"प्रेम म्हणजे काय?" यावर धागा काढला तर हजारो पोस्ट पडूनही प्रश्न अनुत्तरीतच राहणार यात कोणालाही शंका नसावी.
प्रत्येकाची व्याख्या वेगळी आणि तरीही बरोबर असू शकते.
पण हे जे काही प्रेम आहे ते "एकाच वेळी" दोघींशी होऊ शकते का हो?
(मी मुलगा आहे म्हणून दोघींशी लिहिले, आपण यापुढच्या लेखात आपल्या सोयीनुसार "दोघींशी" किंवा "दोघांशी" असे काहीही वाचू शकता.)
इथे प्रेम म्हणजे मैत्री, ममता, वात्सल्य असे काही अपेक्षित नाही, तर स्त्री-पुरुष वयात आल्यानंतरचे होणारे प्रेम ज्याला प्रमाण मानून आपण आयुष्याचा जोडीदार निवडतो त्याला डोळ्यासमोर आणा.
काही जण म्हणतात, एकीवरच प्रेम कसे करणार...
कोणाचे डोळे सुंदर असतात, कोणाचे केस, तर कोणाचे गाल...
एखादीचे बोलणे आवडते, एखादीचे दिसणे, तर एखादीचे हसणे...
फिल्मी डायलॉग निव्वळ...
कारण माझ्यामते एखादीचे नुसते आपल्या आयुष्यात असणे जेव्हा आपल्याला आवडायला लागते तेच खरे प्रेम..
इतर गोष्टींना वासना म्हणा, आकर्षण म्हणा, आवड म्हणा...... पण प्रेम .... नाह...!
आजच्या पिढीच्या भाषेत सांगायचे तर ते "इश्कवाला लव" नक्कीच नाही..
असो, तर हे असे प्रेम एकाचवेळी दोघींशी कसे होऊ शकते??
एखादीत मन खरेच गुंतले तर ती आपले सारे आयुष्य व्यापून टाकते तर तिथे दुसरीसाठी जागा कुठून करणार.? त्यासाठी फोर्थ डायमेन्शनमध्येच जावे लागेल ना..
हृदय म्हणजे कप्प्याकप्प्यांचे कपाट आहे का? .. स्वताला हवे तेव्हा एक कप्पा उघडला अन दुसरा बंद केला..
हृदय म्हणजे ड्युअल सिम मोबाईल आहे का? .. कार्ड बदलले की नवीन नेटवर्क पकडले..
हृदय म्हणजे चॅनेल बदलणारा एफ एम रेडिओ आहे का? .. एक खटका दाबला आणि आपोआप ट्यूनिंग होऊन नवीन फ्रीक्वेन्सी सेट झाली..
एखादीवर तुम्ही प्रेम करत आहात आणि त्याचवेळी आणखी एखादी तुम्हाला आवडते याचा अर्थ एकतर त्या दुसरीबद्दलच्या भावना प्रेम नसून वर सांगितल्याप्रमाणे वासना, आकर्षण, आवड या सदरात मोडणार्या असाव्यात,
किंवा
तुमचे पहिलीवर आता प्रेम राहिले नाही वा कधी नव्हतेच मुळी..
पण तरीही तुम्हाला असे वाटत असेल तर आता हे तुम्ही स्वताच्या मनाचे समाधान म्हणा किंवा जोडीदाराची समजूत काढणे म्हणा...
वा आपल्या व्यभिचाराचे समर्थन..
पण मी याला व्यभिचारही म्हणू इच्छित नाही जर प्रामाणिकपणे दोघींपैकी कोणावर खरे प्रेम आहे हे स्वताच्या मनाशीच मान्य करून दुसरीजवळ त्याची कबूली दिली तर...
कुछ कुछ होता है या शाहरुखपटात एक संवाद होता - आपण एकदाच जगतो, एकदाच मरतो, वगैरे वगैरे एकदाच करतो, तर तसेच हे प्रेम पण एकदाच करायला हवे.
पण पुढे काय होते तो इतिहास आहे. (चित्रपटप्रेमींना माहीत असेलच.)
हे असे पुन्हा प्रेम होणे यात काही वावगे नाही किंवा हे घडतेच घडते. कारण प्रेम आपण करत नाही तर प्रेम हे होते.
माणूस गेला की संपले सारे. भले त्याने एकेकाळी आपले सारे आयुष्य का व्यापून टाकले असेना.. उलट तेवढीच मोठी पोकळी तो आपल्या आयुष्यात निर्माण करून जातो, जी भरल्याशिवाय आयुष्य पुढे सरकू शकत नाही. अश्यावेळी खरे तर जास्तच गरज असते एखाद्याची.. त्यामुळे प्रेमभंगानंतर पुन्हा प्रेम होणे, आणि या दुसरीशीही प्रेमभंग होऊन परत पहिलीच्याच प्रेमात पडणे असे काहीही होऊ शकते.....
पण एकाच वेळी..? दोघींच्या प्रेमात..? कोण कसे पडू शकते राव..?? हे या अंड्याला कोणीतरी समजवा इथे.
तळटीप - बेफिकीर यांच्या एका ललित-कथेवरून हा विषय निघाला. प्रतिक्रियेत माझे मत एका वाक्यात मांडले तर तिथे पुढच्या सार्या प्रतिक्रिया या विरोधातच आल्या. अगदीच राहवले नाही आणि मूळ कथेचा धागा भरकटू नये म्हणून त्यावर सविस्तर मत वेगळा धागा काढून मांडणे योग्य समजले.
अवांतर - मायबोलीकरांचा सरासरी वयोगट अंदाजे माझ्या वयाच्या दीडपट असावा .. त्यातही महिलांचे प्रमाण लक्षणीय .. पण .. पण .. प्रेम हे प्रेम असते, तुमचे आणि आमचे सेम असते .. त्यामुळे दरदिवशी दरडोई किमान एक प्रतिक्रिया तरी अपेक्षित आहे.
- आनंद
देवा, मामींनी मामी म्हणायची
देवा, मामींनी मामी म्हणायची सोय करून दिलीय तरी त्यांना मामीमावशी म्हणजे कहर आहेस...
बाहेर ये आता अंड्यातून आणि तो आला की उदय तू तुझा वरचा प्लान एक्सिक्युट करून टाक...
मेलो हसून हसून मामीमावशी
मेलो हसून हसून
मामीमावशी म्हणे :-h
माझे पेढ्यांवर प्रेम आहे. २१
माझे पेढ्यांवर प्रेम आहे. २१ व्या प्रतिसादाला पेढेवाटप सुरु होणार ऐकले.
माझे बर्फीवर देखिल प्रेम आहे. मी दोन्ही एकाचवेळी खाऊ शकते. प्रेम कशाशी खातात ते माहित नाही पण बहूदा दोन दोन प्रेमे एकदम खाणे अजिर्ण होईल.
रच्याकने- दोघींसाठी भेटवस्तू, दोघींबरोबर खरेदी, वीकांतचे प्लान, first day first show पाहणे. हिच्याबरोबर असताना तिचा फोन वगैरे गोष्टी सांभाळणे मोठे कलेचे काम आहे. असे बरेच कलाकार पाहिलेत.
अंड्या, लेख आवडला रे. जावु
अंड्या, लेख आवडला रे.
जावु दे, एवढं काय आश्चर्य वाटुन घेतोस. असतो बर्याच जणांचा स्वभाव 'प्रेमळ'.
मावशी नको आत्या म्हणा
मावशी नको आत्या म्हणा

एग्जब्रदर, स्टॉप वॉचिंग हिंदी
एग्जब्रदर, स्टॉप वॉचिंग हिंदी पिच्चर.
नंदिनी अंड्या, तुझ्या
नंदिनी
अंड्या, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्यातच दडलय. तू प्रेम नक्की कशाला म्हणतोस यावर ते एकाच वेळी दोघींवर करु शकतोस का ते अवलंबून आहे.
माझ्या मते प्रेम म्हणजे संपूर्ण समर्पण, मग ते कोणावरही का केलेलं असेना. आणि एकदा का तूम्ही स्वतःला संपूर्ण समर्पित केलात की मग तुम्ही तुमचेच उरत नाहीत तर मग दुसर्या कोणाचे कसे होऊ शकणार ?
एलिमेन्टरी डॉक्टर वॉटसन. 
मामीमावशी कहर आहे
मामीमावशी
कहर आहे 
माझ्या ओळखीतल्या एका घरात
माझ्या ओळखीतल्या एका घरात घरातल्या थोरल्या स्त्रीला अगदी तिची सख्खी मुले देखील मामी म्हणत.....तस्मात मामींना ते मामीमावशी म्हणाले तर विनोद काही नाही हेमावैम.
मामीमावशी! एगुड्या, अंडुशा,
मामीमावशी!
एगुड्या, अंडुशा, अंडुड्या हे फक्त वरच्या यादीत भर घालण्यासाठी. ( नाहीतर मलाही कायतरी भयाण संबोधन शोधुन काढायचास!)
'प्रेम' एकाच व्यक्तीवर असतं रे त्यातही ते दोन्ही बाजुंनी वाटत असलं तर ठीके. एका व्यक्तीच्या प्रेमात असतांना दुसरी व्यक्ती किंवा 'क्ष' इतक्या व्यक्ती 'आवडु' शकतात.
बाबु होम्ल्स यांणा आनुमोदक.
मामीमावशी एग्जब्रदर नंदिनी
मामीमावशी

एग्जब्रदर नंदिनी
(No subject)
पण हे जे काही प्रेम आहे ते
पण हे जे काही प्रेम आहे ते "एकाच वेळी" दोघींशी होऊ शकते का हो?
<<आनंद, अस नाही होउ शकत ...आणि प्रेम "एकाच वेळी दोघींशी झाल्यास" दोन्ही आकर्षणे आहेत असे समजा...
दोन धृवावर आपण दोघे तू तिकडे
दोन धृवावर आपण दोघे तू तिकडे अन मी इकडे.:फिदी: असे काहीसे अंडुचे झाले असावे.
जितुचे नाही का एकाच वेळी श्रीदेवी आणी जयाप्रदाबरोबर प्रेम किंवा लग्न व्हायचे तसे. आठवा तोहफा आणी अजून काही असले तर.
मामीमावशी, चिडू नका हा, या
मामीमावशी, चिडू नका हा, या लोकांनी कितीही हसून हसून आपल्यात आग लावायचा प्रयत्न केला तरीही...
सोनूभाय, खरेच २१ प्रतिसादांनतर पेढेवाटप आहे... पण आतापर्यंतचे ६२ प्रतिसाद मी विषयबाह्य म्हणून डिसक्वालिफाय केलेत, आणि माझे सवताचे गिणतीतच नाही पकडलेत.
दिमीत सातशे एकव्वीस,
अगदी बरोबर, आपला प्रतिसाद टॉप एकव्वीस मध्ये जमा केला गेलाय.
मनिमाऊडी धन्यवाद ग तायडी, लेख आवडला बोलणारी तूच पहिली..
नंदिनीजी, सिनेमा हिंदी असो वा मराठी, त्यातील कथेला भाषा नसते. त्यात आजच्या समाजाचेच प्रतिबिंब डोकावत असते. जे पटते तेवढेच घेंणार, जे नाही पटणार त्यावर आक्षेप व्यक्त करायचा हक्क बाळगून राहणार.
बागुलबुवा,
माझ्या मते प्रेम म्हणजे संपूर्ण समर्पण, मग ते कोणावरही का केलेलं असेना. आणि एकदा का तूम्ही स्वतःला संपूर्ण समर्पित केलात की मग तुम्ही तुमचेच उरत नाहीत तर मग दुसर्या कोणाचे कसे होऊ शकणार
-------------------------------------------------------------
अगदी अगदी... मनातलंच लिव्हलत..
सामोपचार, आमच्या इथेही माझा एक मित्र सचिन त्याच्या वडीलांना काका बोलतो. आणि त्याचा एक चुलतभाऊ ज्याने काका बोलायला पाहिजे तो अण्णा बोलतो. मला मात्र कन्फ्यूज होते की आपण त्यांना काय बोलायचे, म्हणून मी त्यांना सचिनचे काका बोलतो.
टुनटुन
जितुचे नाही का एकाच वेळी श्रीदेवी आणी जयाप्रदाबरोबर प्रेम किंवा लग्न व्हायचे तसे. आठवा तोहफा आणी अजून काही असले तर.
----------------------------------------
डेविड धवनने तर अश्या सिनेमांची रांग लावली होती... आठवा सांगतो ते एकेक करून... गोविंदा - साजन चले ससुराल, सलमान - बीवी नंबर वन, अनिल कपूर - घरवाली बाहरवाली... अजूनही असावेत कदाचित... विनोद म्हणून ठीक आहे, पण त्यातही हिरो असा कसा दोघींच्या प्रेमात पडला हे जस्टीफाय करायला नाना क्लृत्या लढवल्या जातात. याचाच अर्थ प्रेक्षकाला हिरोचे असे एका हिरोईनला फसवून दुसरीच्या मागे लागणे रुचणार नाही हे दिग्दर्शकही जाणतो..!!
<<<आतापर्यंत तिघींच्या पडलो
<<<आतापर्यंत तिघींच्या पडलो पण वन बाय वन.>>>
<<< मनातली घंटी फक्त एकीसाठीच वाजते.>>>
अंड्या , एक काय ते नक्की ठरवं . 'दिसली पोरगी की पड प्रेमात' , करायला काय केळीच्या सालावरुन चालत असतोस का रे.
श्री हा काय पेढे-बिढे देणार
श्री
हा काय पेढे-बिढे देणार नाहीये...त्यामुळे माझ्यासारख्या पिंका टाकणार्यांनी सावधान.....
अंंड्ञा, तू सुरुवात लाडूपासून कर....:)
इब्लिसांचा पहिला प्रतिसाद
इब्लिसांचा पहिला प्रतिसाद आवडला...
अहो मामीमावशी, त्या काय
अहो मामीमावशी, त्या काय कूकरच्या शिट्ट्या आहेत काय? एकदा लावला कूकर की होतच राहतात.. मनातली घंटी फक्त एकीसाठीच वाजते..
----- मनातली घंटी फक्त एकीसाठीच वाजते असे तुम्ही म्हणता मग "एकाच वेळी दोघींच्या प्रेमांत" हे शिर्षक किती निरर्थक ठरते.
जर मनांत अनेक घंट्या बसवल्या तर प्रश्नच निर्माण होणार नाही. एका घंटीचा आवाज दुसरीला नको...
<<<आतापर्यंत तिघींच्या पडलो
<<<आतापर्यंत तिघींच्या पडलो पण वन बाय वन.>>>
म्हणजे मनातली घंटी एकावेळी फक्त एकीसाठीच वाजते असे काहिसे म्हणायचे असेल.
<<< मनातली घंटी फक्त एकीसाठीच वाजते.>>>
अंड्या , एक काय ते नक्की ठरवं . 'दिसली पोरगी की पड प्रेमात' , करायला काय केळीच्या सालावरुन चालत असतोस का रे.
------ श्री - त्यांनी वन बाय बन म्हटले आहे ना...
श्री .. काय राव, फक्त तीनच
श्री ..
काय राव, फक्त तीनच मुलींच्या प्रेमात पडलो म्हणजे पटापटा नाही तर वयवर्षे १६ पासून २२ पर्यंत.. म्हणजे ६-७ वर्षांच्या कालावधीत....... प्रत्येकीच्या प्रेमात १-२ वर्षे होतो..... पहिलीच्यात गुंतलेले मन बाहेर पडले तेव्हाच दुसरी अन मग तिसरी...... मनही बाहेर पडले म्हणजे नाईलाजानेच..... कारण त्याच माझ्या आयुष्यातून निघून गेल्या..... नशीबाचे बॅडलक..
पण त्या प्रेमात पडलेले असायच्या काळात रस्त्याने जाणारी एकही मुलगी बघायचो नाही... किमान त्या नजरेने तरी बघायचो नाही...
प्रत्येकीच्या प्रेमात १-२
प्रत्येकीच्या प्रेमात १-२ वर्षे होतो..... पहिलीच्यात गुंतलेले मन बाहेर पडले तेव्हाच दुसरी अन मग तिसरी..>>>>>> एखाद्याचं गुंतलेले मन जर लवकरच बाहेत पडत असेल अन दुसरीच्यात गुंतत असेल अन मग परत लगेच बाहेर पडुन पहिलीच्यात गुंतत असेल तर त्याला तुम्ही एकाच वेळी दोन मुलींच्या प्रेमात आहे तो असं म्हणणार का?
म्यानेजमेंट चांगल असेल तर जमू
म्यानेजमेंट चांगल असेल तर जमू शकतं
आणि एकाच वेळी दोघीं शी प्रेम होवू शकतं...!
अरे देवा बिचार्या
अरे देवा
बिचार्या मुली
अवांतर असेल पण तेलुगू "ऑरेंज" मूव्ही बघा
मस्त आहे
आवडला मला
रिया अवांतर असेल पण तेलुगू
रिया
अवांतर असेल पण तेलुगू "ऑरेंज" मूव्ही बघा
---------------------------------------------------
काय स्टोरी आहे हो? या विषयाशी किंवा माझ्या वरच्या अनुभवाशी संबंधित का?
रियाजी तुम्ही शाहीद कप्पूरचा "येह दिल मांगे मोअर" पाहिला आहे का?
अंड्याचे तसेच झालेय थोडेफार.
बंडुभाऊ
जिथे प्रेम असते तिथे मॅनेजमेंट स्किल लागत नाही, आपोआप सारे जमत जाते, कारण आपल्यासाठी पहिले आपले प्रेमच असते बाकी सारे त्यानंतर..
चिमुरे, बाई गुंतलेले मन लवकर बाहेर नाही पडायचे ग्ग, ती आयुष्यातून गेल्यावर काही महिन्यावर्षाचा काळ जायचा अतीव दुखात... सकाळी हिच्या प्रेमात तर संध्याकाळी तिच्या असे काही वरदान किंवा शाप नव्हता मला..
जी वैगेरे नको पण त्या सिनेमात
जी वैगेरे नको
पण त्या सिनेमात थोडंस असं आहे की प्रेम करायचं पण थोड्याचं वेळासाठी..
मी स्टोरी नाही सांगतं पण वाचाच!
गुंतलेले मन लवकर बाहेर नाही
गुंतलेले मन लवकर बाहेर नाही पडायचे ग्ग, ती आयुष्यातून गेल्यावर काही महिन्यावर्षाचा काळ जायचा अतीव दुखात... सकाळी हिच्या प्रेमात तर संध्याकाळी तिच्या असे काही वरदान किंवा शाप नव्हता मला..
----- अंड्या मन गुंतवले नाही तर बाहेर पडायचा प्रश्नच येत नाही. दु:ख का करत बसायचे? नव्या जोमाने, मागच्या वेळेच्या केलेल्या चुका टाळायच्या.
चला आता अंड्यातुन बाहेर पडा, अंड्यामधे राहुनच बाहेरचे जग निर्दयी आहे हे असे गृहित धरणे हे निर्दयी पणाचे लक्षण ठरेल.
बाई गुंतलेले मन लवकर बाहेर
बाई गुंतलेले मन लवकर बाहेर नाही पडायचे ग्ग, ती आयुष्यातून गेल्यावर काही महिन्यावर्षाचा काळ जायचा अतीव दुखात... सकाळी हिच्या प्रेमात तर संध्याकाळी तिच्या असे काही वरदान किंवा शाप नव्हता मला..>>>>>>> अरे अंड्या मी तुझ्याबद्दल म्हनत नव्हते.. पण बाकीच्यांना असं वरदान मिळालं असेल गुंतलेलं मन पटकन बाहेर पडायचं अन लगेच दुसरीच्यात गुंतायचं अन परत तिथुन बहेर पडुन पहिलिच्यात गुंतायचं तर तु त्यांना एकाच्वेळी दोघींच्या प्रेमात आहे तो माणुस असं म्हणणार का असं विचारलं मी.. तुला तसं वरदान नाही म्हणजे बाकी कोणालाच नसणार असं नाही ना?
जी रिया, आता मी तुम्हाला
जी रिया, आता मी तुम्हाला रियाजी नाही बोलत..
सिनेमाची स्टोरी लाईन ईंटरेस्टींग वाटतेय.. पण अंड्याला कदाचित तेलगू येत नसावी त्यामुळे बघणे होणार नाही, तरीही सुचवल्याबद्दल धन्यवाद..
चिमुरे,
अश्यांना चंचल मनाचे म्हणतात ग बाई...
सगळ्यांनीच भारी प्रतिसाद
सगळ्यांनीच भारी प्रतिसाद दिलेत.. हसून हसून पोट दुखू लागलय
.. प्रतिसाद दिलेली सर्व मंडळी अजूनही माबोवर आहेत का? आणि अंडेराव अंड्यातून बाहेर आले का? 
Pages