आणि दाऊदवर गोळी चाललीच नाही!
प्रमाणे अमेरिकेने कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून मारले होते तशाच प्रकारे मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमला ठार मारण्याची संधी भारताकडे चालून आली होती. मात्र अगदी शेवटच्या क्षणाला हे मिशन रद्द करण्यात आल्याने १९९३च्या मुंबई बॉम्बब्लास्ट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आजही पाकिस्तानात मोकळेपणे फिरत आहे.
दाऊद अनेक वर्षापासून कराचीमध्येच वास्तव्याला आहे. तो रोज त्याच्या क्लिप्टन रोडवरील घरातून डिफेन्स हाऊसिंग सोसायटीकडे जात असे. याचदरम्यान दाऊदला संपवण्याची योजना आखण्यात आली. त्यानुसार 'सुपर बॉइज'ने या मार्गावर असलेल्या दर्ग्याजवळ दाऊदला शूट करण्याचे निश्चित करण्यात आले होते. नियोजीत प्लॅननुसार १३ सप्टेंबर २०१३च्या दिवशी हे नऊ कमांडोज दर्ग्याजवळ पोजिशन घेऊन बसले होते. दाऊद कसा दिसतो, याबद्दल सर्व कमांडोजला पूर्ण माहिती असल्याने शिकार चुकण्याचा प्रश्नच नव्हता. काही क्षणातच दाऊदची गाडी दर्ग्यासमोर येणार तेवढ्यातच मुख्य कमांडोला फोनवरुन गोळी न चालवण्याचे आदेश आले आणि सगळा प्लॅन फसला. दाऊद समोरून गेला पण त्याचा 'गेम' मात्र होऊ शकला नाही. दरम्यान, हा कॉल कुणी आणि का केला होता, याबद्दल माहिती देण्यास संबंधित सुत्रांनी नकार दिला.
१३ सप्टेंबर २०१३ ला अस्तित्वात असलेल्या काँग्रेस सरकार कडेच ह्याच उतरदायीत्व !!असाव
Comments
दिवाकर देशमुख
Sun, 12/14/2014 - 05:46
Permalink
हा कॉल कुणी आणि का केला होता,
हा कॉल कुणी आणि का केला होता, याबद्दल माहिती देण्यास संबंधित सुत्रांनी नकार दिला. <>>> इतके सगळे सांगितले आणि नाव नाही सांगितले
बनावट बातमी मुद्दामुन प्रसिद्दीला दिलेली आहे.
2013 सप्टें ला हे झाले असते निवडणूक आरामात जिंकले असते तसेच 20 वर्षापूर्वी म्हणजे नरसिंहरावांच्या काळात पाठवले मग काँग्रेसनेच पाठवले तेच मागे घेतील?
देशाचे लक्ष दुसरी कडे वळवण्यासाठीच आणि भक्तांना खाद्य म्हणून हे चालू आहे
अश्या बिनडोक बातम्या अजून येतील
नितीनचंद्र
Sat, 12/13/2014 - 14:55
Permalink
समधर्मसमभाव आहे. मुसलमान
समधर्मसमभाव आहे. मुसलमान आहे तो. त्यांच्या साठी या देशात कायदेच वेगळे आहेत. त्यातुन त्या देशात जाऊन एन्काँउन्टर ? काँग्रेसची मते गेली असती ना लोकसभेत.
सचिन पगारे
Sat, 12/13/2014 - 14:56
Permalink
हि काही कल्पना आहे का सत्य
हि काही कल्पना आहे का सत्य हकीकत आहे. काही संदर्भ दिल्यास आमच्याही ज्ञानात थोडी भर पडेल.लेखाला काहीही आगा पिच्छा नाही.
शांताराम कागाळे
Sat, 12/13/2014 - 15:01
Permalink
सगळे मिडियावाले हात धुवून
सगळे मिडियावाले हात धुवून काँग्रेसच्याच मागे का लागलेत ?
सचिन पगारे
Sat, 12/13/2014 - 15:25
Permalink
मुसलमान आहे तो. त्यांच्या
मुसलमान आहे तो. त्यांच्या साठी या देशात कायदेच वेगळे आहेत.>>>>> मुस्लिमांसाठी ह्या देशात काय वेगळे कायदे आहेत ते स्पष्ट केले तर बरे होईल. क्रिमिनल कायदा, वाहतुकीचा कायदा, सिविल कायदा ह्यातला कोणता कायदा वेगळा आहे .काश्मीरचे तुणतुणे वाजवू नका तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
एखाद्या हिंदू ,शीख, बौद्ध, व्यक्तीने खून केला तर त्याच्यावर कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल होतो मुस्लीमासाठी काही वेगळे कलम असल्यास सांगा. सर्वधर्मसमभाव तुम्हाला पटत नाही हे तुमच्या पोस्टवरून कळतेय मग स्वधर्म सोडून इतर धर्माचा पराकोटीचा द्वेष हे तुम्हाला आवडते का?
काउ
Sat, 12/13/2014 - 15:45
Permalink
बरं बुवा ! आमची काँग्रेस
बरं बुवा ! आमची काँग्रेस दाऊदधार्जिणी होती.
आता तुमचे मोदी आलेत ना ?
हेच ऑपरेशन पुन्हा मोदीना करायला सांगा.
मोदी मटा वाचतात का ?
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/india-came-close-to-killin...
शांताराम कागाळे
Sat, 12/13/2014 - 17:29
Permalink
काउ, काँग्रेस दाऊद धार्जीणी
काउ,
काँग्रेस दाऊद धार्जीणी असेल मग मोदींनी केलच पाहीजे अस कश्याला ?
असु दे की, देईल अजुन थोडे धक्के होतील थोडे अजुन बाँम्ब स्फोट, मरतील थोडे अजुन लोक,
स्पार्टाकस
Sat, 12/13/2014 - 18:26
Permalink
मुस्लिमांसाठी ह्या देशात काय
मुस्लिमांसाठी ह्या देशात काय वेगळे कायदे आहेत ते स्पष्ट केले तर बरे होईल. क्रिमिनल कायदा, वाहतुकीचा कायदा, सिविल कायदा ह्यातला कोणता कायदा वेगळा आहे . >>> सिव्हील कायदा - मॅरेज अॅक्ट मुस्लीमांसाठी स्पेशल आहे पगारेसाहेब. मुस्लीम ४ बायका करु शकतात.
उदय
Sat, 12/13/2014 - 18:28
Permalink
अधिक महिती किव्वा लिन्क मिळेल
अधिक महिती किव्वा लिन्क मिळेल का?
jayant.phatak
Sat, 12/13/2014 - 19:35
Permalink
@ स्पार्टाकस, मस्त....
@ स्पार्टाकस,
मस्त....
ऋन्मेऽऽष
Sat, 12/13/2014 - 20:36
Permalink
कथा आहे का? क्रमश: आहे
कथा आहे का?
क्रमश: आहे का?
सत्यघटनेवर आधारीत आहे का?
काल्पनिक आहे का?
सीआयडीची जाहीरात तर नाही ना?
दाऊदचे उदात्तीकरण करायच्या या प्रकाराचा णिशेध !!!
काउ
Sat, 12/13/2014 - 22:15
Permalink
काँग्रेस दाऊद धार्जीणी असेल
काँग्रेस दाऊद धार्जीणी असेल मग मोदींनी केलच पाहीजे अस कश्याला
..........
मोदी काँग्रेससारखेच वागणार असतील तर मोदीना का निवडुन दिलेत?
आमच्या काँग्रेसचे अभिनंदन.
काँग्रेसच्या काळात भारताचे कमांडोज दाउदच्या अगदी जवळ जाऊन पोहोचले होते ! किती अभिमानास्पद गोष्ट आहे !
प्रत्यक्ष गोळी न का चालेना पण कमांडोज तिथवर पोचले होते हे काय कमी आहे ? शाहिस्तेखान हातुन निसटला म्हणुन शिवरायांच्या पराक्रम झाकोळुन जात नाही.
मोदीच्या काळात हे कमांडोज सध्या काय काम करताहेत ? कचरा उठाओ आंदोलन का ?
काँग्रेसचे अभिनंदन !
असेच काम करण्यासाठी मोदींना शुभेच्छा
रॉबीनहूड
Sun, 12/14/2014 - 05:32
Permalink
हे आधी वाचा त्यावरून ते
हे आधी वाचा त्यावरून ते भारतीय कमांडो होते का यापासून शंका घेता येतील. आंतरराष्ट्रीय राजकारणात शाखेतल्या शंका उपस्थित करणे हास्यास्पद ठरेल आजच्या लोकसत्तातला हा लेख आहे पण तो तेल विषयावरचा असल्याने लिंक न देता कामापरता उतारा कट पेस्ट करीत आहे......
'' पुतिन यांनी त्या तीन महिने अलीकडे घेतल्या. त्या निवडणुकांची हवा तापत असताना आणि मतदान अगदी तोंडावर आलेले असताना मॉस्को शहरात अचानक बॉम्बस्फोट होऊ लागले. अनेक निवासी इमारती या स्फोटांत पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळू लागल्या. त्या स्फोटांच्या वेळाही विचित्र असायच्या. पहाटे पाच वाजता वगरे. जास्तीत जास्त जीव या स्फोटात जावेत म्हणून ही वेळ. हे बॉम्बस्फोट हे खरोखरच गूढ होते. किती? तर एकदा एक स्थानिक बससेवेचा चालक घरी परतत असता त्याला आपल्या इमारतीच्या आसपास काही संशयित इसम एक बोचके ठेवून निघून जाताना दिसले. त्याने ते पाहिले आणि वर ते ज्या गाडीतून आले होते, त्या गाडीचा नंबरही टिपला. वातावरणातली भीती लक्षात घेता एकंदरच जागरूकता वाढलेली होती. त्यामुळे या चालकाने पोलिसांना फोन केला. लगेचच पोलिसांची गाडी आली. त्यातल्या स्फोटतज्ज्ञाने बोचक्यातला ऐवज तपासला आणि निर्वाळा दिला की, ही स्फोटके भयंकर आहेत. त्यांचं नाव- हेक्झोजेन. दुसऱ्या महायुद्धात ती मोठय़ा प्रमाणावर वापरली गेली होती. (तसा आपलाही या स्फोटकांशी चांगलाच परिचय आहे. आपल्याकडे ती ओळखली जातात 'आरडीएक्स' या नावाने.) त्या स्फोटकांबरोबरच्या घडय़ाळात पहाटे पाचची वेळ मुक्रर करण्यात आली होती. म्हणजे त्या वेळेला हे स्फोट झाले असते. परंतु या चालकाच्या जागरूकतेमुळे ते टळले. या चालकाने ज्यातून ही स्फोटके ठेवणारे आले होते, त्यांच्या वाहनाचाही नंबर पोलिसांना दिला. आता हे सर्व पकडले जाणार याबद्दल सर्वच नििश्चत होते.
परंतु दुसऱ्या दिवशी आक्रित घडले. सरकारने जाहीर केले- स्फोट वगरे काहीही नाही, पोलीस किती दक्ष आहेत त्याची आम्ही चाचणी घेत होतो. स्फोटके बनावट होती, अशी ग्वाहीही दिली गेली.
अर्थातच ती खोटी होती. बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्ती रशियाच्या गुप्तहेर खात्यातील होत्या. आणि त्या खात्याच्या प्रमुखाचे नाव होते- व्लादिमीर पुतिन. म्हणजे हे बॉम्ब हे पुतिन यांच्याच कर्मचाऱ्यांनी ठेवले होते का? या प्रश्नाचे उत्तर आजतागायत मिळालेले नाही. ज्यांनी ते शोधण्याचा प्रयत्न केला, ते पत्रकार आदी सर्व गायब झाले. या एका सापडलेल्या बॉम्बचा अपवाद वगळता आधीच्या बॉम्बस्फोटासाठी पुतिन यांनी सरसकटपणे चेचेन बंडखोरांना जबाबदार धरले आणि त्यांच्याविरोधात मोठी लष्करी कारवाई सुरू केली. तोपर्यंत समस्त रशियनांनी सरकारी प्रचारामुळे चेचेनांवर ठपका ठेवायला सुरुवात केलीच होती. म्हणजे जनमत पुतिन यांच्या बाजूने होते. परंतु या िहसाचारामागे खरोखरच चेचेनांचा हात किती, हे गूढ आहे आणि ते अजूनही उकलले गेलेले नाही.''
दिवाकर देशमुख
Sun, 12/14/2014 - 05:45
Permalink
१३ सप्टेंबर २०१३ ला
१३ सप्टेंबर २०१३ ला अस्तित्वात असलेल्या काँग्रेस सरकार कडेच ह्याच उतरदायीत्व !!असाव > मग संसद वर हल्ला , अतिरेक्यांना सोडुन आलेल्याचे उत्तरदायित्व देखील भाजप सरकार कडेच असावं तसच त्या अतिरेक्यांनी जितके हल्ले आणि बॉम्बस्फोट केले त्याचे उत्तरदायित्व देखील भाजप सरकारचेच आहे असे देखील म्हणा.
एकतर लेख स्वतःसारखा अर्धवट कॉपीपेस्ट केलेला आहे. त्यात लिहिलेले भारतीय गुप्तचर संघटना मागील २० वर्षांपासून दाऊदच्या मागावर असून त्याला ठार करण्यासाठी गुप्त ऑपरेशन अंतर्गत एक स्पेशल कमांडो पथक पाकिस्तानात धाडण्यात आले होते. मात्र अनेकवेळा प्रयत्न करुनही दाऊद भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागला नाही. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार दाऊदला पाकिस्तानातच संपवण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी योजना आखली होती. हे मात्र सोईस्कर रित्या वगळले १९९३ ला कुणाचे सरकार होते ?
कैच्याकै धागे काढुन स्वतःचा कंड शमवणे हेच तुमचे उद्योग आहेत. की वरुन ऑर्डर आल्या आहेत का? लव जिहाद घरवापसी काळापैसा वगैरे वर भक्तांना बोलता येत नाही म्हणुन कुठुन तरी दुसर्या पुंगळ्या सोडुन विषयांतर करा आणि लोकांना सरकारच्या निष्क्रियतेवरची चर्चा करायलाच देउ नका हेच उद्देश आहेत
शांताराम कागाळे
Sun, 12/14/2014 - 06:04
Permalink
तुम्हाला किती किती "कंंड" आहे
तुम्हाला किती किती "कंंड" आहे हे आणि तो तुम्ही "आमचा आड्डा " ह्या धाग्यावर कसा शमवता ते ईथे सर्वांना माहीती आहेच !!
दिवाकर देशमुख
Sun, 12/14/2014 - 06:07
Permalink
जळजळ आली बाहेर लावा बर्नॉल
जळजळ आली बाहेर

लावा बर्नॉल
शांताराम कागाळे
Sun, 12/14/2014 - 06:13
Permalink
जळजळ तुमची झालीय म्हणून तुमचे
जळजळ तुमची झालीय म्हणून तुमचे कंड ईथे तिथे दिसतात,
आम्हाला बर्नाल चालेल !!
पण तुम्हाला खरुज नायटा झालाय ! उपचार करुन घ्याच !!
:G: :G: :G:
दिवाकर देशमुख
Sun, 12/14/2014 - 06:16
Permalink
चिडली
चिडली
आशुचँप
Sun, 12/14/2014 - 07:21
Permalink
जोशींचा धागा बघुनच वाटले होते
जोशींचा धागा बघुनच वाटले होते काल्पनिक असणार म्हणून. पण अपेक्षा होती की काहीतरी रंजक वाचायला मिळेल...हा तर अगदीच फुसका बार निघाला....
जोशी ते कंदाहार विमान अपहरण प्रकरणावरती पण लिहा की. त्यावेळी कुणाचा फोन आलेला वगैरे
दिवाकर देशमुख
Sun, 12/14/2014 - 07:29
Permalink
(No subject)
काउ
Sun, 12/14/2014 - 07:34
Permalink
आणि धागा चाललाच नाही. फुस्स !
आणि धागा चाललाच नाही.
फुस्स !
दिवाकर देशमुख
Sun, 12/14/2014 - 07:38
Permalink
समधर्मसमभाव आहे. मुसलमान आहे
समधर्मसमभाव आहे. मुसलमान आहे तो. त्यांच्या साठी या देशात कायदेच वेगळे आहेत. त्यातुन त्या देशात जाऊन एन्काँउन्टर ? काँग्रेसची मते गेली असती ना लोकसभेत. > मग कांदहारला अतिरेकी सोडले होते ते इतर धर्माचे होते का? कि "घर वापसी" झालेली होती
कोकणस्थ
Sun, 12/14/2014 - 08:21
Permalink
फाडणीस, हा माझा धागा
फाडणीस, हा माझा धागा नाही.
आणि माझे धागे/लिखाण कसे असते याबद्दल तुमचे सर्टीफिकेट लागावे इतकी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाही
People are really obsessed over Joshi.
Get a life guys. And get well soon.
Contact admin to ascertain if this is my Id. He has all records.
गामा_पैलवान_५७४३२
Sun, 12/14/2014 - 09:31
Permalink
शांताराम, तुम्ही दिलेली मटा
शांताराम,
तुम्ही दिलेली मटा मधली बातमी कितपत विश्वासार्ह आहे ते माहीत नाही.
ही मात्र खरी बातमी आहे असं म्हणतात : http://indiatoday.intoday.in/story/rajan-tried-to-take-out-dawood-in-kar...
डोंगरी ते दुबई या झैदीलिखित पुस्तकात देखील ही बातमी दिलीये म्हणतात.
मटामधली बातमी पूर्वी सव्वा वर्षांपूर्वी येऊन गेलीये : http://defencelover.in/2013/09/24/two-attempts-raw-made-on-the-life-of-d...
आ.न.,
-गा.पै.
शांताराम कागाळे
Sun, 12/14/2014 - 12:58
Permalink
आशुचँप, जर ९ कमांडो
आशुचँप,
जर ९ कमांडो पाकिस्तानात दाउदसाठी वर्ष भर रहात होते आणि ऐन वेळी एक फोन येउन गेम रद्द झाला, याला जर तुम्ही फुसका बार म्हणत असाल, तर, तुमची लायकी कळली !!
तुम्ही कंदहारच विचारण्या आधी मा. पंतप्रधान गुजराल यांनी पाकिस्तानातील कार्यरत भारतीय गुप्तहेरांची नाव
दिली होती त्याची कारण आम्हाला सांगाल का ?
निझाम चे रझाकार ज्यांनी महाराष्ट्रात सरे आम कत्लेआम केल त्यांची पाकिस्तानात रवानगी केली त्या बद्दल ही तुम्हाला बरीच सहान भुती असेलच .
एवढा काँग्रेस बद्दल पुळका असेल तर मी बरेच प्रश्न विचारेन मग बघु तुम्ही उत्तर देता की पाय लाउन पळुन जाता !!
दिवाकर देशमुख
Sun, 12/14/2014 - 13:05
Permalink
बगल दिलीच शेवटी
बगल दिलीच शेवटी
अभि१
Sun, 12/14/2014 - 13:57
Permalink
लोकांच्या मनात जाम खुन्नस
लोकांच्या मनात जाम खुन्नस दाटून राहिली होती. कोन्ग्रेस च्या काहीही निर्णय न घेण्य्च्या पद्धती मुळे. त्यामुळे जात / भाषा / राज्य ( खूप प्रमाणत ) इत्यादी मुद्दे सोडून देऊन भारतीय मतदारांनी मोदीना मते दिली. सर्व खाबू बाबू / नेते / अधिकारी यांचा गेम ते करतील हि इच्छा मनात बाळगून. बलात्कारी लोकांना / खुनी लोकांना लवकरात लवकर वरती पाठवतील अशी इच्छा धरून. टोल माफिया नेस्तनाबूत होतील, कायद्याचे राज्य आता अवतरणारच आसे वाटून.
रेप रोजचेच झालेत सध्या. निदान त्याच्यावर उपाय तर हातात आहे ना .. द्या कि ५० / १०० जणांना फाशी . पण ते पण होत नाहीये . मग कोन्ग्रेस ला लाथ मारून आपण नक्की साध्य काय केलेय असा प्रश्न पडतो ..
कोन्ग्रेस ने काय केले / नाही केले ते सोडून द्या . पण मोदिनी काय केले ते सांगा कि.
शांताराम कागाळे
Sun, 12/14/2014 - 15:57
Permalink
पुणे म्युनिसिपा ल्टीत उंदिर
पुणे म्युनिसिपा ल्टीत उंदिर मारायच्या खात्यात काम करणारे लोक हे ह्यांच्या खात्यात म्हणे
पं प्र १५ लाख भरणार !!
वा रे वा फुकटे लोक !!
ह्यांच सरकार होत त्यावे ळेला हा गेलेला पैसा होता त्यात तुमच्या घामाची एक पै ही गेलेली नाही मग कश्याला
ह्या पैश्याचा लोभ ? म्हणतात ना काँग्रेस चे लोक हे पैसे खायला कुठच्या ही थराला जातील !!
इब्लिस
Sun, 12/14/2014 - 16:44
Permalink
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=kCcpGnHchZY&sns=tw
limbutimbu
Mon, 12/15/2014 - 04:10
Permalink
>>>>> तोपर्यंत समस्त
>>>>> तोपर्यंत समस्त रशियनांनी सरकारी प्रचारामुळे चेचेनांवर ठपका ठेवायला सुरुवात केलीच होती. म्हणजे जनमत पुतिन यांच्या बाजूने होते. परंतु या िहसाचारामागे खरोखरच चेचेनांचा हात किती, हे गूढ आहे आणि ते अजूनही उकलले गेलेले नाही. <<<<
बाकी धाग्याचा विषय वगैरेबाबत मी अनभिज्ञ आहे. मात्र वरील वाक्यावरून एक जाणवेले की शिन्च्या त्या रशियन वा तत्सम लोकान्ना जनमत व जनलक्ष असे कुठे तरी वळविण्यासाठी चेचेन्या वगैरे नमुने भेटतात - उपलब्ध आहेत.
इकडे देशात मात्र तशी सुविधा नसल्याने, तसेच सर्वधर्मसमभाव व मतांच्या बेगमीसाठी पाकिस्तानला शत्रु न मानण्याच्या वृत्तीमुळे, येच देशीच्या साडेतीन टक्क्यांविरुद्ध अगदि सरकारी पाठींब्याने व पातळीवरूनही राजरोस, १९४८ पासुन तर रोजच्यारोज ठपके ठेवण्याचे काम अव्याहत सुरू आहे व हल्ली त्यात सरकार/प्रशासनासोबत, नक्षली/कम्युनिस्टांची भरच पडत आहे.
कम्युनिस्टांची भर पडते म्हणताना कदाचित चूकत असेन मी कारण कूळकायदा/ब्यान्कान्चे राष्ट्रियीकरण वगैरे करून भोन्गळसमाजवाद अर्थात शर्करावगुंठीत कम्युनिझम आणायला कोण जबाबदार होते ते वेगळे सांगायला हवे का? तर कम्युनिस्ट ऑलरेडी होतेच... फक्त चेहरा वेगळा होता.
तर मुद्दा असा की वरील चेचेन्याचे उदाहरण (ते खरे असेल असे मानू क्षणभर), अन देशभर साडेतीन टक्क्यांविरुद्ध उडवत असलेली राळ यात मला काहीही फरक वाटत नाही. मला तरी असेच भासते बोवा!
दिवाकर देशमुख
Mon, 12/15/2014 - 04:11
Permalink
जशी कर्म तशी फळ
जशी कर्म तशी फळ
काउ
Mon, 12/15/2014 - 17:07
Permalink
लिंब्या गल्ली चुकली .. तिकडे
लिंब्या गल्ली चुकली ..
तिकडे आग्रा वसई धर्मांतरावर महायुद्ध्ह सुरु आहे.
आणि तू हिकडे रशिया कम्युनिस्ट वगैरे बडबडत बस्ला आहेस.
वत्सा तिकडे जा ( ये)
आशुचँप
Tue, 12/16/2014 - 20:23
Permalink
तुमच्या या धाग्याला ना शेंडा
तुमच्या या धाग्याला ना शेंडा ना बुडखा...
सोयिस्कर तेवढं सांगायचं इतकच जमतं तुम्हाला बहुदा. इतकी तपशीलवार जर माहीती आहे, कोण कुठे लपलं होतं ते तर फोन कुणाचा आला तेही सांगून टाका की...
तिथेच कशी माशी शिंकली तुमची...
शांताराम कागाळे
Wed, 12/17/2014 - 06:02
Permalink
आशुचँप, तपशीलवार माहीती ?
आशुचँप,
तपशीलवार माहीती ? कश्याला आता सारवा सारव करताय ?
जर गुप्तहेरांबाबत ईतकी माहीती आम जनतेला दिली असती तर त्या ऑपरेशनचे अगोदरच बारा वाजले असते
आणि त्यात तुम्हाला "कंधहार" वैगेरे आणायची काय गरज होती ?
तुम्हाला उपचाराची गरज आहे हेच सिद्ध होतय !! गेट वेल सुन !!