मराठा संघर्ष - काही महत्त्वाच्या लढाया - १

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

दुसर्‍या महायुद्धात ज्या माणसाने हिटलर सारख्या प्रशासकाच्या एका मोठ्या जनरल रोमेलला युद्धात हारवले त्या फिल्ड मार्शल माँटगॅमेरीने एक पुस्तक लिहीले आहे A Concise history of Warfare. ह्या पुस्तकात त्याने जगातील महत्त्वाच्या लढायांचा आढावा घेतला आहे. या लढाईतील एक लढाई म्हणजे निजाम व पहिला बाजीराव यातील पालखेडची लढाई.

ह्या छोट्याश्या लेखातून आपल्या बाजीराव पेशव्यांची एक नविन ओळख तुम्हाला होईल. मूळ लेखन इंग्रजीत असल्यामुळे ( मी भाषांतर करु शकलो असतो पण फिल्ड मार्शल माँटगॅमेरी जे बाजीरावाबद्दल लिहीतात तेच लिहावे वाटले म्हणून इंग्रजीत लिहीले आहे.)

या पुस्तकात प्राचीन काळापासून लढाया कशा होतात (का होतात हा विषय वेगळा) व जगातील काही महत्वाची युध्दे घेतली आहेत. अशी युद्धे निवडताना नेत्याचे युद्ध कौशल्य, त्या काळातील राजकारण, महत्त्वाच्या व्यक्ती व त्या युद्धानंतर होणारे समाजव्यवस्थेतील बदल हे मांडले आहे. ह्यात आपल्या बाजीराव व निजाम यांचे पालखेडला झालेले युद्ध आहे ज्याने तत्कालीन राजकारणावर दूरगामी प्रभाव पडला व सत्ता खर्‍या अर्थाने शाहूंकडून पेशव्यांकडे आली.

पार्श्वभूमी:

निझाम्-उल्-मुल्क त्याआधी दिल्लीहून सेना घेऊन दक्षिण सुभा सोडवायला बाहेर पडला होता. निजाम हा औरंगजेबाच्या काळातील लढवय्या. अनेक देश पाहीलेला व अनेक लढाया त्याने स्वबळावर जिंकल्या होत्या. शाहू महाराज सुटून आल्यावर त्यांनी " जुने मोडू नये नवे करु नये" ही " स्ट्रॅटेजी घेतली होती. त्यांना मोगलांशी लढाया नको होत्या कारण त्यामुळे नवीन गोष्टी प्रस्थापित झाल्या असत्या पण त्याच वेळेस त्यांना बादशहाने तत्वतः मान्य केलेली दक्षिणेतील चौथाई सनद हवी होती. निझामाला स्वतः सुभेदार व्हायचे होते व झालेच तर पुढे मागे स्वतंत्र राजाही व्हायचे होते. त्यामुळे त्याला दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून पाय रोवणार्‍या मराठ्यांना हारविणॅ भाग होते हे ओघाने आलेच. ह्या लढाया १७२७ च्या शेवटास ते १७२८ च्या सुरुवाती पर्यंत चालल्या. १७२७ मध्ये शाहूचा सरलश्कर सुलतानजी निंबाळकर हा निझामाला मिळाला. तर कोल्हापुरकर छत्रपती संभाजी (दुसरा) याने निझामास युध्दात मदत केली.

नमनाला घडाभर तेल न ओतता आता मी तो प्यारेग्राफ देतो.

The Palkhed campaign of 1727-28 in which Baji Rao I outgeneralled Nizam-ul-Mulk, is a master piece of strategic mobility. Baji Rao's army was a purely mounted force, armed only with sabre,lance, a bow in some units, and a round shield, there was a spare horse for every two men. The Marathas moved unencumbered by artillery, baggage, or even handguns and defensive armor. They supplied themselves by footing.
Bajo Rao resented the Nizam's rule over the Deccan and feared his diplomacy. And it was he who struck the first blow. In Oct 1727 as soon as the rainy season ended, Baji Rao burst into the territory of the Nizam. The lightly equipped Marathas moved with great rapidity, avoiding the main towns and fortresses living off the country, burning and plundering. They met one reserve as the hands of the Nizam's able lieutenant, Iwas Khan , at the beginning of November, but within a month they had fully recouped and were off again, dashing east, north, west, with sudden changes of direction. The Nizam had mobilized his forces and for a time pursued them, but he was bewildered by the swift and impracticable movements of the enemy and his men became exhausted.
At the end of January the Nizam changed his strategy; he gave up the pursuit of the elusive Maratha forces and instead made direct for his heartland around Poona, which he captured and ravaged. Baji Rao received urgent calls to come back. but with good strategic sense he resisted the call and instead countered the Nizam's move by in turn threatening his capital Aurangabad. Nizam predictably evacuated the Poona district and returned to rescue Aurangabad. Baji Rao had not actually captured the capital, but he had pillaged the neighbouring area. As the Nizam had once again endeavored to catch Baji Rao, the Marathas harried & circled round his forces. The Nizam preserved his army intact, but in March 1728 he gave. The Marathas returned home laden with plunder and by the peace terms some of their territorial claims conceded.

फिल्ड मार्शल माँटगॅमेरी - A CONCISE HISTORY OF WARFARE

बाजीराव युध्दातुन माघार घेऊन जळगावाकडे सरकल्यावर निझामाने पुण्यावर चढाई केली व आजुबाजूचा परिसर ताब्यात घेऊन विध्वंस सुरु केला. त्याला बाजीराव अवघड अजिंठा मार्गाने औरंगाबादवर येईल हे वाटले नाही पण आपल्या पायी चालणार्‍या मावळ्यांनी मुक्काम न घेता अजिंठा पार करून औरगांबादला धडक दिली व दिल्ली दरवाजा ताब्यात घेतला. शहरावर हल्ला झालाच नाही, फक्त हूल ऊठविली गेली. निझाम वापस येताना पेशवा औरंगाबादेतून ऊठून नाशकाकडे निघाला. निझामाने परत पाठलाग सुरु केला. बाजीरावाला कुठे थांबायचे हे आधीच माहीत असल्यामुळे त्याले पालखेड हे नदीकाठचे गाव गाठले. नदीला पल्याड ठेवून भली मोठी छावणी उभी केली. निझाम पाठलाग करत पालखेडला आला व छोट्या मोठ्या लढायांना तोंड फुटले. निझामी सैन्याला नदी पल्याड असल्यामुळे पाणी मिळेनासे झाले. पाण्याला काबूत ठेवून निझामाला बाजीरावाने जेरीस आणले. निझामी सैन्यात महागाई सुरु झाली. पाणी, अन्नावरुन आपापसात भांडणे सुरु झाली व सैन्याचा धीर खचला. अशातच बाजीरावाने दुसरी आघाडी उघडली. पाणी नाही, दोन्हीकडून बाजीराव अशा स्थितीत निझामाला शरण येण्याशिवाय पर्याय राहीला नाही. (अशीच परिस्थिती सदाशिव भाऊने अब्दालीवर आणली होती पण .....)

फलप्राप्ती व नंतरचे राजकारण ( माझे विवचन. हे त्या पुस्तकात नाही)

निझामाने शरणागत येऊन पुढील पाच वर्षासाठी निझाम मराठा युध्द होणार नाही, मराठ्यांना चौथाईचा हक्क व नुकसानभरपाई भरणे असा तह बादशहाकडुन मान्य करुन घेतला. व लढाई संपली.
निझामाने मराठ्यांच्या भयाने त्याची राजधानी औरंगाबादहुन हलवून भागानागर (हैद्राबाद)ला पुढे केली. पुढील काही वर्षे दक्षिणेकडे निझामाकडून शांतता होती. नंतर थोरल्या नानासाहेब पेशव्यांनी निझामाला परत एकदा मात देऊन बाजीरावाचा तह कायम करुन घेतला.

शाहू लढाया न करता प्यादे हलवत होता तर हा तरुण पेशवा खर्‍या अर्थाने मुख्य प्रधान झाला व सूत्रे पुण्याकडे आली. जर या लढाईस भोसलेपणाला जागून शाहू जाता तर कदाचित पेशवाई निर्माण झाली नसती व स्वतः छत्रपतीच युध्दाला जातो म्हणुन सर्व सरदार एकदिलाने पुढे लढू शकले असते. मराठा मंडळ जे राजारामां मुळे अस्तित्वात आले (यावर एक मोठा लेख होऊ शकतो) ते नष्ट करता येऊन एकछत्री अमंल प्रस्थापित करता आला असता. पण शाहु तेवढा धैर्यशाली नव्हता.

नीट विचार करता हे युद्ध ज्या गोष्टीसाठी झाले (दक्षिण सुभा चौथाई हक्क) त्यामुळे मराठे हे खर्‍या अर्थाने दिल्लीकर बादशाहाचे मांडलीक बनले. दिल्लीवर संकट आले तर मराठे धावून जाणार व मराठ्यांची फौज दिल्ली रक्षणासाठी दिल्लीत राहाणार असा करार नंतर परत झाला. म्हणजे ज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व नंतर छत्रपती राजाराम महाराज व ताराबाई ने अहोरात्र मेहनत घेतली ती शाहुने अशी वाया घालवीली व मराठेशाहीला मांडलीकाचे रुप आणले. यातुनच पुढे दिल्ली रक्षणासाठी पाणिपत घडल्याचे वाचकांचा लक्षात येईल. जर शाहूने चौथाई नाकारुन प्रदेश कब्जा केला असता तर नविन स्वराज्य वाढण्यास मदत झाली असती

विषय: 
प्रकार: 

मुघलांबरोबर नमते घ्यायचे धोरण पेशाव्यांचेही होतेच .

कदाचित् तो राजकारणाचा भाग असावा.

कदाचित् संभाजी, राजाराम, ताराबाई यांच्यानंतर स्वतंत्र राज्याच्या कल्पना अशक्य वाटू लागल्या असतील. ती स्फूर्तीच हरवली.

इतरांना स्फूर्ति देऊन राज्य स्थापना करणे, जसे छत्रपति श्रीशिवाजीमहाराजांनी केले तसे बिचार्‍या बाजीरावाला जमले नसावे. कारण बाकीचे सगळे फक्त मस्तानीकडे बघत बसले, नि याला एकट्यालाच का? आम्हाला पण अशी कुणि का नाही, या असूयेने, नुसते बाजीरावाला विरोध करण्यात मग्न झाले. राज्य वगैरे कोण विचार करतो?

दुर्दैवाने ते सगळे तेज, अभिमान ताराबाई नंतर हरवले. उरले ते स्वार्थ, फितुरी, पैशाची हाव. अमावास्या असूनहि भारताच्या आकाशात दोन चारच तारे, नि तेहि एका वेळी नाहीत.

नमस्कार केदार,

ईतिहास हा मझा आवदता विषय आणि त्यातुन मराठे शाहिचा ईतिहास म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच.

धन्यवाद !

छान लिहिलंय...
नाझी भस्मासुराचा उदयास्त मध्ये हिटलर छान मांडला गेलाय...

प्रिय केदार,

आम्ही पुढिल काही दिवसातच नविन मासिक काढत आहोत त्यात मी मरठ्या॑चा ईतिहास या विषयावर लिहिन्याच्या विचारात आहे पण स॑दर्भ म्हणून तुझे लेख वापरण्या साठी तुझी परवानगी हवी आहे.

सत्यवान

केदार शेवटच्या दोन परिच्छेद अतिशय मार्मिक वर्णन आहे. खरच शाहू तस वागला असता तर भारताचा इतिहास बदलला असता आणी भारत हा फार पूर्वीच एकसंध झाला असता.

पराक्रमी मराठ्यांचा इतिहास आजही प्रेरदायी आहे,
त्याबद्दल लिहणारे थोडे अन् आमच्या सारखे वाचणारे खुप आहेत.
तेव्हा लिहीत रहा.

ले़ख आवडला पण आणि नाही पण. कारण हा लिहणारा संशोधक आहे अस भास होतो आहे व प्रतिक्रिया म्हणजे जरा कोड्कौतूक जास्तच होतय. कुणाला काय आवडाव, हे पण आधिच ठरल तर काय ढेकळ नविन कळ्नार?

kedar bhau sambhaji maharajananantrcha itihas jrasa tutat tutak swarupat n gondhlat taknara aahe.... jr tumala jamle tr tyavrti akhadi lekhmalika suru kra.... baki tumchi lihnyachi padhat bhari aahe....

Pages