आत्ता आत्ताच घडल्यासारखं आठवतंय सगळं अगदी तारखेसकट
१ जुन १९९९३
माझा बारावीचा रिझल्ट. सकाळी ११ वाजता कॉलेजमध्ये समजणार होता, १० वी नंतरची २ वर्ष आठवत होती. मनाविरुद्ध कॉमर्सला टाकल्यामुळे २ वर्षात काहीही अभ्यास केलेला नव्हता. आमच्याच शाळेतल्या ज्यूनियर कॉलेजला असल्याने फक्त ''पूर्वसंचिताच्या ''जोरावर ११ वीला नापास न होता १२वीत दाखल झालो होतो. पण परत अख्या वर्षभर अभ्यासाला हातही नव्हता लावला.पण एखाद्या भाविकाने न चुकता देवळात जावं तेवढ्याच ; खरंतर त्याहून जास्त श्रद्धेने जवळपास रोज कुठूनही ५-१० रुपये जमवून morning /matinee टाकत होतो. बरोबरच्या १५-२० मित्रांबरोबर अगदी कुठलेही टुकार चित्रपट पण एन्जॉय करत होतो. आणि बेफिकीरीत अगदी त्याच दर्जाचे पेपरही देउन टाकले होते. आणि गंमत म्हणजे त्याचे काहीही वाईट वाटत नव्हते. तरीही निकालाबद्दल प्रचंड उत्सुकता होतीच. सकाळी लवकर कॉलेजला पोचलो तर समजलं निकाल ३ वाजता लागेल. आम्ही २-३ मित्र लगेच पिक्चर शोधायला लागलो. निलायमला ऋषी कपूर, शाहरुखचा 'दिवाना ' सुपरहिट चालला होता .खरंतर पाहायचा राहूनही गेला होता,पण तेवढ्यात लक्ष्मीनारायणला ''जो जीता वोही सिकंदर ''लागल्याचं समजलं. आमीर खान पहिला Choice !!चला..आमच्या सायकल्स सातारा रोडच्या दिशेनी निघाल्या.
इंटरवलपर्यंत आमीर खानच्या खोड्या पाहून वयाला साजेसं हसुनही घेत होतो, त्याच वेळी दुपारच्या निकालाची प्रतीक्षाही लागून राहिली होती. इंटरवल नंतर सगळंच बदललं , आमीर खान भावाच्या अपघातानंतर एकदम जवाबदार झाला,भावाची,वडिलांची काळजी घ्यायला लागला , वडिलांच्या सायकल रेस जिंकण्याच्या स्वप्नाला स्वतःचं स्वप्न मानून बाकी सगळं विसरून स्वतः मध्ये १८० डिग्रीत बदल करून मेहनत करायला लागला. आणि फायनली रेस जिंकला...पिक्चर संपला . बाहेर आलो ३ वाजले होते. पटकन कॉलेजला पोचलो, आणि २ वर्षात पहिल्यांदाच रिझल्टचं प्रचंड टेन्शन आलं. प्रचंड धाकधुक वाढलेली असतानाच मार्कलिस्ट हातात आली.. नको होता पण मनातून कुठेतरी अपेक्षित होता असाच निकाल. आयुष्यात पहिल्यांदाच नापास ...क्षणात हताश झालो.सगळे मित्र पास आणि मी ?लहानपणापासून चांगल्यापैकी हुशार समजला जाणारा ,मुख्य म्हणजे कधीही नापास न होणारा नापास?? कित्येक वर्षांनी पहिल्यांदाच हा निगरगट्ट माणूस ढसाढसा रडत होता. अख्या वर्गातले एकूण एक मित्र मला धीर देत होते.मला फक्त आई बाबांचा चेहेरा दिसत होता.त्यांना काय वाटेल? काय म्हणतील ?आता काय करायचं ..आत्महत्या करायचं डेअरिंग नाही होणार मग काय कोणालाही नं सांगता कुठेतरी लांब निघून जायचं??
पण त्याच वेळी आमीर खानचा जो जीता मधला ComeBack आठवला .आणि ठरवलं शिस्तीत घरी जावून सगळं खरं सांगायचं,बघू तरी काय होतंय ?पण पळून न जाता आमीर खान सारखाच ComeBack करायचा हे नक्की .पिक्चर मधल्या त्याच्यात आणि आपल्यात खुप गोष्टी कॉमन आहेत. अगदी सायकलसकट ...धीर करून घरी जावून खरं सांगितलं . कोणीच काही बोललं नाही ते पाहून जास्तच घुसमट झाली.रात्री उशिरापर्यंत जागाच होतो ,पहाटे कधीतरी झोप लागली . सकाळी उठल्यावर कोणाशीही काहीही न बोलता आमच्या कारखान्यात गेलो. निमुटपणे जे मशीन मोकळं दिसलं त्याच्यावर काम सुरु केलं. घरून पैसे घेणं बंद केलं. (मागितले असते तरी मिळायची खात्री नव्हती ). पण येताजाता इतर लोकांचे टोमणे खातच होतो ,अगदी कारखान्यात वडिलांच्या हाताखालच्या कामगारांचेही.
पहिला गुरुवार आला ,आठवड्याची सुट्टी परत एकट्याने जावून ''जो जीता'' पाहिला , आणि नंतर कांय चांगलं करु शकतो हे चक्क लिहून काढलं.
आणि मग ठरवलं बास.. आता काहीतरी मोठं करून दाखवायचं तरच आपण आपल्या विषयीचे समज दूर करु शकतो.सकाळी उठलो की आमीर खानचं सायकलिंग डोळ्यासमोर आणायचो.
अभ्यासाकरता काकांकडे राहायला गेलो ,चुलत बहिण Pregnent असतानाही तिने अभ्यास घेतला , परीक्षा दिली पास झालो. BMCC कॉलेजला Admission मिळवली . पण त्याचवेळी ठरवलं होतं ,आता हे शिक्षण फक्त दुसऱ्यांना दाखवायला , आपण मास्टर मात्र ' बिझनेस 'मध्ये व्हायचं. १ जुन २००३ ला आपल्याला बोललेल्या लोकांनी इतरांना आपलं उदाहरण द्यायला पाहिजे .
मग चालू झाली खरी धावपळ….
रोज सकाळी उठून कॉलेजला हजेरी लावून कंपनीत जायचो ते संध्याकाळी उशिरा घरी. परत नाईट शिफ्टला सुपरव्हीजन करायला जायचो ते थेट १२.३० घरी यायचो. पण ह्यात एकही दिवस आमीर खानच्या प्रयत्नांची आठवण झाली नाही असं झालंच नाही. कधी कधी तर स्कूटर चालवतानाही आमीर खानसारखी रेसर सायकल चालवल्यासारखा स्वतःलाच भास व्हायचा.कधी कधी खुप हेक्टिक व्हायचं पण नेटाने प्रयत्न करत गेलो,कामाच्या बाबतीत वडिल सांगतील ते ऐकत राहिलो .कारण फक्तं १च ''जो जीता वोही सिकंदर''.....
हळू हळू इमेज बदलत गेली,रिझल्ट मिळायला लागले. सायकलवरून स्कूटर,स्कूटरवरून बाईक ,बाईकवरून गाडी कधी हातात आली ते कळलंही नाही.बघता बघता १० वर्ष कशी गेली हेही समजलंच नाही.मधल्या काळात एकिकडे Graduate झालो ,त्यातून वाढलेल्या Confidence च्या जोरावर Management मध्ये Post Graduation पण करून झालं होतं .ज्या दिवशी Degree मिळाली त्या दिवशी अक्षरशः आमीर खान जसा रेस मध्ये जिंकल्यावर करंडक उंचावतो तस्सच वाटल ..आता कधीतरी विचार करायला लागलो की गंमत वाटते .
त्या दिवशी आमीर खानच्या ऐवजी ''दिवाना ''बघायला गेलो असतो तर पुढच्या काळाकरता ,कामाकरता जे Inspiration मिळायला पाहिजे होतं ते कुठून आणणार होतो कांय माहिती ..पण मग वाटतं वो सब गया जहन्नुम में ''जो जीता वोही सिकंदर''!!!
--समाप्त ----
मित्रहो असं काही तरी येवढ् सार्वजनिकरित्या शेअर करायची सवय नाहीये मला.लिखाणात काही चुका दिसल्या असतील तरी गोड मानून घ्या अर्थात येवढं सगळं वाचलं असेल तर तुमच्या कडे दुसरा पर्याय नाहीये ह्याची संपूर्ण जाणीव आहे मला
लिखाणाची संधी दिल्याबद्दल प्रिय मायबोली आणि अजय गल्लेवाले ह्यांचे मनापासून आभार ..
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
छान लिहिले आहेत. मनापासून
छान लिहिले आहेत. मनापासून लिहिलेले आहेत
खूप दिवस मनात रेंगाळणारा,
खूप दिवस मनात रेंगाळणारा, तरुण स्वप्नाळू मनांवर गारुड करणारा चित्रपट!
तो बघून आल्यानंतर कितीतरीदा मी मनातल्या मनात बर्याच इंटर कॉलेज चॅन्पीयनशीप जिंकल्यात
आयेशा जुल्का कधी नव्हे ती जबरा आवडली होती या सिनेमात!
आगाऊ, साजिरा >>+१ आवडला लेख!
आगाऊ, साजिरा >>+१
आवडला लेख!
मालक, फारच मस्त. लिहिलेतही
मालक, फारच मस्त. लिहिलेतही छान! हा इतिहास माहित नव्हता..
नंदिनी,बेफिकिर
नंदिनी,बेफिकिर ,Bumrang,ट्यागो-मनापासुन धन्यवाद्. नात्या -आपले मार्ग १० वि पासुन वेगळे झालेना गड्या ,असो तुझ्या प्रतिक्रियेसाठी तुला काय लिहु खरच समजत नाहिये :)मायबोली परिवारामध्ये मधे मला सगळ्यात आधीपासुन आणी जवळुन ओळखणारा तुच मित्रा
अंबर,खूप प्रामाणिक लेखन अन
अंबर,खूप प्रामाणिक लेखन अन प्रातिनिधिकही..प्रेक्षकांच्या स्वप्नांचं प्रतिनिधीत्व केलंय तुम्ही.
लेख छान आहे..... शुभेच्छा
लेख छान आहे..... शुभेच्छा
हा चित्रपट आयुष्यात इतका
हा चित्रपट आयुष्यात इतका प्रेरणादायी ठरला हा अनुभव
आणि एकंदर लेखन सहज, साध्या शब्दात केलंय..... लेख आवडला.
मस्त लिव्हलय ... सुंदर अनुभव
मस्त लिव्हलय ...
सुंदर अनुभव
लेख आवडला... प्रामाणिक आणि
लेख आवडला... प्रामाणिक आणि सरळ साध्या सोप्या भाषेत .... छान लिहीला आहे
तुमच्या जिद्दीला सलाम!
स्पर्धेसाठी शुभेच्छा!!
पहला नशा<< लव्ह अँथम <<
गाणं सहीच आहे
चित्रपट आणि तुझं लिखाण दोन्ही
चित्रपट आणि तुझं लिखाण दोन्ही एकदम अपिलींग
साधंसुधं, खरंखुरं आणि मनापासून लिहिलं आहेस. लिहीत रहा.
१ जुन १९९९३>> नक्की ना हेच
१ जुन १९९९३>> नक्की ना हेच साल होते
जोजिवसि सही नाव दिले
त्यानंतर आयशा जुल्का आणि पूजा बेदींचे काही पाहिल्याची स्मरतच नाही. खूप सुंदर सिनेमा. मी तेंव्हा अभियांत्रिकीच्या पहिल्या दुसर्या वर्षाला असेल. अमरावतीमधे मित्रांसोबत पाहिला होता. काय वय होते ते!
<<खूप दिवस मनात रेंगाळणारा,
<<खूप दिवस मनात रेंगाळणारा, तरुण स्वप्नाळू मनांवर गारुड करणारा चित्रपट!
तो बघून आल्यानंतर कितीतरीदा मी मनातल्या मनात बर्याच इंटर कॉलेज चॅन्पीयनशीप जिंकल्यात
आयेशा जुल्का कधी नव्हे ती जबरा आवडली होती या सिनेमात!<< +१००० अनुमोदन!
अंबर...जबरदस्त लिहिलय!!
इन्स्पायरींग सिनेमा होता. पहला नशा.. खुप आवडलेलं. पण जास्त भावलेलं गाणं," रुठ के हमसे कभी, जब चले जाओगे तुम"!
आम्ही एमएस्सी करत होतो तेव्हा. आमच्यातल्याच एका ग्रुपने त्यातल्या
"जवां हो यारो, ये तुमको हुआ क्या" यावर डान्स बसवला होता.
प्रामाणिक लेख. सिनेमा जसा
प्रामाणिक लेख. सिनेमा जसा बिघडवू शकतो तसाच घडवू सुद्धा शकतो याचं मुर्तीमंत उदाहरण.
भारती बिर्जे,वर्षा व्हिनस
भारती बिर्जे,वर्षा व्हिनस ,UlhasBhide काका ,रोहित ..एक मावळा,लाजो ,बी ,सई ,मी_आर्या ,कौतुक शिरोडकर -प्रतिक्रिया देण्याकरता खुप खुप धन्यवाद .
लेख आवडला... मला पण हा सिनेमा
लेख आवडला... मला पण हा सिनेमा आवडला
स्मितू -धन्यवाद
स्मितू -धन्यवाद
Pages