रिमोट
रिमोट
आज कित्येक वर्षानंतर जेंव्हा मी
माझ्यातील मलाच शोधण्याचा प्रयत्न करतो,
तेंव्हा माझ्या लक्षात येत माझ्यातील मी हारवलाय
माझ्यातील मी खरच हारवलाय की हारलाय
स्वतःच स्वतः भोवती निर्माण केलेल्या शत्रूंशी लढता लढता......
कसा होतो मी नाजुक पण धीट,
हसरा ,अल्लड , विनोदी आणि आज कसा आहे ?
भित्रा, चिंताग्रस्त, वैतागलेला, रागावलेला
आणि त्रासलेला स्वतःलाच नव्हे तर जगालाही ....
आज गोठ्या खेळायच म्हटल तर माझा नेम लागत नाही,
बॅट हातात धरताही येत नाही.
पतंग कशी उडवायची तोही आता आठवत नाही.