आधुनिक भारतातील युगपुरूष !

Submitted by केदार on 14 August, 2015 - 07:48

६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस आधुनिक भारतात कोण कोण युगपुरूष होते असा विचार करू जाता केवळ एकच नाव समोर दिसते.

मोहनदास करमचंद गांधी ! फॉर बेटर ऑर फॉर द व्हर्स - ही वॉज द मॅन इंडिया निडेड.

More you read about him, more you hate and more you read about him, more you respect !

भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा ! जय हिंद !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बायदवे भारतात गांधींचे सर्वात जास्त बॅशिंग भीमराव रावजी आंबेडकरांनी केलेले आहे. (सहज तुम्हाला माहिती असावे म्हणून. )
>>

कित्ती कित्ती माहिती आणि प्रेम आहे हो तुम्हाला आंबेडकरांबद्दल!
घुसडलंतच तुम्ही आंबेडकरांना स्वतःच काढलेल्या गांधीजींच्या धाग्यावर.

आता धागा हीट आणि हॉट होणार हां एकदम!

>>तुम्ही राजु गाइड कॅरॅक्टरशी तुलना करून त्यांचे काम बिलिटल करता आहात असे वाटते<<

आतातर मला तुमच्या वाचन/आकलन या विषयी शंका आहे. माझी सगळी कमेंट परत वाचा, तरीहि नाहि समजल्यास सोडुन द्या. आय कॅन अंडरस्टॅंड...

आणि हो, मी अनॅलजी मांडली होती, अनॅलिसिस नाहि.

मो.क. गांधी.
दोन लहान वर्तुळे आणि त्याला दोन काड्या. वरती टक्कल दाखवणारी एक रेघ. शेजारी एक काठी. म्हणजे चित्र पूर्ण असते तर हातात धरल्यासारखी दिसली असती अशी. किंवा नुसताच चश्मा, एका विशिष्ट कोनात (डोळ्यांवर) ठेवलेला.
बस्स. झाले गांधी. मिनिमालिस्टिक आणि मॅक्ज़िमाय्ज़िंग.
नदी सुदूरस्थ जनां पवित्र,
विटाळिती तीर्थ तिचेच पुत्र.

राज, मला तुम्ही गांधीजींची तुलना राजू गाइडबरोबर केल्याने ते बिलिटल झाले असे म्हणायचे नसून राजू गाइडच्या प्रवासाबरोबर गांधीजींच्या प्रवासाची तुलना (उत्तरायुष्यातल्या) ते बिलिटल झाले आहेत असेच म्हणायचे आहे.
पण आता थांबू. कारण तुम्हाला माझ्या आकलनाबद्दल व वाचनाबद्दल शंका असल्याने यातून निष्पन्न काहीच होणार नाही. धन्यवाद.

@हिरा, गांधीजींचे ते मिनिमलिस्टिक चित्र पहिले लक्ष्मणने काढले का?

बायदवे भारतात गांधींचे सर्वात जास्त बॅशिंग भीमराव रावजी आंबेडकरांनी केलेले आहे.
>>

घ्या ... मला वाटत होते सावरकरांनी Happy

आपापली व्यक्तीगत भांडणं दुसर्‍या वाहत्या बाफवर करा कृपया.
>> Rofl अरे कसली वैयक्तिक भांडणं न कसलं काय ? या आयडीला ओळखत देखील नाही.

क्षमस्व. खरे तर असे करायची मला आवश्यकता नव्हती. प्रत्येक धाग्यात नको तिथे तोंड खूपसून दिड-शहाणी अक्कल पाजळ्णा रे नवीन आयडी वाचले > यैच्च त्तो , यईच प्रॉब्लेम है न. किसीकी खेती किसीका घोडा, बीच मे महंमद अली क्युं दौडा ?

पुन्हा या धाग्यावर माझ्याकडून असे घडणार नाही.>>> Lol

चालू द्या , चालू द्या !!!

मिनिमालिस्टिक आणि मॅक्ज़िमाय्ज़िंग. >> +१

कित्ती कित्ती माहिती आणि प्रेम आहे हो तुम्हाला आंबेडकरांबद्दल!
घुसडलंतच तुम्ही आंबेडकरांना स्वतःच काढलेल्या गांधीजींच्या धाग्यावर. >>

ह्या धाग्यवर दुसर्‍या नेत्यांचे नाव प्रथम खडीसाखर ह्यांनी आणले आहे. मी फक्त गांधी एवढेच लिहिले होते.

त्यांना त्यांच्याच भाषेत ( म्हणजे बॅशिंग पोस्ट ) उत्तर देताना मी एक फॅक्ट सांगीतली आहे. तुम्हाला फॅक्ट माहिती नसतील तर उगाच मला का दोष देता? तसेच आंबेडकर काही बाबतीत कसे गांधींपेक्षा ग्रेट आहेत हे मी नुकतेच तुमच्या ग्रूप मधील एका सदस्यांच्या सोबत झालेल्या चर्चेत लिहिले आहे. (उद्या डॉ आंबेडकरांवर मी एक धागा काढला तर लगेच तुम्ही ओरडणार का बॅशिंग बॅशिंग म्हणून? कारण माझे नाव आडनाव जोशी आहे बहुदा म्हणून. जातीयवाद ह्यालाच म्हणतात का? - हे वैतागून लिहितोय. )

ह्या लोकांना फक्त लोकं म्हणूण पाहा. गुण दोष आपोआप दिसतील. काही लोकांना फक्त गुणच आवडतात, मला त्यांचे दोषही एक इतिहास अभ्यासक म्हणूण पाहायला आवडतात, ते मी चर्चेत मुद्द्या व पुराव्यासहित देतो ह्यात नविन काहीच नाही.

हा धागा गांधी बॅशिंगचा आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे. त्यांनी तसे टिळक धाग्यावर लिहून आमंत्रीत केले जे चूकीचे आहे हे पण मी त्या साखरेबुवांना सांगीतले. पण सातीने देखील तोच सूर लावला आहे. जो चुकीचा आहे. सांगणे माझे काम म्हणून सातीला उत्तर देतोय.

--

बर्‍याच लोकांनी आधुनिक ह्या शब्दाचा अर्थ चुकीचा घेतला आहे. इतिहासात कालखंड असतात. मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत ह्या अर्थाने तो घ्यायचा आहे ना की इंडस्ट्रियलायझेशन. आणि तसाच अर्थ घ्यायचा असेल तर मनमोहन सिंग हे त्या रेस मध्ये जास्त पुढे असतील. पण तो मुद्दा नाही.

आडनाव जोशी आहे होय ? बरं.
फार पाणचट आयड्यांच्या तोंडाला लागायची पाळी आली आज ! निशेध बुवा स्वतःचाच.. आता पुन्हा प्रत्तुत्तर. काय ऐकत नाय Lol

प्राधान्यक्रमानुसार :

१. गांधी
२. आंबेडकर

हे दोघेच युगपुरुष! बाकी सगळे स्वातंत्र्यसैनिक महापुरुष Happy

अय्या, तुमचं आडनाव जोशी आहे का?
माझ्या लक्षातच नव्हतं.
Wink

बाकी ते आंबेडकरांच्या वडिलांचे नाव 'रामजी' करा पाहू.
इतिहासतज्ज्ञांनी असा इतिहास लिहिलेला पाहून माझ्या भावना दुखावतायत.

आडनाव जोशी आहे होय ? बरं.
फार पाणचट आयड्यांच्या तोंडाला लागायची पाळी आली आज ! निशेध बुवा स्वतःचाच.. आता पुन्हा प्रत्तुत्तर. काय ऐकत नाय हाहा

>>

खंडेराव,

आवरा की जरा ...

आडनावामुळे झालेल्या "अन्यायाच्या कथा" ऐकूनच जावं म्हणतो आता. नाही म्हणजे यांचे स्वत:चे चष्मे भ्रष्ट आणि दोन दोन आयड्यांनी चंमतग करतात त्याची मौज वाटली. Lol

नाही म्हणजे यांचे स्वत:चे चष्मे भ्रष्ट आणि दोन दोन आयड्यांनी चंमतग करतात त्याची मौज वाटली. हाहा >>

मी एकाच आयडीने लिहितो. केदार ह्या. मला ड्यु आयडीची गरज नाही.

आडनाव मी वैतागुन मध्ये आणले. कारण तुम्ही ( अन काही प्रमाणात साती हा बाफ दुसरीकडेच नेत आहात.

मी गांधींवर लिहू शकत नाही का? का असं वाटावं तुम्हाला की टिळकांचा प्रतिशोध म्हणूण मी हा बाफ उघडला ते.

का उगाच आपली ओळखही नसताना तुम्ही विनाकारन आरोप करत आहात?

व्हॉट्स द फन इन दिस?

स्वातंत्र्यलढ्यात आपले प्राण वेचणारे आणि त्यासाठी हसत हसत मृत्यूला आलिंगन देणारे वीर हे खरे युगपुरुष होते.
त्या दृष्टीने विचार करता खालील नावं चटकन समोर येतात -

भगतसिंग
सुखदेव
शिवराम हरी राजगुरु
चंद्रशेखर आझाद
रामप्रसाद बिस्मिल
राजेंद्र लाहिरी
अश्फाकउल्लाह खान
मदनलाल धिंग्रा
उधमसिंग

अर्थात याचा अर्थ असा नाही की बाकी कोणाचंही काहीही कर्तृत्व नाही. गैरसमज नसावा.

बर्‍याच लोकांनी आधुनिक ह्या शब्दाचा अर्थ चुकीचा घेतला आहे.>>>>>

त्या टिळकांच्या धाग्यावर इतिहास चघळून काय उपयोग असे वाचले होते म्हणुन म्ह्टले
आधुनिक भारतातील युगपुरूष अरविंद केजरीवाल ठरतिल
जे गेले त्यांची नावे का घ्या.ते इतिहास जमा झाले आता.

लालु यादव पण आधुनिक भारतातील युगपुरूष ठरु शकतात.

महात्मा गांधी. मोहनदास करमचंद गांधी या मानवाला समजण्याकरीता अख्खी पिढी गेली तरी समजले नाही. मिठाई वाटा या बंदूकीचे फोटो टाका या मानवाला तिळमात्र फरक पडणार नाही त्याने काम जे हाती घेतलेले ते तडीस नेले. काहींकडून स्वताःचे नेमून दिलेले office मधले रोजचे काम देखील होत नाही. यांना बोलणे म्हणजे सुर्यावर थुंकणे जे इथले काही बिनलायकीचे आयडी करतात. गांधी नसते तर अजून ही इंग्रजांची गुलामी करावी लागली असती (काही जण अजून करतात तो भाग वेगळा. गुलामी तर करतात वर जिथून शिकून गेले मोठे झाले त्याच देशाला नावे ठेवण्यात आनंद मानतात)
बाकी सुप्रीम कोर्ट ने आदेश भारी दिला आहे

मग भरकटवा बाफ. >>

मी जेन्युईन बाफ काढला आहे तो दुसरीकडे नेण्याचे कार्य खडी साखर करत आहेत. आणि काही अंशी तुम्ही.

कॉपरमाईन युगपुरूष आणि वीरपुरूषांमध्ये फरक असतो. तुम्ही जी यादी दिली ती वीर पुरूषांची आहे.

ते जाऊदे.
जरा टायपिंगची चूक निस्तरा की.
काय आहे की काही लोकांना सकपाळ, संकपाळ, अंबावडेकर, आंबेडकर हे आडनावाचे ट्रान्झिशनपण माहित नाही, त्यात तुम्ही वडलांच्या नावाचापण घोळ घालताय.
Wink

टण्या, होय, बहुधा लक्ष्मणच. पण खात्री नाही.
केदार. मनमोहनसिंहांची योग्य ती कदर केल्याबद्दल अनेक धन्यवाद. मनमोहनजी आणि काही प्रमाणात नरसिंहराव हे माझ्यामते unsung heroes आहेत.

काय आहे की काही लोकांना सकपाळ, संकपाळ, अंबावडेकर, आंबेडकर हे आडनावाचे ट्रान्झिशनपण माहित नाही
>>

सांगा की सवीस्तर तुम्ही ... आम्ही राहिलो अडाणी पामर ...

केदार. मनमोहनसिंहांची योग्य ती कदर केल्याबद्दल अनेक धन्यवाद. मनमोहनजी आणि काही प्रमाणात नरसिंहराव हे माझ्यामते unsung heroes आहेत. >>

अरे कदर काय त्यात हीरा. हा माझाही देश आहे आणि हे सर्व लोकं माझेही पुढारी आहेतच की.

नरसिंहराव हे माझ्यामते unsung heroes >> टोटली.

हीरा,

अनुमोदन! खरेतर मलासुद्धा नरसिंहराव यांचे नाव घ्यावेसे वाटत होतेच, परंतु सुरुवात गांधींपासून झालेली असल्याने नेमका गोंधळ. १९९१ च्या अभूतपूर्व स्थितितून त्यांनीच काढले. देशास सांभाळले त्यांनीच Happy आणि नंतर ते सोने सोडवूनही आणले.

आता स्वामी उगाच म्हणतात की चरणसिंहांच्या मंत्रिमंडळातील त्यांचीच योजना मनमोहनसिंग आणि नरसिंहराव यांनी राबवली! हे खरे खोटे कोणास ठाऊक!

बर्‍याच लोकांनी आधुनिक ह्या शब्दाचा अर्थ चुकीचा घेतला आहे. >> हो मी आधुनिक म्हणजे कालखंडाच्या दृष्टीने धरले नव्हते. पॉइंट टेकन.

खडी साखर या आयडी ने बरेच ठिकाणी उगाचच संबंध नसताना धागे भरकटवणे, वैयक्तीक शेरेबाजी करणे, लोकांची टर उडवणे असले प्रकार केले आहेत. करतो आहे. त्याच्या लिखाणावरून अकलेशी त्याचा दूर-दूर वर संबंध नाही हे स्पष्ट दिसतेच.

म्हणतात ना, डुकरा बरोबर कुस्ती करण्यात अर्थ नसतो. एक तर तुम्ही चिखलात लोळता आणि डुक्कर एंजॉय करते. Happy

काहीही हां खडी ! Wink

Pages