सुख-दु:ख संत महात्म्यांचे .......

सुख-दु:ख संत महात्म्यांचे .......

Submitted by पुरंदरे शशांक on 2 December, 2013 - 01:29

सुख-दु:ख संत महात्म्यांचे .......

श्रीनिवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव व मुक्ताई या चार भावंडांनी त्यांच्या माता-पितरांच्या पश्चात कसे दिवस काढले असतील याची आपण याकाळात कल्पनाही करु शकत नाही !

त्यांच्या पिताश्रींनी (विठ्ठलपंत) संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात टाकलेले पाऊल - हा त्याकाळातील त्या समाजाने ठरवलेला एक अक्षम्य अपराध - ज्याला प्रथम बळी पडले ते विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई. जेव्हा समाजाने त्यांना वाळित टाकले (ग्रामण्य) ते त्या दोघांनी सहन करुन आळंदी गावाबाहेर रहाणे पसंत केले. त्यावेळेसचा समाजरोष पूर्णपणे स्वतःवर झेलून त्यांनी या चार मुलांचे जे संगोपन केले ते मोठे आश्चर्यच.

Subscribe to RSS - सुख-दु:ख संत महात्म्यांचे .......