वाईट कशाचं वाटतंय? मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी आहे खास आपल्यात, पण त्या 'खास' हून पलीकडे जाण्याला बंदी आहे हे माहीत होतंच की आधीपासून. मग वाईट कशाचं वाटतंय?
या आधीसुद्धा कितीतरी वेळा तूला 'मी' सोडून कुणासोबत तरी असलेला पाहिलेलं आहेच की मी..मग वाईट कशाचं वाटतंय?
तू कुणाच्या प्रेमात पडलास तर माझ्यासाठी आनंदच आहे, असं ठणकाऊन सांगते खरी मी नेहमी, पण त्या विचाराने अस्वस्थ ही होते. तू कुठल्याही प्रकारे बांधील नाहीस मला, पण मग 'तू लग्न करतो आहेस' असं कळल्यावर आकाश फाटल्यासारखं वगैरे का वाटलं असेल?
ही बातमी आली म्हणून? की तूझ्याकडून आली नाही म्हणून?? की ईतक्या लवकर आली म्हणून? की 'लग्न' करतोयस म्हणून?
मनाची तयारी करून ठेवलीच होती की केव्हाची? मग वाईट कशाचं वाटतंय?
'लग्न केलस' एवढ्या एका कारणाने परका होशील का रे? आता भेटतोस तसा नाही भेटणार मग? आता बोलतोस तसा नाही बोलणार तेव्हा? मध्यरात्री नाहीस नेणार बाईक वरून फिरायला..आता मी आजारी पडले की तासातासाने माझी चौकशी करायला फोन करतोस, तसं ही नाही करणार.. हे सहाजिक आहे सगळं..यातलं बरचसं आता अंगवळणीही पडलंय.. मग वाईट कशाचं वाटतंय?
खूप खूप कोसळून रडायचय तूझ्याकडे, भांड्ल्याचं निदान नाटक तरी करायचंय, किमान तेवढ्यासाठी तरी भेटून जा असं सांगतेय केव्हाची.. तू येणार नाहीस हे माहीत आहे पक्कं..मग वाईट कशाचं वाटतंय?
'माझ्यापूरता तू', मिळवला आहे मी..तो समजून घेण्यातच हयात संपेल.. मग वाईट कशाचं वाटतंय?
छान वाटलं छोटसं मनोगत.
छान वाटलं छोटसं मनोगत.
छान लिहीलयसं रमा...
छान लिहीलयसं रमा...
आवडलं.
आवडलं.
अगदी निवडक शब्दात पण खूप खर
अगदी निवडक शब्दात पण खूप खर आणि मनस्वी लिहिलय... लेख वाचून पूर्ण होत असतानाच "रन्जिश ही सही..." ही अजरामर गझल आठवत गेली.
आता हेडफोन लावून शान्तपणे "रन्जिश ही सही..." ऐकल्या शिवाय काही खर नाही..
शेवटचे वाक्य जास्त
शेवटचे वाक्य जास्त आवदले
"'माझ्यापूरता तू', मिळवला आहे मी..तो समजून घेण्यातच हयात संपेल.. मग वाईट कशाचं वाटतंय?"
चांगल लिहीलेस
चांगल लिहीलेस
खुप आवड्ली
खुप आवड्ली
आह! सहीच!!
आह! सहीच!!
धन्यवाद लोकहो.. गुलाम चोर ,
धन्यवाद लोकहो..
गुलाम चोर , मी खरोखरीच 'रन्जिश' ऐकत होते.. 'आ, फिरसे मुझे छोडके जाने के लिये आ...'
रमा.. खुप छान व्यक्त केलयस..
रमा.. खुप छान व्यक्त केलयस..
रमा, मस्तच..
रमा, मस्तच..
'असे आगळे हे नाते, ऐक ही रमा
'असे आगळे हे नाते, ऐक ही रमा सांगते..
बीज हे रूजे अंतरी, जगण्याचे फूल होते...'
--उंच माझा झोका..
चांगलं लिहिलं आहेस.
चांगलं लिहिलं आहेस.
जमलय! आवडलं. रंजिश ही सही....
जमलय! आवडलं.
रंजिश ही सही.... ऐकते आहे. अर्थासकट ऐकायला मजा येतेय.
खूपच सुंदर लिहिलं आहेस रमा
खूपच सुंदर लिहिलं आहेस रमा कारण हे लिहिणं नाहीच, एक एह्सास आहे शब्दातून थोडासा व्यक्त होणारा.
अभिव्यक्ती आवडली.
अभिव्यक्ती आवडली.
अगदी मनातलं! खुपच मस्त!
अगदी मनातलं!
खुपच मस्त!
थँक्यू लोकहो..असेच एहसास
थँक्यू लोकहो..असेच एहसास मांडत रहाण्याचा प्रयत्न करत राहीन.
सही. मस्तच.
सही. मस्तच.
रमा... मला माफ कर प्लीज....
रमा...
मला माफ कर प्लीज.... तुझा हा धागा माझ्याकडून पाह्यचा कसा चुकला हे समजून येत नाही. पण असो...आता वाचल्यावर समजले की किती भावुकपणे मनातील विचार तू प्रकट केले आहेस. सुंदरच सारे... विशेषतः "....भांड्ल्याचं निदान नाटक तरी करायचंय...." ही कबुली तर नात्यातील ओढ किती गाढी आहे हे दर्शविणारी.
तुम्हाला छान सुचलय!
तुम्हाला छान सुचलय!
ह्ह्ह्म्म्म्म्म्म्म्म... काय
ह्ह्ह्म्म्म्म्म्म्म्म...
काय राव ...
काय बोलू ??? माझ्या निवडक
काय बोलू ???
माझ्या निवडक दहात...
खुप सुन्दर आहे लेख् न ,
खुप सुन्दर आहे लेख् न , पु.ले.शु.
माझ्यापूरता तू', मिळवला आहे
माझ्यापूरता तू', मिळवला आहे मी..तो समजून घेण्यातच हयात संपेल>>>>> हे फार फार पटलं आणि म्हणूनच आवडलं. पु. ले. शु.
आवडलं
आवडलं
सुंदर!
सुंदर!
खुप छान........
खुप छान........
छान
छान
रमा खूप मस्त. आवडले
रमा खूप मस्त. आवडले लिखाण.
कधी कधी असे वाटत असते की आयुष्यात अशी माणसे नक्की का येत रहातात?
Pages