विदर्भ

Submitted by admin on 5 April, 2008 - 11:33

विदर्भातले मायबोलीकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं...
पण निदान उगा दहशत पसरवणे म्हणुन खुन करत सुटणं किंवा शक्तीप्रदर्शन असं नव्हत कधी दिवटेंच..
आता मात्र असलेल्या गँग बेक्कार आहे.. त्यांच्यावर ज्याचा वचक होता तो हा होता..

मला विशेष माहीती नाही त्याच्याबद्दल, पण पेपरमधे जे काही येतं त्यावरुन म्हणाले
आजकाल तु पेपर बघ दर २ दिवसांनी कोणाच्या ना कोणाच्या खुनाची बातमी असतेच.

मला त्यांच्याबद्दल बर्‍यापैकी माहिती आहे..
खरतर ज्या ज्या लोकांना तो व्यक्ती पर्सनली माहिती होता..अगदी सामान्य नागरिकांपासुन पोलिसांपर्यंत ज्यांना ज्यांना हे सगळ्या प्रकरणाची सुरुवात माहिती आहे आणि कायकाय झालय हे सगळं ज्यांनी फॉलो केलं आहे ते सगळे शॉक मधे तरी आहे अथवा हळहळ तरी व्यक्त करत आहे..

खुन, मारामारी, गुंडगिरी हे सगळं वाईटच आहे म्हणा पण हे सगळं काही घडतय त्यातुन जो बरा आहे त्याला लोक उगा स्वतःचा फेवर देउन देतात.. म्हणुन याला लोक बरा म्हणायचे ते याकरिताच..

आपलं गाव कस जास्त मोठ नाही.. त्यामुळे कोण होत, काय होत, कसं होत हे बर्‍याच आधीपासुन माहित असल्याने एवढ सारं माहिती तरी आहे.. असो..

आज डायरेक यवतमाळचे अंडरवर्ल्ड आले चर्चेत! बापा! आम्हाला तर दत्त चौक अन खास दही भल्ले भेटणारेच यवतमाळ माहिती होते :O

तस सांगण्यासारखं बहोत हाय बापू यवतमाळात..
आज तर दिसभर हाच इषय सगळीकडं..
इथं जालावर मर्यादा येते सांगाच्या म्हणुन सांगा.. बाकी माराले कोण आले होते अन् किती आले होते हे कळलचं..
प्रिप्लॅन्ड होता मर्डर..

Retail Alliance Ad.jpg

छान... पण मला वऱ्हाडी आणि झाडीबोली पण जास्त नाही येत.शाळेत असतानाच जास्त बोलली जायची. तेव्हा पण शिक्षक ओरडायचे शुद्ध बोला म्हणून. .. Miss those days..

अच्छा!
मला सुद्धा विशेष येत नाही, पण बऱ्या पैकी जमते.
पंचवीस वर्षे झाली विदर्भ सोडून.

बालपण काढले की येते. आम्हा भावंडाना येते बऱ्यापैकी वऱ्हाडी, आईबाबांना नाही येत तेवढी.