीनाथ→ निवृत्तीनाथ→ ज्ञानेश्वर (ज्ञाननाथ) या गुरूशिष्य परंपरेतील आहेत. अशारितीनं वारकरी सांप्रदायाचं मूळ नाथपंथात आहे. या पंथात धर्म, जाती, लिंग हा भेदभाव नाही.
गुरूनिष्ठा महत्वाची. हठयोगाचं यथार्थ ज्ञान असलेले नवनाथ हे जगाच्या कल्याणार्थ अवतरीत झाले. यांचा जन्म अयोनिज आहे आणि म्हणून ते चमत्कारिक ठरतात, वाटतात. नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ चमत्कारांनी भरलेला असला तरी थोतांड नाही, कवी कल्पना नाही. गोरक्षनाथांनी गोरक्षकिमयागार नावाचा ग्रंथ लिहीला जो आज अस्तित्वात नाही. कालौघात तो नाहीसा झाला. त्या ग्रंथावरून मालू नावाच्या (तो ह्याच गुरूशिष्य परंपरेतून आलेला असावा) भक्तानं प्राकृत भाषेत नवनाथ पोथीची रचना केली. या पोथीचं लिखाण मंत्रांकीत आहे त्यामुळं ते प्रभावी ठरतं. (मंत्रांकीत असणं म्हणजे बिजमंत्र वाक्यागणिक पेरलेली असणं) श्रद्धेने ग्रंथ वाचून (सकाम अगर निष्काम) चमत्कारिक अनुभव घेतलेले ठिकठिकाणी सापडतात. नाथांच्या समाधीस्थानी त्यांच चैतन्य अनुभवता येतं. नाथपंथ भरकटू शकत नाही. येथे भोंदूगिरीला थारा नाही कारण नाथांचा शब्द अंतिम मानला जातो. हे होतं कसं? तर याचं उत्तर आहे परकायाप्रवेश! जेव्हा सामान्य भक्त भावावस्थेत जातो, तेव्हा नाथांच्या चैतन्यानं त्या शरीराचा ताबा घेतलेला असतो. त्यादरम्यान जी वाक्यं त्या व्यक्तिच्या बोलण्यात येतात ती इश्वरी वाचा ठरते.. हे बोलणं भविष्यात सत्य झालेलं अनुभवास येतं. आपल्या शिष्यांवर गुरूचं control असतं मग तो गुरू शरीरानं आपल्यात असो वा समाधिस्त असो..
ग्रेट, इतक्या कालावधी नंतर ही
ग्रेट, इतक्या कालावधी नंतर ही कविता व चर्चा वाचली गेली ,मत प्रगटीकरण झाले .धन्स राहुल
डॉक्टर, नाथ सांप्रदाय आपल्या
डॉक्टर, नाथ सांप्रदाय आपल्या महाराष्ट्रात ग्रामीण भागात आपला प्रभाव टिकवून आहे. मायबोलीवर याबाबत कोणीही जास्त लिखाण केलेलं नाही.. तांत्रिक बाजू सांभाळून, यावर लिखाण व्हावं ही अपेक्षा...
बरेच अध्याय वाचलेले आहेत. पण
बरेच अध्याय वाचलेले आहेत. पण सलग पोथीवाचन केलेल नाही. करायचे आहे. परंतु अध्याय खूप मोठे आहेत
श्रावणात बरीच मंडळी पारायण
श्रावणात बरीच मंडळी पारायण करत असतात म्हणून जी महत्वाची माहिती बाहेर प्रचलित नाही ती देण्याचा प्रयत्न आहे . नवनाथ भक्तिसार वाचायची वेळ सांप्रदायिक संकेतानुसार रात्री ११ ते २ आहे. वाचनानंतर साधना कक्षातच खिचडी शिजवून (इंडक्शन शेगडी कामाला येते इथे ) खावी. हे एकवेळचे जेवण सोडले तर इतर कोणताही आहार वर्ज्य आहे. नन्तर तिथेच घोंगडी टाकून झोपायचे. वाचताना आपल्या शेजारी एक मोकळे आसन पण ठेवावे. साधना कक्ष वेगळा असावा आणि तिथे पारायण काळात दुसऱ्या कोणाला प्रवेश नसावा.
ह्या प्रकारच्या पारायणात भीतीदायक अनुभव येण्याची दाट शक्यता असल्याने आपल्याला ते प्रकार झेपत असल्यासच धाडस करावे. पारायण चालू करायच्या आधी आपल्या इष्टदेवतेचे स्तोत्र-कवच पठण करून नवनाथ स्मरण श्लोक म्हणून मगच सुरुवात करावी
ज्यांना नवनाथांप्रती प्रीती आहे आणि अगोदर पारायणे करून काही इच्छित अनुभव न आल्यास ह्या पद्धतीने करून पहा. नाही जमलं करायला तरी दुसरे कोणी इच्छूक असल्यास त्यांना ही माहिती द्या.
धन्यवाद सर .खर तर तुम्ही
धन्यवाद सर .खर तर तुम्ही सांगितली हि माहिती यापूर्वी कधीही वाचनात किंवा ऐकण्यात आली नव्हती.
Kahi urgent emergency asel
Kahi urgent emergency asel tarach ase parayan karave.symptoms nastil tar covid test Karu naye yasarkhe he ahe.nathji he ya velet CONFERENCE madhe astat.tyana disturb hotoch.navnath bhaktisar ha Granth nasun purnapane 7600 shabri mantra ahet.jas jase sadhna vadhat jate tas tase te mantra Kalat jatat.maza swatachya 2019 navratra madhil anubhav ahe.kahi goshti spashta Nahi bolta yenar.pan tumche sarva darvaje band zalet ase vatat asel tar ratri nischit parayan karave.at least 3
वारिल माहिती एका अधिकारी नाथ
वारिल माहिती एका अधिकारी नाथ पंथी व्यक्ति कडून मिळाली.
छान.
छान.
Pages