बिहार विधानसभा निवडणूक २०२५

Submitted by जावेद_खान on 9 November, 2025 - 00:05

बिहार विधानसभेच्या 243 सदस्यांची निवड करण्यासाठी सध्या निवडणूक सुरू असून पहिला टप्प्याचे मतदान सहा नोव्हेंबरला झाले तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 11 नोव्हेंबरला आहे. निकाल 14 तारखेला जाहीर होतील.
स्पेशल इंटेन्सीव रिविजन SIR अशा गोंडस नावाखाली मतदार याद्या बदलण्याचं सध्या जे काम चालू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे.

अंदाज

भाजप आघाडी: १८८
राजद+काँग्रेस आघाडी: ५३
इतर: 2

राजद आघाडीच्या जागा अजून कमी होतील बहुतेक.

Group content visibility: 
Use group defaults

भाजपने काय केले? बिहारमधे लाल्या यादव नामक दैत्य (आणि त्याची यादवी पिलावळ) राज्य करत होता तेव्हा जंगल राज होते. पैसेवाल्या लोकांचे अपहरण करून पैसे उकळणे हा एक राजमार्ग बनला होता. अनेक सुरस आणि चमत्कारिक सत्यकथा ऐकल्या आहेत.
निदान हे जंगल राज तरी आटोक्यात आले आहे. बिहारी लोक अपहरण होणार म्हणून कायम धास्तावलेले नाहीत. लाल्या राक्षसाच्या तुलनेत बिहार बराच सुधारलेला आहे. अजून भरपूर सुधारणा होणे शक्य आहे. पण निदान हेही नसे थोडके.

साम दाम भेद दंड वापरून निवडणुका जिंकणे म्हणजे जणू एखादे भयंकर कृत्य असा आव आणायची गरज नाही.
काँग्रेसही अमुक फुकट तमुक फुकट अशी आश्वासनांची खैरात करते.
इंदिरा राजीव सोनियाबाई यांच्या राजवटीत हे प्रकार होत होते. आता तेच मार्ग जास्त परिणामकारकरित्या वापरताना पाहून भाजपद्वेष्ट्या लोकांचे पोट दुखते आहे.
युवराज राहुल निव्वळ इनोदी भाषणे आणि अन्य माकडचेष्टा करून निवडणुका जिंकू पाहतो. डोंबार्याचा खेळ पाहून टाळ्या वाजवणारे त्या डोंबार्‍याला राजा बनवत नाहीत हे या माकडाच्या डोक्यात शिरत नाही!
पक्ष बांधणी, कार्यकर्त्यांची संघटना मजबूत करणे, बूथ पातळीपर्यंत संघटनेचे नियोजन करून ते अमलात आणणे वगैरे गोष्टी युवराजांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्याचा परिणाम दिसतोच आहे.

घंटा! रेवड्यांना नावं ठेवणारा अजैविकाला रेवड्यांचे समर्थन का करावे लागले ?
संघटना मजबूत, बूथ लेवल नियोजन इतके खात्रीने यश मिळवून देत असेल तर निवडणूक आयोगाला हाताशी धरायची पाळी का आली. निवडणूक आयोग आता हुकमी एक्का झालाय बीजेपीसाठी.

बिहार ही ज्याची कर्मभूमी आहे त्या कौटिल्याने सामदामभेददंड हे सूत्र सांगितले आहे. हे इष्ट साध्य करायला वापरले जाऊ शकते.
सामदाम भेद दंड ह्यात लाजिरवाणे काय आहे कळत नाही.
खालील उदाहरणे पहा.
सामः आम्हाला मत द्या. आम्ही एक चांगला पक्ष आहोत असे सांगणे. (इथे कुणाचीही तक्रार असण्याचे कारण नाही)

दामः आम्हाला मत द्या. आम्ही गरीबांना फुकट तांदूळ देतो. आम्ही मशिदींना पवित्र रमझान महिन्यात फुकट तांदूळ देतो. (हे तमिळनाडूत होत आले आहे). कोणी कितीही नाक मुरडले असले तरी सत्ता हातात असणारे हा मार्ग वापरून मते मिळवतात.

भेदः शरद पवार आणि अजित पवार दोघातील मतभेदांचा फायदा घेऊन पार्टी फोडून एक तुकडा आपल्याकडे ओढणे. (काँग्रेस हे कितीतरी वेळा करत आली आहे. इंदिरा गांधी, शरद पवार आणि अशा अनेक लोकांनी हे केले आहे. पवार पाठीत खंजीर खुपसण्यात चांगलेत तरबेज आहेत.) कायदा मोडला नसेल तर हा मार्गही चुकीचा नाही.

दंडः शठासी शठ धटाशी उद्धट असा न्याय लावणे. एका पार्टीचे गुंड निवडणुकीत बूथ कॅपचर वगैरे (बिहारच्या मातीत निर्माण झालेले संशोधन!) कार्यक्रम करणार असतील तर आपले सवाई गुंड आणून असले कार्यक्रम हाणून पाडणे. दमदाटी करून अमक्याला मत द्या असे विरोधी पक्ष धमकावत असेल तर आपले गुंड पाठवून त्यांचा बंदोबस्त करणे वगैरे. इथे कायद्याच्या सीमा ओलांडल्या जाऊ शकतात. आणि जर हा मार्ग मोठ्या प्रमाणात वापरला जात असेल तर कोर्टात दाद मागावी. पण भाजपने बिहार निवडणूकीत हा मार्ग वापरला का याविषयी मला माहिती नाही. भाजप द्वेष्ट्यांना माहित असेल तर सांगा.

निवडणुका जिंकायच्या हे ध्येय बाळगून भाजप नेते आणि कार्यकर्ते मैदानात उतरतात.
निवडणूक हरल्यावर निवडणूक आयोग, खोटे मतदान, इव्हीएम वगैरे नेहमीची रडगाणी विरोधक गाणार हे ठरलेले आहे. पण त्याल अर्थ नाही.
वरील मार्ग वापरण्यात ते कमी पडले हे खरे उत्तर अहे.

झालेल्या बिहार निवडणुकीत, मतदार यादीतून नाव वागळल्यामुळे मतदान नाही करता आलेल्याच्या किती तक्रारी आल्या?
बोगस मतदान केल्याच्या किती तक्रारी आल्या?

रावल्या आता महाभारत युद्धात फसलाय आता त्याला गरज आहे कृष्णाची. आता मायबोलीवरील सदस्यांनी मीटिंग भरवून एकाला कृष्ण निवडावा. तो अंगाला निळा रंग फासून बासरी हातात घेऊन रावळ्याकडे जाईल. रावळ्या सकाळी ब्रश करत असताना त्याच्यासमोर पॉ पॉ बासरी वाजवत प्रकट व्हायचं. रावळ्या ते भयानक दृश्य बघून पळत सुटेल. एक हातात पाण्याचा जग आणि दुसऱ्या हातात ब्रश घेऊन रावल्या पुढे पळतोय त्याच्या मागे मायबोलीवरचे सर पॉ पॉ बासरी वाजवत उड्या मारत पळत आहेत. हे भयानक दृश्य बांधून रावल्या अजूनच घाबरून मम्मी मम्मी करत पळतोय. असं कायतरी व्हायला पाहिजे तेव्हा कुठे अच्छे दिन येतील नाहीतर हे आहे असंच सुरू राहील.

मग मोदी आणि भाजपने आम्ही कमरेचे गुंडाळून डोक्याला बांधले म्हणून जाहीर करावे, उगाच बुधवारात जाताना सोवळे नेसून जाण्याचा आव आणू नये.

मग तो कोणतं गाणं म्हणेल?>> नको गाणं आता. रावळ्याचं वाईट झालं. रावळ्याच्या दुःखात आपण सगळे सहभागी व्हायला पाहिजे. रावळ्याची मला काळजी वाटायला लागले. मलाच आता कायतरी करायला पाहिजे. त्याच्या समर्थकांनी विनोद गम्मत अशा नावाचे धागे काढलेत. सिरियनेस पाहिजे ना कायतरी. हा पण धागा नक्की का काढला माहीत नाही. मला कधीतरी रडू येतं रावळ्याची ही अवस्था बघून आणि यांना विनोद आणि गंम्मत नावाचे धागे कसे सुचू शकतात? रावल्या Sad

>>
मग मोदी आणि भाजपने आम्ही कमरेचे गुंडाळून डोक्याला बांधले म्हणून जाहीर करावे, उगाच बुधवारात जाताना सोवळे नेसून जाण्याचा आव आणू नये.
<<
भाजप आणि मित्र पक्षांनी बिहार दणदणीत मताधिक्यांनी जिंकला आहे हे सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आहे.
आता विरोधकांनी भाजपने अमुक करावे आणि तमुक करू नये अशा खास फर्माईशी पेश कराव्यात. (दुसरे करणर तरी काय))
भाजप त्यावर गंभीरपणे विचार करेल. नक्की नक्की विचार करेल!
Happy Happy Happy

तरुणांना नोकऱ्या कशा देणार हे तेजस्वी यादवला सांगता आलं नाही असं वाचलं.
मुख्यमंत्री नीतीश कुमार ने वैशाली में युवाओं के लिए बड़ी घोषणा करते हुए कहा कि सरकार 10 लाख युवाओं को नौकरी दे चुकी है। अगले पांच सालों में एक करोड़ युवाओं को रोजगार के अवसर मिलेंगे
हे प्रचारादरम्यानचं आहे.
मोदींनीसुद्धा २०१४ मध्ये असंच काहीतरी सांगितलं होतं ना?
अशी आश्वासनं द्यायचा मक्ता फक्त भाजप आणि मित्र पक्षांना असावा. विरोधी पक्षांनी केलं तर भिंगाखाली ठेवून तपासू.
नितीशकुमारनी २० वर्षांत १० लाख नोकऱ्या दिल्या म्हणे. आता पाच वर्षांत त्या नोकऱ्यांनाच १ करोड नोकऱ्यारूपी होणार असतील.

https://www.facebook.com/share/v/1DiymfJFHS/
बिहारींना मतदानासाठी आणायला स्पेशल ट्रेन्स होत्या. मला वाटलं होतं, आता हे तिथेच राहतील. कसलं काय? कशासाठी , पोटासाठी परत चालले.
आणि आता स्पेशल गाडीबिडी काही नाही.

यांची आठवण भाजपला आता पाच वर्षांनी येईल.

राऊत झाले आहेत आजारी. त्यांना शांतपणे आराम करू द्या. त्यांनी वेळोवेळी सल्ले आणि सावधानतेचे इशारे दिले आहेतच त्यांची उजळणी करूया.

राउत आजारी आहेत, याचा या धाग्याशी काय संबंध?
की कागदेबाई शाहरुखच्या मरणाची वाट पाहताहेत, तसं तुम्ही राउतांबाबत करताय, हे दाखवायचं आहे?

दमदाटी करून अमक्याला मत द्या असे विरोधी पक्ष धमकावत असेल तर आपले गुंड पाठवून त्यांचा बंदोबस्त करणे वगैरे >> मग सत्ताधारी असून उपयोग काय जर गुंडगिरीच करायची असेल तर? आणि ते ५६", खमक्या गृहमंत्री वगैरे फुकट वल्गनाच की..

मला कायतरी करायला पाहिजे. माझा छकुला पिक्चर काढला तसा आता मला माझा रावल्या पिक्चर काढायला लागेल. डोंबिवली बँकेत दरोडा पडलेला दाखवणार आहे. तिथे रावल्या किडनॅप झालेला दाखवायचा. रावल्याच्या बाळलीला आणि कराटे बघून गिधाड गँगच रावळ्याला घाबरून पळते. डोंबिवली कल्याण भिवंडी मानकोली ब्रिजवरून मग ते एस्सल वर्ल्ड गाठतात आणि तिथे रावल्या गिधाड गँगला पकडतो.

>>तात्याने उद्या लाथ मारली तर बिहार मध्ये जागा पक्की करतायेत बहुधा
अशीच सुखस्वप्ने पाहत रहा. आणि तसे काही होत नाही ह्याची खात्री बाळगा!
बाकी बिहारात छान कमळ फुलले असताना काही भ्रमर वैयक्तिक शेरेबाजीच्या चिखलात लोळणे पसंत करतात हे खूपच विशेष आहे!
कवितेत आणि वास्तवात फरक असतो असे दिसते!

उशीरा वाचतेय.

बिहारमधील यशाबद्दल एन्डिएचे अभिनंदन. तसेच काँग्रेसच्या राहू गांधीना धन्यवाद. त्यानं दुसरी बाजू नेटानं लढवली म्हणूनच एन्डिएला इतकं घवघवीत यश मिळालं. >>> मामी मला आवडली तुझी कमेंट.

एन डी ए चं अभिनंदन. नितिशकुमार मुख्यमंत्री झाले तर कितव्यांदा होतील, रेकॉर्ड होईल. मानायला लागेल त्यांना, कोणीही सोबत असो मुख्यमंत्री तेच. भाजपला थोड्या जास्त आहेत, भाजपचा मुख्यमंत्री होईल का.

बाकी सर्व कमेंटस परत एकदा वाचेन.

Mr Bharat तुमची बुद्धी गुडघ्यात आहे का? मी शाहरूख च्या मरणाची वाट बघत नाहीये कारण तो मनुष्य मला तितका महत्त्वाचा वाटत नाही. स्टारडम काय असते ह्याची तुलना करण्यासाठी मी ते ऊदाहरण घेतले होते.
भाजप जिंकला बिहार मधे तर तुमचे frustration आता अगदीच ऊतु जाऊ लागलेले आहे.so get well soon. बाकी चालू द्या

बिहार निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस झाले. विरोधकांना किंवा हरलेल्या उमेदरांना मतदान केंद्राचे व्हिडीओ रेकॉर्डिंग पाहिजे असेल तर अजून ४० दिवस बाकी आहेत.

४५ दिवसाच्या आत व्हिडिओ मागितले तर " माँ, बेटी और बहुओंकी निजताका उल्लंघन नहीं होता क्या?

प्रवक्ते पद नको, उगाच नेमणाऱ्याचीच बाजू ओढावी लागते.
अजून ३९ दिवसानंतर ब्राझीलयन मॉडेल एखाद्या गावात मतदान करून गेल्याचे आरोप सुरु होतील. रेकॉर्डिंग असेल तर न्यायालयात तरी दाखवता येईल.

२७२ हूर निवडणूक आयोगाच्या बचावाला उतरले. ह्यात किती माजी निवडणूक अधिकारी आहेत बघावे लागेल.

<ब्राझीलयन मॉडेल एखाद्या गावात मतदान करून गेल्याचे आरोप सुरु होतील > भाजपच्या आय्टी सेलने पाठवलेला कचरा डोक्यात भरल्याचा पुरावा. राहुलने म्हटलं होत्म मतदान यादीत २२ मतदारांच्या समोर ब्राझिलियन मॉडेलचा फोटो होता तिने येऊन मतदान केलं असं म्हटलं नाही.. तो फोटो तिथे कसा आला ते सांगितलं का आयटी सेलने?

भाजपच्या किमान चार कार्यकर्त्या / पदाधिकार्‍यांनी काही महिन्यां पूर्वी अन्य राज्यांत मतदान केले होते, आता बिहारमध्ये केले हे त्यांच्याच सोशल मीडिया पोस्टवरून स्पष्ट झाले. त्यातल्या एकाची दोन मतदार ओळखपत्रे आहेत. ही ठळक व्यक्तिमत्त्वे होती, म्हणून कळलं. न कळलेले किती असतील? आयोगाने दुबार मतदार शोधणारे सॉफ्टवेअर का वापरले नाही? एखाद्या मतदाराचे नाव दोन ठिकाणी नोंदले म्हणजे दोन ठिकाणी मतदान करेल असं नाही असं ग्यानेश म्हणाला. मुळात तू त्याचे नाव दोन ठिकाणी कसे नोंदवलेस ते सांगायची तुझी जबाबदारी आहे.

Pages