जयभीम ! चित्रपट आणि त्यानिमित्ताने
Submitted by श्रीधर अप्पा on 14 November, 2021 - 07:25
चित्रपटांची लाज काढणारा सूर्यवंशी बॉलीवूडमधे रिलीज झाला. तमिळ मधे सुद्धा असे सिनेमे येतात. पण त्याच वेळी ती चित्रपटसृष्टी बॉलीवूडची लाज काढणारे अनेक सिनेमे बनवत असते.
बॉलीवूडने अनेक विषयांवर कातडे ओढून घेतलेले आहे. वास्तववादी म्हणून फार तर वेन्सडे सारखा चित्रपट बनतो. अक्षयकुमारचे चित्रपट सातत्याने गुड मुसलमान आणि बॅड मुसलमान करत राहतात. हेच ते काय वास्तववादी. पण आजूबाजूला जे जातीच्या अत्याचारासारखे रखरखीत वास्तव आहे त्याकडे बॉलीवूडचे चित्रपट दुर्लक्ष करतात. असे मुद्दे अनुल्लेखाने मारत राहतात.