नजर जो कोई भी तुझसा हसीं नही आता
किसी को क्या मुझे खुदभी यकीं नही आता
जो होनेवाला है अब उसकी फिक्र क्या कीजे
जो हो चुका है उसीपर यकीं नही आता
बिछडना है तो बिछडजा इसी दोराहे पर
कि मोड आगे सफरमे कहीं नही आता
- पै. कूंवर अख्लाक मुम्हम्मद शहरयार खान
सुखनवर बहुत अच्छे या मालिकेचा सहावा भाग प्रकाशित करताना या मालिकेने आजवर न दिलेली बेचैनी आणि तुटलेपणाची जाणीव होत आहे. उतरलेल्या चेहर्याने आणि स्तब्धतेला टाळण्याच्या प्रयत्नातल्या बोटांनी ही आदरांजली लिहीली जात आहे. उर्दू गझलेच्या परंपरेच्या जेमतेम उरलेल्या तकलादू पुलाचा आणही एक खांब कोसळला.
साधेपणाच्या कोंदणातील शब्द हिर्यासारखेच प्रकाशतात आणि हिर्यासारखेच बोचतातही हे शहरयारांनी दाखवले.
सिर्फ अफ्सुर्दादिली को क्या कहे
हमको जीनेका हुनर आता न था
(फक्त हृदयाच्या उदासवाणेपणाला का नावे ठेवू? मलाच जगायची पद्धत माहीत नव्हती)
१६ जून १९३६ रोजी आंवला, जिल्हा बरेली येथे जन्मलेल्या शहरयारांचे प्रारंभिक शिक्षण हरदोई व उर्दू साहित्यातील एम ए अलीगढ विद्यापीठात झाले. अलीगढ मासिक, हमारी जुबाँ, गालिब व शेरो-हिकमत या मासिकांचे, पत्रकांचे व पुस्तकांचे त्यांनी संपादन केले.
इस्मे आझम, सातवाँ दर, हिज्रके मौसम, ख्वाबका दर बन्द है, नींद के किरचे हे त्यांचे गझल / काव्यसंग्रह प्रकाशित झाले. हिंदी (देवनागरीतही) चर काव्य / गझलसंग्रह प्रकाशित झाले. ख्वाब का दर बन है चे साहित्य अॅकॅडमीने इंग्लिशमध्ये 'द गेट वे ऑफ ड्रीम इज क्लोझ्ड' असे भाषांतर केले. साहित्य अकादमी, उत्तर प्रदेश उर्दू अकादमी, दिल्ली उर्दू अकादमी , फिराक सन्मान, असे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले.
शहरयारांच्या गझलेत सातत्याने आढळणारी वैशिष्ट्ये म्हणजे:
- रिकामेपणाची व एकटेपणाची मन डचमळवणारी जाणीव रसिकांनही अनुभवायला लावणे
- भूतकाळावरील हेलावणारे भाष्य
- सामाजिक व वैयक्तीक अनुभुतींचा उत्कृष्ट मिलाफ
महान उर्दू शायर शहरयार खान यांचे आज दु:खद निधन झाले.
या धाग्याद्वारे व प्रामुख्याने खाली नोंदवलेल्या त्यांच्याच शेरांद्वारे त्यांना विनम्र श्रद्धांजली:
=================================
वादेपे तेरे मैने कभी शक नही किया
फिर तेरा इन्तझार मुझे रात क्यों न था
अर्थ - तुझ्या वचनावर माझा विश्वास होताच. पण काल रात्री मात्र तो विश्वास असूनही मी तुझी वाटच पाहात नव्हतो. असे का बरे? (अर्थ - आता तू कधीच येणार नाही आहेस हेही मला ठाऊक होते)
================================
चेहरोंके समन्दरसे गुजरते रहे फिरभी
इक अक्सको आईना तरसता है हमारा
अर्थ - इतके लोक भेटले, भेटत आहेत, पण एकही आपला , माझ्यासारखा नाही. अक्स = प्रतिबिंब
================================
मेरे वजूदपे नफरत की गर्द जमती रही
मिला न वक्त इसे आसूओंसे धोनेका
अर्थ - माझ्या व्यक्तीत्वावर, आयडेंटिटीवर तिरस्कार जमून राहिला आहे, अश्रूंनी तो धुवून टाकण्यासाठी वेळ कुठे मिळाला?
================================
औरभी होगये है हम तनहा
इक जरा आया था खयाल अपना
अर्थ - चुकून स्वतःचीच काय जराशी आठवण आली, आता तर मी आणखीनच एकटा एकटा झालो
================================
बहुत दूर तुझसे कभी मै न था
मगर दिन लगे थे सफर मे बहुत
अर्थ - तुझ्यापर्यंत (प्रेयसी / देव / ध्येय / यश) पोचायचे होते, अंतर फार नव्हतेच, पण प्रवासात फारच दिवस गेले.
================================
कोई नही जो हमसे इतना भी पूछे
जाग रहे हो किसके लिये, क्यों सोये नही
दुख है अकेलेपनका मगर ये नाज भी है
भीडमे अबतक इन्सानोंके खोये नही
अपनी नजरमे खुदको सुबक हमने न किया
यानी किसीकी राहमे काटे बोये नही
(सुबक - स्वतःच्या मनातून स्वतःला उतरू दिले नाही) (बाकी अर्थ स्पष्ट)
=================================
दिलमे ता-उम्र तू खुषीसे रह
इस मकां का कोई किराया नही (ता-उम्र - आयुष्यभर)
================================
(सीनेमे जलन मधील इतर दोन शेर)
हमने तो कोई बात निकाली नही गमकी
वो जर्दपशेमान पशेमानसा क्युं है
(मी तर माझ्या दु:खाबाबत काहीच बोललो नाही, मग ती इतकी लज्जित का दिसत आहे जणू तिचा दुष्टपणा माझ्यामुळे जगाला कळलाच अशी?)
तन्हाईकी ये कौनसी मंजिल है रफीको
ता हद्दे-नजर एक बयाँबान सा क्यूं है
नजर जाईल तेथपर्यंत जंगलच जंगल आहे, एकटेपणाची ही कोणती पातळी आली आहे?
=================================
तेरे चेहरेके खदो-खाल लिये
मैने हर शै मे तुझे ढुंढा है
(अर्थ - तुझे गाल आणि गालावरचा तीळ आठवून मी प्रत्येक व्यक्तीत तू दिसतीयस का हे शोधत बसलेलो होतो)
================================
शायर नासिर काझमी (दिल मे इक लहरसी उठी है अभी चे शायर) यांच्या स्मृतीत लिहिलेल्या गझलचा मतला:
भटक गया कि मंजिलोंका वह सुराग पा गया
हमारे वास्ते खलां मे रास्ता बना गया
(कुठे हारवला की मुक्कामाची वाट / चिन्हे सापडली त्याला? बहुधा आमच्यासाठी - आम्हा जिवंतांसाठी - आकाशात वाट बनवत असेल तो)
===============================
जिंदगी जैसी तवक्को थी.. नही कुछ कम है
हर घडी होता है अहसास... कही कुछ कम है
घरकी तामीर तसव्वुरही मे हो सकती है (तामीर- निर्मीती, तसव्वुर - कल्पनेतच)
अपने नक्शेके मुताबिक ये जमी कुछ कम है
बिछडे लोगोंसे मुलाकात कभी फिर होगी
दिलमे उम्मीद तो काफी है... यकीं कुछ कम है (उम्मीद - आशा, यकीं - खात्री)
अब जिधर देखिये लगता है कि इस दुनियामें
कहीं कुछ चीज जियादा है.. कहीं कुछ कम है
आजभी है तेरी दूरी की उदासीका सबब
यह अलग बात की पहलीसी नही... कुछ कम है
================================
हरघडी होता है अहसास..... कहीं कुछ कम है
शेवटचा सलाम शहरयार.....
================================
-'बेफिकीर'!
================================
आजवरचे 'बहुत अच्छे सुखनवर':
http://www.maayboli.com/node/22554 -भाग १ - डॉ. 'सर' मुहम्मद 'इक्बाल'
http://www.maayboli.com/node/22651 - भाग २ - 'साहिर' लुधियानवी
http://www.maayboli.com/node/23096 -भाग ३ - डॉ. रघुपती सहाय 'फिराक' गोरखपुरी
http://www.maayboli.com/node/26488 - भाग ४ - मौलाना हसरत मोहानी
http://www.maayboli.com/node/29834 - भाग ५ - मुनव्वर राना
==============================
औरभी होगये है हम तनहा इक जरा
औरभी होगये है हम तनहा
इक जरा आया था खयाल अपना
वाह ! छान लिहिलंय.. 'साहिर' वाचायला जास्त आवडेल.
भुक्कडचे काय, बेफिजी?
भुक्कडचे काय, बेफिजी?
अप्रतिम लेख बेफि
अप्रतिम लेख बेफि !
मुजरा......
अगदी योग्य वेळेवर हा भाग
अगदी योग्य वेळेवर हा भाग आला.
शहरयार ह्यांना श्रद्धांजली
व्वा.... ज्या धाग्याची फार
व्वा.... ज्या धाग्याची फार गरज वाटत होती तो प्रसिद्ध झाला [आणि ज्या सदस्याकडून तो अपेक्षित होता, त्यांच्याकडूनच तो व्हावा हेही एक वैशिष्ठ्य !]. आज सकाळीच ज्यावेळी बातम्यात 'शहरयार' अल्लाघरी गेल्याची बातमी ऐकली त्यावेळी मनी दाटून आलेले मळभ काढण्यासाठी अर्थातच 'सीने मे जलन' कडे जाणे क्रमप्राप्त होते. इथे मायबोलीवर 'दु:खद घटना' सदरात त्याना श्रद्धांजली अर्पण केली होती तरीही त्यांच्यावर स्वतंत्र धागा निघणे जरूरीचे आहे असे सारखे वाटत राहिले आणि श्री.बेफिकीर यानी शेवटी ते ऐकले आणि ज्या प्रभावीपणे त्यानी या कवीला शब्दसुमनांची श्रद्धांजली अर्पण केली आहे ती वाचल्यावर एकच भाव मनी आला, तो म्हणजे "धन्यवाद दोस्त".
मराठी वाचकांचा उर्दू साहित्याशी संबंध क्वचितच येत असतो असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही. त्यातही काही उर्दू कवींच्या रचना कानी पडणार असतील तर त्या चित्रपट माध्यमाद्वारेच. महाराष्ट्रात साहिर लुधियानवी हे सिनेगीतकार म्हणून जास्त प्रसिद्ध होते पण 'कवि साहिर लुधियानवी' हे नाव उत्तर भारतात तसेच पाकव्याप्त पंजाबमध्ये किती जादुभरे आहेत हे तेथील साहित्यप्रेमीनाच माहीत असते. श्री.बेफिकीर सारखे बोटाच्या पेरावर मोजावे असे काही साहित्यप्रेमी असतील ज्यानी उर्दू भाषेची नजाकत जोखली आहे. [कै.माधव मोहोळकर हे एक असाच दबदबा असणारे नाव होते.]
'शहरयार' या जातिवंत उर्दू कवीची. हे नाव वाचनात आले किंवा कानी पडताच महाराष्ट्रातील कलाप्रेमींना प्रथम आठवणार ते 'उमरावजान', 'गमन' ही दोन मुस्लिम पार्श्वभूमी असणारी मुझफ्फर अलींचे दोन सुंदर चित्रपट. "शहरयार" [अर्थ : राजा] या नावाने उर्दुत कविता करणारे अखलक मोहम्मद खान यांची ओळख फक्त या दोन चित्रपटांचे गीतकार नसून त्या भाषेतील एक फार मोठा दबदबा असलेल्या शिक्षकाचे, संशोधकाचे नाव होते. त्या विषयात त्यानी डॉक्टरेट तर मिळविली होतीच शिवाय अलिगड मुस्लिम विद्यापीठात त्या विभागाचे हे एच.ओ.डी.ही होते.
साहिर, बहजाद लखनवी, कैफी आझमी अथवा मजाज यांच्यासारख्या श्रेष्ठ उर्दू कविंच्या लिखाणातून वेळोवेळी आढळणारी 'क्रांती' ची घोषणा वा "जला दो जला दो, मेरे सामने से हटालो ये दुनिया", 'समाज को बदल डालो' अशा स्वरूपाच्या रचना त्यानी न करता आपल्या कोणत्याही रचनेतून त्यानी फक्त भाषेची कलात्मकता आणि सुंदरता याचे विश्लेषण करून दाखविण्याचा सदैव प्रयत्न केले. एक प्रकारे ते 'निसर्गकवी' होते असे म्हटले जाते, कारण त्यांच्या कोणत्याही रचनेतून समाजासाठी संदेश असा काही प्रकार आढळत नाही. एका संग्रहाचे नावच मुळी "ख्वाब के दार बंद है |" असे असल्याने ते खोट्या स्वप्नांच्या मागे कधी धावलेले दिसत नाही. मानवी आयुष्य वेदनामय आहेच ही संकल्पना त्यानी कधीच त्यागली नाही, पण म्हणून आपल्या प्रतिभेला त्यानी कधीही 'आक्रस्ताळे' पणाच्या वाळवंटात घुमवित ठेवले नाही. सारे साहित्य उर्दू या भाषेतच त्यानी लिहिले असून 'मेरे हिस्से की जमीन' हे एकच पुस्तक देवनागरीमध्ये उपलब्ध आहे.
दिल्ली, लखनौ, सिमला, अमृतसर आदी ठिकाणी त्यांचे मुशायरे व्हायचे, पण गुलझार, जावेद यांच्यासारखी धोधो प्रसिद्धी त्याना कधी लाभली नसल्याने....किंबहुना ते मुंबईत कधी त्या संदर्भात कधी न आल्याने साहजिकच मिडियाने त्यांच्या रचना रेकॉर्डेड करण्याचा कधी प्रयत्न केलेला नाही.
"सारेगामा" (एच.एम.व्ही. चे एक अपत्य) आणि टी सीरिजने 'उमराव जान' च्या यशानंतर "मंझिल' नावाचा एक ९० मिनिटांची टेप बाजारात आणण्याचे घोषित केले होते - साधारणतः १९८५-८६ च्या आगमागे - पण गुलशनकुमार यांच्याशी झालेल्या काही तांत्रिक वादापोटी त्या कॅसेटचे मार्केटिंग व्यवस्थित होऊ शकले नाही. [प्रीती सागर या गायिकेने एका मुलाखतीत ही बाब स्पष्ट केली होती]
श्री.बेफिकीर याना ह्या धाग्याबद्दल मनापासून धन्यवाद.
अशोक पाटील
सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे.
सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे.
औरभी होगये है हम तनहा इक जरा
औरभी होगये है हम तनहा
इक जरा आया था खयाल अपना
<< आह..!!
लेख छानच..!! शहरयार यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
त्यांनी काही मोजक्या हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन देखील केलेलं आहे. उदा. उमराव जान, अंजुमान इ.
सुरेख प्रतिसाद अशोककाका
सुरेख प्रतिसाद अशोककाका
बेफी अप्रतिम आढावा.. अशोक
बेफी अप्रतिम आढावा..
अशोक मामा पोस्ट प्रचंड आवडली.
होय, मलाही म्हणायचे होते पण
होय, मलाही म्हणायचे होते पण राहून गेले.
अशोकराव, तुमचा हाच नव्हे तर सगळेच प्रतिसाद अतिशय आवडतात.
तुम्ही काही स्वतंत्र लेखन पकाशित करावेत अशी इच्छा व मागणी व्यक्त करतो
अमित, दक्षिणा व विशाल, आपले आभार
-'बेफिकीर'!
थॅन्क्स दक्षिणा ~ आय न्यू यू
थॅन्क्स दक्षिणा ~ आय न्यू यू वुड लाईक इट.
बेफिकीर ~ काही वेळापूर्वीच विशाल कुलकर्णी याने मला "शहरयार" यांच्या लाईव्ह मुलाखतीची एक माहिती दिली. तुमच्या टीव्हीला "लोकसभा" चॅनेल आहे ? असल्यास त्या चॅनेलवर पूर्वी रेकॉर्ड केलेली शहरयार यांची मुलाखत सध्या दाखविली जात आहे.
तुम्हाला जरूर ती भावेल, म्हणून ही पोस्ट.
अशोक पाटील
...दुख है अकेलेपनका मगर ये
...दुख है अकेलेपनका मगर ये नाज भी है
भीडमे अबतक इन्सानोंके खोये नही
अतिशय सुंदर आणि समेवर लेख, बेफिकिर.
बेफिकीर यांनी अतिशय सुंदर
बेफिकीर यांनी अतिशय सुंदर शब्दांत वाहिलेली श्रद्धांजली आणि तीवरचा अशोक पाटील यांचा तितक्याच तोलामोलाचा भावपूर्ण प्रतिसाद. ईश्वर मृतात्म्यास शांति देवो.
धन्यवाद
धन्यवाद