गाथाचित्रशती लेखन स्पर्धा .विषय क्र.१ -जो जीता वोही सिकंदर

Submitted by ambar on 17 August, 2012 - 00:35

आत्ता आत्ताच घडल्यासारखं आठवतंय सगळं अगदी तारखेसकट
१ जुन १९९९३
माझा बारावीचा रिझल्ट. सकाळी ११ वाजता कॉलेजमध्ये समजणार होता, १० वी नंतरची २ वर्ष आठवत होती. मनाविरुद्ध कॉमर्सला टाकल्यामुळे २ वर्षात काहीही अभ्यास केलेला नव्हता. आमच्याच शाळेतल्या ज्यूनियर कॉलेजला असल्याने फक्त ''पूर्वसंचिताच्या ''जोरावर ११ वीला नापास न होता १२वीत दाखल झालो होतो. पण परत अख्या वर्षभर अभ्यासाला हातही नव्हता लावला.पण एखाद्या भाविकाने न चुकता देवळात जावं तेवढ्याच ; खरंतर त्याहून जास्त श्रद्धेने जवळपास रोज कुठूनही ५-१० रुपये जमवून morning /matinee टाकत होतो. बरोबरच्या १५-२० मित्रांबरोबर अगदी कुठलेही टुकार चित्रपट पण एन्जॉय करत होतो. आणि बेफिकीरीत अगदी त्याच दर्जाचे पेपरही देउन टाकले होते. आणि गंमत म्हणजे त्याचे काहीही वाईट वाटत नव्हते. तरीही निकालाबद्दल प्रचंड उत्सुकता होतीच. सकाळी लवकर कॉलेजला पोचलो तर समजलं निकाल ३ वाजता लागेल. आम्ही २-३ मित्र लगेच पिक्चर शोधायला लागलो. निलायमला ऋषी कपूर, शाहरुखचा 'दिवाना ' सुपरहिट चालला होता .खरंतर पाहायचा राहूनही गेला होता,पण तेवढ्यात लक्ष्मीनारायणला ''जो जीता वोही सिकंदर ''लागल्याचं समजलं. आमीर खान पहिला Choice !!चला..आमच्या सायकल्स सातारा रोडच्या दिशेनी निघाल्या.
इंटरवलपर्यंत आमीर खानच्या खोड्या पाहून वयाला साजेसं हसुनही घेत होतो, त्याच वेळी दुपारच्या निकालाची प्रतीक्षाही लागून राहिली होती. इंटरवल नंतर सगळंच बदललं , आमीर खान भावाच्या अपघातानंतर एकदम जवाबदार झाला,भावाची,वडिलांची काळजी घ्यायला लागला , वडिलांच्या सायकल रेस जिंकण्याच्या स्वप्नाला स्वतःचं स्वप्न मानून बाकी सगळं विसरून स्वतः मध्ये १८० डिग्रीत बदल करून मेहनत करायला लागला. आणि फायनली रेस जिंकला...पिक्चर संपला . बाहेर आलो ३ वाजले होते. पटकन कॉलेजला पोचलो, आणि २ वर्षात पहिल्यांदाच रिझल्टचं प्रचंड टेन्शन आलं. प्रचंड धाकधुक वाढलेली असतानाच मार्कलिस्ट हातात आली.. नको होता पण मनातून कुठेतरी अपेक्षित होता असाच निकाल. आयुष्यात पहिल्यांदाच नापास ...क्षणात हताश झालो.सगळे मित्र पास आणि मी ?लहानपणापासून चांगल्यापैकी हुशार समजला जाणारा ,मुख्य म्हणजे कधीही नापास न होणारा नापास?? कित्येक वर्षांनी पहिल्यांदाच हा निगरगट्ट माणूस ढसाढसा रडत होता. अख्या वर्गातले एकूण एक मित्र मला धीर देत होते.मला फक्त आई बाबांचा चेहेरा दिसत होता.त्यांना काय वाटेल? काय म्हणतील ?आता काय करायचं ..आत्महत्या करायचं डेअरिंग नाही होणार मग काय कोणालाही नं सांगता कुठेतरी लांब निघून जायचं??
पण त्याच वेळी आमीर खानचा जो जीता मधला ComeBack आठवला .आणि ठरवलं शिस्तीत घरी जावून सगळं खरं सांगायचं,बघू तरी काय होतंय ?पण पळून न जाता आमीर खान सारखाच ComeBack करायचा हे नक्की .पिक्चर मधल्या त्याच्यात आणि आपल्यात खुप गोष्टी कॉमन आहेत. अगदी सायकलसकट ...धीर करून घरी जावून खरं सांगितलं . कोणीच काही बोललं नाही ते पाहून जास्तच घुसमट झाली.रात्री उशिरापर्यंत जागाच होतो ,पहाटे कधीतरी झोप लागली . सकाळी उठल्यावर कोणाशीही काहीही न बोलता आमच्या कारखान्यात गेलो. निमुटपणे जे मशीन मोकळं दिसलं त्याच्यावर काम सुरु केलं. घरून पैसे घेणं बंद केलं. (मागितले असते तरी मिळायची खात्री नव्हती ). पण येताजाता इतर लोकांचे टोमणे खातच होतो ,अगदी कारखान्यात वडिलांच्या हाताखालच्या कामगारांचेही.
पहिला गुरुवार आला ,आठवड्याची सुट्टी परत एकट्याने जावून ''जो जीता'' पाहिला , आणि नंतर कांय चांगलं करु शकतो हे चक्क लिहून काढलं.
आणि मग ठरवलं बास.. आता काहीतरी मोठं करून दाखवायचं तरच आपण आपल्या विषयीचे समज दूर करु शकतो.सकाळी उठलो की आमीर खानचं सायकलिंग डोळ्यासमोर आणायचो.
220px-Jo_Jeeta_Wohi_Sikandar_1992_DVD_cover.jpg
अभ्यासाकरता काकांकडे राहायला गेलो ,चुलत बहिण Pregnent असतानाही तिने अभ्यास घेतला , परीक्षा दिली पास झालो. BMCC कॉलेजला Admission मिळवली . पण त्याचवेळी ठरवलं होतं ,आता हे शिक्षण फक्त दुसऱ्यांना दाखवायला , आपण मास्टर मात्र ' बिझनेस 'मध्ये व्हायचं. १ जुन २००३ ला आपल्याला बोललेल्या लोकांनी इतरांना आपलं उदाहरण द्यायला पाहिजे .
मग चालू झाली खरी धावपळ….
रोज सकाळी उठून कॉलेजला हजेरी लावून कंपनीत जायचो ते संध्याकाळी उशिरा घरी. परत नाईट शिफ्टला सुपरव्हीजन करायला जायचो ते थेट १२.३० घरी यायचो. पण ह्यात एकही दिवस आमीर खानच्या प्रयत्नांची आठवण झाली नाही असं झालंच नाही. कधी कधी तर स्कूटर चालवतानाही आमीर खानसारखी रेसर सायकल चालवल्यासारखा स्वतःलाच भास व्हायचा.कधी कधी खुप हेक्टिक व्हायचं पण नेटाने प्रयत्न करत गेलो,कामाच्या बाबतीत वडिल सांगतील ते ऐकत राहिलो .कारण फक्तं १च ''जो जीता वोही सिकंदर''.....
हळू हळू इमेज बदलत गेली,रिझल्ट मिळायला लागले. सायकलवरून स्कूटर,स्कूटरवरून बाईक ,बाईकवरून गाडी कधी हातात आली ते कळलंही नाही.बघता बघता १० वर्ष कशी गेली हेही समजलंच नाही.मधल्या काळात एकिकडे Graduate झालो ,त्यातून वाढलेल्या Confidence च्या जोरावर Management मध्ये Post Graduation पण करून झालं होतं .ज्या दिवशी Degree मिळाली त्या दिवशी अक्षरशः आमीर खान जसा रेस मध्ये जिंकल्यावर करंडक उंचावतो तस्सच वाटल ..आता कधीतरी विचार करायला लागलो की गंमत वाटते .
त्या दिवशी आमीर खानच्या ऐवजी ''दिवाना ''बघायला गेलो असतो तर पुढच्या काळाकरता ,कामाकरता जे Inspiration मिळायला पाहिजे होतं ते कुठून आणणार होतो कांय माहिती ..पण मग वाटतं वो सब गया जहन्नुम में ''जो जीता वोही सिकंदर''!!!
--समाप्त ----
मित्रहो असं काही तरी येवढ् सार्वजनिकरित्या शेअर करायची सवय नाहीये मला.लिखाणात काही चुका दिसल्या असतील तरी गोड मानून घ्या अर्थात येवढं सगळं वाचलं असेल तर तुमच्या कडे दुसरा पर्याय नाहीये ह्याची संपूर्ण जाणीव आहे मला Wink
लिखाणाची संधी दिल्याबद्दल प्रिय मायबोली आणि अजय गल्लेवाले ह्यांचे मनापासून आभार ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही Happy

अंबर, मघाशी बाहेर जायचं होतं म्हणून एका शब्दाची प्रतिक्रिया दिली. आता सविस्तर लिहिते. एकदम झक्कास लिहिलंस आणि मुख्य म्हणजे अगदी साध्या, सोप्या शब्दांत, मनापासून लिहिलं आहेस. खूपच आवडलं!

लेख वाचला नाही अजून...
पण +७८६ फक्त सिनेमाच्या आवडीसाठी..
आता लेख वाचायला घेतो..

छान, प्रांजळ लिखाण Happy

लक्ष्मी रोडवरून मग कसबा पेठेतून कँपात जाताना वाटेत उजवीकडे कुठलं ते थिएटर लागतं, तिथे आम्ही हा सिनेमा पाहिला होता. (नावच आठवत नाहीये.)
प्रचंड, खचाखच गर्दीत घुसून ऐनवेळी तिकिटं काढली होती. बाल्कनीची मिळाली नाहीत म्हणून हळहळलो होतो. आमिरचा सिनेमा खाली स्टॉलला, पुढून ७व्या-८व्या रांगेत बसून, छपरी पब्लिकसोबत काय पहायचा?? - असं वाटलं होतं Lol
त्यादिवशी रविवार असूनही मला ऑफिसला जावं लागलं होतं. जाताना मी सोबत सिनेमाला जाताना घालण्यासाठी अजून एक ड्रेस घेऊन गेले होते. (ऑफिसच्या कपड्यातच आमिरच्या सिनेमाला काय जायचं?? - असंही वाटल होतं. :फिदी:)

खरच इतकी वर्षं झाली वाटत नाही :).
तेंव्हा सुध्दा आमिर रॉक्ड अ‍ॅज कॉलेज बॉय अ‍ॅन्ड हि स्टिल रॉक्स इन ३ इडियट्स :).
नुकतीच इतर बीबी वर चर्चा झाली तो दीपक तिजोरीच्या मित्राचा डॉयलॉग ' तेरी हलकी फुलकी पप्पी पप्पा के बराबर होती है ' Biggrin

खूप मस्त वाटले वाचून..

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, मैने प्यार किया, कयामत से कयामत तक... तीन चित्रपट ... तीन खान.. तीन प्रेमकहाण्या.. नव्वदीच्या दशकातील युवा वर्गाला प्रेमाची स्वप्ने बघायला यांनीच लावली असावीत..
आणि त्यानंतर मग हा जो जीता वही सिकंदर.. प्रेमाचा ट्रॅक साईडलाईनला टाकून क्लायमॅक्समध्ये आयुष्यात काहीतरी बनण्याचा महत्वाकांक्षेला स्थान देणारा.. त्या वयात हा चित्रपट तुम्हाला प्रेरणा देऊन गेला यात नवल नसावे.. Happy

तेरी हलकी फुलकी पप्पी पप्पा के बराबर होती है ' Lol
>>>>>>>>>>

घंचू घोडे हे नावही मी तात्या विंचू सारखे कधी विसरू शकत नाही.. Proud

सगळ्यात बेस्ट म्हणजे पजामा छाप.. ईंजिनीअरींगमध्ये आमच्या सिविलला पोरी नसल्याने आम्ही स्वतालाच पजामा छाप म्हणवून घ्यायचो.. पेट से भुके, शकल से भुके.. हर बात के भुके... Lol

छान लिहिलंय. Happy
'यहा के हम सिकंदर' मधल्या एनर्जीने बरंच कायकाय दिलं होतं.
आयेशा जुल्का खूप खूप आवडण्याचे दिवस होते ते..
पहला नशा तर 'लव्ह अँथम' >> अगदीच!

पहला नशा तर 'लव्ह अँथम' होते!!! >>> 'होते' नाही, आगावा, 'आहे' !! Proud (फक्त आता, 'नया प्यार, नया इंतजार' नाहीय, इतकंच)

ऑर्कुट नवीन नवीन होतं. तिथे आपल्या अकाऊंटमधे आपल्या आवडीचे व्हिडियोपण टाकता येतात असं कळल्यावर मी आधी 'पहला नशा'चा व्हिडियो शोधून टाकला होता. नंतर कधीतरी जाणवलं, की तो व्हिडियो नाही, तर ऑडियो आपल्या जास्त आवडीचा आहे Happy

लेख खुप आवडला. हा माझाही आवडता चित्रपट.

एका परदेशी चित्रपटावर आधारीत असूनही, याचा भारतीय अवतार जास्त चांगला जमला होता.

शोले, लगान असल्या चित्रपटांच्या माध्यमातून मेनेजमेंट वगैरे शिकवताना पाहिलय. तितकेसे पटले नव्हते तेंव्हा. पण हा तुमचा प्रांजळ लेख वाचून चित्रपट देखील इतका परीणाम घडवू शकतो यावर विश्वास ठेवावासा वाटतोय.

सुंदरच आहे लेख.

अम्बर ,
दिलखुलास लिहिलेस ! " सन्धी " आयुष्यात येते ती अशी. अपयश यशाला खुणावत असते . म्हणुनच " जो जिता ....

Pages