मराठा संघर्ष - पेशवे व पेशवाई

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

छत्रपती महाराजांनी स्वराज्य स्थापण केले आणि त्या स्वराज्याला दिशा दिली ती बाजीराव पेशव्याने. त्याच्या उत्तराभीमुख राजकारणामुळे मराठेशाही अटकेपार जाऊन आली. पेशव्यांच्या उदय अस्तावर अनेक पुस्तके आहेत त्यामुळे या लेखात मी वंशावळीवर वा ईतर गोष्टींवर न जाता मुख्य पेशव्याच्या उदय कसा झाला हे मांडनार आहे. प्रस्तुत लेखात विस्तारभयामुळे अनेक घटना येनार नाहीत पण पेशवे कोण होते, त्यांचाकडे गादी का आली ह्याच गोष्टींवर विचार करत आहे.

महाराजांनी छत्र चामरे धरायच्या आधीच पेशवे पद निर्मान केले होते. स्वराज्याचे पहिले पेशवे हे सोनोपंत डबिर होते. त्यांचा नंतर निळोपंताना (मुलगा) पेशवाई न जाता राझेंकर कुळकर्णी पेशवे झाले व त्यापुढे मोरोपंत पिंगळे हे पेशवे झाले. महाराज जर स्वराज्याची उजवी बाजु होते तर मोरोपंत हे डावी ईतके मोठे काम पंतानीं करुन ठेवले आहे. स्वराज्य जिंकने हे काम सेनापतीचे पण त्यावर अंमल चढविने हे पेशव्यांचे. असे हे पेशव्यांचे महत्व.

नंतर पेशवाईच्या काळातील पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट कसा झाला ते पाहु.
बाळाजी विश्वनाथ भट हा मुळचा कोकणातील श्रीवर्धनचा होता. त्याचा घरान्याकडे दंडाराजपुरी व श्रीवर्धन परगण्यांची देशमुखी साधारण १४०० पासुन होती. रिसायसकार ( गो स सरदेसाई, यांनी फार मोठी कामगीरी मराठी ईतिहासासाठी केली आहे) लिहीतात की भट घरान्यतील लोक कदाचित थोरल्या महाराजांकडे नोकरीला होते. दंडाराजपुरी म्हणल्यावर जंजीरा बाजुला आलाच. तिथे सिध्दी होता त्याचा उपद्रव वाढल्यामुळे मुळ पेशवा देशावर आला. राजाराम महाराजांच्या काळात बाळाजी पुणे प्रांताचा सरसुभेदार होता तर १९०४ ते १७०७ मध्ये तो दोलताबादेचा सरसुभेदार होता. याच काळात कदाचित तो धनाजी जाधवाबरोबर मोहीमेस गेला असावा असा निष्कर्ष ईतिहास्कार काढतात. घाटावर येतानाचे त्याचे वय कदाचित २० एक असेल.
दोलताबादचा सुभेदार असताना त्याची स्वतःची राजमुद्रा होती.
" श्री उमाकान्तपदांभोजभजनाप्रसमुन्नते: |
बाळाजी विश्वनाथास्य मुद्रा विजयहेतराम ||"

धामधुमीच्या काळात जरी तो महाराणी ताराबाई सोबत काम करत असला तरी शाहु सुटुन आल्यावर त्याला शाहुचा पक्ष महत्वाचा वाटला म्हणुन तो तिकडे गेला. शाहु - ताराराणि युध्दात धनाजी जाधव ताराराणि कडुन होता. युध्द करायला तो निघाला पण युध्द झालेच नाही. बाळाजी विश्वनाथाने मोलाची कामगिरी करुन धनाजी जाधवास शाहुच्या पक्षात ओढले. कमजोर असलेला शाहु पक्ष धनाजी जाधव मुळे बळजोर झाला. ह्या घटनेला फार महत्व आहे. यामुळे बाळाजी विश्वनाथ शाहुचा मुख्य सहकारी झाला त्यामुळे शाहुने खुश होऊन बाळाजीस "सेनाकर्ते" ही पदवी बहाल केली.
पुढे जेव्हा तेव्हाचा पेशवा बहिरोपंत पिंगळे याला आग्र्यांनी अटक केली तेव्हा स्वराज्या समोर मोठा कठीन प्रश्न निर्मान झाला. एक सरदार दुसर्याला अटक करतो. तो सोडविन्यासाठी प्रतिनिधीशी सल्ला मसलत करुन शाहुने बाळाजी विश्वनाथला पेशवा केला. तेव्हा प्रथम भट घराने पेशवे झाले. पेशव्याने मोठ्या हिकमती आंग्र्याशी युध्द न करता सलोखा केला त्यामुळे त्याचे वजन आणखीन वाढले.

शाहुने मांडलिकी स्वरुप राज्य स्विकारल्यामुळे जेव्हा दिल्लीत गडबड झाले तेव्हा शाहुने हुसेन अलीला मदत करन्यासाठी बाळाजी विश्वनाथला पाठवले. ही मराठ्यांची पहिली मोहीम. (स्वतंत्र न्हवती पण त्यामुळे उत्तरेतल्या वाटा समजल्या, राजकारण समजले). जाताना बाळाजीने आपल्या कोवळ्या पोराला ( पहिला बाजीराव उर्फ विश्वास राव) सोबत घेतले. सन १७१८. ) या मोहीमेत सामील होताना एक तह झाला त्यात पण पेशव्याने मोलाची कामगिरी बजावली. हाच तो करार ज्यात पहिलेंदा चओथाई चा मुद्दा आला व पुढे निझामासोबत बाजीरावाने युध्द केले.

राजारामाने सनदादेऊन राज्य वाढीस लावायचा प्रयत्न केला होता. बाळाजी ने तो पुढे नेऊन त्याला मराठा मडंळाचे मोठे स्वरुप आणले.
बाळाजीच्या पश्चात त्याचा मुलगा बाजीराव पेशवा झाला. त्याला विरोध झाला नाही कारण तो वयाचा ११ व्या वर्षापासुन राजकारणात व स्वार्यात समाविष्ट होता. (पहीली स्वारी शाहु विरुध्द चंद्रसेन जाधव (धनाजी चे सुपुत्र).) पण तो वारल्यावर त्याचा मुलाला म्हणजे बाळाजी बाजीराव ( नानासाहेब पेशवे) लगेच पेशवाई मिळाली नाही. बाजीरावाचे जामात बाबूजी नाईक बारामतीकर (जोशी) हा ३ महीने पेशवा होता. तो प्रंचड श्रिमंत होता. शाहुवर त्याचे प्रंचड कर्ज होत त्यामुळे त्याने पेशवाई विकत घेतली असे म्हणता येईल. पण नंतर शाहुने परत नानासाहेबांना पेशवाई सन्मानाने परत केली. पण यापुढे मात्र नानासाहेबाने पेशवाई वंशपरंपरेने मागीतली व ती त्याला देऊ केली. पूढे १७४९ च्या आसपास शाहु महाराज निवर्तले त्यामुळे सर्व अधिकार पेशव्यांकडे आले.

पेशव्यांना बर्याच लोकांचा विरोध होता. जसे सेनापती दाभाडे, रघुजी भोसले, पंत प्रतिनिधी वैगरे. बाजीरावाने आणखी एक मोठे युध्द दाभाडेशी गुजरात / माळव्यासाठी केले व त्यात तो विजयी झाला.

पेशव्यांचा कारभार (पेशवे म्हणुन)

बाळाजी विश्वनाथ - १७१३ ते १७२० पेशवाई प्रारंभ.
बाजीराव - १७२० ते १७४० ( बंघु चिमाजी आपा)
मधिल दोन तिन महीने बाबुजी नाईक.
बाळाजी बाजीराव -( नानासाहेब) १७४० ते १७६१ ( बंधु रघुनाथ, चुलत बंधु सदाशिव, अपत्य विश्वासराव, माधवराव)
माधवराव - १७६१ ते ७२
नारायनराव - १७७२-७३
रघुनाथराव १७७३-७४
सवाई माधवराव - ते बाजीराव दुसरा १७७४ ते १८१८. पेशवाई समाप्त.
पुढे अमृतराव व नंतर नानासाहेब दुसरे यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यसमर मध्ये भाग घेतला.

विषय: 
प्रकार: 

केदार, पुनः एकदा, फार चांगले काम केलेत.

नागपूरकर भोसले यांना पेशवेपद न मिळाल्यामुळे ते रागावून नागपूरला गेले असे मी वाचले. पण ते केंव्हा? म्हणजे बाळाजी विश्वनाथ यांच्या काळात की पहिला बाजीराव यांच्या काळात?

शाहुने मांडलिकी स्वरुप राज्य स्विकारल्यामुळे

हा केवळ राजकारणी निर्णय असावा, त्याला काही कारणे असतीलहि (तेंव्हा पैशाची टंचाई, ताराराणी विरुद्ध मदत मिळावी म्हणून इ.) पण त्यानंतरहि पहिल्या बाजीरावाच्या काळात मराठ्यांना पुनः सार्वभौम राजे म्हणून घोषित करायला अडचण काय आली?

नागपूरकर भोसले यांनी मुगलांच्या बंगालवर हल्ला केला, त्याचे 'पारिपत्य' करायला नानासाहेब पेशवे का गेले? त्या ऐवजी, आपण दोघे मिळून या मुगलांना कायमचे हाकलून देऊ, नि दोघे मिळून हिंदूंचे राज्य करू असे विचार कसे कुणाच्याच मनात आले नाहीत?

आजकालच्या काळात हिंदू म्हणवून घेणे, म्हणजे कित्येक हिंदूंनाच लज्जास्पद वाटते, इतरांना ते जातीयवादी वाटते, वगैरे, त्यामुळे हिंदू म्हणवून घेणे सोयीचे नाही. संभाजी ब्रिगेडमुळे ब्राह्मण लोकांना विरोध आहे. जातीयवादामुळे दलित म्हंटल्या जाणारा वर्ग हिंदू धर्म सोडून गेला आहे. आता हिंदूंची एकी करणेच कठीण, पण..

त्या काळात तरी हिंदू म्हणवून घेण्यास , अगदी ब्राह्मण म्हणवून घेण्यात लोकांना लाज वाटत नव्हती! मस्तानीला विरोध केला म्हणून मुसलमानांनी 'प्रतिक्रिया' करण्यासाठी शनिवार वाड्याला आग लावायचा प्रयत्नहि केल्याचे वाचनात नाही! तेंव्हा तर संभाजी ब्रिगेडपण नव्हती, होळकर, शिंदे आणि पेशवे यांच्यात बरेच सख्य होते!

या प्रश्नांची उत्तरे मिळतील असे काहीतरी तुमच्या पुढील लिखाणात वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

२५ ऑक्टोबरनंतर, आज परत लेख वाचला तेंव्हा काही वेगळेच विचार मनात आले.

"पेशव्यांच्या पहिल्या तीन पिढ्यांनी जे केलं ते इतर पेशव्यांनी मातीत घातलं. ब्राह्मण कर्मकांड ....... इतके की देशस्थ व कोकनस्थांचेही आपापले कंपू तयार झाले मग राजकारणी लोक कश्याची स्तुती करणार?"

याच कारणांमुळे माझा या इतिहासावर फार राग होता. कारण मी वाईट गोष्टींकडे जास्त लक्ष दिले. लोकांनी इतिहासातल्या वाईट गोष्टींवरून, नुसती एकमेकांशी भांडायची नवी नवी कारणे शोधून काढली!!मी इतरत्र अत्यंत तिडिकेने लिहीले की असा इतिहास वाचूच नका,
ही माझी चूक.

आता माझे मत बदलले.

नेहेमी चांगले काय ते पहावे, वाईट विसरून जावे. विशेषतः जे वाईट घडले त्याबद्दल आता आपण काय करू शकतो? जर करू शकलो तर करावे.
फितुरी, वैयक्तिक स्वार्थ, मानापमानाच्या जरुरीपेक्षा जास्त वाढवलेल्या कल्पना, इ. विसरून देशाचे भले कसे करता येईल, धर्माचे खरे ज्ञान प्राप्त करून त्याप्रमाणे धर्माचे समाजातील, राजकारणातील योग्य तेच स्थान ठेवणे. इ.

उगाच वाईट गोष्टी उगाळण्यात काय अर्थ आहे? मन उदास होते, काही काम करावेसे वाटत नाही. त्यापेक्षा चांगल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, त्यामुळे आपल्यालाहि काही चांगले करायची स्फूर्ति येते.

केदार चांगले लिहीत आहात. धन्यवाद. असेच लेख येऊ देत.

धन्यवाद श्रीयुत केदार
पुरवलेली माहीती अप्रतिमच आहे,त्यात वादच नाही.
सध्या मी विश्वास पाटिल यांनी लिहीलेलं पानिपत वाचत आहे.अब्दाली बादशहाविरुदध आणि हिंदुस्थानाच्या/दिल्लीच्या संरक्षणात उतरलेल्या सव॑ लोकांची व्यवस्थीत माहीती दिली आहे.तरीही काही गोंष्टी गोंधळ्वुन टाकतात. तुम्ही पुरवलेल्या माहीतीने गोंधळ संपला.

धन्यवाद केदार,
मला याचा खुप उपयोग होतो आहे.
अजुन या विशयावर माहिति मिलालि तर बरे होइल.
मी m.a marathi करत आहे.

छान माहिती,
पानिपत कादंबरीतून पेशव्यांची थोडी माहिती मिळते पण त्याहून अधिक माहिती विस्ताराने मराठीत उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Pages