नवनाथ पोथी वाचल्यावर

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 November, 2012 - 10:51

नाथाप्रती प्रीती मनात होती
जरी नव्हती वाचली पोथी
कसला गूढ असावा संकेत
नाही उमजत आज मज
वाचला पंथ दडला कथेत
वरील उलटीत रंजक प्रसंग
साधने विन न मिळे ज्ञान
सद्गुरू वाचून न होये सोय
मागील जन्माची असून शिदोरी
या जन्मी परी लागे कष्टावे
इतुके पक्के ठसले मनात
झालो शरणागत नाथापायी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मालू कवीचा हा ग्रंथ वाचला आजच्या विज्ञान युगाला चमत्कृतीजन्य आणि खरतर न पटणारा .ओशोची गोरख नाथावरची पुस्तक, त्यातही मुख्य म्हणजे हसिबा खेलीबा करीबा ध्यान वाचल्यावर भेटणारे नाथ इथे भेटत नाही पण श्रद्धा ,शरणागतीच्या प्रांतात इतर सारे गौण असते.नाही का ?

विक्रांत प्रभाकर,

अरे वा! उत्तम काव्य!! नाथांच्या शक्त्या काय वर्णाव्यात! शिव, विष्णू, मारुती, वेताळ हिंगळादेवी, इत्यादि एकाहून एक सरस अश्या योध्यांशी पंगा घेणारी ही नाथलोकं! साष्टांग दंडवत.

एक सुचवावंसं वाटतं. श्री दत्तगुरूंची आळवणी करा. त्यांचा मंत्र आहे 'श्री गुरुदेव दत्त'. तो जपला की कुठल्या ना कुठल्या नाथांकडून वा स्वयं श्रीदत्तगुरूंकडून मार्गदर्शन होईल.

आपल्या शोधकार्यास शुभेच्छा! Happy

आ.न.,
-गा.पै.

नाथांचे चमत्कार भरपूर आहेत. चमत्कार म्हंटले की अनेकांच्या भुवया उंचावतात. पण ज्यांनी अनूभव घेतलाय, त्यांना तर कळेलच. नगर जिल्ह्यातील मढी या गावी नाथांची ( मच्छिंद्रनाथ की कानिफनाथ हे मात्र लक्षात नाही ) समाधी आहे. लोकांचा महापूर असतो तिथे म्हणे.

आणि दत्तावतारच म्हणायचे तर श्री स्वामी समर्थ आणी श्री टेंबेस्वामी आहेतच की. मात्र टेंबे स्वामी अतिशय तापट. माझ्या घरी जो फोटो आहे टेंबे स्वामींचा, त्या फोटोत त्यांच्या डोळ्याकडे पहाताच येता येत नाही, खूप तेज जाणवते. स्वामी मात्र शीतल वाटतात, आई बाबांप्रमाणे.

नाथांच्या पोथीचे जमल्यास एक पारायण करुन बघावे प्रचिती येते असे ऐकले आहे. अर्थात, श्रद्धा हवी, पण नवस बोलु नये. देवाला दिलेला शब्द मागे फिरवु पण नये.

मढीला कानिफनाथांची समाधी आहे. तिथून थोड्याच अंतरावर मच्छिंदगड आहे तेथे मच्छिंदनाथांची समाधी आहे. Happy

दर गुरुवरी तेथे खरच महापुर असतो. Happy

थोड्याशाच पण शुद्ध भावाने केलेल्या भक्तीने प्रसन्न होणारे दैवत म्हण्जे "दत्तगुरु" मनापासून भक्ती सुरु केल्यानन्तर अनुभव यायला लागतात.

मढीला लहानपणी गेलो होतो.आता पुन्हा जायची ईच्छा बळावली आहे..धन्यवाद सेनापती ,टुनटुन .अनिल .टुनटुन आपण श्रीरंगावधूत महाराज व शंकर महाराजांचे डोळे पाहिलेत का ? काय वाटते ?

नगर जिल्ह्यातील मढी या गावी नाथांची ( मच्छिंद्रनाथ की कानिफनाथ हे मात्र लक्षात नाही ) समाधी आहे.
>>>
मढी- कानिफनाथांची समाधी आहे
मायांबा/मच्छिंदगड -मच्छिंदनाथांची समाधी

मला यातलं फारसं माहित नाही.

मात्र,
कवितेत अजून वळणे आली असती. असो. जिथे श्रद्धा असेल तिथे नियम जास्त आणू नयेत.
छान प्रयत्न.

गामा, शक्ती चं अनेकवचन शक्त्या नसून शक्ती च आहे.
टुनटुन, नाथांची पोथी स्त्रियांनी वाचू नये असा संकेत असल्याचे वाचल्याचे स्मरते.

साती बरोबर आहे तुमचे. परंतु त्यांच्या पोथीतील २८ वा अध्याय मात्र कुमारीका वाचु शकतात. म्हणजे अविवाहीत मुली, ज्यांचे लग्न काही कारणाने लांबले आहे अशा.

अर्थात, त्याचे मूळ काय कारण आहे हे मला ही माहीत नाही. कारण त्यांची पोथी मी वाचलेली नाही, पण माझ्या चुलत सासर्‍यांनी सहज पारायण केले होते, तेव्हा ते पण म्हणाले की स्त्रिया फक्त २८ वाच अध्याय वाचु शकतात बाकी नाही. श्री गुरुचरीत्र सुद्धा स्त्रिया वाचु शकत नाहीत असे कळले आहे, कारण दत्त ब्रम्हचारी, संन्यासी.

साती, टुनटुन.. हे प्रथमच ऐकतोय. Happy

माझ्या माहितीत सर्व वयोगटातल्या अनेक महिला आहेत ज्या नित्य नाथपोथीचे आणि गुरुचरित्राचे पारायण करतात.

सर्व प्रतिसाद आवडले
काव्यही आवडले
विषय माझ्यासाठी नवीन होता जरा ; पण खूप छान महिती मिळाली

धन्यवाद सर्वाना !!

सेनापती,

बरोबर आहे तुमचं. बायका नवनाथ भक्तिसार वाचू शकतात असं वाचल्याचं आठवतं. पोथीत बघून सांगतो.

आ.न.,
-गा.पै.

विक्रांत सॉरी लेट प्रतीसाद. मी शंकर महाराजांच्या मठात एकदाच गेले आहे, त्यामुळे तसे पाहिले नाही, पण ते लहरीच वाटतात. तसेही साधु, संत अवलीया हे जरा लहरी आणी चमत्कारीकच असतात, कारण जगाचे कल्याण करतांना त्यांना कुणाशी तसे काही देणे घेणे नसते.

मात्र तुम्ही म्हणता ते श्री श्रीरंगावधूत महाराज मला खरच माहीत नाहीत.

टुनटुन, श्री रंगावधूत स्वामी म्हणजे दत्तबावनीकर्ते. हे जन्माने महाराष्ट्रातील असले तरी पुढे गुजरातेतच यांनी काळ व्यतीत केला.

तसेही साधु, संत अवलीया हे जरा लहरी आणी चमत्कारीकच असतात >>> खरे सद्गुरु कित्येक वेळा बालोन्मत्तपिशाच्च वृत्ती किंवा वरवर वाटणारा विक्षिप्तपणा धारण करतात ते तुम्ही म्हणता त्या कारणासाठी. उदा. श्री गजानन महाराजांनी उकिरड्यावर उष्ट्या पत्रावळीतील अन्न वेचून खात बसणे. श्री स्वामी समर्थांचे हातात काचेची गोटी घेऊन उडवत बसणे किंवा श्री साईनाथांनी द्वारकामाईतील पहिल्या रामजन्मोत्सवाच्यावेळी नृसिंहावतार धारण करुन उपस्थितांची पाचावर धारण बसवणे.

बाकी साधूचा गणवेश धारण केलेली प्रत्येक व्यक्ती खरी साधू असेलच असे नाही...त्यामुळे त्याने असं काही वागणं दाखवलं तरी ते निव्वळ चाळे असू शकतात.

नाथांची पोथी स्त्रियांनी वाचू नये असा संकेत.>>>>>>मला वाटते ज्याची श्रद्धा असते आणि इच्छा असते तिथे मार्ग असतो.कारण

रांगेमध्ये देव का कधी मिळतो
रांगेत मिळते ,
ते रेशन,रेल्वेचे तिकीट वगैरे वगैरे ! “
तो म्हणाला ,
“तर मग ही रांगेची
उठाठेव तरी कशाला “
यावर ते हसून म्हणाले ,
“अरे रांग तोडायला लावायला ,
ज्याला निकड भासते
तोच रांग मोडतो
अन इथे येवून पोहचतो .
ये तुझे स्वागत आहे ! “

_/\_!*गुरूपुजा*!_/\_

माझी गुरूपुजा,भजन किर्तन
माझी गुरूपुजा,भजन किर्तन

शब्द होती गंध
सुर होती सुमने
लय,ताल,गीत होई.......
..................पुजासामुग्री*

चक्षू दोन समई
भावभक्ती तेलवात
तेवती निरंतर.........
...................गुरूचरणी*

धक-धक र्‍हुदयाची
जणू,टाळ-चिपळ्या वाजती
पंचेंद्रिय तल्लीन होती......
.................जणू वाद्यवृंद*

चंदनाचा पाट नको
कुबेराचाथाट नको
गुरू रंगे थेट.........
..............भजनी किर्तनी*

माझी गुरूपुजा,भजन किर्तन
माझी गुरूपुजा,भजन किर्तन.

'श्री गुरुदेव दत्त'श्री गुरुदेव दत्त'श्री गुरुदेव दत्त'.
चिखल्या, मी पण तुमच्याशी १००% सहमत!++

सेनापती,

पोथी बघितली. श्री. वि.के.फडके यांनी संपादित केलेल्या श्रीनवनाथ भक्तिसारात (११वी आवृत्ती, पान २२) स्पष्टपणे म्हंटलंय की बायका हा ग्रंथ वाचू शकतात.

navnath_bhaktisaar_baaykaa.JPG

आ.न.,
-गा.पै.

विक्रांत,

साधने विन न मिळे ज्ञान
सद्गुरू वाचून न होये सोय

मागील जन्माची असून शिदोरी
या जन्मी परी लागे कष्टावे

अशा पद्धतीच्या आणखी काही ओळी किंवा प्रसंग असते तर अजून उलगडले असते.

धन्यवाद गा. पै. कै व्ही के फडके हे पुण्यातील नामवंत ज्योतिष्यी आणी अनूभवी धार्मिक व्यक्ती होत. मी त्यांना भेटले होते पण असे प्रश्न विचारण्याची वेळ आली नाही कारण या विषयी मलाही माहिती नव्हतीच. आणी आमचे वरवरचे प्रश्न असल्याने बाकी बोलणे झालेच नाही. पण बरे झाले तुम्ही इथे लिहीले ते.

आश्विनी तुझे ही धन्यवाद. मला दत्तबावनी माहीत होती, पण वाचली नाही, कारण दत्त हे संन्यासी असल्याने त्यांचे कोणते कोणते ग्रंथ/ श्लोक वाचावे हे कळेना, म्हणून दत्तबावनीचे जनक कोण हे पण कळले नाही.

जोशीजी ,आले लक्षात .खर तर लिहिणे आपल्या हातात कमी असते .प्रेरणा झाली की लिहतो .कधी दिवा पटकन विझतो कधी उगाचच फडफडत राहतो .
सेनापतींनी साक्षात टेंबे स्वामींचा दाखला दिल्या मुळे ,बोलती बंद .परंतु त्यातूनही काही लोकांनी मार्ग काढला आहे. मला वाटते काही ठराविक अध्याय वगळून गुरुचरित्र वाचावे असे कुठे तरी वाचले होते .कुणाला माहित असल्यास सांगावे .
विभाग्रजांची गुरुपूजा छान आहे.

नाथसंप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले आढळतात.
>>>>मटा बातमी
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18787028.cms

Pages