दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास? हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 September, 2019 - 15:57

दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास?

हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

विकासाच्या नावाखाली आरे येथे मोठी वृक्षतोड होणार. मुंबईची फुंफ्फुसे निकामी करणार. त्याविरोधात चला पेटीशन साईन करूया म्हणून उत्साहात मी सुद्धा माझे वृक्षप्रेम आणि त्याहून कांकणभर जास्त असे मुंबईप्रेम दाखवत त्याला समर्थन दिले. माझ्यासोबत चार लोकांना जबरदस्ती द्यायला लावले.

पण आता आरेला कारे करत बातमीची दुसरी बाजू काही अभ्यासू लोकं समोर घेऊन येत आहेत. आरे वाचवा म्हणणारयांवर बेगडी पर्यावरणप्रेमीचा शिक्का मारला जात आहे. तसेच मुंबईच्या विकासासाठी वृक्षतोड किती गरजेची आहे हे सांगत आहेत.
त्यात आज सकाळीच एक बातमी कानावर आली की या विकांताला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबईतील उच्चशिक्षित विकासप्रिय नागरिक मेट्रो समर्थनासाठी जमणार आहेत.
बर्रं बातमीसोबत सोबत एक भावनिक आवाहन होते,
तुमचा एक तास वसई-कल्याण च्या लोकलमधून पडणाऱ्याचा जीव वाचवू शकतो.

एकंदरीत दोन्ही बाजूंनी मला भावनिक करून टाकले आहे.

यात माझे एक सूक्ष्म निरीक्षण असेही आहे की मित्रयादीतले भाजप समर्थक मेट्रो झिंदाबाद टीमकडून उतरले आहेत तर सरकार विरोधक आरे बचाव गटात सामील आहेत.
आणि जेव्हा असे एखाद्या विषयात राजकारण येते तेव्हा काय खरे आणि काय खोटे हे जाणून घेणे माझ्यासाठी अवघड होते.

मायबोलीचर्चेत नेहमीच चांगली आणि योग्य माहीती मिळते हा आजवरचा अनुभव म्हणून मुद्दाम ईथे हे विचारतोय.

माझे वैयक्तिक मत म्हणाल तर आपण विकासाच्या रस्त्याने विनाशाकडे जात आहोत. पण याचा अर्थ असा नाही की मी मेट्रोला वा विकासाला विरोध करतोय. विनाश असा ना तसा आज ना उद्या होणारच आहे. तर त्याआधी विकास उपभोगून घेतलेला काय वाईट Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<< त्यात जवळजवळ ५ लाख झाडांपैकी ३ हजार झाडे कापली जातील >>>
अशा परिस्थितीत १५ हजार नवीन झाडे का लावत नाही? किमान ५ हजार जरी जगली आणि वाढली तरी चांगलेच आहे आत्तापेक्षा.

“The best time to plant a tree was 20 years ago. The second best time is now.”
– Chinese Proverb

<< ब्रिटीशांनी ९० वर्षांत ९४,००० किमीची रेल्वे बांधली. स्वातंत्र्यानंतर भ्रष्ट
काॅंग्रेसने ६५ वर्षांत ९,००० किमी. >>

----- युनिस, हे आकडे कुठे मिळाले ते संदर्भ मिळतील का? नेटवर मला २०१७ चा काही डेटा मिळाला आहे, पण ट्रॅक लेंग्थ (कशी मोजली आहे) चा काही ताळमेळ बसत नाही.
http://www.indianrailways.gov.in/railwayboard/uploads/directorate/stat_e...

१९४७ च्या नंतर (आणि २०१४ च्या आधी) (अ) किती मिटर गेज, नॅरो गेज चे ब्रॉड गेज मधे रुपांतर झाले ?
(ब) किती सिंगल ट्रॅक चे डबल ट्रॅक मधे रुपांतर झाले ?
(ड) किती मार्गांचे electrification झाले ? आम्ही लहान असतांना कोळशाचे इंजिन (खिडकीत बसल्यावर डोळ्यात कोळसा जायचा) होते, मग भुसावळला गाडीला इलेक्ट्रिकचे (AC) इंजिन लागायचे, आणि पुढे इगतपुरीला DC इंजिन.... या प्रत्येक ठिकाणी गाडी २०- ते २५ मिनीटे थांबायची.

मला ज्या मार्गांबद्दल माहित आहे ते एक केवळ उदाहरण म्हणून लिहीतो. इतरत्र किती आणि कसा विकास (?) झालेला आहे याची आकडेवारी मिळवण्याचा प्रयत्न करतो.

आज (२०१४ च्या आधी) हावरा ते मुंबई आणि दिल्ली ते मुंबई संपुर्ण मार्गाचे electrification झाले आहे. या मार्गांवर किती ठिकाणी आधी कोळशाचे + डिझेल इंजिने धावायची. अनेक मार्ग दोन पदरी केले आहेत, आणि काही ठिकाणी चौपदरी करण्याच्या योजना आहे.

आज भारत इतर काही देशांना रेल्वेचे इंजिने निर्यात करतो (यात पाक चे नाव पण वाचनात आले). यापैकी किती निर्यात २०१४ च्या आधी झाली हे मला माहित नाही पण माहिती असेल तर वाचायला आवडेल.
https://www.quora.com/Does-Indian-Railways-export-locos-to-any-countries

त्यांच्या लॉजीकने त्यांना काँग्रेस काळात वीज पोचलेली गावे व रामराज्यात वीज पोचलेली गावे ह्यांची आकडेवारी द्यायला सांगा.

काँग्रेस समर्थकांना इथे लिहिताना पाहून विनोदी वाटतंय. त्यांच्या पक्षाने गेल्या सत्तर वर्षात महाराष्ट्रात मराठी टक्का कमी कसा होईल, परप्रांतिय इथे येऊन दादागिरी करायला बलाढ्य कसे होतील याकडेच फक्त लक्ष दिलंय. रिझल्ट दिसतोच आहे. इतर स्टेट्समध्ये स्थानिक लोकाधिकार आणि महाराष्ट्रात मात्र मराठीचे पध्दतशीर खच्चीकरण असे डबल स्टँडर्ड यांचे कायम राहिलेत. वर 'ब्लेम इट ऑन मोदी' चा गेम खेळायला हे मोकळे. लवासा किंवा अँबी व्हॅली, पलावा सिटी यासारख्या प्रक्ल्पांना चालना यांच्याच कार्यकाळात मिळाली. आता यांना पर्यावरणाचा खोटा पुळका येतोय. मुळशी मावळ ते पार हडपसरच्या पुढे दोन्ही टोकांना पुण्याचे गुंठा गुंठा तुकडे करुन परप्रांतियांची राहायची सोय कोणाच्या सत्ताकाळात केली गेली? इतर सदस्यांना पर्सनल ट्रोलिंग करण्याव्यतिरिक्त ते काही करु शकत नाहीत.

<< राजेश आजोबा, ते युनिस आजोबा ब्रिटिशांनी बांधलेलं आणि कॉंग्रेसने बांधलेलं अशी तुलना करताहेत बघा.
त्यांना सांगा हे. >>
-----
ब्रिटन कालीन झालेली बांधकामे (ब्रिजेस, रेल्वे ट्रॅक्स) त्यांची मजबूती अचंबित करणारी आहे. त्यांनी किती विचार केत्यांनी, सचोटीने काम केले असेल हे जाणवते. तसे आज होताना दिसत नाही ? त्या पुतळ्यासाठी झालेला नक्की खर्च माहित नाही Gravity मुळे पाणी खाली घसरले...
https://timesofindia.indiatimes.com/city/vadodara/rainwater-dripping-ins...

पडला आहे, नैतर चार गुंठे जागा घेऊन लाल चिर्याचे घर बांधून बाजूला साठ फुटी रोड ठेवला तर मला थोडेच नको आहे ?

ब्लॅक कॅट ह्यालाच नियोजन म्हणतात .
दुबई ४००० sq km च्या आसपास area आणि लोकसंख्या २५ लाख .
मुंबई ६०० sq km area आणि लोकसंख्या ३ करोड च्या आसपास .
आणि बाकी देश ओसाड पडलाय .
खेडे गावात फक्त म्हातारी माणसे आहे सर्व तरुण मुंबई delhi आणि शहरात गाढवासारखी राहत आहे नी श्वास घेण्या साठी सुद्धा जागा नाही अशा वाहनातून प्रवास करत आहे .
हा विचार कधी येतो का डोक्यात .

>><<< त्यात जवळजवळ ५ लाख झाडांपैकी ३ हजार झाडे कापली जातील >>>
अशा परिस्थितीत १५ हजार नवीन झाडे का लावत नाही? किमान ५ हजार जरी जगली आणि वाढली तरी चांगलेच आहे आत्तापेक्षा<<
भिडेबाईंच्या त्या लेखानुसार ६ पट नविन झाडं लावली जाणार आहेत. या मुद्द्यावर विरोधकांची अळीमिळी गुपचिळी का? प्रॉब्लेम डिफॉरेस्टेशनचा आहे कि अजुन काहि?..

आयत्या वेळी मोडता घातला आणि 2 वर्षे जरी पूढे ढकलले तर 30 % कोस्ट वाढते

तिथल्या झाडाला कुठला राजकारणी पाणी घालणार नाही , ना मेट्रोनेही फिरणार नाही,

प्लॅनिंग पासून प्रत्यक्ष आणण्यापर्यंत पूर्ण वेळ ह्यांचेच सरकार आहे , मग आता विरोध नेमका कोण कुणाला करत आहे ?

ह्यालाच नियोजन म्हणतात .

हो , आणि नियोजन शिकवले नेहरू आणि इंदिराजी नी, एक मुलगी अन दोन्ही सुना खासदार,

नैतर घरात 6 असलेले अजून नेहरू अन काँग्रेसच्या नावाने रडत असतात, चुलीचा धूर डोळ्यात गेला म्हणून .

त्या खेड्यात राहाणार्यानी 4,6 काढले म्हणूनच लोक शहरात आले , अन्यथा घरात एकटेच असते तर वडनगरात चहाचा ठेला घालून बसले असते , पण पोटा पाण्याला वाराणशी गाठावी लागली,
ह्याला इंग्रजानी तर काय करायचे अन नेहरूंनी तरी काय करायचे ?

>>>>>प्रॉब्लेम डिफॉरेस्टेशनचा आहे कि अजुन काहि?..<<<<<
प्रॉब्लेम हा आहे की , अर्रेच्च्या अशी काम आम्ही कधीही केलेली नाहीत मग आता ह्यांना कशी करु द्यायची. हे काम करणार मग लोकांना झालेली कामे दिसणार, आम्ही म्हणणार मोदींजी लाट काय तरंग सुद्धा नाही, मग परत निवडणुकीत आमच डीपाॅझीट जप्त होणार. नको असल वाईट स्वप्न. त्यापेक्षा ह्याच्या कामात अडथळे आणुयात मग भले त्यासाठी चीन किंवा पाकिस्तानचे पाय धरायला लागले तरी बेहत्तर !!!!

अरे! प्रतिसाद लिहिता लिहिता मोठा झाला आणि खूप वेळ लागून मागच्या पानावर गेला. उघडून पाहिले तर शेवटी प्रतिसाद दिसलाच नाही. कधी कधी असे होते, पण इथे प्रतिसाद फारच वेगाने आलेले दिसताहेत.
चांगलेच आहे. चर्चा ही झालीच पाहिजे.

अरे , आदित्य ठाकरे तर मोदी कळपमधलेच ना ? त्यानी कधी चीन पाकचे पाय धरले ?

अन नागपूर मेट्रोचे काँट्रॅकट तर चीनच्या पायाशी सादर केले , असे म्हणतात , रेशिम किडे झोपलेत की काय ?

<< ब्रिटीशांनी ९० वर्षांत ९४,००० किमीची रेल्वे बांधली. स्वातंत्र्यानंतर भ्रष्ट
काॅंग्रेसने ६५ वर्षांत ९,००० किमी. >>

----- युनिस, तुम्ही वर लिहीले आहे आणि तुमच्याकडे माहिती असावी म्हणून पुन्हा डकवतो.

हे आकडे कुठे मिळाले ते संदर्भ मिळतील का? नेटवर मला २०१७ चा काही डेटा मिळाला आहे, पण ट्रॅक लेंग्थ (कशी मोजली आहे) चा काही ताळमेळ बसत नाही.
http://www.indianrailways.gov.in/railwayboard/uploads/directorate/stat_e...

१९४७ च्या नंतर (आणि २०१४ च्या आधी) (अ) किती मिटर गेज, नॅरो गेज चे ब्रॉड गेज मधे रुपांतर झाले ?
(ब) किती सिंगल ट्रॅक चे डबल ट्रॅक मधे रुपांतर झाले ?
(ड) किती मार्गांचे electrification झाले ? आम्ही लहान असतांना कोळशाचे इंजिन (खिडकीत बसल्यावर डोळ्यात कोळसा जायचा) होते, मग भुसावळला गाडीला इलेक्ट्रिकचे (AC) इंजिन लागायचे, आणि पुढे इगतपुरीला DC इंजिन.... या प्रत्येक ठिकाणी गाडी २०- ते २५ मिनीटे थांबायची.

मला ज्या मार्गांबद्दल माहित आहे ते एक केवळ उदाहरण म्हणून लिहीतो. इतरत्र किती आणि कसा विकास (?) झालेला आहे याची आकडेवारी मिळवण्याचा प्रयत्न करतो.

आज (२०१४ च्या आधी) हावरा ते मुंबई आणि दिल्ली ते मुंबई संपुर्ण मार्गाचे electrification झाले आहे. या मार्गांवर किती ठिकाणी आधी कोळशाचे + डिझेल इंजिने धावायची. अनेक मार्ग दोन पदरी केले आहेत, आणि काही ठिकाणी चौपदरी करण्याच्या योजना आहे.

आज भारत इतर काही देशांना रेल्वेचे इंजिने निर्यात करतो (यात पाक चे नाव पण वाचनात आले). यापैकी किती निर्यात २०१४ च्या आधी झाली हे मला माहित नाही पण माहिती असेल तर वाचायला आवडेल.
https://www.quora.com/Does-Indian-Railways-export-locos-to-any-countries

उदय, युनिस आजोबांना वाटतंय ब्रिटिशांनी १८५३ किंवा त्यासुमारास बांधलेलं्व्ह्वीटी स्टेशनच तेव्हापासून पुरतंय.
तसंच चर्चगेट स्टेशनबद्दल ते काय म्हणालेत बघा.
राजेश आजोबा whatsapp युनिव्हर्सिटीबद्लल जे म्हणतात, ते हेच असावं.

भारताची आर्थिक राजधानी म्हणुन मिरवणार्या मुंबईची व मुंबईकरांची छान पिळवणुक भ्रष्ट काॅंग्रेसने केली. स्वातंत्र्रानंतर ७० वर्षे लागली पहीली मेट्रो धावायला . देशातली पहीली मेट्रो कोलकता मध्ये आली. दिल्लीतली मेट्रो
यशस्वी झाल्यावर मुंबईची आठवण आली. कदाचीत कोलगेट, २जी नंतर मुंबई मेट्रोचा नंबर आला असता !! पण नशिब आमच चांगल की मोदीजी आले !!!

सच्याची चर्चगेट स्टेशनाची इमारत १९६०च्या आगेमागे बांधली गेली. मोरारजी देसाई यांनी त्याचे उद्घाटन केले असे काहीसे वाचल्याचे आठवते. तेव्हा चारच फलाट होते. मग मला वाटते ८०च्या दशकात पूर्वेकडच्या फलाटांची जोड दिली गेली. (असावी.) गूगलवर मिळेलच.

जे झाले ते झाले .
पण इथून पुढे कठोर पने नियोजन नाही केले तर देशात सर्व शहर बकाल आणि खेडी सूनासान होणार हे मात्र त्रिवार सत्य आहे .
आज भारतात जगातील उत्तम शहरांना तोड देणारे एकसुधा शहर नाही आणि ह्याची आपल्याला लाज वाटत नाही ह्याचे खरोखर आश्चर्य वाटते .
लोकसंख्येचे नियोजन केलेच पाहिजे .
उत्तरेतील बिहार आणि उत्तर प्रदेश ह्या दोन राज्यातील भरमसाठ लोक संख्येला देशातील सर्व भागात सामान वाटप करणे गरजेचं आहे .
पूर्ण देश साठी भु भाग आणि लोकसंख्या ह्यांचे प्रमाण निश्चित करून त्याची अंमलबजावणी कठोर पने केली पाहिजे .
उगाच राज्य घटनेचा आधार घेण्याची गरज नाही अडचण वाटली तर घटना बदला..
नियोजन नाही केले तर हा देश फुकट लढाई न करता ताब्यात घ्या असे जरी जाहीर केले तरी कोणताच देश त्या साठी तयार होणार नाही .
आणि हे सर्व करण्यासाठी मजबुत bjp सारखेच सरकार हवे .
ह्याला काय वाटेल आणि त्याला काय वाटेल हे भावनिक पॉइंट काही कामाचे नाहीत.
हुकुम शाही पद्धतीने अत्यंत निष्ठुर पने देश हिताचे निर्णय घेण्याची आता वेळ आली आहे

{उत्तरेतील बिहार आणि उत्तर प्रदेश ह्या दोन राज्यातील भरमसाठ लोक संख्येला देशातील सर्व भागात सामान वाटप करणे गरजेचं आहे .}
फक्त भारतात का? जगभरात का नको?
आणि तुमच्या टीममेंबरना, विशेषतः स्वतःच स्थलांतर केलेल्यांना चालेल का हे?

<< सच्याची चर्चगेट स्टेशनाची इमारत १९६०च्या आगेमागे बांधली गेली. मोरारजी देसाई यांनी त्याचे उद्घाटन केले असे काहीसे वाचल्याचे आठवते. तेव्हा चारच फलाट होते. मग मला वाटते ८०च्या दशकात पूर्वेकडच्या फलाटांची जोड दिली गेली. (असावी.) गूगलवर मिळेलच.>>

------ CST - VT चा पण विस्तार झालेला आहे... आज १८ प्लॅटफॉर्म्स आहेत, VT स्टेशन बांधले गेले त्याकाळात बहुधा १८ प्लॅटफॉर्म्स नसावेत.

उदय फ्लॅट फॉर्म नका मोजू .
स्टेशन बाहेर असलेले रस्ते त्याची रुंदी.
लोक वस्ती ह्या सर्वांचा विचार केला तरच तुमच्या लक्षात येईल नियोजन म्हणजे काय

वडनगर ते वाराणसी हेही स्थळांतरच ना ?

बिचार्या एका वारांणशीवाल्या खासदारचा जॉब गेला

Pages