१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
काय आधुनिक उथळपणा चालु आहे
काय आधुनिक उथळपणा चालु आहे हा.
अरेरे.. सार्काझम वाया
अरेरे.. सार्काझम वाया
सुप्रभात माबोकर हॅपी शनिवार
सुप्रभात माबोकर हॅपी शनिवार
दुर्दैवाने आधीच्या सरकारने
दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही
>>>
भारतरत्न ? आणि साधं? मग स्पेशल काय ? ::अओ:
कोणाला भारतरत्न दिले नाही?
कोणाला भारतरत्न दिले नाही?:अओ: नसेल दिले तर आता देऊनच टाका, म्हणजे तसे जाहीर करा. मग बराकभाव आले की त्यान्च्याच हाती दिलेले बरे.
परम पुज्य रामदेव जी
परम पुज्य रामदेव जी महाराजांना.
सगळे वीकेन्डाला गेले वाटते
सगळे वीकेन्डाला गेले वाटते
आवरा रे.....
आवरा रे.....
आवरलय आत्ताच. चहा पण घेऊन
आवरलय आत्ताच. चहा पण घेऊन झाला. सुटायचे मग.
मी मुग भजीचा प्लॅन डोक्यात
मी मुग भजीचा प्लॅन डोक्यात घोळवते आहे
कर मग मस्त मुगौडे ( मुग
कर मग मस्त मुगौडे ( मुग वडे-भजी). इगतपुरीला मस्त मिळतात. ( वीणा हाणेल आता आपल्याला )
आज् वेळ नाही पण सोमवारनन्तर मी जमल्यास मी अध्यात्मावर नक्कीच लिहीणार आहे.
भेटु मग नन्तर, टेक केअर सगळ्यानी. हॅव अ गुड विकेन्ड.
मूग वड्यावरून
मूग वड्यावरून आठवलं..परंपरेनूसार पितॄपक्षात केले जाणारे श्राद्धाच्या जेवणात असणार्या वड्यांना मधे भोक का ठेवतात? त्यामागे काही पारंपारीक विज्ञान आहे का?
आहे, त्यातुन कदाचीत आलेले/
आहे, त्यातुन कदाचीत आलेले/ जेवणारे आत्मे आरपार जात असतील. ( हे मायबोलीचे व्यसन कधी सुटायचे?) आणी ते वडे उडदाचे असतात, मुगाचे नाही.
उडदाच्या मागे काही पारंपारीक
उडदाच्या मागे काही पारंपारीक विद्न्यान आहे का
त्यातुन कदाचीत आलेले/ जेवणारे
त्यातुन कदाचीत आलेले/ जेवणारे आत्मे आरपार जात असतील.>>>:हहगलो:
धागाकर्ती ने वैतागुन धागा
धागाकर्ती ने वैतागुन धागा सोडला ........ तरी गप्पा चालूच आहेत ........ आता तर उडदाच्या वड्यावर गप्पा सुरु झाल्यात ....काय म्हणावे आता
फक्त उडदाच्या वड्यालाच मधे
फक्त उडदाच्या वड्यालाच मधे भोक असते
(No subject)
इब्लीस तुमची पोस्ट नाही तर
इब्लीस तुमची पोस्ट नाही तर तुम्ही स्वतःच अवांतर आहात हे खेदाने मला म्हणावे लागेल.<<<
अरे अरे गोन्धळ झाला. अहो
अरे अरे गोन्धळ झाला. अहो चम्बु, त्या वड्याना श्राद्धाच्या वेळी भोक ठेवत नाहीत, तर इतर वेळेस त्याला भोक पाडुन त्याचा मेदूवडा करतात. मी घरी विचारले त्याचे. पण हेच वडे का करतात ते नाय माहीत.
मन्जु, नैवैद्याच्या जेवणात फक्त तूर आणी मुगाचेच वरण करतात, उडिद आणी मसुर करत नाहीत. आता याचे कारण नाय माहीत. मात्र उडिद अतीशय पौष्टीक ( आणी पचायला पण जड) म्हणून हिवाळ्यात त्याचे वरण, पाक्,वड्या, लाडु वगैरे सगळे करतात. सुकड्बोम्बिल मुलाना उडदाचे लाडु आणी उडिद पाक द्यावा. तब्येत पैलवाना सारखी होते म्हणे.
धागा नुसता सुसाट सुटला आहे.
धागा नुसता सुसाट सुटला आहे.
मुगाची भजी मस्त झाली...
मुगाची भजी मस्त झाली...
इब्लीस तुमची पोस्ट नाही तर
इब्लीस तुमची पोस्ट नाही तर तुम्ही स्वतःच अवांतर आहात हे खेदाने मला म्हणावे लागेल.\lllll
स्त्रिया मधे मत्सर भावना असते
स्त्रिया मधे मत्सर भावना असते असे ऐकल होत पण पुरुषा मधे पण
मत्सर भावना असते असते असे नुकतेच वाचण्यात आले..
तब्येत पैलवाना सारखी होते
तब्येत पैलवाना सारखी होते म्हणे.
....
तब्येत पैलवानागत झाली तर आनंदच आहे.. पण डोकं पैलवानागत झालं तर काय करायच?
नाही होत.
नाही होत.
आतां आधुनिक गप्पांचा धागा आणि
आतां आधुनिक गप्पांचा धागा आणि उथळ गप्पांचा धागा असे दोन धागे काढायला पाहिजेत.
त्यात सुद्धा लोक एकमेकांना गप्प करत राहतीलच
नाताळाच्या सुटीचा पहीला
नाताळाच्या सुटीचा पहीला दिवस...
चंबू , आवडलंच.
चंबू ,
आवडलंच.
अरेरे इकडे सगळ्यांनाच बहुतेक
अरेरे इकडे सगळ्यांनाच बहुतेक मुंडण केलेल्या वेताळाने झपाटलेले दिसते
Pages