बिहार विधानसभा निवडणूक/ इतर पोटनिवडणूक २०२० निकाल

Submitted by जावेद_खान on 9 November, 2020 - 07:53

२८ ऑक्टोबर ते ०७ नोव्हेंबर २०२० दरम्यान बिहार विधानसभेची निवडणूक झाली. त्याचबरोबर इतर राज्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुका देखील याच काळात पार पडल्या. वाल्मिकी नगर (बिहार) लोकसभा पोटनिवडणूकसुद्धा ७ नोव्हेंबरला पार पडली.
बहुतेक सर्वेक्षणामध्ये महागठबंधन बिहार मध्ये बाजी मारेल असे चित्र आहे. मध्य प्रदेशात शिवराज सत्ता राखतील.

निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. त्याची चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रश्न असा आहे , राहुल गांधीला त्यांच्याच पक्षाचे नेते सिरीयसली घेत नाहीत तर जनतेने का घ्यावे ?

काँग्रेस नी आता आक्रमक राजकारण करावे.
राज्यातील नेत्यांना मोकळीक द्यावी.
आणि राहुलजी नी त्यांच्या सहकार्य साठी अत्यंत आक्रमक,तरुण ,निष्ठावंत मंडळी पसंती द्यावी.
काँग्रेस ला इंदिराजी सारखे आक्रमक नेतृत्व च पाहिजे.
इथे आक्रमक पणाच समजतो .

Happy
इतकं सगळ काँग्रेस साठी ?
जरा जास्तच होत नाही का ?
मोडेन पण वाकणार नाही अशी ती काँग्रेस आहे .
Happy

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीजीच हवेत. राहुलना हटवलं तर रस्त्यावर उतरून आंदोलन करतील..
.
..
..
तमाम भाजप कार्यकर्ते!

सनव Proud

https://www.loksatta.com/desh-videsh-news/shiv-sena-saamna-editorial-cri...

शिवसेनेचा यू टर्न - त्यांना आता नितीश मुख्यमंत्रीपदी नको म्हणे. आधी पवार फॉर्म्युलानुसार हवे होते. कौनसे खेत का गांजा चढाते है?

राजकारण एक ******** आहे. या रिकाम्या जागेत अनेक शब्द बसतील. त्यातील एक: विनोद. एन्जॉय.

मोटाभाईने नितीशला संपवायचा डाव केला आहे>>>> या वाक्याला अर्थ नाही कारण नितीश कुमारानी आपण परत निवडणुकीत भाग घेणार नाही असे आधीच सांगितले आहे.

चांगलीच टक्कर दिली तेजस्वी यादवने>>>> बिहारचे राजकारण जाती प्रधान आहे नाही तर चाराचोर लालू यादव १५ वर्शे कसा निवडून येऊ शकला असता? म्हणुन तेजश्वीच्या पक्षाला तो फक्त ८वी पास असूनही एव्हढी मते मिळाली आहेत.

८वी पेक्षा बरेच जास्त आहे हे नक्की. तेजश्वी आला असता तर त्याच पिता खुर्चीमागून सरकार चालवणार होता म्हणून लोकानी तेजश्वीच्या पक्षाला जरा कमी मते दिली आहेत.

भक्कम , दिग्विज यी bjp पेक्षा जास्त जागा आहेत तेजस्वी च्या हे विसरले का.
निवडणूक आयोग पासून बटिक मीडिया शी पण लढावे लागते बाकी पक्षांना.

नितीश कुमारानी आपण परत निवडणुकीत भाग घेणार नाही असे आधीच सांगितले आहे

Proud

ते असे बोलले होते एके दिवशी दुपारी,

मग लगेच दोन तासाने बोलले की मी शेवटची सभा असे बोललो होतो , शेवटची निवडणूक नव्हे. शेवटची सभा म्हणजे या इलेक्शन मधली शेवटची सभा.
मी पुन्हा येईन , मी पुन्हा येईन , मी पुन्हा येईन

बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु केली आहे. नितीश कुमारच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बिहारमध्ये एनडीएच सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु असताना तेजस्वी यादव यांनी मात्र आमदारांना महागठबंधन सरकार स्थापन होईल असं सांगत आमदारांना तयार राहण्याचा आदेश दिला आहे. यामुळे बिहारमध्ये पुढील काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळण्याची शक्यता आहे. निकालानंतर पहिल्यांदाच तेजस्वी यादव यांनी नवनियुक्त आमदारांसोबत बैठक घेत सर्वांचे अभिनंदन केले. तसंच पत्रकार परिषदही घेतली.

बिहारात सकाळी पोस्टल वोट मोजत होते तेंव्हा गठबंधन 128 वर पुढे होते

आणि दुपारी इ व्ही एम मोजू लागल्यावर भाजप 128 वर दिसू लागले.

Proud

भक्कम , दिग्विज यी bjp पेक्षा जास्त जागा आहेत तेजस्वी च्या हे विसरले का. >>>>
हेमंत ,
तुम्ही अगोदर तुमची एकच भूमिका ठरवा बरं !

कधी बिहारींना शिव्या घालता तर कधी त्यांचं कौतुक करताय !

नितीश कुमार पण बिहारी च आहे आणि bjp चे तेथील निवडून येणारे पण बिहारी च आहेत.
पण महाराष्ट्र चा द्वेष करणारा हा bjp पक्ष नकोस वाटतो.
म्हणून तेजस्वी जवळचा.

बिहारमध्ये भाजप सीएम पदाच आश्वासन पाळतेय. मग महाराष्ट्रात भाजप न शिवसेनेला दिलेलं आश्वासन का पाळलं नै? का शिवसेनेला आश्वासन दिलेलंच नव्हतं अन शिवसेनेनच भाजपला डच्चू दिला?

कै कळत नै.

https://www.loksatta.com/maharashtra-news/pravin-darekar-raised-question...

शिवसेना खासदार संजय राऊत हे परस्पर विरोधी भूमिका मांडून काय साधत आहेत याचं आश्चर्य वाटतं. बिहार निवडणुकीचे निकाल आले तेव्हा म्हणाले की नितीश कुमार हे मुख्यमंत्री होतील. त्यानंतर संजय राऊत म्हणाले की तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेले नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्यास तो बिहारच्या जनतेचा अपमान ठरेल. जर हाच नियम महाराष्ट्रात लागू केला तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का? असा प्रश्न आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.

बिहारबाबत शिवसेना सातत्याने भूमिका बदलताना दिसते आहे. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाले तर श्रेय शिवसेनेला जाईल असं संजय राऊत म्हणाले होते. आता आज संजय राऊत यांनी उलट भूमिका घेतली आहे. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केल्यास तिथल्या जनतेचा, जनाधाराच अपमान होईल असे संजय राऊत म्हणत आहेत. शिवसेना मांडत असलेली ही भूमिका दुतोंडी नाही का? असाही प्रश्न प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.

>>कै कळत नै.<<

फडणवीसांनी दिले की उत्तर की भाजपा दिलेला शब्द पाळतो आणि न दिलेल्या शब्दासाठी कितीही दबाव आणला तरी तडजोड करत नाही म्हणून!

भारतीय जनता पार्टीने एनडीएमधील आपला सहकारी पक्ष असलेल्या जदयूला मोठा झटका दिला आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजपाने अरुणाचल प्रदेशमध्ये नितीश कुमार यांच्या सहा आमदारांना फोडलं आहे. अरुणाचलमध्ये जदयूचे सात आमदार आहेत, त्यापैकी सहा आमदारांनी आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/in-arunachal-pradesh-six-out-o...

असा तेजश्वी यादव येथील अनेकाना जवळचा वाटतो.>>>>>
मग या बाबत हेमंत यांचे बिहार बद्दल विचार एकदम परखड आणि बरोबर आहेत . बिहारी लोकांची हीच मानसिकता त्यांच्या राज्याच्या अधोगती ला कारणीभूत ठरली आहे .

भाजप , नितीश ऐवजी एक वेळेस ओवसि आणि काँग्रेस चे भरपूर आमदार निवडून आले असते तर बिहारी लोकांची डोकी जागेवर आहे समजू शकले असते
पण बिहार ला वर्षानुवर्ष लुटणाऱ्या लालू च्या पक्षाला भरपूर मतदान करणाऱ्यांना शिक्षण विकास शी काही घेण देणे नाही असेच सिद्ध होते !
त्याच प्रमाणे लालू / तेजस्वी चे कौतुक करणारे उलट्या खोपडीचे आहेत असे मानावे लागेल..

Pages