पावसाळी कविता (एक धागा हौशी कवींसाठी)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 August, 2014 - 14:35

पाऊस येतो आपल्या मर्जीने !
पाऊस जातो आपल्या मर्जीने !!
लोकं मात्र भिजतात आपल्याच हलगर्जीने ..

मी कवी नाहीये. पण तो बरसायला सुरुवात झाली की आपसूक शब्दांचेही ढग मनी दाटून येतात. अन त्याच्यासंगे रिते होतात.

लोकं पण ना, कमाल करतात,
चार थेंब नाही पडले, तर छत्री खोलतात ..

जेव्हा आभाळ कोरडे पडते, तेव्हा "धावा" करतात ..
जेव्हा बरसू लागते, यांच्या "विकेट" पडतात !

- कवी ऋन्मेऽऽष

असू द्या असू द्या ...
तर माझ्यासारखे पावसाळी कवी मायबोलीवर कैक असतील. आपल्या सर्वांसाठी म्हणून हा धागा. कविता वाचायला आवडणार्‍यांसाठी नाही, तर कविता (न लाजता) रचायला आवडणार्‍यांसाठी. कोणीच नाही लिहिले तर माझी मी भर घालत राहीलच. तरीही कोणी नावाजलेल्या कवींच्या फसलेल्या पावसाळी कविता त्यांना शेपरेट धागा काढून प्रकाशित कराव्याश्या वाटत नसतील तर त्या कृपया इथे येऊ द्या. जर असा एखादा धागा मायबोलीवर आधीच असेल तर कृपया त्याच्या लिंका शोधायचा त्रास घेण्यापेक्षा काही ताज्या ताज्या पावसाळी चारोळ्या रचून ईथे भर घाला. पावसाळा उलटून दोन महिने झाल्यावर हा धागा काढला म्हणून,
दिलगीर आहे,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेषची कविता पुढे कंटिन्यू करते Proud
-----

भिजवून टाकायला चार थेंब पुरतात
एक तनावर
एक मनावर
दोन तरीही उरतात ...
एक शिशिरावर
एक ग्रीष्मावर
पुढच्या पावसापर्यंतची बेगमी करतात

डिविनिता .. धन्यवाद .. आवडेल त्यालाच चांगले बोलल्याबद्दल Proud

आश्विनी .. वाह वा पर्रफेक्ट ! अर्थ आणलात, नाहीतर ते दोन थेंब वाहूनच जायचे होते.
(आणि माझ्या ओळी कंटिन्यू कराव्याश्या वाटल्या म्हणून जरा माझीही पाठ थोपटतो Wink )

पहिलं पहिलं प्रेम
सांवर रे मना
पहिल्या पावसाचंही सेम
तू कोसळ रे घना..

....
...

आज मुंबईत पैल्यावैल्या पावसाने हजेरी लावल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ जुना धागा उचकवटून वर आणत आहे.

श्रावण...

आला रे आला
पुन्हा श्रावण आला
घेऊन आठवणींचा झुला

हिंदकळती आठवणी
पाणथळल्या वळचणी
इंद्रधनूचा घेऊन झुला
आला रे आला
पुन्हा श्रावण आला

बहरली माती
हिरवीगार शेती
मृदगंध आसमंती दाटला
आला रे आला
पुन्हा श्रावण आला

ऊनपावसात लागे
कोल्हाकोल्हिचे लगीन
ढगांचा बॅड वाजला
आला रे आला
पुन्हा श्रावण आला

केतकीच्या बनात
मयूर पिसारा फुलला
सर्वत्र केकारव घुमला
आला रे आला
पुन्हा श्रावण आला

राजेंद्र देवी

हाहा धन्यवाद लोक्स, ते तर धागा वर काढायला काहीतरी खरडले, पण धागा चालू न होता तो वार फुकट गेला म्हणून आणखी एक बनवले.. आवडले तर बरंय पण, व्हॉटसपवर फिरवतो Wink

मी कविता लिहीतो आहे
तरीही थापा मारतो आहे
ऋ चा खोटेपणा बघण्या
धागा वर काढतो आहे
Lol

व्वा राजेंद्रजी सुंदर रचना! Happy

पावसाच्या धारा
बरसुनी गेल्या
शेकडोंचा संसार
उघड्यावर मांडुन गेल्या

पुर आला होता
आता ओसरला आहे
आसवांचा पुर
नेत्रांत अजुनही आहे

वाहुन गेली गुरेढोरे
नाहीशी झाली घरे
अन्
जागी झाली
माणसांतली माणुसकी सळसळले हात शेकडो एकजात फक्त
माणुस होऊनी

(Dipti Bhagat)

वादळांचा गडगडाट होता विज चमकते।
पडणारच म्हणता कुठेतरी माशी शिंकते।।
धोधो पडणारा अंगणात शिंपडाव करतो।
मन ओले चिंब होता तन राहते भिजायचे।।

चारोळी खास तुझ्यासाठी

श्रावण आला गं सखे
----------------------------

श्रावण आला गं सखे
माहेराची सय आली
हाती जरी किती कामं
त्या साऱ्याला लय आली

परसात एक आड
अंगणात किती झाडं
त्या झोक्यांची याद आली

प्रेमळ गं भाऊराया
वहिनी करिते माया
भेटायची इच्छा झाली

देवासमान गं पिता
देवासमान गं माता
पानं गळायला आली

आताच जायला हवं
त्यांना पहायला हवं
चिंता इथे भय घाली
------------------------
बिपीन

छन्दिफन्दि यांच्या धाग्याला पाहून हा आठवला..
वर काढतो..
सध्या एका दुखात आहे.
त्यामुळे पाऊस आणि विरहरस एकत्रच शब्दातून बाहेर पडतील असे वाटतेय..

सध्या एका दुखात आहे.
त्यामुळे पाऊस आणि विरहरस एकत्रच शब्दातून बाहेर पडतील असे वाटतेय..

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 August, 2023 - 0>>> sorry to know. Get better soon

छन्दिफन्दि यांच्या धाग्याला पाहून हा आठवला>>> धन्यवाद.

मस्त धागा.

काही चारोळ्या आणि कविता मदत आहेत.

ऋन्मेऽऽष, या घाग्याबद्दल खूप खूप आभार. सर्वांना निसंकोचपणे कविता पोस्ट करायला प्रवृत्त केलात आणि एरवी कधी वाचायला मिळाल्या नसत्या अशा छोट्या छोट्या मस्त कविता वाचायला मिळाल्या.

ही माझी कधीतरी पूर्ण करेन म्हणून ठेवलेली कविता चारोळी म्हणून या काव्यप्रवाहात सोडून देत आहे..

पिसाटलेला वारा मिळे
गडगडणाऱ्या नभा,
अन् या साऱ्याच्या मधे
मी हतबल उभा..

ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत,
सौमित्रच्या आवाजातल कानात घुमत. मधे ह्याच्या खूप पोस्ट्स बघितल्या होत्या आणि सगळ्यांतून प्रेरणा घेत ट ला ट लावत एक शब्दचित्र रेखाटण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय...

ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं,
Ac पायी वीज मीटर आकाशाला भिडत
मन मात्र गावच्या बालपणात रमत
नाही AC नाही फॅन
एक झुला त्या आंब्याला बांध
वारा तो अवखळ कधी आंबे पाड,
तर कधी चिंचा चटक
चोखत चोखत झाडाला लटक
ऊन बिन काही नाही
गावाकडची आमची मस्त आमराई!

वळवाच्या पावसावर कविता आहेत, पहिल्या पावसावर आहेत, श्रावणातल्या पावसावर तर ढिगाने आहेत. पण भाद्रपदात येणाऱ्या पावसाबद्दल कविता आहेत काय? श्रावण म्हटलं की क्षणात येते सरसर शिरवे वगैरे किंवा माहेरवाशिणी खेळ खेळतात झाडाला दोले वगैरे बांधून. पण भाद्रपद महिन्यात हा ऋतू फार निष्ठुर आहे. हस्त नक्षत्राचा धो धो मारा होत असतो. पितृपक्ष येतो. गणपतीत सगळ्या मंडळ कार्यकर्त्यांची धांदल उडवून टाकतो. ह्या महिन्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस येतो आणि त्याच्या धारा सुयांसारख्या बोचतात. ह्याच दरम्यान पूर्व किनाऱ्यावरील राज्यांत तो थैमान घालतो. वादळं गावं गिळून टाकतात. यांवर कविता व्हायला हवी.

गणपतीतला पाऊस तसा आवडीचा आहे माझा.
पाहिले कारण विसर्जनाला पाऊस असेल तर नाचायला मजा यायची.
दुसरे कारण म्हणजे कोकणात जेव्हा जेव्हा मुक्कामाला गेलोय ते गणपतीमध्येच गेलो आहे. त्यामुळे एकंदरीतच उत्सवाचे वातावरण + पाऊस + कोकणचे निसर्गसौंदर्य अश्या छान आठवणी आहेत.

ह्या महिन्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस येतो आणि त्याच्या धारा सुयांसारख्या बोचतात. ह्याच दरम्यान पूर्व किनाऱ्यावरील राज्यांत तो थैमान घालतो. वादळं गावं गिळून टाकतात. यांवर कविता व्हायला हवी>>>>

मला कणा कविता आठवली.

अतिशय आवडती आहे.

कणा >> +१

नको नको रे पावसा पण आठवली आत्ता.

Pages