माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही.
आजकाल अर्थव्यवस्था गाळात चालल्याच्या बातम्या दिवसेंदिवस समोर येतायेत. लोक या बद्दल फार काही बोलताना दिसत नाही. टीव्ही चॅनेल आणि वृत्तपत्रांवर भारतात आज काल बऱ्यापैकी सरकारचं नियंत्रण असल्यामुळे क्वचित कुठेतरी एखादी बातमी येते. मायबोलीवर समाजाच्या विविध स्तरांवर काम करणारे लोक आहेत. तुमचे या आर्थिक मंदीविषयी काय विचार आहे आणि ह्यातून बाहेर येण्यासाठी सरकारला काय करावे लागेल? आणि महत्वाचे म्हणजे वैयक्तिक रित्या या मंदीतून वाचण्यासाठी तुम्ही काय प्लांनिंग करत आहेत?
बाकी मंदीला काँग्रेस किंवा भाजप जबाबदार आहे ह्या छाप चर्चा होऊ नये अशी माफक अपेक्षा.
शेअर मार्केटशी मैत्री.........
अर्थाचा अनर्थ
प्रत्येक जीव जंतू आणि प्राण्यांकडून काहीतरी शिकावं अशी आपली संस्कृती सांगते. ही गुंतवणूकीची कला आपण कोणत्या प्राण्या पासून घेतली काय माहीत! कदाचित ते श्रेय मुंग्याना आणि मधमाशाना जात असावे. पोर कमवायला लागलं की वडीलांचा पहीला सल्ला असतो की “चार पैसे गाठीला ठेव रे! सगळे उधळून टाकू नको.” हे गाठीला ठेवलेले पैसे परत नक्की कधी गाठ पडणार अशा माझ्या प्रश्नावर पिताश्रीनी मला बरंच अनाकलनीय लांबलचक उत्तर दिले होते. उत्तराची एकंदरीत लांबी रूंदी पाहता आणि खोली न समजता मी सगळं मान्य करून टाकलं होतं.
कार्यालयाच्या पाठीमागे
सगळे व्यवहारात व्यस्त
अन रांगेमधल्या आम्हाला
सांगा "तसलं काही नसतं"
सगळंच झालय फार महाग
काय राहिलंय स्वस्त
तरीही सगळे आनंदात
हो त्यांचंच चाललंय मस्त
अन रांगेमधल्या आम्हाला
सांगा "तसलं काही नसतं"
शासक आमचे आरामात
त्यांनी पैसा केला फस्त
पोलीस धाडलेत वेशीबाहेर
गावात चोरांचीच गस्त
अन गावामधल्या आम्हाला
सांगा "तसलं काही नसतं"
शेअर मार्केट च्या तुंबाडच्या विहिरीत स्टोक , इंडेक्स असे अनेक हस्तर कमरेला पैशाच्या थैल्या लावून पडलेले असतात,
तर आपण तयारीत राहायचे , ग्राफवर दोन इंडिकेटर लावून घ्यायचे,
1 फ्रेकटर चावस बॅंडस
यात एक वरची लाईन असते व एक खालची लाईन असते , हस्तर यांच्या दरम्यान फिरत असतो, आपल्या सोयीने दोन रंग घ्यावेत
केस नं. तीनः दोन मित्र
अजय अतुल दोन सख्खे मित्र. लहानपणापासून एकत्र वाढलेले, एकाच शाळेत शिकले. एकाच कॉलेजातून पदवीधर झाले. पुढचे उच्चशिक्षणही एकत्रच केले आणि एकाच बँकेत दोघेही मोठ्या हुद्द्यावर नोकरीस लागले. मनासारखा, प्रचंड पगार दोघांनाही. लाइफ तो जैसे सेट हो गयी. ह्याचा दोघांनाही मनस्वी आनंद झालेला. आता जरा हायफाय लाइफ जगू शकतो असा कॉन्फिडन्स आला. ही लाइफ एन्जॉय करायची दोघांनी ठरवले. दर महिन्याला एकदा कोण्यातरी फाइवस्टार हॉटेलमध्ये जाऊन दोघांनी फस्सक्लास डिनर करावा असे ठरले.