धर्म, समाज, जातपात ह्या लेखाचा हा पुढील भाग विचार पूर्वक नियोजन करून सनातन धर्माने घडवलेल्या समाजात घोळ घातला गेला त्याचेच दुष्परिणाम जन संख्या वाढी बरोबरीने वाढताना अनुभवतो आहोत. ते सांगण्याचा हा प्रयत्न आहे. हे माझे मत मला मिळालेल्या अनुभांनी तयार झालेले आहे.
"त्या मुलांनी हे का केलं ते मला कदाचित कधीच कळणार नाही. अश्लिल, हादरवून सोडणारं आणि चांगल्या गोष्टीवरचा विश्वास समुळ नष्ट करणारं. माझ्या वाट्याला आलं ते, फसवं फेसबुक खातं बंद करता येत नाही यातून आलेली निराशा, दु:ख, राग, वैताग आणि क्षणा क्षणाला नष्ट होत जाणारा आत्मविश्वास." ही कहाणी, शब्द सुझनचे. पण हे फेसबुक किंवा कोणत्याही आंतरजालावर (सोशल नेटवर्किंग) असणार्या कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. तेव्हा सावधान. सुझनची गोष्ट ही माझी किंवा अगदी तुमचीही होवू शकते.