भारताच्या रेल्वे इतिहासातील सर्वात दुर्दैवी व भीषण अपघात

Submitted by ढंपस टंपू on 3 June, 2023 - 23:49

भारताच्या रेल्वे इतिहासात आजवर अनेक अपघात झाले. पण परवा बालासोर इथे झालेला दुर्दैवी अपघात हा समोरासमोर तीन रेल्वेगाड्यांची टक्कर झाल्याने भारताच्या रेल्वे इतिहासातला अत्यंत भीषण अपघात म्हणावा लागेल. या आधी ६ जानेवारी १९८१ रोजी बिहार मधे बागमती नदीत रेल्वेगाडी घसरून ७०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हा आजवरचा सर्वात भीषण अपघात समजला जातो.

बालासोरच्या दुर्दैवी घटनेत आता पर्यंत २९४ मृत तर ११०० प्रवासी जखमी आहेत. जस जसे मदत कार्य पुढे जाईल तसतसा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पण ज्या पद्धतीने तीन ट्रेन्स एकमेकांना धडकल्या ते पाहता यात मानवी चूक आहे का असा प्रश्न पडतो. आतापर्यंत २९५ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नदीत पडल्याने मृतांचा आकडा जास्त असणार हे उघड आहे. ती घटनाही लाजिरवाणीच आहे. पण तीन गाड्या एकमेकांवर कशा काय धडकू शकतात ? यात मानवी चूक आहे का ?

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी आता कवच तंत्रज्ञानामुळे रेल्वे अपघात विसरून जा असे त्यांच्या एका प्रेझेंटेशन मधे सांगितले होते. तरी हा अपघात कसा काय झाला ?

जगभरात भारताच्या रेल्वेगाड्या, इंजिन्स निर्यात करण्याची घोषणा केली होती. या अपघातामुळे आयात करणार्‍या देशांवर परिणाम होईल का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल आकाशवाणीवरती ऐकले की सरकारने मृत व त्यांच्या नातेवाईकांना १० लाख रक्कम घोषित केलेली आहे. व किरकोळ जखम झालेल्यांना ५०,०००. गंभीर जखम झालेल्यांना या दोन्हीमधली काही रक्कम आहे जी की आठवत नाहीये.

२०१४ च्या आधी भाजप दुर्दैवी घटनांचं काय करत होतं ? नवीनच जगात आल्यासारखे वागताय का ?>>>>>>>>>>>>>
संवेदनशीलता दाखवून अगोदर ती स्मायली उडवा, मग चर्चा करा !

नातेवाईकांना १० लाख रक्कम घोषित केलेली आहे. व किरकोळ जखम झालेल्यांना ५०,०००. गंभीर जखम
ह्याची लय मोठी process असते आणि बाबू लोक पहिलीच जटिल असलेली पद्धत अजून जटिल करून लाच घेतल्या शिवाय पैसे देत नाहीत..
50000 मधील दहा तरी वाटण्यात च जात असतील.
घोषणा आणि अमलबजावनी ह्या मध्ये जमीन आस्मान च फरक आहे

तेच सिग्नल यंत्रणेच्या बाबतीत. वीज जाणे, पावसाचे पाणी शिरणे, उंदराने कुरतडणे अशा कित्येक गोष्टी डिजाईन तेबलवर विचारात घेणे शक्य नसते>>>
हे म्हणणे बरोबर नाही. ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन फेल सेफ डिजाईन केले जाते.

संपूर्ण पोस्ट वाचली तर बरे होईल. रेल्वेत काय झाले याची कल्पना नाही हे स्पष्ट म्हटलेले आहे. डिझाईन करताना कित्येक गोष्टी निसटतात हे सांगण्यासाठी उदाहरणे दिली याचा अर्थ तेच धरून बसावे असे नसते. तुम्हाला अनुभव असेल तर सिग्नल यंत्रणेच्या डिझाईनची माहिती दिलीत तर छान होईल. अनफोरसीन फॅक्टर्स हे नव्याने येणार्‍या यंत्रणेत असतात इतकाच मुद्दा आहे.

ह्यांचे निर्णय च भयंकर हास्यास्पद असतात.
अर्थ मंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर स्मृती इराणी देते..
संरक्षण मंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर अर्थ मंत्री देतात..स्वतःच्या खात्याच्या प्रश्नांचे उत्तर कोणताच मंत्री देत नाही...
रेल्वे अपघात कसा झाला ही टेक्निकल बाजू वर अवलंबून तपास आहे त्याचा तपास सीबीआय काय करणार.
त्यांना त्या मधील काडी चे तरी ज्ञान आहे का?
रेल्वे नीच तो तपास करायला हवा होता आणि समांतर तपास त्या क्षेत्रातील तज्ञ लोकांच्या समिती नी केला पाहिजे होता.
आणि ते दोन्ही तपास चे निर्णय आणि निष्कर्ष ह्याचा अभ्यास करून फायनल रिपोर्ट तयार केला पाहिजे होता..सीबीआय काय घंटा तपास करणार

. अनफोरसीन फॅक्टर्स हे नव्याने येणार्‍या यंत्रणेत असतात इतकाच मुद्दा आहे.>> तो मुद्दा ठीकच आहे. पण 'अनफोरसीन फॅक्टर्स' म्हणून उदाहरणं देणं हेच मलाही पचलं नाही. आणि दिलेली उदाहरणं अनफोरसीनही नाहीत. उदा. यंत्रणा उभारताना जवळ खाण होईल कल्पना नसणे आणि मग खाण करायला बेसुमार स्फोटकांचा वापर केल्याने काही वर्षांंनी खालचा लेअर फ्रॅक्चर होणे आणि भूकंप प्रवणता वाढणे. हे असं होतं का? कान्ट फोरसीन. इ. बाकी पोस्ट चांगलीच आहे.

उदा. यंत्रणा उभारताना जवळ खाण होईल कल्पना नसणे आणि मग खाण करायला बेसुमार स्फोटकांचा वापर केल्याने काही वर्षांंनी खालचा लेअर फ्रॅक्चर होणे आणि भूकंप प्रवणता वाढणे. >>> ही उदाहरणं जशी आहेत तशीच मी ही दिली आहेत. मला रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेची कल्पना नाही हे आधीच स्पष्ट केलेले आहे. अनफोरसीन फॅक्टर्स असतात हे डिझाईनर म्हणून ठाऊक आहे. १०० माणसांसाठी डिझाईन केलेल्या पुलावर २०० माणसे येणे हे डिझाईनरसाठी अनफोरसीन फॅक्टर मधेच मोडते. डिझाईनर म्हणून रिक्वायरमेंट, पॅरामीटर्स या जोडीला मला अनुभवाची जोड देता येते. काही ठिकाणी त्यामुळे कॉस्ट वाढते का हे पाहिले जाते. याबद्दल इतके पुरे.

मर्म समजून घ्यायचे ते घेतीलच.

अपघात स्थळी रेल्वेमंत्री भारत माता की जय आणि वंदे मातरम या घोषणा देत आहेत.
एका रात्रीत ट्रॅक क्लियर करून गाड्या पुन्हा सुरू झाल्या हा पराक्रम.
अश्विनी वैष्णव Railways, Communications, Electronics & IT. या खात्यांचे मंत्री आहेत.

रेल्वेच्या सिग्नलिंग सिस्टीम बद्दल माझा अनुभव शून्य. पण सेफ्टी सिस्टीम कशा डीझाईन केल्या जातात त्याचा भरपूर अनुभव आहे. त्याच्या आधारावर मी लिहिले आहे. रेल्वे सिग्नलिंग ही पण एक सेफ्टी सिस्टीम आहे असे मानतो.
अर्थात सेफ्टी सिस्टीम वर किती पैसे खर्च करायचे? हा महत्वाचा प्रश्न आहे. डीझाईनर त्यानुसार डिझाईन करतो. पण पाणी घुसणे , वीज जाणे , उंदीर इत्यादी गोष्टी व्यवस्थित विचारात घेतल्या जातात.
डिझाईन करताना कित्येक गोष्टी निसटतात हे सांगण्यासाठी उदाहरणे दिली याचा अर्थ तेच धरून बसावे असे नसते. >>>हो अगदी बरोबर. आणि ह्या बद्दल मी काय बोलणार. पण अस लिहिल्यामुळे लोकांचा गैरसमज होतो हो. लोक म्हणणार "काय साले हे डिझाईनर! ह्यांना एव्हढी पण अक्कल नाही? इत्यादी." म्हणून आपल लिहिले हो. राग मानू नये.

कदाचित ओदिशामध्ये पूर्वी कधी इतक्या तत्परतेने कामे झाली नसतील पण महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबईला हे काही नवे नाही. रेल वे डिझास्टर नसेल कदाचित ( तेही निस्तरले आहे सीरियल बॉम्ब स्फोटात) पण इतर काही भीषण आपत्तींचे निवारण त्वरेने झाले आहे.)

आपण हे वाचले आहे का?
A senior railway official who did not want to be identified said this kind of tinkering with the 'logic' of the AI-based electronic interlocking system can only be 'intentional' and ruled out any malfunction in the system.
हायला AI! ?
माझ्या कडे पण एक थेरी आहे. एक नाही दोन आहेत.
१)शील्डिँग. म्हणजे आपल्या कडे कुठलेही एलेक्ट्रोनिक्स सर्ज प्रूूफ नाही. त्यामुळे एक दिवस असा उगवणार आहे कि आपले जीवन उध्वस्त होणार आहे.
२) टनेलिंग इफेक्ट. यामध्ये इलेक्ट्रॉन जंप मारून बाहेर पडतो आणि यंत्रणा विस्कळीत करू शकतो.
खरोखर जीवन अशक्य आहे.

The root cause of the three-train crash in Odisha's Balasore district and the people responsible for it have been identified, Railway Minister Ashwini Vaishnaw said on Sunday
मग CBI कशाला?

. केशवकुल यांच्या शेवटच्या प्रतिसादातलं विधान बातमीत वाचलं. इतक्या लवकर यांची चौकशी पूर्ण झाली आणि घातपात आहे हे ठरलं.

वरील लेखातील "तीन गाड्या एकमेकांवर कशा काय धडकू शकतात ?" या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थितपणे लिखित वृत्तपत्रातून आले आहे.
कोरोंमंडल एक्स्प्रेसला सिग्नल मिळाला पण त्यासाठी रुळ बदलले गेले नाहीत.त्यामुळे ती लूप लाईन वर मालगाडी वर धडकली. तिचे डबे रुळावरून घसरले. त्याच वेळी दुर्दैवाने बंगलोर हावडा गाडी विरुद्ध बाजूने दुसऱ्या ट्रॅक वरून जात होती. हे घसरलेले डबे त्या विरुद्ध बाजूने जाणाऱ्या गाडीच्या शेवटच्या डब्यांना आदळल्याने अजून जास्त जीवितहानी झाली.
सिग्नल लागल्यावर रुळ का बदलले गेले नाहीत हा प्रश्न आहे.

सिग्नल लागल्यावर रुळ का बदलले गेले नाहीत हा प्रश्न आहे.>>> असंं कसंं? आधी रूळ बदलल्यावर मग सिग्नल लागला/लावायला पाहिजे. सगळ काही व्यवस्थित होत. गाडीने सिग्नल क्रॉस केल्यावर सांधा बदलला असणार. ही एक शक्यता.

रूळ (सांधा) आधी बदलतात,मग सिग्नल देतात.

शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास टीव्हीवर पाहिलेल्या बातम्यांत एका गाडीचे डबे रुळावरून घसरले आणि काही डबे दुसऱ्या मेन ट्रॅकवर पडले. तिला मग विरुद्ध दिशेने पूर्ण वेगात येत असलेली ट्रेन धडकली ती एवढी तीव्र होती की तिचे डबे बाजूच्या मालगाडी धडकले असे सांगत होते.

हे खरे नसून जर सांधा लूपला जोडला असल्याने कोरोमंडल त्या ट्रॅकवर जाउन धडकली असे असेल तर मग तो सिग्नल सिस्टम मधला दोष - सांधा मेन ट्रॅकला जोडला नसूनही हिरवा सिग्नल मिळणे. (आणि मग काँस्पिरसी थिअरीलाही स्कोप)

पण अस लिहिल्यामुळे लोकांचा गैरसमज होतो हो. लोक म्हणणार "काय साले हे डिझाईनर! ह्यांना एव्हढी पण अक्कल नाही? इत्यादी." म्हणून आपल लिहिले हो. राग मानू नये. >> मायबोलीवर राहून आपला राग धरणे परवडणारे आहे काय ओ ? चालू द्या तुमचे. तुम्ही नेहमीच बरोबर असता. Lol

बहुतेक ही मानवी चूकच दिसतेय .
मोटरमन किंवा सिग्नलमन याला जबाबदार असतील .
पण एखाद्या समुदायाचे त्यांच्यातील काही लोकांच्या
बदनामकारक कर्तृत्वामुळे कानफाट्या नाव पडले असेल तर
सरकार स्वतःचे अपयश झाकण्यासाठी कानफाट्या लोकांवर बील फाडण्याची शक्यता ही आहे ......

पुलवामाच्या वेळी राज ठाकरे - अजित दोभाल यांची चौकशी केली तर पुलवामाचं सत्य समोर येऊ शकेल. वरच्या प्रतिसादामुळे त्याची आठवण झाली.

ते सुरक्षा कवच लावायचे तेव्हा लावा, प्रथम प्रत्येक रेल्वे गाडीला पुढे, मागे आणि डब्यांच्या दोन्ही बाजूला असे कमीत कमी चार cctv कॅमेरे लावावेत. निदान अपघात कसा झाला ह्याचा पुरावा तरी मिळेल आणि टीव्ही पासून सोशल मीडियावरील speculation पासून सुटका होईल. वात आणलाय अगदी.

उपग्रह द्वारे ट्रेन कुठे होत्या हे .
GPS मुळे माहीत पडतच.
सर्व सत्य माहिती आज पण उपलब्ध आहे.

पण सत्याशी मीडिया वाल्यांचे काही देणे घेणे नाही.
फक्त अजेंडा चालवणे,चाटू गिरी करणे.
शेठ च हुकूम पाळणे इतकेच मीडिया करते.
आता पत्रकार पण qualified नाहीत.
असेच नवं शिखे , कसलाच अभ्यास नसलेले भंगार पत्रकार आहेत.
पहिले पत्रकार काही माहिती मिळाली की त्या जागेवर जावून त्याची सत्यता तपासात असत..
त्या प्रकरणाचा चारी बाजूने अभ्यास करत असत आणि नंतर ती बातमी मीडिया मध्ये येत असे.
आता ह्या सर्व स्टेप बंद झाल्या आहेत
डायरेक्ट उडी मारून सर्वात पुढे हेच कार्य पद्धती सध्या मीडिया ची आहे

<< ते सुरक्षा कवच लावायचे तेव्हा लावा, प्रथम प्रत्येक रेल्वे गाडीला पुढे, मागे आणि डब्यांच्या दोन्ही बाजूला असे कमीत कमी चार cctv कॅमेरे लावावेत. निदान अपघात कसा झाला ह्याचा पुरावा तरी मिळेल आणि टीव्ही पासून सोशल मीडियावरील speculation पासून सुटका होईल. वात आणलाय अगदी. >>

------- CCTV कशासाठी ? त्याने काय साध्य होणार आहे?

पुरावा मागे रहायला नको म्हणून असलेले CCTV फोडून मग निरपराध नागरिकांना काठ्यांनी मारणारे कायदे रक्षक (दिल्ली दंगल आणि त्यामधे पोलीसांचा सहभाग) जगाने पाहिले आहे.

गाड्यांवरचे कॅमेरे फोडतील आणि मग पुढचे कार्य करतील. हवा असलेला नरेटिव लोकांपर्यंत पोहोचवायला आय टी सेवकांची फौज २४ -७ दक्ष असते.

फुरोगामी तुम्ही संवेदनशीलतेवर बोलावं हे मनोरंजक आहे. संवेदनशीलता कशाशी खातात हे माहिती असेल तर रेल्वेमंत्र्याला राजीनामा द्यायला सांगा.

२०१४ च्या आधी राजीनामा मागणारा पक्ष म्हणजे भाजप ही भाजपची ओळख होती.

<< एका दुर्दैवी अपघाताचा धागा राजकारणाकडे वळवण्यात यश मिळालेले दिसत आहे.
आता त्यात कुठूनतरी पाकिस्तान connection दाखवून, हाही पुलवामाप्रमाणेच मुद्दाम घडवून आणलेला प्रकार आहे हे वाचायची सवय लावून घ्यावी लागेल. >>

------ २६-११ रोजी कसाब आणि काही अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. सबंध देश हादरला होता.

त्यावेळी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री २४ तासाच्या आत मुंबईला पळत पळत आले... थेट कॅमेर्‍यासमोर... हत्यासत्र सुरु होते, अतिरेक्यांवर नियंत्रण मिळविलेले नव्हते. देश कुठल्या परिस्थितीमधून जात होता आणि यांना त्यातही "संधी" दिसत होती.

Pages