Submitted by डॉ अशोक on 11 August, 2013 - 03:59
दुर्दैव
वहात जावे ज्यांच्या संगे, प्रवाह ऐसे उरले नाही
दिपून जावे डोळे ज्यांनी, भास्कर ऐसे दिसले नाही
*
कितीक पंचम्या आल्या गेल्या, पुंग्या ही वाजवून झाल्या
भिनून घ्यावे जहर जयांचे, नागच ऐसे डसले नाही !
*
प्रवास झाला उभा-आडवा, थकून होतो कधी थांबलो
राहुन जावे कायम जेथे, गावच ऐसे भिडले नाही
*
शिकार व्हावी हीच मनीषा, व्हावे लक्ष्य ही एकच आशा
रक्ताळूनही मन हासावे, बाणच ऐसे घुसले नाही
*
रदिफ-काफिये नाचून गेले, घेवुन आले अलामतींना
ठाव घेतील रसिक मनाचा, शेरच ऐसे सुचले नाही
-अशोक
११/०८/२०१३
(नागपंचमी)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त जमली आहे. मजा आली.
मस्त जमली आहे. मजा आली.
धन्यवाद किशोर !
धन्यवाद किशोर !
मस्त
मस्त
खूप छान.. अडकूनी जावे जाली
खूप छान..
अडकूनी जावे जाली माझ्या,सावज ऐसे फसले नाही
तिसरी द्वीपदी सर्वात विशेष
तिसरी द्वीपदी सर्वात विशेष वाटली.
डॉ. साहेब ? छानच आहे
डॉ. साहेब ?
छानच आहे
वाअह्ह्ह्ह्ह
वाअह्ह्ह्ह्ह
...... राजपुर "डॉ. साहेब ?
...... राजपुर
"डॉ. साहेब ?
छानच आहे"
हे काही लक्षात आलं नाही !
कितीक पंचम्या आल्या गेल्या,
कितीक पंचम्या आल्या गेल्या, पुंग्या ही वाजवून झाल्या
भिनून घ्यावे जहर जयांचे, नागच ऐसे डसले नाही
आवडले.