१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
नरेश
नरेश
फोटो बघूनच समजत होते गौडबंगाल
फोटो बघूनच समजत होते गौडबंगाल
बघायलाही आजच गेलो जेव्हा वर कौतुक वाचले
पण पण पण... असे गरजेचे नसते
पण पण पण...
असे गरजेचे नसते तिथे आपलाच फोटो हवा, उद्या मी शाहरूखचाही लावू शकतो की..
कुमार ऋन्मेष, तुम्ही
कुमार ऋन्मेष,
तुम्ही प्रोफाईलवरच काय पण तुमच्या सर्वांगावर शाहरूख गोंदवून घ्या! फक्त काहीही संबंध नसताना प्रत्येक धाग्यावर नळ गळावा तसं गळू नका शाहरूखच्या नावाने.
स्पार्टा
स्पार्टा
स्पार्ट्या
स्पार्ट्या
स्पार्टा >>>>
स्पार्टा >>>>
अहो ते फक्त उदाहरण होते,
अहो ते फक्त उदाहरण होते, उदाहरणात सचिन तेंडुलकर टाका हवे तर. त्यात काय एवढे. फक्त नंबर वनच घ्या.
शाहरुख नंबर वन आहे असं
शाहरुख नंबर वन आहे असं तुम्हाला कोणत्या गाढवाने सांगितलं? कृपया आरशाचा उल्लेख करु नका.
कृपया आरशाचा उल्लेख करु
कृपया आरशाचा उल्लेख करु नका.
>>
येस्स आरसाच, मुंबई मिरर
प्रत्येक गोष्ट तुम्हीच
प्रत्येक गोष्ट तुम्हीच सांगितली पाहिजे असा काही नियम नाही आहे
लेट मी रीफ्रेजः शाहरुखला नंबर
लेट मी रीफ्रेजः शाहरुखला नंबर वन म्हणणारा/री गाढव आहे.
(No subject)
हाच फोटो कसा मिळाला असेल
हाच फोटो कसा मिळाला असेल ह्यांना?
त्यांचाच असु शकतो नंतर
त्यांचाच असु शकतो
नंतर अमानविय रुपाने मायबोलीवर आलेल्या असतील
हो रामदेव बाबाने जिवंत केल
हो रामदेव बाबाने जिवंत केल असेल बहुदा
म्हणुनच त्या रामदेवबाबांना
म्हणुनच त्या रामदेवबाबांना साधं भारतरत्न देण्याची मागणी करत आहेत.
उडीद वड्यांना छिद्र का
उडीद वड्यांना छिद्र का पाडतात? छिद्र न पाडता वडे करायचा प्रयोग करण्याचे आवाहन पाकृ वाल्यांना करण्यात येत आहे..
वांगी भाजताना त्यालाही छिद्र का पाडतात?-- छिद्र न पाडल्यास वांग्याचा फटका होतो. (प्रयोगांती सिद्ध)
से गरजेचे नसते तिथे आपलाच फोटो हवा, उद्या मी शाहरूखचाही लावू शकतो की..>>>
गफ्रे चा लावा, आम्हालाही दर्शन होउ द्या त्या प्रचंड सहनशिल व्यक्तिमत्वाचे..
प्रचंड सहनशिल
प्रचंड सहनशिल व्यक्तिमत्वाचे.. >>> सहमत, हि तिची सर्वोत्तम क्वालिटी आहे, आणि म्हणूनच मी माझ्या ग'फ्रेंडशीच लग्न करणार आहे.
मला तर लय भ्या वाटु राह्यल.
मला तर लय भ्या वाटु राह्यल. ते पेपरमधले भूत इथे रागवुन यील आणी मायबोलीला झपाटल.
दर्शन द्याना वीणाताई आता
ह्म्म्म फोटो पाहिला तेव्हाच
ह्म्म्म फोटो पाहिला तेव्हाच संशय आला होता की येथे वेगळेच काही सुरू आहे.
असो, पसंद अपनी अपनी.
रेकाॅर्ड धागा आहे का ?
रेकाॅर्ड धागा आहे का ? जाणकारांनी प्रकाश टाकावा....
खरेतर अॅडमिनने प्रत्येक
खरेतर अॅडमिनने प्रत्येक आयडीची आयडेंडिटी निट तपासुन मगच प्रवेश द्यावा असे वाटते.
ना रहेन्गे डुआय, ना होन्गे भांडण !
मग तुम्हाला साथ देणार्यांचे
मग तुम्हाला साथ देणार्यांचे काय होईल
महेश, आणि ती आयडेन्टीटी
महेश, आणि ती आयडेन्टीटी प्रोफाईलमधे नीट दिसली पाहीजे. म्हणजे सांडलेले ज्ञानकिरण नेमके कोणाचे ते समजेल

निशाना तुला दिसला ना
निशाना तुला दिसला ना
महेश, म्हटलं नव्हतं तुला?
महेश, म्हटलं नव्हतं तुला? बरोब्बर बाण लागलेला आहे बघ.
मला तर लय भ्या वाटु राह्यल.
मला तर लय भ्या वाटु राह्यल. >>>मला बी! अहो विना तै याकी.....कुनी अतिरेकी तर नसल न्हव???
बाण कुठे लागला कळल सगळ्यांना
बाण कुठे लागला कळल सगळ्यांना
इथलेच कुणीतरी ड्यु आय आहेत.
इथलेच कुणीतरी ड्यु आय आहेत.:फिदी: पहिल्यान्दा वाटल की फेसबुकावर लिहीतात त्यामुळे इथे मराठी लिहीणे अवघड नसणार. पण शब्दखुणा पाहिल्यावर सन्शय आला. पण वाटले तसे काही नसेल.:डोमा::फिदी:
Pages