नितीनचंद्र

शाई

Submitted by नितीनचंद्र on 27 March, 2014 - 00:10

मुंबईच्या माथाडी कामगारांच्या मेळाव्यात उडालेली शाई वाळायला कदाचित वेळ लागेल पण शाईचे डाग रहाणार हे नक्की. शाई बरोबर बोगस मतदानाचे अनेक हुकमी डाव आज प्रचलीत आहेत्. आज हेड्मास्तर चुकुन काही बोलले असे समजण्याचे कारण नाही हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहित आहे.

ते चुकुन बोलले, चेष्टेच्या सुरात बोलले हे निवडणुक आयोगाला पटेल कारण निवडणुक आयोगात माणसेच असतात आणि ती माणसे कधी कधी चुकलेली असतात याचा पंचनामा हेडमास्तरांनी आधीच करुन ठेवलेला असतो.

विषय: 
शब्दखुणा: 

जात्यामधले दाणे रडती....

Submitted by नितीनचंद्र on 19 January, 2014 - 03:43

जात्यामधले दाणे रडती सुपातले हसती हे गीत मधुकर जोशींचे आहे. याला संगीत दशरथ पुजारी व आवाजही दशरथ पुजारींचाच लाभला आहे.

जेव्हा दोलायमान परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण जात्यात आहोत आणि भरडले जाणार आहोत किंवा सुपात आहोत याची जाणिव माणसाला विचार करायला प्रवृत करते.

मधुकर जोशी म्हणतात त्याप्रमाणे जात्यामधले दाणे रडतात आणि सुपातले हसतात ही कल्पना दाणे ह्या पदार्थाला मन, भावना, किंवा जाणिव नसते या अर्थाने समर्पक आहे. माणसाला मन, भावना आणि जाणिव असल्याने मात्र पोत्यातुन किंवा कणगीतुन सुपात म्हणजेच सुस्थितीतुन दोलायमान परिस्थीती येताच त्याची जाणिव नक्की होते.

विषय: 

सुरळीत वहातुकीसाठी मनसेचा रास्ता रोको

Submitted by नितीनचंद्र on 14 January, 2014 - 21:19

आजच्या दैनीक सकाळ ( पिंपरी चिंचवड - मावळ परिसर ) यात आलेली बातमी - सुरळीत वहातुकीसाठी मनसेचा रास्ता रोको . बातमी वाचुन आश्चर्य वाटले.

हा प्रकार म्हणजे दारु सोडण्यासाठी दारुतुनच औषध घेणे यासारखा चमत्कारीक वाटला.

लोकांच्या प्रश्नावर लोकांमध्ये जाउन जागरुकता निर्माण करणे, जनमत तयार करणे यासाठी रस्त्यावर उतरणे स्वाभाविक आहे. पण वाहतुक नियंत्रक नाहीत, सिग्नल नाहीत ते बसवुन वहातुकीचे नियंत्रण व्हावे यासाठी रास्ता रोको करणे म्हणजे काहीतरी विचार न करता केलेले आंदोलन असे जाणवले.

नक्षत्र शांती आणि अनुभव

Submitted by नितीनचंद्र on 1 January, 2014 - 23:38

ज्योतिष शिकायला लागल्यानंतर वयाच्या ३३ व्या वर्षी मला लक्षात आले की माझी स्वतःची मुळ नक्षत्राची शांत झालेलीच नाही. आधी अनुभवावे मग सांगावे यान्यायाने प्रथम मी माझी स्वतःची मुळ नक्षत्र आणि अमावस्या योगावर जन्माला आल्याची शांत केली. तहान लागली पाणी पिले आणि समाधान झाले इतका कार्यकारण भाव जरी या शांती नंतर दिसला नाही तरी अरोग्यात सुधारणा, स्वभावात सकारत्मक बदल, अकारण चिडणे क्मी झाले इतके स्पष्ट बदल स्वतःला जाणवले. पाठोपाठ माझ्या मुलीचे पुष्य नक्षत्रावर जन्म असल्यामुळे जननशांती कर्म खुप उशीरा म्हणजे तीच्या वयाच्या ९ वर्षी मी करवले.

दिल्लीत आता काय घडेल ? ( बदलुन )

Submitted by नितीनचंद्र on 8 December, 2013 - 23:44

दिल्लीचे बलाबल या प्रमाणे

एकुण जागा ७०

बहुमताला आवश्यक ३६

भाजप - ३२ ( बहुमताला चार कमी )
आआप - २९ ( बहुमताला ७ कमी )
काँग्रेस - ८ ( बहुमताला २८ कमी ) चंद्रशेखर यांच्या ४२ खासदारांना काँग्रेसने बाहेरुन पाठींबा देऊन केंद्र सरकार चार महिने चालले हा भारताचा इतिहास आहे.

अपक्ष २

पर्याय उपलब्ध्द

१) भाजप अपक्ष व अन्य पक्षातले आमदार फोडुन सरकार स्थापन करेल.

२) भाजप आआप किंवा काँग्रेसच्या पाठींब्याने सरकार स्थापन करेल ( ही शक्यता कमी वाटते )

३) आआप - काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार बनवेल ( अशक्य कोटीतील शक्यता )

४) आआप - भाजपच्या पाठींब्याने सरकार बनवेल.

विषय: 

कॅपा कोलाच्या निमित्ताने

Submitted by नितीनचंद्र on 16 November, 2013 - 00:41

कॅपा कोलाच्या रहिवाश्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली. या निमीत्ताने ब्रेकिंग न्युज आल्या. मुख्यमंत्री आणि सुप्रिम कोर्टाच्या दरवाज्यात असलेल्या प्रकरणात काही माहिती त्रोटकच होती.

या इमारतीचा एखादा मजला किंवा १०% एफ एस आय जास्तीचा होता हे समजु शकते. काही नियमांची निटशी कल्पना नसल्याने हे घडु शकते. उदा. बाल्कन्या कारपेटमध्ये समाविष्ट करायच्या किंवा नाही इ.

या सगळ्या गदारोळात बिल्डर डेव्हलपर कोण यांचे नाव जाणिवपुर्वक टाळले जात आहे. हा मामला सुप्रीम कोर्टात जाईपर्यत कुणा फ्लॅट धारकाने बिल्डरवर फसवणूकीचा दावा लावला नाही ? त्याला आत घातल नाही ?

नवीन राज्य निर्मीतीचे राजकारण

Submitted by नितीनचंद्र on 11 August, 2013 - 08:37

काँग्रेसने नाईलाजाने तेलंगणाला मान्यता दिल्यानंतर विदर्भ असो, बोडोलँड असो अश्या अनेक जुन्या मागण्या रस्त्यावर आल्या. हीच परिस्थीती नेहरुजींच्या काळात होती. इंग्रजांनी निर्माण केलेली चार राज्ये - १८ राज्यात परिवर्तीत झाली. या सगळ्यामागचा आधार होता भाषेवर आधारीत प्रांतरचना जी काँग्रेसला मान्य नव्हती.

अनेक आंदोलने, सत्याग्रह आणि एका उपोषणानंतर चेन्नीला झालेल्या मृत्युनंतर भाषावर आधारीत राज्य निर्मीतीला असलेला विरोध मागे पडला.

भाषेच्या आड अप्रभावी नेत्यांनी सत्ताअभिलाषा सुध्दा या आंदोलनात प्रभावी असावी.

विषय: 

जगह मिलनेपर साईड दि जाएगी !

Submitted by नितीनचंद्र on 30 June, 2013 - 00:19

जगह मिलनेपर साईड दि जाएगी !

विषय: 

तासाला फक्त बारा मिनीटे

Submitted by नितीनचंद्र on 14 April, 2013 - 08:42

कालचा सकाळमधला लेख वाचुन मी हा लेख लिहीत आहे.. डॉ. केशव साठ्ये या मान्यवरांनी " प्रेक्षकांना दिलासा -- ब्रेक के बाद ..." अश्या नावाचा लेख दै. सकाळ मध्ये १३ मार्च २०१३ ला प्रसिध्द केला.

मुळ लेखाचे लेखक डॉ केशव साठ्ये हे संवाद्शास्त्र आणि प्रसार माध्यम या विषयाचे प्राध्यापक आहेत.

मुळ लेखाचा गोषवारा मायबोलीकरांनी वाचावा असे आवाहन आहे पण मुळ लेख वाचल्या शिवाय आपली मते लिहु नयेत असे आग्रहाचे आवाहन आहे.

अर्थातच हा लेख दुरदर्शन आणि त्याच्या वाहिन्या असा आहे त्यामुळे मुळ लेखाच्या मुद्याला धरुन लिहावे. उगाच दुरदर्शन किती वाईट यावर लिहीण्याचे टाळावे.

एकनाथांचा विंचु,खेबुडकरांची इंगळी आणि शैलेद्रांचा बिच्छु

Submitted by नितीनचंद्र on 27 January, 2013 - 07:43

आजच गौरव महाराष्ट्राच्या कार्येक्रमात एका स्त्री कलाकाराने पिंजरा मधल इष्काची इंगळी डसली हे जगदीश खेबुडकर रचीत, राम कदम यांच्या संगीताने नटलेल आणि उषा मंगेशकरांच्या मुळच्या आवाजाताल गाण ऐकत होतो. या गाण्यानेच काय तर व्ही शांताराम यांच्या पिंजरा या चित्रपटानेच त्या काळी वेड लावले होते. या चित्रपटातली सगळी गाणी, संध्या, डॉ श्रीराम लागु आणि निळु फुले यांच्या भुमीका, जगदीश खेबुडकरांची गीते आणि राम कदम यांच संगीत अजरामर झाल.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - नितीनचंद्र