देशांतराच्या कथा (१): अमेरिकेतील भारतीयांचा इतिहास

Submitted by निकीत on 7 May, 2015 - 06:12
indians on komagata maru

अमेरिकेत आज सुमारे ३० लाख (~ १% लोकसंख्या) भारतीय वंशाचे लोक राहतात; उत्पन्न आणि शिक्षणाच्या बाबतीत सर्वाधिक यशस्वी स्थलांतरित म्हणून भारतीय ओळखले जातात. ते तसे का आहेत हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे; ह्या लेखात मी भारतीय लोक अमेरिकेत कसे स्थिरावले याचा थोडक्यात आढावा घेणार आहे. अमेरिकेमध्ये भारतीय स्थलांतराचा इतिहास सुमारे १५० वर्ष जुना आहे हे बऱ्याच जणांना ठाऊक नसते. स्थलांतर खऱ्या अर्थाने वाढलं ते १९६५ नंतर आणि त्याबद्दल आपण अनेक माध्यमातून वाचत / ऐकत / पाहत आलो आहोत. पण साधारण १८८० ते १९६५ हा प्रवास मोजक्याच भारतीयांचा असला तरी संघर्षपूर्ण आहे. सध्या तरी मी याच कालखंडासंदर्भातील मांडणी करणार आहे.

अमेरिकेतील पहिल्या भारतीय माणसाचा उल्लेख १६२० सालात आढळतो - कोणी "टोनी" नावाचा हा भारतीय इसम व्हर्जिनियामध्ये जॉर्ज मेनेफी नावाच्या एक बड्या जमीनदाराकडे कामाला होता (बहुतेक गुलामच). त्यानंतर १७६८ मध्ये व्हर्जिनिया मधील पेपरात एका मालकाने दिलेली "इस्ट इंडीयन" गुलाम पळून गेल्याची जाहिरात सापडते. १७८० मध्ये "मद्रास मॅन" नावाचा व्यापारी (खरे नाव माहित नाही) मॅसेच्युस्सेट्स मध्ये आला होता असाही उल्लेख आढळतो. पण असे १-२ उल्लेख वगळता १८२० पर्यंत अमेरिकेच्या इतिहासात भारतीय स्थलांतरित फारसे दिसत नाही.

१८५७ मधील एका पुस्तकातील कॅलिफोर्निया मधील सोन्याच्या खाणीत काम केलेल्या "हिंदू" माणसाचे चित्र (बहुधा कॅलिफोर्नियामधील भारतीयांचा सर्वात जुना दस्तावेज):
Hindoo.jpeg
स्त्रोत: हचिंग्ज कॅलिफोर्निया मॅगझिन १८९९.

१८८६ मध्ये मीर खान नावाच्या भारतीय हकीमाला लायसन्स नसताना काम केले म्हणून अटक करण्यात आली असाही उल्लेख आहे.
mier khan.jpg
स्त्रोतः अल्टा डेली कॅलिफोर्निया, १८ ऑक्टोबर १८८६.

स्थलांतर - १८२० पासून पुढे (मुख्यतः कॅलिफोर्निया)
अमेरिकेत भारतीय स्थलांतराला सुरुवात झाली पश्चिम किनाऱ्यापासून. १८२० च्या आसपास भारतातून काही शीख लोक पहिल्यांदा कामाच्या शोधात उत्तर अमेरिकेत - कॅनडा मधील व्हानकुवर येथे आले आणि तेथे मुख्यतः शेती आणि लाकूड उद्योगात काम करू लागले. साधारण १८९० पर्यंत त्यांची संख्या अगदीच कमी होती पण त्यानंतर मात्र ती हळूहळू वाढू लागली. लवकरच त्यांचाविरुद्ध स्थानिक गोऱ्या लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि तो इतका शिगेला पोहोचला की भारतातून येणारी जहाजे स्थानिक लोक व्हानकुवर बंदरामध्ये येऊच द्यायचे नाहीत. याची सर्वात (कु)प्रसिद्ध केस म्हणजे मे १९१४ मध्ये कॅनडात येऊ पाहणारे "कोमागाटा मारू" जहाज. सुमारे ३७६ भारतीय असणारे हे जहाज स्थानिकांनी सुमारे तीन महिने बंदराबाहेरच ताटकळत ठेवले आणि अखेरीस जुलै महिन्यात ते जपानकडे (आणि नंतर भारताकडे) माघारी फिरले.

कोमागाटा मारू जहाज आणि त्यावरील भारतीय:
komagata maru.jpgस्त्रोत.

कॅनडा मधून पिटाळले गेलेले भारतीय कामाच्या शोधात मग अमेरिकेचा पश्चिम किनार्यावर आले. सुरुवातीला त्यांनी ओरेगन आणि वाशिंग्टनच्या लाकूड, शेती आणि रेल्वे उद्योगात काम केलं आणि त्यानंतर १८९० च्या दशकापासून ते मोठ्या संख्येने कॅलिफोर्निया मध्ये येऊ लागले आणि इकडे हळूहळू आपला जम बसवायला सुरुवात केली.

१८९९ साली सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकल मध्ये आलेली एक बातमी:
0_2.jpg स्त्रोत.

१९०० सालातील शीख कामगारः
Rrwork5-c.jpgस्त्रोत.

भारतीय येथे येण्याआधीपासूनच कॅलिफोर्नियात चीनी आणि जपानी कामगार मोठ्या प्रमाणावर आले होते. त्यामुळे स्थलांतरितांविरोधात इथे आधीच असंतोष होता. मग कॅनडा मध्ये जे झालं त्याचीच पुनरावृत्ती अमेरिकेतही होऊ लागली. भारतीयांविरोधात विरोधात दंगली झाल्या; जाळ्पोळी आणि मारहाणी झाल्या. त्याचबरोबर त्याना प्रचंड वंशभेदाचा सामना करावा लागला. त्वचेच्या रंगामुळे तर अर्थातच पण त्याच बरोबर त्यांचे कपडे, वास, सवयी यामुळे सुद्धा. त्यामुळे सुरुवातीच्या काळात बरीच भारतीय मंडळी आफ्रिकन अमेरिकन आणि मेक्सिकन लोकांबरोबर राहिली आणि त्यांच्यातच मिसळले. भारतीय स्थलांतरित हे मुख्यतः अविवाहित पुरुष असल्यामुळे अनेकांनी त्यांच्याशी लग्नेही केली. अर्थातच लपून छपुन. कारण इंटररेशियल लग्नांवरहि कायद्यानुसार बंदी होती - पण मेक्सिकन स्थलांतरित अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आल्यानंतर (साधारण १९२० नंतर) मात्र चित्र थोडे पालटले - कारण भारतीय आणि मेक्सिकन दोघेही ब्राउन! या काळात अनेक भारतीय-मेक्सिकन लग्ने झाली आणि त्यांनी मारिया सीता हर्नांडेझ, होजे अकबर खान वगैरे अत्यंत इंटरेस्टिंग नावे असलेली मुलेही जन्माला घातली !

एंजल आयलंड:
एशियन लोकांच्या स्थलांतरामध्ये सॅन फ्रान्सिस्को बे मध्ये असलेल्या एंजल आयलंडचं एक महत्वाचं स्थान राहिलं आहे. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर येणाऱ्या परदेशी नागरिकांचा एंजल आयलंड वर इमिग्रेशन चेक होत असे. तिथे डिटेन्शन सेंटर सुद्धा होते. गंमत म्हणजे या डिटेन्शन सेण्टर मध्ये डिपोर्टेशन रेट होता जवळजवळ ३० ते ४०%! इतर ठिकाणी (विशेषतः पूर्व किनाऱ्यावरील एलिस आयलंड येथे) हाच रेट १ ते २% च होता. १९१० ते १९४० च्या दशाकात अमेरिकेत येऊ पाहणारी जवळ जवळ सर्वच भारतीय कुटुंबे एंजल आयलंडवर ठेवली गेली. भारतीयांबरोबरच मुख्यतः इथे राहिले ते म्हणजे चायनीज आणि जपानी. अत्यंत वाईट सुविधा असलेल्या या डिटेन्शन सेण्टर्स मध्ये डिटेनीजना अनेक दिवस राहावे लागे. अशा वेळी अनेक डिटेनिज भिंतीवर आपल्या कविता आणि कथा कोरत असत. त्यामधून त्यावेळच्या परिस्थितीची कल्पना येते. एंजेल आयलंड वरील बिल्डिंग्ज मध्ये आजही त्या कविता तशाच सापडतात. कितीतरी गोष्टी तर लिहिल्याच गेल्या नसतील.

डिटेन्शन सेंटरची इमारत:
Angel_island_lg.jpg

डॉर्मस:
Angel_Island_Immigration_Station_Dormitory_b.jpg

भिंतींवर कोरलेल्या कविता:
Since-9-months--Punjabi--text-carved-into-the-wall-of-a-main-barrack-at-the-detention-center-at-Angel-Island.jpg

स्त्रोतः विकीपीडीया.

कायदेशीर लढाई
१९१७ सालच्या इमिग्रेशन अ‍ॅक्ट मध्ये एशियाटिक देशांमधून आलेल्या स्थलांतरितांवर बंदीच घालण्यात आली. या कायद्यान्वये फक्त कॉकेशियन आणि आफ्रिकन लोकांनाच अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकत होते आणि अक्षरशः अक्षांश रेखांश काढून आशियातून होणाऱ्या सर्वच स्थलान्तरांवर बंदी घातली गेली. या कायद्याच्या अटी इतक्या जाचक होत्या की अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय मुलानादेखील अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकत नव्हते. ह्या कायद्याविरुद्ध अनेक भारतीयांनी कायदेशीर मार्गाने लढाई देण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी उल्लेखनीय केसेस म्हणजे भगतसिंग ठींड आणि दिलीपसिंग सौंद यांच्या.

भगतसिंग ठींड यांनी प्रथमच स्थलांतरासाठी कायदेशीर लढाई देण्याचा प्रयत्न केला. ठींड यांनी पहिल्या महायुद्धात अमेरिकन मिलिटरी मध्येही काम केलं होतं. पण १९२३ साली कोर्तानी त्यांच्या विरोधी निकाल दिला. ठिंड यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की भारतीय लोक हे टेक्निकली कॉकेशियनच आहेत. पण कोर्टाने कॉकेशियनची व्याख्या व्हाइट अशीच मर्यादित ठेवली.

भगतसिंग ठिण्ड (१९१८):
10_1.jpg स्त्रोत.

दिलीपसिंग सौंद हे १९२० मध्ये गणितात पीएचडी करण्यासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठात (बर्कली) आले. उन्हाळ्याच्या सुट्टीत पैसे मिळविण्यासाठी ते आसपासच्या शेतांवर कामे करायचे. १९२४ साली पीएचडी पूर्ण केल्यानंतर त्यांनी सरळ शेती करण्यास सुरुवात केली. पण आजूबाजूला राहणाऱ्या देशवासीयांची परिस्थिती बघून त्यांनी त्याविरुद्ध कायदेशीर मार्गाने लढत देण्याचा निर्णय घेतला.
नागरिकत्व नसल्यामुळे अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय वंशाच्या लोकांनादेखील जमिनी विकत घेता येत नसत. जमीन लीज करण्यासाठीही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. त्यामुळे बहुतांश भारतीय आयुष्यभर शेतमजूर म्हणूनच काम करत असत. सुमारे वीस वर्ष सौंदसाहेब वेगवेगळ्या कोर्टात भारतीयांच्या समान नागरिकत्वासाठी लढाई देत राहिले.

याच काळात इतर भागातील भारतीयांनीही (जे संख्येने फ़ारच कमी होते) वेगवेगळ्या पद्धतीने अमेरिकन सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. उदा. भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मदत करण्यासाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला फिलाडेल्फियातील लाला हरदयाळ यांनी हिंदुस्तान गदर पार्टीची स्थापना केली. त्यांनी भारताच्या स्वातान्त्र्याबरोबरच (लाल लजपत राय याच्या होम रूल चळवळीला मदत) स्थलांतराच्या प्रश्नावर देखील बरेच काम करण्यास सुरुवात केली. मुबारक अली खान (अरिझोना) आणि सरदार जगजीतसिंग (न्यूयॉर्क) यांनी राजकारणी, डिप्लोमॅट, मिडिया वगैरेंबरोबर जोरदार लॉबिंग केलं. शेवटी १९४६ साली ह्या सर्व प्रयत्नांना यश मिळाले आणि १९४६ साली कॉंग्रेसने ल्युस-सेलर कायदा पारित केला. ह्या कायद्याअंतर्गत भारतीय (आणि फिलिपिनो) स्थलांतरितांच्या अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना अमेरिकन नागरिकत्वाचा अधिकार सुप्रीम कोर्टाने दिला. त्याचबरोबर दरवर्षी १०० भारतीयाना ग्रीन कार्ड (कायमचे स्थलांतरित असा दर्जा) देण्यासही मान्यता दिली. १९४९ साली नागरिकत्व मिळाल्या मिळाल्या लगेच दिलीपसिंग सौंद कॅलिफोर्नियात जज्ज म्हणून निवडून आले आणि १९५६ साली सेण्ट्रल डेमोक्रटिक पक्षातर्फे कॅलिफोर्निया मधून कोंग्रेसवर निवडूनही गेले. कॉंग्रेसवर निवडून येणारे सौंद हे पहिले एशियन ! सौंद यांची एक जुनी मुलाखत इथे पाहता येईल.

दिलीपसिंग सौंद तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ केनेडी आणि उपाध्यक्ष लिंडन जॉन्सन यांच्यासमवेत:
dec07_saund1.jpgस्त्रोत.

सॅनफ्रान्सिस्को मध्ये अजूनही हिंदुस्थान गदर पार्टीचे ऑफिस जतन करून ठेवले आहे (5, Wood Street). या म्युझियमचे उद्घाटन १९७६ साली तत्कालीन परराष्ट्र मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले होते.
PAGE-MEMORIAL-THE-GADAR-MEMORIAL-2.jpgस्त्रोत.

१९६५ आणि नंतर
ह्या कायदेशीर लढाईनंतरही १०० ग्रीन कार्ड कोट्यामुळे भारतीय स्थलांतरितांची संख्या फार काही वाढली नाही; १९६५ पर्यंत ही संख्या सुमारे १० ते १२,००० च होती. पण १९६० च्या आसपासच्या सिव्हिल राइट्स चळवळीचे पडसाद इमिग्रेशन पॉलिसीमध्येही पडले नसते तरच नवल होतं. १९६५ साली अमेरिकन सरकारने एक कॉंप्रिहेन्सिव्ह इमिग्रेशन कायदा पास केला. सर्व देशांमधून आलेल्या आलेल्या स्थलांतरितांना दर वर्षी समान कोटा पद्धत तेव्हा सुरु झाली जी आजतागायत चालू आहे. १९६५ नंतर मात्र भारतीय स्थलांतरित मोठ्या संख्येनं अमेरिकेत आले. १९८० पर्यंत त्यांची लोकसंख्या २ लाख झाली आणि त्यानंतर दर दशकाला ती दुप्पट ते अडीचपट होत आता ३० लाखापर्यंत पोहोचली आहे. हा सगळा पुढचा इतिहास सर्वश्रुत आहेच.
१८८० ते २०१५, we have indeed come a long long way.

वॉशिंग्टन डीसी मधील स्मिथसोनियन म्युझियममध्ये ह्या विषयावरील प्रदर्शन ऑगस्ट २०१५ पर्यंत चालू आहे (Beyond Bollywood - Indian Americans Shape the Nation). शक्य असेल तर आवर्जून भेट द्या आणि कसे वाटले किंवा नवीन काय माहिती मिळाली हे इथे जरूर लिहा.

*****
देशांतराच्या कथा (२): भारतीय स्त्रियांचा अमेरिकेतील इतिहास : http://www.maayboli.com/node/54325
*****

अजून एक कल्पना:
मायबोलीवर अनेक देशांतील सदस्य आहेत. जर त्या प्रत्येक देशामधील भारतीय स्थलांतराचा इतिहास आपण संकलित करू शकलो तर तो एक अतिशय उपयुक्त दस्तावेज ठरेल. मराठीमध्ये माझ्या मते अशी माहिती संकलित केलेली नाही.

अधिक संदर्भ:
बर्कली साउथ एशिया लायब्ररी: http://www.lib.berkeley.edu/SSEAL/
Berkeley South Asian History Archive: http://www.berkeleysouthasian.org/
Smithsonian: Beyond Bollywood - Indian Americans Shape the Nation: http://smithsonianapa.org/beyondbollywood/
एंजल आयलंड इमिग्रेशन स्टेशन: http://www.aiisf.org/pdf/aiisf_sfChron_seAsian.pdf
मायग्रेशन पॉलिसी इंस्टिट्यूट: http://www.migrationpolicy.org/article/indian-immigrants-united-states

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>माझ्या आणि मुकुंदच्या आधीच्या प्रतिसादात हे पटेल लोक अमेरिकेतील मोटेल व्यवसायात कसे शिरले हे लिहिले आहे<<

माझ्या माहितीतले बहुतेक सगळे मोटेलवाले पटेल हे भारतातुन आलेले नाहित. ते ब्रिटीश, युगांडा, साऊथ आफ्रिका इ. देशांचे नागरीक होते. पोलिटिकल अनस्टॅबिलीटी, बेटर अपाॅर्चुनिटीज या कारणा करता ते आपली सगळी (आणता येइल ती) संपत्ती अमेरिकेत घेउन आले आणि त्यांनी मोटेल्स मध्ये गुंतवणुक केली. वेरी फ्यु स्टार्टेड फ्राॅम स्क्रॅच...

हे लिहायला योग्य धागा सापडत नव्हता पण हा एक जवळपास जाणारा आहे. अध्यक्ष निवडणुकीच्या धाग्यावर विचारणार होतो पण मायबोली शेवटी अमेरिकन संस्थळ असल्याने तिथली जनता उचकायची म्हणून हा धागा शोधून काढला.
तिथल्या अध्यक्ष निवडीने भारतावर किती परिणाम होतो की आपली माध्यमे एवढा त्या निवडणुकीच्या बातम्यांचा रतीब घालत असतात कायम ? इतरवेळीही सगळीकडे ह्या स्वरूपाच्या बातम्या येत असतात - भारतीय वंशाच्या अमुकतमुक यांची इथे निवड झाली , इथे जिंकून आले, अमुकतमुक पुरस्कार भेटला वगैरेवगैरे . तर ही मंडळी भारतीय नागरिक असती तर एकवेळेस त्या घटनांचे बातमीमूल्य समजू शकलो असतो पण ते दुसऱ्या देशाचे नागरिक असूनही आपली लोकं का एवढी फॉर्मात असतात ? पाटलाचे घोडं @@@ला भूषण या टाईप नाही होत का या बातम्या ? यावरून दुसरा आणि सगळ्यात जास्त महत्वाचा प्रश्न पडला की ही प्रवृत्ती फक्त भारतीय उपखंडातच आढळते की जर्मनी- जपान यासारख्या बुद्धिमान लोकांच्या देशांत असल्याच बातम्या येत असतात तिथल्या मीडियात? अमुकतमुक जपानी-जर्मन वंशाच्या व्यक्तीने अमुकतमुक पराक्रम केला? (बाकीच्या देशांचे पण विचारले असते पण मी फक्त या देशांनाच तुलनेने जास्त बुद्धिमान मानतो)

सोनिया गांधीला परदेशी म्हणून हिणवणारे लोक ती कुणीतरी भारतीय वंशाची अमेरिकन बाई निवडून आली म्हणून तिचे अभिनंदन करत आहेत

Proud

Biggrin

<<<सोनिया गांधीला परदेशी म्हणून हिणवणारे लोक ती कुणीतरी भारतीय वंशाची अमेरिकन बाई निवडून आली म्हणून तिचे अभिनंदन करत आहेत>>>
घाबरू नका. जेव्हढे भारतीय हॅरिसचे अभिनंदन करत आहेत, त्यच्या ५० पटीने जास्त अमेरिकन हॅरिसला नुसते हिणवतच नाहीत, तर चक्क तिचा द्वेष, अपमान करतात. झाले समाधान?

इंडियन आयटी, फायनान्स, बीपीओ फील्डमधल्या लोकांना अमेरिकन घडामोडी फॉलो कराव्याच लागतात कारण त्यांच्या बिझनेसवर थेट परिणाम होत असतो.

पण मंत्रालयात पडीक टाईप पुरोगामी कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर अगदी 'ओहायोमध्ये इतकी आघाडी' 'टेक्ससचा कल कुठे' टाईप लिहिताना पाहिलं तेव्हा जरा हसूच आलं. एरवी चिन्मय तन्मय बद्दल पोस्टी प्रसवणारं हे पब्लिक.
यांचं नुसतं ट्रम्प बायडन ही मुख्य नावंच नव्हे तर Squad मधल्या त्या 4 बायका, सीएनएन-एनबीसी-सीबीएस वर काय चाललंय, dr fauci's comments असं सगळीकडे बारकाईने लक्ष आहे Biggrin
चिन्मय तन्मयना Michigan किंवा wisconsin मध्ये राहून जितकी माहिती नसेल तितकी या ताईदादाना महाराष्ट्रात बसून आहे. Proud

असेना का. माहिती असणं वाईट नाही. पण दुसऱ्या देशाच्या कारभारात निष्कारण लुडबूड करणं मात्र तितकंसं चांगलं नाही.

आमचे लोक तर बायडेंन साठी नुसते नाचत आहेत

तुमचे लोक तर ट्रम्पसाठी यज्ञ करत होते

यज्ञाचे फळ मिळाले , सत्ताही गेली बायकोही गेली

लेख वाचनीय आहे आणि काही प्रतिसादही.

मागच्या अमेरिका दौऱ्यात वॉशिग्टनमध्ये अगदी मोक्याच्या ठिकाणी (कॉन्स्टिट्यूशन ऍव्हेन्यू) SMITHSONIAN NATIONAL MUSEUM OF AFRICAN AMERICAN HISTORY AND CULTURE दिसले. २०१६ सालीच उदघाटन झाल्यामुळे फार कोणाच्या 'मस्ट व्हिसिट लिस्ट' मध्ये नव्हते. एक भारावून टाकणारी जागा आहे.

असेच भारतवंशीय आणि त्यांच्या अमेरिकेतल्या इतिहासाचे, योगदानाचे केंद्र उभे राहिलेले बघायची इच्छा मनात आहे.

असेच भारतवंशीय आणि त्यांच्या अमेरिकेतल्या इतिहासाचे, योगदानाचे केंद्र उभे राहिलेले बघायची इच्छा मनात आहे...>>
तसंच होवो !!

तुम्ही नाही का अमेरिकेत राहून भारतातले चिल्लर पत्रकार, नट्या आणि त्याचे तमाशे वगैरे पांचट गोष्टींची माहिती ठेवत? आणि वर वादविवाद करत? ते ताईदादाही तसेच जगातली माहिती ठेवत असतील. त्यात काय?
की ते ताईदाला भारतासारख्या दरिद्री देशातले दरिद्री आहेत आणि तुम्ही अमेरिकेतील महान एनाराय म्हणून त्यांची चेष्टा करावी वाटते?

अटलिस्ट ते ताईदादा त्यांच्या विचारात कन्सिस्टन्ट आहेत. भारतातही पुरोगामी आणि अमेरिकेतही.
नाहीतर काही महान एनाराय लोक, आमेरिकेत पुरोगामी नी भारतात प्रतिगामी. फक्त स्वार्थ बघायचा. तत्व वगैरे काही नाहीच.

सुनीती.,
तन्मय चिन्मय रेफरन्स तुम्हाला कळला नसेल तर माझी आधीची पोस्ट तुम्हाला absolutely कळणारच नाही.

आणि हो, भारतात 'पुरोगामी' राजकीय पक्ष अस्तित्वात आहेत अशी तुमची धारणा दिसते. या धारणेसाठी आपल्याला साष्टांग नमस्कार. आपल्याशी चर्चा करण्याची माझी पात्रता नाही.
एकतर्फी चालू द्यात. Happy

नवीन धागा काढायचा ना.> हो .. तेच ठीक झाले असते आणि व्यवस्थित चर्चा झाली असती. इथे मी नमुद करू इच्छितो की मला बाहेर देशात जाऊन तिथले नागरिक बनलेल्या लोकांबद्दल काहीही अढी नाही मनात. त्यांना अर्थात इथल्या पेक्षा चांगल्या संधी मिळाल्या आणि ते त्यांच्या मेहनतीवर मोठे झाले सो त्यांचा प्रश्न नाही. फक्त आपल्या इथल्या लोकांना कशाचेही अप्रुप वाटत असते आणि अर्थाअर्थी सबंध नसताना ते आनंद साजरा करतात ते पाहून असा प्रश्न पडला. its very weird habit of indian people

तेच तर

आणि मग लोकांना शाहरुख खान देशद्रोही वाटतो अन अक्षयकुमार देशप्रेमी

<<निष्कारण लुडबूड करणं मात्र तितकंसं चांगलं नाही.>>
घाबरू नका. तुम्ही कितीहि काहीहि लिहिले तरी तुमची इथे लुडबुड होणारच नाही, कारण कुणि लक्षच देत नाहीत.
अमेरिकन तर मुळीच नाही, पण इथले नागरिक झालेले भारतीय सुद्धा नाहीच.
भारतात अजूनहि गोर्‍या लोकांबद्दल जास्तच प्रेम दिसते. इथे आल्यावर थोड्याच अवधीत गोर्‍या लोकांचा खरा रंग कळला की भ्रमनिरास होतो.

Proud
तरी तुम्ही अमेरिकेत गोरा छाप नोटा छापत बसले

मोदी आले की इथे , घरवापसी करणार का ?

अमेरिकन गोरे तुमच्यावर तितकेच प्रेम करणार जितके इथले वरचे लोक इथल्या आरक्षणवाल्यांवर करतात
Proud

<<<फक्त आपल्या इथल्या लोकांना कशाचेही अप्रुप वाटत असते आणि अर्थाअर्थी सबंध नसताना ते आनंद साजरा करतात ते पाहून असा प्रश्न पडला. its very weird habit of indian people>>>
मला त्यात काही weird वाटत नाही. गोष्टींचे अप्रूप वाटणे नि आनंदी रहाणे हे तारुण्याचे लक्षण आहे. आपली वृत्ति आनंदी असली की आपल्या आजूबाचूच्या लोकांनाही बरे वाटते.
वृद्धपणी कशाचेहि अप्रूप वाटत नाही नि आमच्यावेळी असे नव्हते म्हणत चिड चिड करत रहाणे, यात काहीहि सुख नाही - ना स्वतःला ना इतरांना.

<<भारतासारख्या दरिद्री देशातले दरिद्री आहेत >>

भारतीयांना हा न्यूनगंड का? ज्याला थोडीफार तरी अक्कल आहे असा कुठलाहि माणूस भारताला दरिद्री म्हणणार नाही. विशेषतः एनाराय नि कित्येक भारतीय जे बरेच वर्षे इथे रहातात त्यांना तर असे मुळीच वाटत नाही. आज भारतीय मध्यम वर्गाकडे जेव्हढा पैसा आहे तेव्हढा इथे रहाणार्‍या अर्ध्याहून अधिक लोकांकडे नाही. सहजा सहजी हजारो लाखो रुपयांच्या गोष्टी करणारे भारतीय कुठे नि दहा ऐवजी १२ डॉलर झाले की महागाई वाढली म्हणणारे इथले लोक कुठे!
सहज तीन चार नोकर बाळगणारे भारतीय कुठे नि स्वतःचे संडास स्वतः साफ करणारे इथले भारतीय कुठे?
भारत आज जगातील एक महान सत्ता आहे - अमेरिकेचा प्रेसिडेंट भारताला चांगला का वाईट याचा विचार करण्यापेक्षा आज अमेरिकेच्या प्रेसिडेंटने काळजी करायला पाहिजे की भारतीयांना आपण आवडू की नाही. भारतीयांची प्रगति, त्यांची हुषारी ही स्वतःला शहाणे म्हणवणार्‍या लोकांना काळजी करायला लावणारी गोष्ट आहे - त्याचबरोबर त्यांना हेहि माहिती आहे की हुषारीत ते भारतीयांशी स्पर्धा करू शकणार नाहीत.
जगभर पसरून यशस्वी झालेले भारतीय पहाता लवकरच भारत स्वतःच्या हुषारीवर महासत्ता होईल.

भारतात पुष्कळच आर्थिक/ शैक्षणिक/नागरिक विषमता आहे. एक दशांश टक्का नागरिकांकडेही वर वर्णन केलेल्यातली समृद्धी नाही. पण अर्थात लोकसंख्याच खूप असल्याने इतक्या कमी टक्केवारी चेही लोक संख्येने खूप असतात.

भारतात पुरोगामी पक्ष आहेत अस मला खरंच वाटतं. तुम्हाला का नाही वाटत? तुमची काय व्याख्या आहे पुरोगामीची?>>>

जो देश अजून जातीपातीच्या चिखलातून बाहेर आलेला नाही, ज्या देशातील आम जनता व त्यांचे नेते 'आमचा समाज आजही मागास राहिलाय आणि आरक्षण हेच त्यावर एकमेव सलाईन आहे, ते लवकर टोचा' म्हणून निदर्शने करतात तो देश, जनता, समाज पुरोगामी कसे होणार? राजकीय पक्ष समाजाचेच प्रतिबिंब आहेत, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?तेही पुरोगामी कसे होणार?

मग बिघडले कुठे ? बुद्धिमान लोक आय आय टी शिकून बाहेरच जातात

आरक्षणात शिकून केली भारतात नोकरी तर बिघडले कुठे ? आरक्षण नव्हते तेंव्हा उचवर्गीय लोक विश्वाला विमान वेकसिन वगैरे पुरवत होते की काय ?

Pages