कायद्यासमोर सर्व समान?

Submitted by सचिन पगारे on 24 February, 2021 - 06:44

सध्या महाराष्ट्रात जे पुजा चव्हाण हीच्या मरणा वर राजकारण सुरु आहे ते महाराष्ट्र युपीच्या रांगेत उभा राहतोय की काय असे वाटण्याजोगे दुर्दैवी आहे. एक जीव गेलाय त्यावर राजकारणी त्यांची पोळी भाजत आहे. ज्या मंत्र्याचा या प्रकरणाशी संबंध आहे असे बोलले जातेय तो मंत्री बारा दिवस पसार काय होतो नंतर समाजापुढे येउन भाषण काय देतो हे सर्व लाजीरवाणे आहे.

स्त्रियांच्या बाबतीत एक निरीक्षण आहे की त्या अशा प्रकरणाबाबत पक्ष पाहुन वागतात. भाजपचे प्रकरण असेल तर विरोधी पक्षाच्या स्त्रिया आक्रमक होतात नि इतर पक्षांचे असेल तर भाजपनिष्ठ स्त्रिया आक्रमक होतात... माझ्या मते स्त्रियांनी पक्षनिष्ठा, नेत्यावरील निष्ठा बाजुला सारुन अशा प्रकरणात स्त्रिया ंवरील अन्यायाला महत्व द्यावे. जर एखाद्या स्त्रीवर अन्याय होतो तेव्हा स्त्रि आमदार, खासदार, नगरसेवकांनी पक्ष भेद बाजुला ठेवुन आपला एक दबाव गट बनवावा. कुठलाही प्रभावशील व्यक्ती असो कुठल्याही पक्षाचा असो त्या प्रकरणी पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी एकत्र यावे हा आपल्या पक्षाचा तो दुसर्या पक्षाचा असा भेद करु नये.

जॉर्ज ऑर्वेल या लेखकाने 'अ‍ॅनिमल फार्म' कादंबरीमध्ये सांगितल्याप्रमाणे, कायद्यासमोर सर्व समान असतात, पण काही जण अधिक समान असतात. वर्तमान राजकीय, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये वारंवार त्याचे प्रत्यंतर येत असते. आपल्या अवतीभवती अधिक समान असलेले खूप सारे लोक वावरत असतात आणि त्यांच्यासाठीचे मापदंड इतरांपेक्षा वेगळे असल्याचे वारंवार सगळ्या यंत्रणा दाखवून देत असतात.

आपण कितीही संस्क्रुतीचा टेंभा मिरवत असलो तरी शेवटी ही पुरुषप्रधान संस्क्रुती आहे. स्त्रि जातीवरील अन्याया बाबत जात पात, पक्ष, नेता, धर्म न बघता स्त्रियांनी एकत्र यायला हवे. नाहीतर अशा कित्येक अबला न्यायावाचुन बळी पडतील व लोक दुसरा विषय मिळेपर्यंत चर्चा करतील.

Group content visibility: 
Use group defaults

दोन दिवसांत अनेक लग्न सोहळ्यांवर प्रशासनाने कारवाई करून गुन्हे दाखल केल्याचे वाचले. हडपसरला महाडिक पुत्राचा मोठा सोहळा साजरा झाला जिथे सर्व नियम धाब्यावर बसवले गेले पण कुठे काही कारवाई केल्याची बातमी ना काही दण्ड झाल्याची. फार चीड येते काही वेळेला आणि हताशही वाटते.
मंत्री साहेबांना पोहरादेवी पावली असणार नक्कीच कारण एवढे उद्योगकरूनही मंत्रिपद शाबुत आहे म्हणजे कमाल आहे मुख्यमंत्र्यांची. आमचा संजय तर तुमचा धनंजय.

>>तो मंत्री बारा दिवस पसार काय होतो नंतर समाजापुढे येउन भाषण काय देतो हे सर्व लाजीरवाणे आहे

'अमूक अमूक जात' हा शब्द न वापरता ' अमूक अमूक समाज' असा शब्द वापरला की व्यक्ती जातीवादी न ठरता समाज्वादी म्हणून ओळखली जाते.

त्यामुळे एखाद-दुसरी 'जात' सोडली तर बाकी सगळे 'समाज' असतात. आणि त्या एखाद-दुसर्‍या जातीचे लोक्स 'जातीवादी' ठरतात पण बाकीचे सगळे 'समाजवादी' असतात.
अशी मजा आहे.

प्रिंट मिडिया, टिव्ही, सोशल मिडिया वरच्या बातम्या/लिखाण्/वक्तव्य नीट वाचलं/ऐकलं तर ही मजा हळूहळू कळायला लागते.

बाकी राजकारण , समाजकारण वा अर्थकारण काहीही असो, स्त्रीच प्रत्येक ठिकाणी भरडली जाते. संजय राठोड राजीनामा देतील अशी चर्चा आहे.

https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-five-tigers-hunted-i...

महाडिक लग्न सोहळा, पोहरादेवी ला जमलेले 1000 पेक्षा जास्त लोकं.. ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल /न येईल.. पण प्रत्यक्ष ही गर्दी दिसत असताना त्या क्षणी अटक करता येत नाही का..?
उशिराचे शहाणपण म्हणतात ते हेच का..?

<< आपण कितीही संस्क्रुतीचा टेंभा मिरवत असलो तरी शेवटी ही पुरुषप्रधान संस्क्रुती आहे. स्त्रि जातीवरील अन्याया बाबत जात पात, पक्ष, नेता, धर्म न बघता स्त्रियांनी एकत्र यायला हवे. >>

------ विषय अत्यंत गंभिर आहे. अपराधी कुठल्याही पक्षाचा वा धर्माचा असला तरी त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी.

दिल्ली मधे निर्भयावर अत्याचार झाल्यावर सर्व देश एकत्र आला होता. पण हाथरस किंवा कथुआ किंवा उनांव सारख्या घटनेत अगदी वेगळे चित्र समोर आलेले बघायला मिळते. अत्याचार ग्रस्त महिलेचा अंत झाल्यावर तिच्या कुटुंबाची परवानगी न घेतांच तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्या इतपत कोडगेपणा उ प्र मधे बघायला मिळाला. कारण?

एखाद्या स्त्रीवर अन्याय /अत्याचार झाल्यावर आधी तिची जात/धर्म पाहिला जातो, मग अपराधी कोण आहेत त्यांचा धर्म / जात बघितली जाते आणि नंतर प्रतिक्रिया काय द्यायची हे ठरविले जाते. असा नवा नॉर्म तयार होतो आहे.

सर्वसामान्यांच्या मनातले लिहीलेत.
आपल्या पक्षाचे, संघटनेचे किंवा समूहाचे असेल की सर्व क्षम्य ही वृत्ती चीड आणणारी आहे. यात स्त्रियाही सामील असाव्यात याचा राग येतो.

इथल्या काही प्रसिद्ध स्त्री आयडीज ना फक्त एका ठराविक ज्ञातीतील विक्टीम असेल तरच दु:खाचा कड येतो.. शिवाय गुन्हेगार त्यांच्या ज्ञातीतील असेल तर "आपण त्या गावचेच नाही" असं दाखवून चर्चा दुसरेकडे भरकवटतात.

लाजिरवाणे आहे हे सगळे Sad प्रचंड राग येतो पण जिथे केवळ राजकीय हेतूने प्रेरित सर्व कृती असतात तिथे न्याय कसा होणार? ती मुलगी बिचारी जीवानिशी गेलीच. हताश वाटते अशावेळी.

'कौन जात' असं विचारून रिपोर्टिंग करणारे लोकं करतात असं.

माझ्या मते मराठी लोकांना काही (तेही काहीच) मराठी आडनावांवरून जात ओळखता येते, इतर प्रदेशातल्या लोकांची जात, 'कौन जात' फेम पत्रकारांनी (?) सांगितली तरच कळते सामान्य लोकांना. घटनेबद्दलचं दु:ख व्यक्त करण्यापेक्षा / रिपोर्टिंग करण्यापेक्षा 'कौन जात' फेम लोकांनी 'जात' फॅक्टर फेम्स केला आहे.

इथे तर दोन दोन बायकांना सन्मान कसा दिला गेला / दिला जातो , अशा भाषेत चुकीच्याकृत्याची भलावण पण झालेली आहे नुकतीच

दोन बायका बाबत कुणी भलावण केली नसावी

पण पहिल्या बायकोने पोलीस तक्रार केली तरच गुन्हा दाखल होतो अन्यथा नाही

आता हे आजन्म ब्रम्हचारी राहणाऱ्या किंवा लग्नाच्या बोहाल्यावरून पळून जाणाऱ्या किंवा लग्नाच्या बायकोला सोडून पळून जाणाऱ्यांना आयडोल समजणाऱ्यांना हे माहीत असेल असं वाटतं नाही Biggrin

येथील 'काही' प्रतिसाद पहिले, त्या वरून असे दिसून येते की , विषय काहीही असो पण त्यांना फक्त जात दिसते.
खर तर हा विषय खूप गंभीर आहे, पण तो दुसरी कडे नेऊन तिसऱ्याच जातीला टार्गेट करायचा प्रयत्न केलेला दिसतो.

हे तर सर्वश्रुतच आहे की अश्या 'काही' लोकांना काही जाती च्या नावाने मळमळ होण्याचा जन्म'जात' रोग आहे, आणि मग ते असे कुठेही ओकत असतात .☺️

आणि हो , असे अनेक आहेत, बिचारे एक मेकांची उलटी बाहेर काढायला मदत करत असतात, ☺️.

बाकीच्यांना एक सल्ला, त्यांचा हा रोग बरा करण्याच्या नादाला कोणी लागू नये, कशाला आपले हात घाण करून घ्यायचे.

हलके घ्या ☺️

पुण्यातील चैत्राली कुलकर्णीच्या हत्येचं गुढ चार वर्षांनंतरही कायम.
भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत चैत्राली सक्रिय होती.तिचा मृत्यूदेह खडखवासला धरणाजवळ गूढ अवस्थेत मिळाला. Bjpच्या मोठ्या नेत्याचा सहभाग असण्याची शक्यता असल्याने त्यावेळचे व ग्रहमंत्री @Dev_Fadnavis नी योग्य चौकशी केली नाही व त्या bjp च्या नेत्याला समर्थकाला पाठीशी घालण्याचे पाप फसनवीसनी केलं आहे. त्यामुळे फडणवीस आणि त्याच्या खोटारड्या गँगने व त्या चित्रा वाघने अगोदर त्या चैत्राली कुलकर्णीला व तिच्या घरच्यांना व भाजपा मध्ये कार्यरत असलेल्या एका महिलेला न्याय का दिला नाही याचे उत्तर द्यावे. नंतर काय भुंकत राहावे.

...
व्हॅटसप आले
----

आता ही कोण ?

एबीपी माझा वर पण चैत्राली कुलकर्णी च्या हत्येबाबत तिच्या वडिलांची मुलाखत पाहिली होती. तिच्या हत्येबाबत ते स्वतः तत्कालीन मु.मं. ला भेटून सि.बी.आय. चौकशी करा म्हणुन सांगितलं होतं पण फडफडणवीस यांनी दुर्लक्ष केले... तिचे वडिल हे पुण्यातील एका नामांकित कॉलेज मधे प्राध्यापक आहेत. सर्वात दु:खदायक बाब म्हणजे चैत्राली कुलकर्णीच्या हत्येचा निषेध म्हणुन देखील कुणी त्या केवीलवाण्या माता-पित्यांच्या मागे उभा रहिले नाही.. चैत्रालीचं दुर्दैव हेच की तिच्या मृत्युची चौकशी व्हावी यासाठी ४ वर्षांनी सुद्धा त्या फडफडणविसाना किंवा त्यांच्या बोलभांड पक्ष नेत्यांना किंवा पक्ष कार्यकर्त्यांना किंवा मातृसंस्थेतील स्वयंसेवकांनाच काय पण तिच्या बांधवांना देखिल सोयर सुतक उरलेले नाही...

DJ1:
इथल्या काही प्रसिद्ध स्त्री आयडीज ना फक्त एका ठराविक ज्ञातीतील विक्टीम असेल तरच दु:खाचा कड येतो.. शिवाय गुन्हेगार त्यांच्या ज्ञातीतील असेल तर "आपण त्या गावचेच नाही" असं दाखवून चर्चा दुसरेकडे भरकवटतात.
DJ2:
आता हे आजन्म ब्रम्हचारी राहणाऱ्या किंवा लग्नाच्या बोहाल्यावरून पळून जाणाऱ्या किंवा लग्नाच्या बायकोला सोडून पळून जाणाऱ्यांना आयडोल समजणाऱ्यांना हे माहीत असेल असं वाटतं नाही Biggrin

Uhoh

असोच

अजीबात नाही. पण एकसारखी आडनावे पार हिंदु- मुस्लिम - ख्रिश्चन व बौद्ध धर्मात असल्याचे दिसल्याने आश्चर्य वाटले.

Pages