मंगल पांडे

१० मे : एक महत्वपूर्ण दिनांक

Submitted by दामोदरसुत on 10 May, 2012 - 12:17

१० मे : एक महत्वपूर्ण दिनांक

१० मे १८५७ : पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या उद्रेकाचा पहिला दिवस.खरे तर एकाच वेळी हा उद्रेक घडविण्यासाठी ३१ मे हा दिनांक ठरला होता. पण नवी काडतुसे वापरण्यास नकार देणार्‍या मिरतमधील ८५ शिपायांना अत्यंत हीन वागणूक देऊन १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावून अंमलात आणल्याने तेथील तुकड्यांचा संयम सुटला. १० मे च्या सकाळीच
मिरत येथील लष्करी छावणीतून ईस्ट इंडिया कंपनीच्या गोर्‍या ब्रिटिश सैनिकांशी संघर्षाला प्रारंभ झाला. प्रथम त्यांनी आपल्या अटकेत पडलेल्या सहकार्‍यांना सोडवले आणि त्यानंतर हा वणवा संपूर्ण उत्तर भारतात पसरला.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - मंगल पांडे