गुरगाव

Submitted by Poetic_ashish on 26 October, 2009 - 04:45

गुरगाव
दोन दिवस झाले गुरगावमधे येवून पण एवढे महाग शहर मी कधी बघीतल्याचे आठवत नाही.मध्यम वर्गीय माणूस नावाचा प्राणी येथे अस्तीत्वात आहे की नाही इतपत शंका येण्याइतपत महाग्.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरय आशिष, खूपच महाग; पण मला असं वाटत की कदाचित स्वस्ताई असलेल ठिकाण असणारच गुरगावात. शोधल पाहिजे. माझी बाईक येत्येय या आठवड्यात. मी कॉन्टॅक्ट करेनच तूला. भटकू दोघजण. सापडत नाही म्हणजे काय. शोधून काढूच स्वस्त वस्तूंचे दुकान. Happy

२ ओळी लिहिण्यासाठी अख्खा बाफ कशासाठी उघडला आहे? तोही मागोवा मध्ये? >>

अगदी अगदी!!

मी पण हेच लिहायला आले होते इथे. की गुलमोहर मध्ये हे पान का उघडलंय??? हितगुज मध्ये "गुरगाव" चं गप्पांचं पान नाही का>? नसेल तर तिथे उघडा नवीन गप्पांचं पान !!

गुडगांवमधील सेक्टर ४,७,१५,१७,२२,२३ रिझनेबल कॉस्ट ऑफ लिव्हींग आहे. जयपुर हायवेपलिकडचा भाग थोडा महागडा आहे पण त्यातही ५४,५५ ठीक आहेत.
गुडगावच्या सदर बाजारमध्ये सगळ्या वस्तू वाजवी दरात मिळतात.गलेरीया मार्केटही मस्त आहे. खरेदीसाठी दिल्लीला जायची मला तर चार वर्षात गरज नाही पडली कधी.
भरमसाठ मॉल्स असल्याने आणि सुशांत लोक वगैरे सारखे एरीया पाहील्यावर गुडगाव महाग असल्यासारखे वाटू शकते. पण तसे काही नाहीये.

(अरे आत्ता पाहीले. एक वर्षापुर्वी सुरू केलेला बीबी आहे हा. आशीष तू अजून गुडगावांत आहेस का ? असशील तर मी सांगीतलेल्या गोष्टी तुला एव्हाना कळाल्याच असतील म्हणा! Happy )

खुषखबर! खुषखबर!! खुषखबर!!!

माँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....
खास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत...
लक्ष ठेवा www.maayboli.com/node/16873 ह्या बाफवर..

जाहीर सूचना

आमचे अशील मायबोली लेखनस्पर्धा संयोजक (राहणार 'लेखनस्पर्धा २०१३', नोड ४४०१०) या नोटिशीद्वारे सर्व मायबोलीकर लेखकांस, टीपीकरांस, लेख लिहिणार्‍यांस, लेख लिहिण्याचा विचार करणार्‍यांस, लेख लिहायला तयार असूनही वेळ नसणार्‍यांस, आधीच्या 'निबंधस्पर्धा' टायटलामुळे घाबरलेल्यांस खालील जाहीर निवेदन देत आहेत.

लेख पाठवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१३ आहे.

सदर स्पर्धेसाठी मायबोलीवर इतरत्र आढळणार्‍या लेखांसारखेच लेख अपेक्षित आहेत. लेखांचे विषय अतिशय सोपे असून ते खाली दिलेप्रमाणे. सदर विषय व त्यांसदर्भातली अधिक माहिती स्पर्धेचे मुख्य कार्यालय नोड ४४०१० येथेही बघावयास मिळतील.

लेखनस्पर्धेचे विषय भारतातील स्वातंत्र्योत्तर काळाशी निगडित आहेत.

१. स्वातंत्र्योत्तर काळातील घटना ज्यांचा सकारात्मक परिणाम झाला किंवा होऊ शकेल.

२. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे अशी व्यक्ती वा संस्था व त्यांचे कार्य. या विषयांतर्गत तुम्ही तुमचे आवडते अभिनेते, कवी, लेखक, गायकगायिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, समाजसेवी संस्था इत्यांदीबद्दल लिहू शकता.

३. स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती. भारतीय भाषेतली, भारतात तयार झालेली आणि भारतीय कलावंतानं साकारलेली हवी. या विषयांतर्गत तुम्ही तुम्हांला आवडलेलं कुठलंही पुस्तक, चित्रपट, गाणं, कविता, शिल्प यांबद्दल लिहू शकता.

वरील तीन विषयांवर एरवीही मायबोलीकर लिहीत असल्याने व वाचणारे सर्व मायबोलीकर मित्र असल्याने त्यांनी टेन्शन, दडपण, भीती, कंटाळा न बाळगता स्पर्धेत लिहिणे आवश्यक ठरते.

वर दिलेल्या माहितीनुसार सदर लेखनस्पर्धा अतिशय सोपी असल्याचे नि:संशय सिद्ध होत असल्याकारणे मायबोलीकरांनी लेख लिहिण्यास घ्यावे, असे जाहीर केले.

नोटीस क्रमांक - एमबीएलपी४४०१०/२५०८/२०१३

patralekhan-1_neelampari.jpg

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.

लिहिताय ना मग? Happy

नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg