पाच राज्यांच्या निवडणुकीत अंदाज मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगडमध्ये

Submitted by हस्तर on 4 November, 2023 - 18:45

तुम्हाला काय वाटते?
तसे पाह्ता भाजपा मुद्दाम सगळे राज्य जिन्कते एक सोडुन
ह्या वेळी तेलन्गाणा सोड्णार कि दुसरे राज्य?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बघैल व महादेव अ‍ॅप हे आताच न्युज सायकल मध्ये का मुद्दाम आणले आहे? पुरावा काही नाही. पण अगदीच डेस्परेट वाटते आहे.

एम पी मध्ये मामा परत येणार का?

तेलंगणा मध्ये केसीआर चा होल्ड खूपच स्ट्राँग असतो.

राजस्थान मध्ये वसुंधरा देवी परत येतील का?
सचीन पायलट ला संधी मिळायला हवी. वयाने लहान आहे. क्या होता क्याकी.

महादेव ॲप बद्दल मी 2-3 महिन्यापू्वीच ऐकलं होत. बॉलिवूडची बऱ्याच लोकांची नावं पण आहेत त्यात. पण बंदी मात्र कालच घातली गेली. शोधल तर पुरावे नक्कीच सापडतील पण निवडणुका झाल्या की सगळ शांत होईल. कारण भजपाची लोक सुद्धा ह्यात असतील.

<< मोदी मिझोराममध्ये प्रचाराला जाणार की नाही?
मणिपूर तिथून जवळच आहे ना?
नवीन Submitted by भरत. on 5 November, 2023 - 23:02>>

------- गेल्या सहा महिन्यांत अमेरिका, फ्रान्स, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, ग्रिस, द. अफ्रिका दौरे करणार्‍या व्यक्तीसाठी मणिपूर फार लांब नसावे.

गुजरात मधे नैसर्गिक ( किंवा मोरबी सारखी मानव निर्मीत ) आपत्ती आल्यावर दिल्ली वरुन त्वरित भेट देणारे, परिस्थितीचा आढावा घेणारे, मदतीचे पॅकेज जाहिर करणारे पंतप्रधान मणिपूर बाबत थोडे संथ आहेत. पण ते १८ - १८ तास काम करतात, अमित शहांना पहाटे ४ वाजता फोन करुन आदेश वजा मार्गदर्शन करतात.

प्राधान्य कोणत्या गोष्टीला द्यायला हवे?

इंडिया आघाडीची चाके निवडणुकीच्या मैदानात रुतू लागली आहेत !!!
जम्मू-कश्मीरचे ओमर अब्दुल्ला व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी ‘इंडिया’वर भाष्य केले. श्रीमान अब्दुल्ला यांनी सांगितले की, इंडिया आघाडीची स्थिती सध्या मजबूत नाही. थोडी अंतर्गत भांडणे आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तरी अशा प्रकारे मतभेद असू नयेत. तर उत्तर प्रदेश विधानसभेतील सर्व जागा लढवू असे समाजवादी पार्टी व काँग्रेसने जाहीर केले. हे इंडिया आघाडीसाठी चांगले नसल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसने ‘सपा’ला जमेस धरले नाही, तर ‘आप’ही स्वतंत्रपणे मैदानात आहे. तर अशा प्रकारे इंडिया आघाडीचे तीन तेरा वाजलेले आहेतं ......

विरोधी पक्षांकडून कोणी ही अपेक्षा ठेवू नाही.
असे नालायक पक्षांची ही आघाडी आहे की ह्यांची एकी कधीच होणार नाही.

Bjp सत्तेत आली आणि ह्या विचित्र नेते असलेल्या पक्षांची युती करण्याची कधी वेळ आली तर ह्यांना दुय्यम वागणूक च ध्या.
त्यांची दुय्यम स्थानावर रहण्यांचीच कुवत आहे

आप च काँग्रेस शी पटत नाही, नितीश कुमार ल स्वतःचे काही मत नाही जिकडे सत्ता तिकडे नितीश,समाजवादी ,काँग्रेस ह्यांचे पटत नाही.

आपल्या राज्यात तर सर्व च आनंदी आनंद आहे.. सेना दोन तुकडे,राष्ट्रवादी दोन तुकडे, काँग्रेस कडे आता सामर्थ्य नाही.
दहावीस आमदार वर पक्ष आले तरी महारष्ट्र मधील राष्ट्रवादी,सेना ह्यांना त्याची जाणीव नाही.

कोणी ही उठतो आणि पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातो.

दक्षिण भारतात फक्त स्थानिक पक्ष आहेत bjp, काँग्रेस ह्या राष्ट्रीय पक्षांना प्रवेश नाही.

जो कोणी सत्तेत असेल केंद्रात त्याला ब्लॅक मैल करून ते हवं ते मिळवतात.
महाराष्ट्र मधील बहुसंख्य जनतेच मत बनत होते की आघाडी ला मत द्यायचे आणि सत्ता पण द्यायची.
उद्गव,राष्ट्रवादी,काँगेस नी आव्हान उभ केले होते लोकांना पर्याय मिळाला होता.
पण .
सेना फुटली,राष्ट्रवादी पण फुटली.
Bjp नी निवडणुकी वेळी कोणाशी च आघाडी करू नये.
Bjp ची सत्ता महाराष्ट्रात नक्की येईल

बरं, इंडिया आघाडीचे राहू द्या. Telngana भाजप नेते काँग्रेस मध्ये जाऊ लागलेत त्यांना थांबवायला कधी जाणार? अचानक मी ओबीसी आहे म्हणून गळे काढण्याची वेळ का आली? निवडणुकीच्या चार दिवस आधी ईडी का लागतेय? मामाजी तिसऱ्या लिसटीत कसा गेला?

हे किरकोळ प्रतिवाद आहेत .बिहार मध्ये आलू आणि दिल्ली मध्ये कजरु सारख्यांना सत्तेवर आणणाऱ्या जनतेकडून काय अपेक्षा ठेवणार .
भाजप ला पर्याय फारतर काँग्रेस पाहिजे होती , पण हे चवळी चटक लयकीचे पक्ष आणि नेते जनतेला फुकट सुविधा देवून आयते बहद्दर बनवतील !
त्यामुळे देशातून काँग्रेस नामशेष व्हायला नको , फारतर गलितगात्र होऊ द्या....

फुकट सुविधा Lol परवाच एका रेवडी बहाद्दरने फुकट अन्न धान्य योजना पाच वर्षांसाठी वाढवली. 81 कोटी लोकं अन्नाला मोताद आहेत असा।त्याचा अर्थ. मग 9 वर्षात यंव केलं न त्यव केलं, जगातली पाचवी अर्थव्यवस्था म्हणून आपले गुणगान कशाला गातो?

Ed लागली म्हणून पक्ष सोडला हा बचाव होवू शकत नाही..नेते आत असले तरी त्यांना काही त्रास असेल असे वाटत नाही.
घरच्या जेवणापासून सर्व सुविधा मिळत असणार.

न्यायालय आहेत ना.

मोदीने तेलंगणात आम्ही ओबीसी मुख्यमंत्री देऊ असं सांगितलं. तिथे भाजपचे किती आमदार आहेत?
राजस्थान, मध्ये प्रदेश, छत्तीसगढमध्ये आम्ही ओबीसी मुख्यमंत्री देऊ असं तो का सांगत नाही?

१००

राजस्थानमध्ये काँग्रेसचा आमदार गिरिराज मलिंगा याच्यावर विद्युत विभागाच्या दोन अभियंत्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. यातील एक अभियंता दलित आहे. मारहाणीचा प्रकार झाला तेव्हा भाजप नेते त्या अभियंत्याला भेटायला गेले होते. आता काँग्रेसने मलिंगाला तिकिट नाकारताच भाजपने त्याचे स्वागत करत त्याला तिकीट दिले. आहे की नाही गंमत?

काँग्रेसची जातीय जनगणना, जितनी ज्यादा आबादी उतना ज्यादा हक, आरक्षणावरील सर्व मर्यादा उठवणे ही strategy उत्तम काम करू लागली आहे. ज्या कोणा कंपनीने ही strategy बनवली त्यांना सलाम.
बिहार मध्ये वैश्य समाज आंदोलन करू लागला आहे कारण जातीय जनगणना मध्ये आमची संख्या मुद्दाम कमी दाखवली असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही भाजपला मत देतो म्हणून युपीए सरकारने आमची संख्या कमी दाखवली. पण आमची संख्या वाढवून दाखवून आम्हाला सवलती दिल्या तर आम्ही काँग्रेसला मतदान नक्की करू- असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांची संख्या वाढवायची तर इतर कोणातरी गटाची कमी करावी लागेल. बघू या कसं काय होतं ते. जितकी जास्त मुलं आपला समाज पैदा करेल तितकी जास्त आरक्षणे आपल्याला भेटणार हे लोकांच्या डोक्यात काँग्रेसने फिट केले आहे. आता बायकांना जात कर्तव्य म्हणून चार पाच मुलं पैदा करायलाच हवीत. Womb is weapon. संतती नियमन, लोकसंख्या नियंत्रण ही धोरणे कालबाह्य व मुर्खपणाची आहेत.
३ डिसेंम्बरला मोदींनी पराभव मान्य करून राजीनामा द्यावा.केंद्र सरकार बरखास्त करावं. काळजीवाहू सरकार काँग्रेसचं असावं. लगेच निवडणुका घ्याव्यात.भाजपने यापुढे कोणतीही निवडणूक लढवू नये.
सनातन धर्म म्हणजे डेंग्यू, मलेरिया- त्याचे उच्चाटन केले पाहिजे- हे म्हणणाऱ्या काँग्रेस प्रणित युपीए आघाडीकडे यापुढे सत्ता किमान ५-१० वर्षे राहील. त्यानंतर मुस्लिम आघाडी टेकओव्हर करू शकेल. हिंदू धर्म आणि हिंदुत्ववादी राजकीय विचारधारा दोन्हीची वेळ संपलेली आहे. फ्री मार्केट, खुले आर्थिक धोरण यांचीही वेळ संपलेली आहे. आता पुन्हा खाजगी क्षेत्रात आरक्षण, खाजगी कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण याकडे वाटचाल असावी. २०१३ च्या दिवाळीमध्ये बीएसई सेन्सेक्स २१००० च्या आसपास होता. आज ६५,००० च्या आसपास आहे. हे मोदींचं पाप आहे. पुन्हा एकदा डाव्या सोशालिस्ट इकॉनॉंमी कडे वाटचाल करून शेअर मार्केट व खाजगी क्षेत्र संपवण्यासाठी मोदींनी मार्गातून दूर व्हावं. Digitization, fourth largest economy, G20 hosting, indigenous vaccines, direct benefits transfer, टॉयलेट्सचं बांधकाम, मुंबईत १० वर्षात एकही टेरेरिस्ट हल्ला नाही, मेट्रो रेल नेटवर्क, दोन मोठ्या जागतिक युद्धांची झळ देशाला बसू न देणे, गरिबांना अन्नधान्य पुरवठा, - हे अन्याय मोदींनी या देशावर केलेत. राममंदिर उभारणी हे तर सगळयात मोठं पाप. Time to vote congress and reverse all this!

Totally

टॉयलेट्सचं बांधकाम, मुंबईत १० वर्षात एकही टेरेरिस्ट हल्ला नाही, मेट्रो रेल नेटवर्क, दोन मोठ्या जागतिक युद्धांची झळ देशाला बसू न देणे, गरिबांना अन्नधान्य पुरवठा, - हे अन्याय मोदींनी या देशावर केलेत. राममंदिर उभारणी हे तर सगळयात मोठं पाप. Time to vote congress and reverse all this!
>>>>>>>>>>>>
छ्या !
त्यांनी १५ लाख कुठंय दिलं ?
त्यामुळे बाकीच्या केलेल्या कामाशी आम्हाला काहीही घेणेदेणे नाही .

नई दिल्ली: Assembly Election 2023: 5 राज्यों में विधानसभा चुनाव हो रहे हैं. कुछ में वोटिंग हो गई है, जबकि राजस्थान में आगामी 25 नवंबर को मतदान होना है. ऐसे में हर कोई यह जानना चाहता है कि कौनसा दल मजबूत है और किस पार्टी को कितनी सीटें आ सकती हैं. देशभर का सट्टा बाजार अपने-अपने समीकरण बता रहा है. सर्वे एजेंसियां भी अपना आकलन लगा रही है. इसी बीच देश के सबसे बड़े फलोदी सट्टा मार्केट के भाव की भी चर्चा हो रही है.

क्या है फलोदी सट्टा बाजार?
फलोदी सट्टा मार्केट राजस्थान के फलोदी जिले से ऑपरेट होता है. पहले यह जोधपुर का ही उपखंड था, हाल ही में इसे नया जिला बनाया गया है. यहां पर हर सीट के उम्मीदवार से लेकर पार्टियों की हार-जीत पर भी पैसा लगता है. फलोदी में सट्टे का काम बीते 500 साल से चल रहा है. फलोदी सट्टा बाजार का आकलन हिमाचल, कर्नाटक और गुजरात विधानसभा में करीब-करीब ठीक था. हालांकि, बंगाल में फलौदी सट्टा बाजार भाजपा को जीता रहा था लेकिन, भाजपा टीएमसी से बुरी तरह हारी.

इस बार किसे जीता रहा फलोदी सट्टा बाजार?

राजस्थान
कांग्रेस- 62 से 65
भाजपा-115 से 120
निर्दलीय-10 से 15
(कुल सीट 200)

मध्‍यप्रदेश
कांग्रेस- 114 से 116
भाजपा-110 से 112
(कुल सीट 230)

छत्‍तीसगढ़
कांग्रेस- 47 से 52 सीट
भाजपा- 39 से 45
(कुल सीट 90)

सट्टा बाजार काहीही म्हणू दे, सगळ्या राज्यात राहूल गांधीच बाजी मारणार. जितनी ज्यादा आबादी उतना ज्यादा आरक्षण हा एकच मुद्दा निर्णायक ठरणार.
आज महाराष्ट्रासारख्या तथाकथित प्रगत राज्यात अनेक सवर्ण जाती स्वतःला मागास ठरवण्यासाठी लढत आहेत आणि अनेक ऑलरेडी ओबीसीमध्ये असणाऱ्या जाती स्वतःला एस्सीएसटी मध्ये घालण्याची मागणी करत आहेत.
हे राहुल गांधींच्या आरक्षणवादाचं निखळ यश आहे.

पण खासगी क्षेत्रात वर्किंग अवर्स मध्ये सोमी वर पडून राहणे अवघड असते हो !
ते सुख फक्त सरकारी नोकरदारांनाच मिळते .
खास करून प्यून , शिपाई वैगेरे वैगेरे Happy

मनसे

ते सुख फक्त सरकारी नोकरदारांनाच मिळते .
खास करून प्यून , शिपाई वैगेरे वैगेरे Happy >>>>>>>>
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना जनतेच्या पैशातून मिळणाऱ्या पगारात
कार्यालयातील फायलीच्या ढीगाऱ्यावर बसून गलवान आणि डोकलाम घटना , सार्जिकल स्ट्राईक , निज्जर / पन्नू केस मध्ये आपल्याच देशा विरोधात सोमी वर मते मांडण्याचे सुख देखील मिळते .....

श्रेणी आणून आपले गरळ ओकण्याची संधी हे संघोटे वाया घालवत नाहीत>>>
पाच राज्यांच्या निवडणुकीत अंदाज मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगडमध्ये हा विषय "होता". असो!

अवांतर: "आपले" नाही. "आपली" गरळ!
केशवकूल>> धन्यवाद!

गरळ
न. विष; हालहल; गर. 'गरळ जें वमी मुखें ।' -ज्ञा ६.२४१. -स्त्री. १ साप, पाल इ॰च्या तोंडाचा विषारी फेस (गवतावर पडणारा). २ (प्रा.) आस्था; छंद; नाद. 'त्याने पढण्याची गरळ सोडली.' ३ लाळ; तोंडास सुटलेलें पाणी. (क्रि॰ येणें). [सं. गरल]

दाते शब्दकोश
गरळ garaḷa f (गरल S) The venomous foam of the mouth of serpents and lizards. 2 P Concern; passion for. Ex, त्या पोरानें पढण्याची ग0 सोडली. 3 Water rising in the mouth. v ये.

मोल्सवर्थ शब्दकोश

ओके !
त्या पाच राज्यांपैकी राजस्थान मध्ये लिब्बुंचा लाडका अजित अंजुम लोकांच्या मुलाखती घेत होता .त्याच्या दुर्दैवाने ज्याला प्रश्न विचारील त्याने सांगावे भाजप ला मतदान केले !
एका मतदान केंद्राच्या परिसरात लोकांना अडवून अडवून प्रश्न विचारत होता.
शेवटी तेथील निवडणूक अधिकाऱ्याने त्याला अंजुम ला झापले आणि परिसरातून बाहेर काढले .....

लगेच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होऊ नका. मागे प बंगाल मध्ये तोंडावर आपटले होते. ह्या फालोडी गावात कशावरही जुगार चालतो. एव्हढा विश्वास असेल तर लावा हजार बाराशे, हाकानाका!

ह्या राज्यातील निवडणुका कोणत्या मुद्यावर लढल्या गेल्या.
१) राम मंदिर हा एक पॉइंट असावा.
२) संविधान.
३) आरक्षण.
ह्या वेळेस bjp नी आरक्षण आणि संविधान हे मुद्दे निवडणुकी साठी पुढे केले आहेत.
त्या मुळे.
महागाई,बेरोजगारी हे मुद्दे मागे पडले आहेत

महागाई,बेरोजगारी हे मुद्दे मागे पडले आहेत ## हे मुद्दे पुढे केले तर भाजप पडू शकते हे त्यांना पहात आहे

राममंदिर उभारणी हे तर सगळयात मोठं पाप >>>>>
दामोदरदास मोदी संपत्ती सोडुन गेले नसते तर राममंदीर ऊभारणी शक्यच नव्हती नाही का?? कोर्टाच्या आदेशाने रामलल्ला समीतीला जागा मिळाली असली तरी श्रेय मात्र पनौतीलाच देणार. अंधभक्ती करावी पण किती??

भ्रमर.

ह्याला तर राजकारणातील चाणक्य नीती म्हणतात ना.

महागाई,बेरोजगारी ह्या मुद्द्याला बगल तर दिलीच गेली आहे.
ती चर्चा पण आता होत नाही.

अमरेंद्र.

इतका खोल विचार जनता करत नाही.ती फक्त रिझल्ट बघते.

काँग्रेस चे नेते श्रीराम ला काल्पनिक असल्याचे ठासून सांगत होते , तेच नेते नंतर मंदिरात जाऊ लागले .
यात राहुल आणि प्रियंका देखील आहे .
सगळ्यात ढोंगी बावचाळलेला पक्ष आहे तो काँगेस !
मुंबई हल्ल्यात पाकिस्तान चा हात असल्याचे ढळढळीत पुरावे असताना विनाकारण त्यात हिंदू धर्माला ओढले !
मग २०१४ ला लाथ बसल्यावर काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी हिंदू दहशतवाद या शब्दाला जन्म घातला होता त्या सुशील कुमार , दिग्विजय सारख्या नेत्यांनाGandhi Dynasty ने कचऱ्यात फेकून दिले .
पण तो पर्यंत उशीर झाला होता , गांधी घराण्याची विचारसरणी हिंदू धर्मा बद्दलचा द्वेष सामान्य लोकांपर्यंत पोहोचला आणि त्यांनीच काँग्रेसला लाथ घातली .
इतके होऊन ही राजकुमार हिंदू धर्मावर टीका करण्याचे सोडत नाही आणि गुलाम देखील त्याच्या म्हणण्यावर माना डोलवत असतात ....

महागाई,बेरोजगारी हे मुद्दे मागे पडले आहेत ## हे मुद्दे पुढे केले तर भाजप पडू शकते हे त्यांना पहात आहे
काँग्रेस ने कधी आणि किती महागाई कमी केली ? बेरोजगारी कमी केली याची आकडेवारी आहे का ?

काँग्रेस काळात 400 च्या आसपास असणारा गॅस 1000 वर गेला.
70 ते 75 रुपये असलेलं पेट्रोल 100 पार गेले .
म्हणजे bjp काळात महागाई वाढली.
उगाच वाद घालण्यात अर्थ नाही.

पण महागाई हा मुद्धा आता राहिलाच नाही.
जाती भोवती सर्व फिरत आहेत आणि विरोधी पक्ष ही bjp ची खेळी रोखू शकले नाहीत.
विरोधी पक्ष च फितूर झाला आहे.

कशाच्या जोरावर bjp विरुद्ध निवडणूक जिंकू असा विश्वास ठेवावा.
काँग्रेस पूर्णपणे डावपेचात हरली आहे

https://iocl.com/indane-14Kg-nonsubsid-previous-price
डिसेंबर २०१३ मध्ये गॅस सिलेंडर ची किंमत १००० होती आणि पेट्रोल ची किंमत ७२ म्हणजे महागाईची झळ बसलेली नाही .
म्हणजे युक्रेन रशिया युध्दा मूळे प्रगत देशात देखील महगाई ने आकाश गाठले होते .
पण मोदींनी सामान्य लोकांस त्याची झळ बसू दिली नाही , पण ज्यांना कूंथन करायची सवय असते ते करणारच .....

मध्य प्रदेश आणि राजस्थान हीच महत्वाची राज्य आहेत राजकीय दृष्टी नी.
आणि तेलंगणा हे हे राज्य आर्थिक दृष्ट्या खूप महत्वाचे आहे हे राज्य नोकऱ्या देते लोकांचे पोट भरते.
मिझोरम आणि छतीसगड ना आर्थिक दृष्ट्या महत्वाचे आहे ना राजकीय दृष्ट्या कोणताही राजकीय पक्ष ह्या राज्यात जास्त intrest घेत असेल असे वाटत नाही.
राजस्थान मध्ये सत्तापालट होण्याच्या इतिहास आहे .
दर्जा मध्ये बिलकुल फरक नसणारी सरकारे aaltunpaltun सत्तेत येतात .
दर्जा मध्ये झीरो फरक त्या मुळे राज्य पण मागास ते मागास च आहे.
Mp पण त्याच लायकीचे आहे.
ह्या दोन राज्यांचे महत्व इतकेच केंद्रात सात्ते साठी ह्यांचे योगदान गरजेचे आहे.
बाकी ह्यांचे काही महत्व नाही.

काँग्रेस चे नेते श्रीराम ला काल्पनिक असल्याचे ठासून सांगत होते , तेच नेते नंतर मंदिरात जाऊ लागले .
यात राहुल आणि प्रियंका देखील आहे . >>>>>
काल्पनिक पात्र असेल तर मंदिरात जाऊ नये असे कुठल्या चोपडीत लिहीलेय?

काँग्रेसचे 2019 चे मुद्दे होते-चौकीदार चोर है, राफेल घोटाळा झाला, सर्जिकल स्ट्राईक झालेच नाहीत, अंबानी अडानी, सावरकर bashing, राहुल गांधी दत्तात्रेय गोत्री जनेउधारी काश्मीरी ब्राम्हण, मंदिर व्हिजिट्स, युनिव्हर्सल इन्कम स्कीम

यातला एकही मुद्दा चालला नाही आणि 2024 मध्ये यापैकी एकही मुद्दा काँग्रेस वापरत नाहीये.
अंबानी बंधुचं तर चुकूनही राहुल गांधी नाव घेत नाहीत.तोंड बंद करण्यात आलेलं आहे. सध्या एकच मुद्दा आहे- जातीय जनगणना व भरपूर आरक्षण वाढवून देण्याची आश्वासने. आणि दुसरा मुद्दा म्हणजे सनातन धर्माचे डेंग्यू मलेरियाप्रमाणे उच्चाटन करणार.

या दोन्ही मुद्द्यांना चांगलं अपील आहे. सरकारी नोकरी किंवा इव्हन मायक्रोसॉफ्ट किंवा apple मध्येही आपल्याला आरक्षणातून सेफ, भरपूर पगाराची नोकरी मिळणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, आपल्याला कामावरून काढून टाकायची कोणाची हिंमतच नसली पाहिजे असं समजणारा एक मोठा वर्ग आहे. तो सोशल मीडियावर दिसतो. सवर्ण जातींना मागास व्हायचंय. ओबीसींना एस सी एस टी व तत्सम इतर प्रवर्गात सामील व्हायचंय. यामुळे आरक्षणाच्या जोरावर राहुल गांधी राजस्थान मध्य प्रदेश ३६ गढ सहज जिंकतील.
दुसरा मुद्दा- हिंदू धर्माचा मलेरियाप्रमाणे नायनाट करणे- यातून हिंदूधर्मविरोधी व्यक्तींची एकगठ्ठा मते मिळतील. यावेळी काँग्रेसकडे winning formula आहे.
दोन अडथळे- सहयोगी पक्षाना योग्य तितक्या सीट देऊन मॅनेज करणे. आणि आरक्षण हा zero sum game असल्यामुळे अनेक जातींवर आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना आल्यास त्याचा परिणाम होणे(उदा कर्नाटकात डिके शिवकुमारच त्याच्या सरकारच्या कास्ट सेन्ससच्या आकड्यांशी सहमत नाहीये). पण हे छोटे इश्यूज आहेत. इस्त्राईलच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याची मागणी करून, हिटलरने केलेला ज्यू लोकांचा संहार समर्थनीय ठरवून भरपूर एकगठ्ठा मतदान होतंय त्यामुळे हिंदू समाजाकडून फक्त १५-२० टक्के मतं हवी आहेत.

काल्पनिक पात्र असेल तर मंदिरात जाऊ नये असे कुठल्या चोपडीत लिहीलेय?>>>>>>>>
जाउ नये असे तुम्हीच म्हणताय !
फक्त खांग्रेसी नी मुस्लिम धर्मावरपण अशीच टीका करून दाखवावी !
या देशांत बहुसंख्य हिंदु सहिष्णू आहेत म्हणून त्यांच्याच भावनांशी खेळण्याची दुर्बुद्धी सुचते म्हणजे सगळेच खांग्रेसी निर्बुद्ध समजायचे का ?

Whitehat

जे स्व बुध्दीचे आहेतः ज्यांना अर्थकारण चांगले कळते.
सर्व वर्गात अशी जाणकार लोक आहेत.
आरक्षण मुळे कोणाचे काही भले होणार नाही.
देशाची अर्थ व्यवस्था ही महत्वाची आहे.
सर्वांगीण सर्व क्षेत्रात विकास झाला नाही तर देश च भिकारी होईल तो भिकारी देश काय आरक्षण देणार.

आरक्षण हा फक्त राजकीय मुद्धा आहे कमी बुध्दीचे लोक च त्या मध्ये intrest घेतात.

अगदी आरक्षित समाजात पण ह्या फालतू राजकारणी विषयी लोकांना जाणीव आहे
मतदान वेळी हे आरक्षित प्रेमी उल्थे पडलेले असतील.

राहुल गांधींच्या थिंक टॅंक मध्ये भारतच नाही तर अमेरिका सोरोस चायना सगळीकडचे हुशार लोक असतील. त्यांनी भारतीय मार्केटचा सखोल अभ्यास करूनच ठरवलं असेल की शत प्रतिशत आरक्षण या मुद्द्यावर 2024 जिंकता येऊ शकेल. कारण राहुलजी प्रत्येक भाषणात तो एकच मुद्दा बोलतायत. कर्नाटक त्याच मुद्द्यावर जिंकलं.आता तिकडे शिवकुमार जातीय जनगणना योग्य पद्धतीने व अचूक झालेली नाही असा आरोप आपल्याच पक्षावर करतायत तो वेगळा भाग.
बाकी महाराष्ट्रात मराठा आरक्षण मुद्द्यावरून सतत आग पेटती ठेवता येणे, इतरही भागात सगळीकडे आरक्षणातून दंगली घडवणे. आता मुस्लिम आरक्षण मागणी आली आहे. काँग्रेसला आशा या एकच मुद्द्यावर आहे. अन्यथा त्यांनी इतर मुद्दे गुंडाळून ठेवले नसते.

माहागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवरवरुन लक्ष इतरत्र वळविण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा लावून धरायचा , नव्हे पेटवायचा.

सोबत सर्व सरकारी यंत्रणा तसेच व्यावस्था सोबत आहे. बघायचे भाजपाला कितपत यश येते.

हेमंत. MP महसुलाच्या दृष्टीने महत्त्वाचे राज्य आहे. तिरोडा मलाजखंड सारखी एशियातील नंबर एक मॅन्गनीज खाण तिथे आहे. चार नॅशनल पार्क आहेत जिथे बारा महिने जोरदार पर्यटन असते. खजुराहो ला पण विसरू नका. फक्त IT आणी खाजगी कंपन्यांनीमधला रोजगार म्हणजे राज्याची प्रगती नाही. MP फालतु कशामुळे आहे ते स्पष्ट करून सांगा नाहीतर माफी मागा. तुम्हाला काहीच अधिकार नाही फालतु वगैरे बोलायचा.

Pages