अभंग. संत श्री अमृतराय

'अजि मी ब्रह्म पाहिले' एक गारुड...

Submitted by पुरंदरे शशांक on 4 July, 2016 - 03:03

'अजि मी ब्रह्म पाहिले' एक गारुड...

हा अभंग ज्या कोणी संत श्री अमृतराय यांनी लिहिलाय त्यांना ते ब्रह्म दृग्गोचर झाले असेलही - कल्पना नाही.. पण आपल्याला स्वरब्रह्म नक्कीच भेटवेल असे हे अद्वितीय गाणे...

लहानपणी कानावर पडलेले या गाण्याचे सूर .... जसजसा मोठ होत गेलो तसतशी या सुरांची मोहिनी अजूनच गडद होत गेली.

खळे काकांनी जयजयवंती रागात बांधलेला हा श्री अमृतराय या संतांचा हा एक अगदी गोऽड अभंग. आशाबाईंनी अशा ताकदीने गायलाय की कितीही वेळा ऐकला तरी त्यातली गोडी उणावतच नाही, उलट वाढतच जाते...

Subscribe to RSS - अभंग. संत श्री अमृतराय