Submitted by Ramesh Thombre on 27 May, 2012 - 02:44
या देशाने काय पाळले गांधी नंतर ?
फोटोला बस हार माळले गांधी नंतर.
विटंबनाही रोज चालते इकडे-तिकडे
पुतळे कसले, तत्व जाळले गांधी नंतर
देश बदलला, देशाचा गणवेश बदलला
खादीलाही नित्य टाळले गांधी नंतर
शस्त्राहुनही खणखर असते निधडी छाती
हिंसेपुढती रक्त गाळले गांधी नंतर
गांधी 'हत्या' 'वध' ठरवण्या आमच्यासाठी ?
इतिहासाचे पान चाळले गांधी नंतर
देश आमचा गांधीवादी सांगत सुटलो,
नथुरामाला किती भाळले गांधी नंतर ?
नको 'रमेशा' निराश होऊ कातरवेळी
'राजघाट'ने नेत्र ढाळले गांधी नंतर.
- रमेश ठोंबरे
(महात्म्याच्या कविता)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
(No subject)
छान
छान
बरी आहे अभिव्यक्त होण्याची
बरी आहे
अभिव्यक्त होण्याची शैली आवड्ली ...............
काही ठीकाणी वृत्त तपासा काही जागी टाय्पो सुधारा ...............
बाकी गझल बरी आहे
नथुरामाचा शेर खतरनाक शेर
नथुरामाचा शेर खतरनाक शेर आहे..........हा शेर निर्भीडपणे मांडलात........ जिगरबाज आहात !!
गांधीहत्या की गांधीवध हाही मुद्दा ..........कुणी काही बोलूनये-ऐकूनये लिहूनये-वाचूनये असा होता आपण तोही मांडलात बेखौफपणे
असो ..........
वैभवरावांच्या दोन्ही
वैभवरावांच्या दोन्ही प्रतिसादांशी पूर्णतः सहमत.
गांधींनंतर... पुतळे, बागा,
गांधींनंतर...
पुतळे, बागा, रस्ते आणि जयंती - पुण्यतिथी
" या देशाने काय पाळले गांधी
" या देशाने काय पाळले गांधी नंतर ?
फोटोला बस हार माळले गांधी नंतर " अगदी सत्य मांडले आहे.
"गांधी नंतर" असे वेगवेगळे न
"गांधी नंतर" असे वेगवेगळे न लिहिता त्या ऐवजी "गांधींनंतर" असे करावे ते जास्त परिपूर्ण वाटेल ...........'धी' पेक्षा 'धीं' जास्त स्वीकारार्ह आहे, तसेच आपण योजलेल्या रदीफातून दोन ऐवजी असा एकच शब्द केला तर जास्त परिणामकारक वाटतोय या ठिकाणी............(वैयक्तिक मत. आग्रह नाही.)