सतीचं वाण घेतलेल्या बंदिवान सासुरवाशिणीच्या माहेरची माणसं

Submitted by अस्मिता. on 25 August, 2023 - 16:41

बंदिवान मी ह्या संसारी
आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.
दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी
१९८८

आशा काळे(कमल) लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं. गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.

मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गरीबाची पण 'लस्ट स्टोरी' ;)..!

या सगळ्यात गावात हातात कादंबरी घेऊन नेहरू शर्ट-पायजामा घालून इकडंतिकडं फिरणारा माधव (खर्शीकर) हिला विहिरीतून ओलेती वगैरे बाहेर काढतो, नंतर भरल्या वांग्याची भाजी खायला येतो. लाल डोळ्याचा पाटील म्हणतो माधव आणि कमलचं लफडं हाय. निळू त्यांच्यावर विश्वास ठेवतो व तिची निर्भर्त्सना करतो. ती सवाष्ण म्हणून पाटलाकडं जेवायला जात नाही, तर तो घरी येऊन छेडतो. मग शेजारच्या काकू दोडकं घेऊन येतात. पाटील पुन्हा निफुचे कानं फुंकतात. नंतर काकू जत्रेत 'जाऊन या ' वगैरे सांगायला येते. तिथेही पाटील निफुला कटवून हिला बैलगाडीत घेतो व इकडंतिकडं हात फिरवायला बघतो. दुसऱ्या गावी बालमित्र/एक्स म्हणतो की याची नजर चांगली नाही. घ्या आता..!
बालमित्र जो कोणी आहे ज्याच्यासोबत गातगात ती पाच मिनिटांत मोठी होते , तो मूर्तिमंत 'दगड' आहे. ह्यांच्या लहानपणीच्या गप्पा बघून पुन्हा पाटील निफुला म्हणतो की हिचं चारित्र्य बरं नाही, कधी माधव - कधी एक्स.

निफु म्हणतो, 'तू पातळी सोडली आहेस. आता मी काही तुला पातळं घेऊन देणार नाही Wink '. मग ती म्हणते की 'मी नागवी बसेन, नको तुमची पातळी आपलं पातळं'. अचानक सत्तावीसावं रडकं गाणं सुरू होतं व संपेपर्यंत पातळ फाटते सुद्धा. माधव गुपचूप येऊन नवीन कोरं गुलबक्षी रंगाचं पातळ ठेवून जातो. 'तुझ्या या लाडक्या भावाने गाणं संपायच्या आत पातळ आणलेलं आहे तायडे', टाईप चिठ्ठी सोडून जातो.

पुन्हा निफुला राग येतो (याला दुसरं येतंच काय). ही पोटुशी होते तर निफु संशय घेतो हे लेकरू 'भरल्या वांग्याचं' आहे म्हणून. मग निफु हिला मारायला जातो, शेजारच्या काकू म्हणतात 'हे लेकरू तुझंच आहे, वांग्याचं नाही. पाटील नालायक आहे, ही तर पवित्र 'कमल' आहे'. एका क्षणात तो शहाणा, समजदार होतो व घराची किल्ली मानाने तिला देऊन कुलूप लावतात. ते गाव सोडून निघून जातात. आनंदी 'टिडिंग टिडिंग' वाजून सिनेमा संपतो.

#दोनतासकुठंहोताकाकू
खऱ्या व्हिलन काकूच आहेत. त्यांनीच प्रेक्षकांचा लाक्षणिक अर्थाने आणि सिनेमाचा शब्दशः अर्थाने अंत बघितला. दोडकं द्यायला आल्या तेव्हा सांगितले असते तर शॉर्ट फिल्म झाली असती.

©अस्मिता

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे त्या आईच्या तोंडी 'या गायब झालेल्या चोली के पीछे क्या है' वाक्याला भूगर्भातून 'चोलीमे सर है मेरा' आवाज आला असता तर मग कुणीतरी बंदीवान या भूसंसारी झाला असल्याची शंका तिलाही आली असती.

मी आपलं भुताच्या जिवाला बरं वाटावं म्हणून kind of नवरा बायको लिहिलं!
>>>>
Lol Lol

अरुण सरनाईकला पुरतात का? जाळत नाही? जाळलं तरी भूत झालं असतंच ना? पण मग अर्थात चोळी कुठे बांधलेली दाखवायची हा प्रश्न उपस्थित झाला असता. >>> परफेक्ट लॉजिक
शिवाय लोकांना खूनाचं कळलं असतं वगैरे मायनर इश्यूज नाहीत का?

चोळीचा सीन आणि अजून थोडं मागेपुढे असं पाहिलं. अचाट आहे सगळंच. अस ला पुरतात म्हणजे काय तर जमिनीलगत उथळ खड्डा खणून ठेवतात आणि वर कबर बांधल्यागत मातीचा ढीग रचतात.

गावातल्या कोणालाही 'अरेच्चा! काल तर इथली जागा सपाट होती, आज अचानक कबर कुठून आली?' असं मनात येणार नाही किंवा उत्सुकतेनं कोणी माती बाजूला करूनही बघणार नाही याची दांडगी खात्रीच.

डोक्याला बांधायला दिली होती, आता तरी परत कर म्हणून मागायला गेली तर झपाटलेली चोळी बघून धक्का बसल्याने ती पण ऑफ झाली.

म्हणून नेहमी बाहेर पडताना मोठा रूमाल चेहर्‍याला बांधावा. वेळप्रसंगी तो देता येतो.

कुणीतरी बंदीवान या भूसंसारी<<<<<< Lol

विषय अवांतर राहू नये म्हणून केवढे ते प्रयत्न! :कुडोस:

गावातल्या कोणालाही 'अरेच्चा! काल तर इथली जागा सपाट होती, आज अचानक कबर कुठून आली?'
<<<<<
गावातला आयुष्मान खुराना -
अभी अभी सपाट जमीन थी यहां पे
लो, अब बन गया उंचवटा....

किंवा,
गावातली करिश्मा -
मुझको हुई ना खबर (कबर??)
चोरी चोरी छुपछुपकर
कब बन गई यहां पे कबर...

तेव्हा मोबाईल नव्हते. नाहीतर फोटो काढुन लगेच "ये कबर छपवादो अखबार मे" केले असते गावातल्या उर्मिलाने.

"ये कबर छपवादो अखबार मे" केले असते गावातल्या उर्मिलाने.
<<<<<<<
Lol टोटली! शिवा-जिऊला न्याय मिळवून दिला असता.

Lol

कबर ही जर बॉक्स मानला तर अस चं प्रेत हे श्रॉडींजरची कॅट होते आणि प्रेतासंदर्भात दोन शक्यता असतात. आयदर चोळीसकट प्रेत किंवा चोळी शिवाय प्रेत. पण ज्याक्षणी जिऊ शिवाला भेटते तेव्हा वेव फंक्शन कोलॅप्स होऊन चोळीसकट प्रेत कबरीत सापडतं. मेन ऑब्झर्वर पण मरते.

आख्खा धागाच हहपुवा आहे Rofl

बंदीवान मी यूट्यूब वर नसल्याचा निषेध म्हणून सतीचे वाण/ सासुरवाशीण / माहेरची माणसं यातला कुठला पिक्चर बघता येईल याचा विचार चालू आहे Proud

@नवीन पोस्टी # 'गडे मुर्दे उखाडना कोई माबोकरोंसे सिखे' Lol

कोणताही पिक्चर चालेल रमड, नगाला नगच आहेत सगळेच. या वटवृक्षाखाली सर्व पांथस्थांना चहापाणी व दोन-दोन क्रॅकजॅक बिस्कीटं मिळतील. दुसरं इतकं चांगलं कंटेंट असतानाही ह्याचा मोह पडतोय म्हणून 'क्रॅकजॅक' बिस्किटं ह्या धाग्याचं प्रतिनिधित्व करतील. Wink

बंदीवान मी यूट्यूब वर नसल्याचा निषेध म्हणून सतीचे वाण/ सासुरवाशीण / माहेरची माणसं यातला कुठला पिक्चर बघता येईल याचा विचार चालू आहे<<<<<<<
तिन्ही बॅक टू बॅक बघत मराठी मूव्ही मॅरेथॉन कर. म्हणजे डोक्यात 'सतीचं वाण घेतलेल्या सासुरवाशिणीच्या माहेरची माणसं' असं एक नवीनच कॉकटेल तयार होईल.

'संसारी बंदिवान असलेल्या कमलच्या आयुष्यात काय ह्यो चमत्कार'* असं ऑलरेडी झालेलंच आहे.

*खर्शिकरने कमलको विहीरमे से निकालना चमत्कारसे कम है के?

मी सुरू केलाय बघायला...केशव लग्नाला नाही म्हटला तीजपर्यंत झाला आता आज पुढे.........
कोणत्याही ऐंगलने सावत्र आईचा छळ सोसणारी सिन्ड्रेला वाटली नाही.. मस्त मस्त आवरून फिरतेय कि लहाणपणापासून...

गुलमोहर चित्रकला यात अरे मनमोहना या नावाने धागा आहे. तो दिसला की प्रत्येक वेळी मला बाळा गाऊ कशी अंगाई मधलं ते गाणं आठवतं. माझ्या लहानपणी मी ज्यांच्या घरी बसून हा सिनेमा पाहिला, त्यांचा मुलगा अरे स्टेज तुटेल असं म्हणत होता. कोरियोग्राफी बघा. गाण्यातल्या प्रत्येक शद्बाच अर्थ समजावून सांगितला आहे.
या चित्रपटाची कथासुद्धा आशाकाळीय आहे. आशा काळेचं विक्रम गोखलेवर प्रेम. त्याचं नयनतारावर. विक्रम गोखले त्या काळातल्या अमिताभ , विनोद खन्ना यांच्यासारखी हेअर स्टाइल ठेवतो. पण अमिताभ विनोदचे केस जसे छान शांपू करून ड्राय करून सेट केलेले सिल्की वाटतात, तसे याचे वाटत नाही. मराठीच्या बजेटात बसायला नको? त्याला बघितलं की मला त्या केसांतून घामाचा वास येतोय असं वाटतं.
आणखी थोडं दूर जाऊ. आशा विक्रमचा कैवारी नावाचा एक चित्रपट आहे. त्यात विक्रम तिला थँक्यु बिंक्यु काही म्हणणार की नाही असं विचारतो. ती म्हणते - बिंक्यू.
आता बाळाची अंगाई. विक्रम नयनताराचं लग्न होतं. ते धुंदीत गातात आणि मस्तीत राहतात. त्यामुळे बाळ होतं. ऑफिसला जायला निघालेल्या विक्रमला टाटा करायला आशा हे बाळ घेऊन पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीत उभी असते. हे कसं जुळवून आणलंय ते आठवत नाही. अर्थातच बाळ तिच्या हातून पडतं आणि देवाघरी जातं. नयनताराच्या डोक्यावर परिणाम होतो. त्यावरचा उपाय म्ह णजे दुसरं बाळ. पण आता विक्रम आणि ती धुंदीत गाऊ शकत नाहीत आणि मस्तीत राहू शकत नाहीत. त्यामुळे बाळ आणण्यासाठी आशा सतीश दुभाषी या विक्षिप्त माणसाशी लग्न करते.
शेवट च्या सीनमध्ये आशा नयनताराला बाळ देऊन जाते तेव्हा मगाशी स्टेज तुटेल अशी भीती वाटणार्‍या मुलाने डोळे झाकून घेतले आणि गेली का ती? गेली का ती ? असं विचारलं. त्याला सिनेमात पुढे दाखवलेलं आधीच कळलं ते तुम्हांला सिनेमा न पाहता कळतंय का?

सिनेमा पाहून वर्षे, दशके , तपे लोटली आहेत. त्यामुळे चूभूद्याघ्या.

भरत Lol
हो , मलाही तो बिंक्यू चा सीन अगदी आठवतो. डोळे उघडमीट करत, कृष्ण धवल सिनेमा असल्याने, राखाडी दिसणारे चमकदार ओठ मुडपत आणि चेहेर्‍यावरची घडी एव्हढी ही मोडणार नाही याची पुरेपूर काळजी घेत.. आशा काळे ने म्हटलेले बिंक्यू!

तेव्हा मगाशी स्टेज तुटेल अशी भीती वाटणार्‍या मुलाने डोळे झाकून घेतले आणि गेली का ती? गेली का ती ? असं विचारलं. त्याला सिनेमात पुढे दाखवलेलं आधीच कळलं ते तुम्हांला सिनेमा न पाहता कळतंय का? >>>>>हा हा हा हा हा हा हा ती भूत वैग्रे होते का ते मुलं देते वेळी ?

'आशा'प्रकारे एशस्वीरीत्या 200 पोस्टींचा टप्पा बंदिवान कमळीने पार केला आहे.
अस्मिताला डिझायनर शाल आणि श्रीफळ!

एवढी पिसं काढल्यामुळे गायब झाला की काय?<<<<<<
'ह्या' शब्दाचे स्पेलिंग yhya केले आहे त्यांनी. मी आशा काळे नाव देऊन सर्च केला होता सिनेमा. (आशा, होऊ कशी उतराई?)

हे स्पेलिंग वाचून जनरल याह्या खान यांचा आत्मा पुन्हा जागृत झाला होता म्हणे! डोक्याला चोळी नव्हती म्हणून हात चोळीत परत गेला.

गुलमोहर चित्रकला यात अरे मनमोहना या नावाने धागा आहे. तो दिसला की प्रत्येक वेळी मला बाळा गाऊ कशी अंगाई मधलं ते गाणं आठवतं.
>>>>
मलाही आणि शहारा येतो अंगावर. गाण्याच्या भावाशी अतिशय विसंगत, वीरश्रीपूर्ण नृत्य - ओन्ली सेव्हिंग ग्रेस म्हणजे विक्रम गोखलेंचा अभिनय. काळेताईंनी स्टेजवर घातलेला धुमाकूळ फक्त डोळ्यांद्वारे नॉनप्लस करून टाकलाय या माणसाने.
शब्द बरे आहेत. पण उदाहरण अत्यंत चुकीचे. जिकडे तिकडे कृष्णाला कशाला वेठीला धरायचे? कृष्ण मीरा समकालीन होते का? ज्या समकालीन राजकन्येने कृष्णावर प्रेम केले तिनेही त्याच्यासाठी गाणे गायले पण वेळ उलटून गेल्यावर नाही.

स्वप्नं पाहायची पण स्वतः प्रयत्न नाही करायचे. मग आपल्या मनासारखे नाही झाले म्हणून रडायचे याला काय अर्थ आहे?
एकंदरीत या ताई 'हम करेसो कायदा' कॅटेगरीत मोडतात - प्रेम एकतर्फी, दुसऱ्याच्या मुलाचा सांभाळ एकतर्फी, त्याग एकतर्फी. एकल मातृत्वाचा फारसा प्रसार झाला नव्हता त्याकाळी...नाहीतर तेही 'करून दाखवले' असते.
कोणती बाई मानसिक स्थिती ठीक नसलेल्या बाईकडे आपले तान्हे मुल निर्धास्त सोपवते? काळे ताईंची तपासणी आधी केली पाहिजे होती.
नकोच पण. एका गाण्यात स्वतः मीरा आणि विक्रम गोखले कृष्ण, दुसऱ्या गाण्यात स्वतः यशोदा आणि विक्रम गोखलेंचा मुलगा कृष्ण..फ्रॉईडलाही कॉम्प्लेक्स आला असता ही केस सॉल्व करताना.

आणि विक्रम गोखले डॉकटर असतो ना? त्याला काही वैद्यकीय उपाय माहित नाहीत बायकोला बरे करायचे? त्याचे कोणी ओळखीचे सायकॅट्रिस्ट वगैरे नाहीत का? मुळात स्वतःचे मुल गेल्याचा मानसिक धक्का बसला असेल तर तो नगाला नग मुल परत आल्यावर आपोआप नाहीसा होतो?

गाण्याच्या भावाशी अतिशय विसंगत, वीरश्रीपूर्ण नृत्य -... Lol अगदी बरोबर!
नगाला नग.. रिप्लेसमेंट ! Lol
किती विचित्र आहे हे!
आणि सतीश दुभाषी कसा काय राजी होतो?
की ..
बाई एकदाचे ते बाळ हवे तर घेऊन जा..पण टळ माझ्या आयुष्यातून..
असे त्याला आशा काळे ला म्हणावेसे वाटले असेल?
शक्य आहे!! Happy

ते गाणं माहित होतं , आठवलं , पण मुद्दामून शोधून परत पाहिलं
ती पहिली खुर्ची रिकामी का आहे ?
पहिल्या रांगेत उजवीकडे लाल्/भगव्या काकू गालावर हात ठेवून " काय करायचं बाई आता या पोरीचं " असे एक्स्प्रेशन देतायेत .
आशा बाई चांगल्या दिसतायेत पण त्या मागच्या बायका अगदीच उत्तरेकडच्या जत्रेतून बोलावल्यासारख्या वेषभूशा करून आल्यात .
नीट पाहिलत तर कळेल , एक दोन वेळा त्या मुली नाचताना चुकल्यात पण . आउट ऑफ सिन्क .
विगो चांगले दिसतायेत .
आशा बाई नी ईतकी कंबर हलवली आहे की हे गाण म्युट करून "नाचू किती लाजू किती कंबर लचकली" गाण लावायचा मोहं झाला .

हे स्पेलिंग वाचून जनरल याह्या खान यांचा आत्मा पुन्हा जागृत झाला होता म्हणे! डोक्याला चोळी नव्हती म्हणून हात चोळीत परत गेला.>>>>>>>>> Rofl

Pages