Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता दुसरा कोण आलाय तो चम्या
आता दुसरा कोण आलाय तो चम्या दिसतोय, कुठेतरी बघितलंय त्याला. अंजलीच्या आईने स्थळ आणलंय तो आहे की काय.
काय पण जागा निवडलेली डायरी
काय पण जागा निवडलेली डायरी लपवण्यासाठी!!! ....वरच्या पातेल्याखाली...दुस-या मिनिटाला त्या चंदेने पाणी पिण्यासाठी तोंड वर केलं आणि तिला डायरी दिसली.
र्राणाने डायरी मागितल्यावर लगेच सांगायचे ना कि हि बघ तुझ्या वहिनीने आताच चुलीत घातली, तर रडत बसली.
अंजलीच्या आईने स्थळ आणलंय तो
अंजलीच्या आईने स्थळ आणलंय तो आहे की काय>>> अंजली त्याला बघून खूष होते म्हणजे कोणी ओळखितला असेल. स्थळ नसेल. पण राणा लगेच जेलस झाला
ओहह असं झालं काय डायरीप्रकरण.
ओहह असं झालं काय डायरीप्रकरण. मग गोदाक्कांचीच चूक आहे, ती बया वहिनी उडत्या पाखराची पिसं मोजणारी आहे हे माहिती असून ती डायरी इतकी easy मिळेल अशी ठेवली. चंदा चमचीच आहेना तिची.
गोदाक्का टिपं गाळत बसतात फक्त. अभिनय छान करतात.
डायरीचे सांगायला हवं होतं पण वहिनीने बाजी उलटवली असती, ती हुशार आहे.
पण ती चंदा एकीकडे त्या
पण ती चंदा एकीकडे त्या वहिनीला कोणी बोललं तर गालातल्या गालात हसत पण असते.
वहिनीने बाजी उलटवली असती, ती
वहिनीने बाजी उलटवली असती, ती हुशार आहे.>> तेच केलं. माझ्याकडे डायरी नाही. ती वाचून झाल्यावर मी गोदाक्काला दिली असे म्हणून हात वर केले ना तिने.
हो बरोबर. चुलीत त्यानीच टाकली
हो बरोबर. चुलीत त्यानीच टाकली असेल, हात पण भाजलाय चुलीत टाकताना असं पण म्हणाली असती वहीनी, जर गोदाक्का बोलल्या असत्या तर.
इतका शहाणपणा करते, नवरा कसा वागतो तिथे लक्ष नाही.
उद्या तरी बाई सांगत्याल का
उद्या तरी बाई सांगत्याल का समदं राणाजीला?
का अजून पाणी टाकून टाकून वाढ्वतात भाग काय माहित?
आता जेलेसी फॅक्टर... बाईंचा
आता जेलेसी फॅक्टर... बाईंचा मीत्र आलाय
हो ना! आणि पाठकबैच्या आईला
हो ना! आणि पाठकबैच्या आईला कल्पेश चक्क पाठकबै साठी आवडलाय असं दिसतंय. तो जेवताना पाठकबैच्या आईला तो मुंडावळ्या बांधून बसलाय असं दिसलं.
स्पष्ट बोलायचं तर मला तरी बै तो कल्पेश झंपकच वाटला. सारखा कै फायद्याचा विचार करतो. "लग्नातनं काय फायदा झाला तर लग्नाला लगेच टाईम मिळेल बघ. " असं बोलला तो. कसं बै बोलतात कुणास ठाऊक.
गोदाक्कांनी डायरी मस्त पटकन
गोदाक्कांनी डायरी मस्त पटकन दिसेल अशीच ठेवली होती. पूर्णपणे आत पण सरकवली नव्हती. आता वैनीसायबांनी जाळली तर रडायचं कशाला. गुपचूप जाऊन अंजलीला सगळं खरं सांगून टाकायचं. राणाला सांगून तो विश्वास ठेवायचाच नाही हेही खरं.
गुपचूप जाऊन अंजलीला सगळं खरं
गुपचूप जाऊन अंजलीला सगळं खरं सांगून टाकायचं तर काय ..घडाघडा बोलयला काय प्रोब्लेम असतो ह्या लोकांना ..
अरे पण जर हे लोक असे
अरे पण जर हे लोक असे शहाण्यासारखे वागले तर शिरेल चालु होताच संपतील महीन्याभरात
अरे पण जर हे लोक असे
अरे पण जर हे लोक असे शहाण्यासारखे वागले तर शिरेल चालु होताच संपतील महीन्याभरात>>
ही शिरेल पण 'झी' वळण घेणार
ही शिरेल पण 'झी' वळण घेणार लवकरच! हळू हळू एकेक पात्राचा समावेश सुरु आहे त्या दृष्टीकोनातून..
हा आठवडा नाही बघणार, तो
हा आठवडा नाही बघणार, तो कल्पेश पिडणार.
पाक खुळं हाय राना!
पाक खुळं हाय राना!
राणाच्या भोळसटपणाचा आणि नंदिताच्या पाताळयंत्रीपणाचा कळस आहे. लंबकाची दोन टोकं आहेत.
काल किती दिवसांनी मालिका बघितली, कंटाळा आला जाम. राणा, अंजली आणि गोदाक्का ह्या सर्वांना दंडाला धरून गदागदा हलवून पुढं ढकलावंसं वाटलं.
गोदक्काना सुलोचना म्हटलं तर
गोदक्काना सुलोचना म्हटलं तर त्या सुलोचनाताईंच्या वरची पायरी गाठु लागल्या सोशिकपणात.
गोदाका चांगल्याच डाव उलटवायला
गोदाक्का चांगल्याच डाव उलटवायला लागल्यात सुनबाईंवर. गप्प बसुन सगळं ऐकुन घेत नाहीत हे बरय.
काय करत आहेत गोदाक्का?
काय करत आहेत गोदाक्का? कुणीतरी अपडेसट्स द्या ना.
गोदाक्कांनी अंजलीला साडी
गोदाक्कांनी अंजलीला साडी घेतली ते बघून वैनीसायबांचा जीव जळला. मग रानाभाऊजींसमोर मोठेपना दाखवन्यासाठी वैनीसायब बोलल्या 'आमी बी अंजली साठी पैठणी काढून ठेवली होती पण द्यायची राहून गेली. ' गोदाक्कांनी तेवढंच धरुन रानाला सांगितलं वैनीसायबांची पैठनी अंजलीला देवन ये म्हणून. वैनीसायब आता कशाला, अंजलीला वायट वाटलं असं कायबाय सांगू लागल्या पण मग राना कसला ऐकतूय.. त्याने पिच्छा करुन वैनीसायबांकडनं पैठणी घेतली नि अंजलीला द्यायला गेला.
वैनीबायचं तोंड अगदी बघन्यासारखं झालं हुतं.
हो मस्तच झालं ते. गोदक्कांनी
हो मस्तच झालं ते. गोदक्कांनी बरं केलं.
सुरजने संक्रांतीला आणलेली साडी दिली वाटतं वयनीने अंजलीला.
खूप दिवसांनी आत्ता ही मालिका
खूप दिवसांनी आत्ता ही मालिका बघायला टीव्ही लावला तर तो कल्पेश अजूनही आहेच, मला वाटलं गेला असेल हा परत. जाऊदे त्याला बघून बंदच केला टीव्ही.
http://www.loksatta.com
http://www.loksatta.com/manoranjan-news/akshay-kumar-to-promote-jolly-ll...
कप्लेशच पात्र फार बोरिन्ग आहे
कप्लेशच पात्र फार बोरिन्ग आहे, राणाजिना आता अॅक्टिन्ग जमायला लागलिये चान्गली!
अरे राणाजी ना कळालं का.. डोळे
अरे राणाजी ना कळालं का.. डोळे बंद केल्या वर बाई का दिसतात? खूप दिवस झाले पहायला नाही मिळाली मालिका
काय नाय कळलं. परवा गैरसमजाने
काय नाय कळलं. परवा गैरसमजाने पाठक बाईं रागावल्या की राणावर.
पाठकबैनी लज्जतदार जेवण बनवून
पाठकबैनी लज्जतदार जेवण बनवून राग काढला की राणाजींचा.
कल्पेश कधी जायचा?? तो आला तेव्हा म्हणालेला अंजलीला की तुझ्या मम्मी पप्पांना भेटून लगेच जायचंय, टायम नाय म्हणून.. आणि आता इतके दिवस कशाले राहिला??
त्याच्यामुळे थोडी बोअर झालीय सिरियल.
त्याच्यामुळे थोडी बोअर झालीय
त्याच्यामुळे थोडी बोअर झालीय सिरियल. >>> हो ना, म्हणून मी बघत नाहीये.
होय होय ..कल्पेश बोर मारतोय.
होय होय ..कल्पेश बोर मारतोय. तरी पण राणाजी आणि पाठक बाईंमुळं सिरियल बघावी असं वाटतं.
गोदाक्का , बरकत , वैनीसाब सगळ्यांनी चांगली कामं केलीत. राणाजींचा निरागसपणा बनावट वाटत नाही.
बाकीच्या सिरियल पेक्षा खूप बरी आहे.
Pages