संस्थानिकांच्या गढ्या... नेमक्या कुणाच्या?

Submitted by संजिव पिल्ले on 9 November, 2013 - 09:09

भारतात पूर्वी काही संस्थाने होती . त्याना प्रिन्सली स्टेट असे म्हणत. इथे त्यांची यादी आहे.

http://en.wikipedia.org/wiki/List_of_princely_states_of_India

भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला.

मुघल साम्राज्याचे इतर तुकडेही असेच नष्ट झाले.. म्हणजे इंग्रजांनी गिळले. लखनौ (अवध) चा नबाब वाजिद अली हाही इंग्रजांपुढे पराभूत झाला. जेंव्हा त्याला इंग्रज पकडून घेऊन जात होते, तेंव्हा त्याने त्याच्या भावना व्यक्त करायला चार ओळी खरडल्या. सैगलपासून पार भिमसेनजींपर्यंत सर्वांनाच त्या ओळीनी भुरळ घातली.

बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए

चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें (उठायें)

मोरा अपना बेगाना छूटो जाए | बाबुल मोरा ...

आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश

जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश | बाबुल मोरा ...

मुघल संपले. त्यांच्या इमारती, राज्ये, पैसा हे सर्व इंग्रजांच्या मालकीचे झाले.

पुढे १९४७ साली इंग्रजही देश सोडून गेले आणि त्यान्नी इंग्लंडला नेलेलं जरी आपल्याकडून गेलं, तरी भारतातील गंगाजळी, भारतातील स्थावर मालमत्ता , इतर उद्योगधंदे , इतर शासकीय संपत्ती ही भारतातच आणि भारताच्या मालकीचीच राहिली.

त्यामुळं मुघलानी आणि इंग्रजान्नी घेतलेलं काही अंशी तरी देशाला परत मिळालं.

पण ज्या संस्थानिकांच्या गढ्या, राजवाडे , महाल होते, त्यातील मात्र बर्‍याचशा वास्तू संस्थानिक घराण्याच्याच राहिल्या आणि आजही त्या 'शासकीय ' मालकीच्या झालेल्या नाहीत. १९४७ साली संस्थानिकांनी आपली प्रजा लोकशाहीच्या मांडीवर बसवली , पण राजकोष आणि राजमहाल हे भारतात विलीन झाले का? उदाहरणार्थ, आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा हा आजही संस्थानिकांचीच खाजगी मालमत्ता आहे. का, ही त्यांची अर्जित प्रॉपर्टी होती? इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे?

मुघलांचे वाडे सरकारचे झाले.

शिवाजी महाराजांचे किल्ले सरकारजमा आहेत.

इंग्रजांच्या वास्तूही सरकारजमा आहेत.

पेशवाई शनिवारवाडा हाही पेशव्यांचा खाजगी राहिलेला नाही.

मग संस्थानिकांच्या गढ्या, महाल, वाडे हे मात्र त्यांच्याच नावाने कसे राहिले? की, संस्थानिकांपासून आपल्याला अजून स्वातंत्र्य मिळालेच नाही?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही वर एक लिन्क दिलेली आहे ती नुसतीच संस्थानांची यादी आहे.
यातले किती लोक राजकारणात शिरले आणि त्यात कोणत्या पक्षात जास्त आहेत याची पण यादी असेल ना तुमच्याकडे ?

महेशराव, पेन्शन खाणारा आणि वाडा गिळणारा प्रत्येक संस्थानिक लब्बाड कोल्हाच आहे. तो कोणत्याही पक्षाचा असो.

महेशराव, पेन्शन खाणारा आणि वाडा गिळणारा प्रत्येक संस्थानिक लब्बाड कोल्हाच आहे. तो कोणत्याही पक्षाचा असो.<<< हे नाही पटले. या संस्थानिकांचा केवळ लोकशाही राज्या मधे विचार करुन चालणार नाही. त्यांचे पुर्वजांची पुण्याई, कर्तबगारी आणि राजेशाही चे राज्या या दृष्टीने विचार करा.

त्यांचे पुर्वजांची पुण्याई, कर्तबगारी आणि राजेशाही चे राज्या या दृष्टीने विचार करा.

हाच नियम लावला तर मग इंग्रजांनाही पेन्शन द्यावी लागेल. Proud

कल्पना उत्तम आहे. स्वातंत्र्यपूर्वकालात भारतीय प्रशासकीय सेवेत होते त्यापैकी सद्ध्या हयात असलेल्या इंग्रजांची यादी करा आणि त्यांना पेन्शन द्या. निदान सानुग्रह अनुदान तरी. कारण इंग्लंडात थंडी फार असते.

त्यानाच कशाला, संस्थानिकांच्या बाबांनी सेवा केली म्हणून महाल त्यांचा ..... हाच नियम लावायचा झाला तर मग सिविल सर्जनच्या पोराला सिविल हॉस्पिटल द्यावे लागेल... हेडमास्तरच्या पोराला शाळा द्यावी लागेल...

Proud

हाच नियम लावायचा झाला तर मग सिविल सर्जनच्या पोराला सिविल हॉस्पिटल द्यावे लागेल... हेडमास्तरच्या पोराला शाळा द्यावी लागेल...<<< हॉस्पिटल जर त्या सिविल सर्जनने स्वतःच्या मालकिचे उभे केले असेल तर ती संपत्ती म्हणून त्यांच्या पुढील वारसांना मिळणारच ना ?? का ती संपत्ती सरकार जमा होणार ??

मुद्दा बरोबर आहे स्_सा.

फ्लॅट्थिंकर आणि ट्रान्सजामोप्या गोडबोले विचार करा Proud

राजवाडादेखील जनतेकडून पैसा गोळा करुनच बांधलेला असतो ना? .. का राजा शेतात शेण काढायला जात होता आणि ते पैसे साठवून तो वाडा बांधतो की काय?

>>>>>>>>>>>>>>
लक्ष्मी गोडबोले | 3 February, 2014 - 11:40 नवीन
त्यावेळी भाजप होता?

इंदिराबाइंना विरोध करणारा गट हा सॅफ्रॉन पॉवर होता, हे सत्य आहे. त्याचीच पिल्लावळ म्हणजे भाजपा ना? की भाजपा आपल्या बापाला / आज्ज्याला विसरला? फिदीफिदी http://www.bjp.org/about-the-party/history?u=bjp-history म्हणून मी भाज्पा शब्द वापरला.

जे लोक स्वतःला अखंड हिंदुत्ववादी / अखंड हिंदुस्तानवादी म्हणून वतःच्या टिमक्या वाजवतात, ते लोक खरे तर अखंड पेन्शनवादी होते. हे बघा .. आमच्या कुरुंदवाडचे संस्थानिक .....

http://en.wikipedia.org/wiki/Kuruntwad

कुरुंदवाडच्या इतिहासात पहिली सर्कस काढणारे छत्रे , पं. विष्णू दिगंबर पलुस्कर आणि डी व्ही पलुस्कर, भू गंधर्व रहिमतखान असे हिरे होऊन गेले. पण त्यांच्या स्मरणापेक्षा कुरुंदवाडच्या संस्थानिकाला इंग्रजांच्या कुठल्या राजाने कोणत्या पदव्या दिल्या याचेव स्मरण जास्त आहे. फिदीफिदी असले राजे स्मरणात राहण्यापेक्षा सरणावर जायच्याच लायकीचेच आहेत. एकीकडे रविंद्रनाथांसारख्या दिग्गज माणसाने इंग्रजांना त्यांची पदवी परत केली हा इतिहास आणि एकीकडे स्वातंत्रानंतरही इंग्रजांच्या पदव्यांबाबत स्वतःच्या टिमक्या वाजवणारी घराणी.

गामा,

कोणी नुक्सान जास्त केले, हा हिशोब इतका सोपा नसतो.

वैद्यकीय क्षेत्रातील दोन उदाहरणे देतो. <<<<<<<<<<<<

अहो लक्ष्मिबाई, हिन्दू धर्माशी/राष्ट्रियत्वाशी नै त नै, पण किमान आयडीच्या जेन्डरशी तरी प्रामाणिक रहा हो!
[आता असे म्हणूनका की आमच्या कुरुन्दवाडात बाया देखिल देतो/घेतो/करतो असे म्हणतात Wink ]

(बायदिवे, २००५च्या आगेमागे माझ्या याच आयडीला जाहिरपणे "विकृत" संबोधित अन ड्युप्लिकेट आयडी म्हणुन माझा जाणुनबुजून झाकलेला चेहरा उघडा पाडण्याच्या सान्घिक कम्पुशाहीच्या आचरट कसरतीत गुन्तलेले नि हात धुवुन माझ्या मागे लागलेले तथाकथित उच्चभ्रू पान्ढरपेशे आयडी, या वरल्या आयडीन्च्या पुढे मात्र नान्गी टाकल्यागत मुर्दाडपणे का बसतात? की त्यान्चे दृष्टीने असले आयडी "वाड्यावर आले" तरच त्यान्चा संबंध, नै तर बाकि माबोवर काही का होईना! आपले वाड्याचे कुम्पण बरे नी आपण बरे! असो. हे आपले माझे तत्कालिक विचार बर्का, अजुन मतामधे परिवर्तित नाहीयेत. )

कम्युनिस्ट विचारधारेकडून यापेक्षा वेगळा विचार अन प्रसार अपेक्षितही करता येत नाही.
तद्दन भडकाऊ धागा आहे.

कोणी कम्युनिस्ट कोणी ब्रिगेडी कोणी काँग्रेसी तर कोणी हिरवा...... स्वतःच्या मताशी मत जुळले नाही की लगेच यांच्या पैकि कोणाच्यापण एकाची मानगुट पकडायची आणि......हाच तो .. म्हणुन मोकळॅ व्हायचे Biggrin

लय भारी .. चालु द्या ..... Wink

( आता विरोधी बाकावर बसवलेच आहे तर विरोध ज्यात त्यात करणारच .. भाजपाकडुन ते शिकण्यासारखे आहे Wink )

>>>> स्वतःच्या मताशी मत जुळले नाही की लगेच यांच्या पैकि कोणाच्यापण एकाची मानगुट पकडायची आणि......<<<<<
नाही, इथे केवळ मत जुळणे न जुळणे हा संबंध नाही, तर कम्युनिस्टान्च्या जन्मापास्सुन त्यान्नी युरोप/रशिया/चीन मधे कित्येक दशके सातत्याने केलेले आक्रस्ताळे चाळे याचा संबंध आहे, त्या विध्वंसक चाळ्यांमागे जी विचारसरणी आहे तीच वरील मजकुरात पावलोपावली पण "सॉफ्टपणे" झळकते आहे असे माझे मत.
कम्युनिस्ट जोवर पॉवर मधे नसतात, तो वर हळूहळू स्लोपॉयझनिन्गप्रमाणे आपले विचार सॉफ्टरित्या पुढे दामटण्याचे कामही उत्कृष्ट करतात, अन एकदा का ते सत्तेत आले की मग तिथे सर्व "आप ही आप" अस्ते! सॉफ्ट काहीच नस्ते.
कृपया याबाबतचे इतिहासाचे दाखले गामापैलवान यांचेकडून विनन्तीकरुन मागुन घ्यावेत, मला ते देत बसायला वेळ नाही.!

कम्युनिस्ट जोवर पॉवर मधे नसतात, तो वर हळूहळू स्लोपॉयझनिन्गप्रमाणे आपले विचार सॉफ्टरित्या पुढे दामटण्याचे कामही उत्कृष्ट करतात, अन एकदा का ते सत्तेत आले की मग तिथे सर्व "आप ही आप" अस्ते! सॉफ्ट काहीच नस्ते. <<<<<<

एकदम मनातले बोललात बघा.. :)......फक्त कम्युनिस्ट जागी इतर शब्द टाकले तरी वरिल वाक्य चपलख बसते .. सोशल मिडीया उदाहरण आहेच Wink

>>>> कम्युनिस्ट जोवर पॉवर मधे नसतात, तो वर हळूहळू स्लोपॉयझनिन्गप्रमाणे आपले विचार सॉफ्टरित्या पुढे दामटण्याचे कामही उत्कृष्ट करतात, अन एकदा का ते सत्तेत आले की मग तिथे सर्व "आप ही आप" अस्ते! सॉफ्ट काहीच नस्ते. <<<<<<
>>>> एकदम मनातले बोललात बघा.. स्मित......फक्त कम्युनिस्ट जागी इतर शब्द टाकले तरी वरिल वाक्य चपलख बसते .. सोशल मिडीया उदाहरण आहेच <<<<

वाक्यान्ची शब्दान्ची उचलेगिरी करायला माझी काहीच हरकत नाही, पोस्ट माझी असली शब्द/वाक्य माझे असले तरि मी त्यावर प्रताधिकार ठेवलेला नाही. तुम्हाला हवे तर तुम्ही अशाप्रकारे शब्द बदलुन कुठेही वापरू शकता. तसही मध्यन्तरी फेसबुकवर कायसेसे ते शब्द/वाक्य झलकत होतेच की रागांनी वापरलेले शब्द नमोनी आधीच वापरले होते.... असो. पब्लिकची स्म्रुती जशी तकलादू अस्ते तशीच माझीही असल्याने मला ते शब्द नेमके आठवत नाहीत. पुन्हा गापै यान्ना संदर्भासाठी शरण जावे काय?
ते शब्द होते "मैं नहीं हम" ! चायवालांनी संदर्भ दिला, धन्यवाद Happy

लिंबुटी, अहो रागांची एक उखाळी काढली कि नमोंची एक पाखाळी निघणारच हे सत्य आपल्या लक्षात आले दिसत नाही, असो दोष तुमचा नाही.

>>>>> लिंबुटी, अहो रागांची एक उखाळी काढली कि नमोंची एक पाखाळी निघणारच हे सत्य आपल्या लक्षात आले दिसत नाही, असो दोष तुमचा नाही.<<<<< दोष नाही कसा?
मी रागां नाही की तुम्ही नमो नाही, अन आपण आपापसात बोलतो ती "चर्चा" अस्ते, उखाळीपाखाळी नाही. तर तुम्ही म्हणता तशी उखाली निघाल्यावर पाखाळी निघण्याकरता रागां आणि नमो यान्ना समोरासमोर बसवावे का हातात माईक देऊन?
नको, माईक गळ्यात अडकवुयात, अन एक सुत्रधार ठेवूयात. तो एकाच्या उखाळी नन्तर दुसर्‍याला पाखाळी काढायची सन्धी देईल. हो कि नाही? असा सुदिन कधी उगवेल? उदयन भाऊ, तुम्हीच सान्गा, असे घडेल का?
अन या धाग्याचा सन्स्थानिकान्च्या खाजगी गढी/इमारतीन्चा प्रश्न देखिल त्यान्चेसमोर विचारार्थ/टीप्पणी करता मान्डू, कसे?
[चला, शेवटच्या वाक्यामुळे एकुणच धाग्याची गाडी धाग्याच्या मूळ विषयावर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे याची खात्री पटते आहे ना! Happy ]

मी चर्चा.. उखळी पाखळी इत्यांदी साठी सदैव तयार असतो Wink

बाकी ते दोघे एकमेकांसमोर काही येणार नाही ... प्रत्येकाला आपापली "इज्जत" प्यारी असते......आणि दोघांचीही दुखती नस .. मुलाखतकारांना अतिशय योग्य रित्या माहीत आहे Wink

(यात मी विरोध केलेला नाही आहे लक्षात घ्यावे... लोकपाल ला विरोधी पक्षांने पाठिंबा दिलेला..:) )

अन या धाग्याचा सन्स्थानिकान्च्या खाजगी गढी/इमारतीन्चा प्रश्न देखिल त्यान्चेसमोर विचारार्थ/टीप्पणी करता मान्डू, >>>

त्या संस्थानिकांची अथवा राजघराण्यांची रितसर परवाणगी घेतली आहे का ??????? Wink

......>>>>> (यात मी विरोध केलेला नाही आहे लक्षात घ्यावे...लोकपाल ला विरोधी पक्षांने पाठिंबा दिलेला <<<<<
ओह, ओके ओके, धन्यवाद उदयन, म्हणजे तू माझ्या "माबोलोकपाल" या नियुक्तिस बिनशर्त पाठीम्बा दिला आहेस तर, पुनःश्च धन्यवाद. Happy

तुमच्या या हिशोबा प्रमाणे स्वातंत्र्यानंतरचे हिशोब पण का केले जाऊ नयेत ?
(मी २/३ वेळा उल्लेख करून देखील तुम्ही सोयिस्कर रित्या दुर्लक्ष करत आहात)

असो पुर्वीची मेली मढी उकरून काढून काय साधायचे आहे ते सांगा ? अंतिम उद्देश काय आहे ?
निजामासारखे लोक चांगले होते आणि इतर संस्थानिक चांगले नव्हते ??
इंग्रजांचे राज्य चांगले होते आणि आधीचे आणि नंतरचे (कॉन्ग्रेसेतर) नव्हते ??
आखिर कहना क्या चाहते हो भाई ??
समजा तुम्ही म्हणता तसे सगळे आहे असे मानले तर पुढे काय ?

<कम्युनिस्ट विचारधारेकडून यापेक्षा वेगळा विचार अन प्रसार अपेक्षितही करता येत नाही.
तद्दन भडकाऊ धागा आहे.>
या मताशी पुर्ण सहमत. टीपिकल कम्युनिस्ट धागा...

पण किमान आयडीच्या जेन्डरशी तरी प्रामाणिक रहा हो!

लिंब्या याचे उत्तर मी पूर्वी एका धाग्यावर दिलेले अहे. लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीप्रसादचे शॉर्ट फॉर्म आहे. Happy

Pages