भारताचे परराष्ट्र धोरण !

Submitted by यारोंकायार1 on 18 February, 2021 - 07:40

परदेशातील होणाऱ्या घडामोडी मुळे भारतात देखील त्याचे पडसाद उमटत असतात . या धाग्यावर भारताच्या परराष्ट्र धोरण विषयक चर्चा होईल अशी अपेक्षा !

सुरूवात नेहमी प्रमाणे पाकिस्तान पासून Happy

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान चे श्रीलंका दौऱ्यातील संसदे समोर होणारे भाषण श्रीलंका सरकार ने कोवीड चे कारण सांगून स्थगित केले . पण खरे कारण इम्रान खान नेहमी प्रमाणे जम्मू काश्मीर चे तुणतुणे वाजवण्याची शक्यता होती , आणि त्यामुळे भारता बरोबर संबंध खराब होण्यापेक्षा श्रीलंका सरकार ने ते भाषण च रद्द केले अशी चर्चा पाकिस्तानी मीडिया मध्ये चालू आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे चीनसोबतचे संबंधही इतके बिघडले की आपल्या सैनिकांना जीव गमवावा लागला
चीनचे सैनिक मारले गेल्याने आपले सैनिक मेल्याचं दु:ख कमी होत नाही.>>>>>>>
बिघडू द्या ना !
संबंध सुरळीत ठेवण्याचं काम दोन्ही सरकार ने करायचे असते ना ?
मग दोन्ही देशात वितुष्ट येण्याचा दोष मोदींना देऊन शी ला क्लीन चिट द्यायची इच्छा तुम्हाला का होत आहे ?

<< कोई गया नही>>>>>>
हे मात्र त्यांनी चुकीचं स्टेटमेंट दिले होते ! >>

---- चुकीचे असेल तर एक वेळ ठिक आहे. पण ते तर विचाराअंती केलेले पण खोटे स्टेटमेंट होते. त्यांना माहित आहे, ते काय बोलत आहेत. परराष्ट्र व्यावहार तसेच रक्षा मंत्रालय जे सांगत आहे अगदी त्याच्या विरुद्ध मोदी यांचे सर्वपक्षिय सभेत विधान.
चीनने त्या स्टेटमेंटला चांगलीच प्रसिद्धी दिली.

चीनने घुसखोरी केली नाही , आपला प्रदेश बळकावला नाही असे म्हणणे म्हणजे सैनिकांचा आणि त्यांच्या त्यागाचा अपमान आहे.

>>>म्हणजे चीनसोबतचे संबंधही इतके बिघडले की आपल्या सैनिकांना जीव गमवावा लागला
चीनचे सैनिक मारले गेल्याने आपले सैनिक मेल्याचं दु:ख कमी होत नाही.

चीन तर शत्रूच आहे पण कित्येक वर्षे आपल्याच देशात दगडफेक करणा-यांच्या दगडफेकीला हातात शस्त्र असून इतके सैनिक बळी पडले, आणि एकतर्फी अतिरेक्यांशी शस्त्रसंधी, आणि श्रीलंकेत तर बिचारे शांतीसेना म्हणून तर हजारो गेले...
आणि काही तर अतिरेकी, दगडफेक करणा-यांना internet access नाही.म्हणून रडारड करत होते 2 वर्षांपूर्वी

आणि चीनबरोबर कधी गोड संबंध होते म्हणे

वडाच्या साली पिंपळाला, पळसाला, आंब्याला कशा चिकटवाव्यात ते यांच्याकडून शिकावं.

प्रत्येक काश्मिरी हा तुमच्या मते दगडफेक्या आणि अतिरेकी आहे तर हा नियम मलाही अनेक ठिकाणी लावता येईल.

मोदी शीसोबत झुल्यावर बसले होते आणि दक्षिणेत समुद्रकिनार्‍यावर फिरत होते तेव्हा चीन मित्र होता की शत्रू?

आता शत्रुत्व संपलं का?
https://www.reuters.com/article/india-china-investment-idCNL4N2KN1HJ
India is set to clear 45 investment proposals from China,

Pages