लेखाची प्रेरणा ईथून आली असली तरी माझी समस्या जेन्युईन आणि त्यापेक्षा जास्त महत्वाची आहे.
तर मुंबई म्हटले तर जीवाची मुंबई ! त्यात आमची तिथे तीन तीन घरे ! ईन द हार्ट ऑफ द सिटी, दादर - माटुंगा - वडाळा या आमच्या जोडीने फिरायच्या जागा. आणि त्यातही लाडके ते फाईव्ह गार्डन. एका गार्डनमध्ये वृद्ध चकाट्या मारताहेत, दुसर्या गार्डनमध्ये पोरं क्रिकेट खेळताहेत, तिसर्यामध्ये त्यांच्या आया व्यायाम करताहेत, चौथ्यामध्ये कोणी नाही तर कुत्रे तंगड्या ताणून पसरले आहेत. यात पाचवे फाईव्ह गार्डन आमचे.. म्हणजे आमच्यासारख्या प्रेमी युगुलांचे.
हातात हात, खांद्याला खांदा, नजरेला नजर, आणि दिवसभरच्या गप्पा.. !
ती सेंट्रल रेल्वेच्या माटुंगा स्थानकावर उतरायची आणि त्याचवेळी मी दक्षिण मुंबईकर, हार्बर लाईनच्या वडाळा स्टेशनवर उतरायचो. ईथून आमचा एकमेकांच्या ओढीने, एकमेकांच्या दिशेने प्रवास सुरु व्हायचा. ते फाईव्ह गार्डनमधील पाचव्या बागेत आमची गाठ पडायची. तिथले ते संध्याकाळचे चार साडेचारच्या सुमारास, उतरत्या तांबूस कोवळ्या उन्हातले, खेळणार्या मुलांच्या कोलाहलापासून आणि गाड्यांच्या वर्दळीपासून दूर, शांत, आल्हाददायक वातावरण.. हातांना हातांची उब पुरायची, गप्पांसोबत तोंडी लावायला एक सुकी भेळ पुरायची.
तिथल्या पानाफुलांनी आमच्या कित्येक आणाभाका ऐकल्या आहेत, आमच्या कित्येक स्वप्नांना त्यांच्याच कुशीत पालवी फुटल्या आहेत. तिथल्या गवतावर आपल्याच मस्तीत फिरणारा मुंगळा न मुंगळा आमच्या प्रणयाचा साक्षीदार बनला आहे..... हे असे आणि बरेच काही, मी तासन तास त्या आठवणीत रमून पानेच्या पाने ईथे लिहू शकतो.
पण प्रश्न तो नाहीये !
गेले ते दिवस ...
आता आम्ही दोघेही जॉबला लागलो आहोत. आमच्या आयुष्यातील रम्य संध्याकाळ आता रात्री आठनंतरच उजाडते. कधी ऑफिसमधून बाहेर पडताना अस्ताला जाणार्या सूर्याचे दर्शन झालेच तर तो क्षण एखादे ग्रहण बघितल्यासारखे एंजॉय करत आठवणीत जपला जातो. आणि हे भाग्य एकाच्या नशिबी आलेच तरी दुसर्याच्या नशिबी त्या दिवशी कामाचे भोग असतातच. पण कधीतरी चारसहा महिने वर्षभरातून एखादा अंगारकी संकष्टीचा योग येतो जेव्हा आम्ही दोघेही वेळेत ऑफिसमधून सुटतो. गेल्या महिन्यात असाच एक योग आला आणि आम्ही आमच्या त्या कॉलेज जीवनाच्या रम्य आठवणींना उजाळा द्यायला फाईव्ह गार्डनला जायचा प्लान बनवला. फरक ईतकाच की यावेळी एक वडाळा अन एक माटुंगा असे न करता दोघेही एकत्रच दादर स्टेशनला उतरलो.
आमचा तो फेव्हरेट बाक अजूनही तसाच होता. पण त्या दिवशी तिथे आधीच बूकींग झाले होते. नेक्स्ट फेव्हरेट त्यापलीकडे दोन बाकं सोडून होता. तिथे तर दोन जोडपी एकाच बाकावर मध्ये एक पिशवी ठेवून बसले होते. गपगुमान आपापले काम करत होते. एकमेकांच्या अध्यात न मध्यात पडता सीमेच्या अलीकडे आणि पलीकडे ईतके प्रेम नांदताना असे पहिल्यांदाच बघत होतो. कडेकडेने फेरी मारून एकूण एक बाक तपासला. फेव्हरेट बाकाचा माज केव्हाच गळून पडला होता. जमिनीवर गवतात पेपर टाकून बसायचीही तयारी व्हावी ईतक्या अपेक्षा खाली उतरल्या होत्या. पण तिथेही काही शौकीन निव्वळ प्रेक्षकाची भुमिका वठवत बसले होते. या 4-जी च्या जमान्यात मोबाईलवर हवे ते, हवे तेव्हा आणि हवे तितके बघायची सोय उपलब्ध झाली आहे तरी काही निसर्गप्रेमी लोकांना त्याच्या सानिध्यातच रमायचे असते आणि तिथलेच नेत्रसुख मिळवायचे असते.
एकंदरीत जागा शोधण्यातच अर्धा तास खर्च झाल्याने आणि त्या नादात चालून चालून पाय दुखू लागल्याने आम्ही नाईलाजाने हॉटेलातच बसण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या हॉटेलांचे हे एक चांगले असते. जागा लगेच मिळते ! तशी ती मिळाली देखील. पण गार्डनमध्ये जागा न मिळाल्याचे शल्य मात्र बोचत राहिले. मिळाली असती तरी तिथले वातावरण पाहता तिथे किती मन रमले असते आणि किती मनमोकळ्या गप्पा झाल्या असत्या याबद्दल शंकाच होती.
राहून राहून मनात तेच विचार येत होते. जसे हॉटेलमध्ये अॅडवान्स बूकींग करता येते, किंवा गेला बाजार नंबर लावत तो येईपर्यंत उपाशी पोटी ताटकळत उभे राहता येते, तसे गार्डन बाबत शक्य होऊ शकत नाही का?
त्यातही ज्यांना फक्त हातात हात घेत गप्पा मारायच्या आहेत आणि ज्यांना त्यापुढे जाऊन काही घडवायचे आहे अश्यांसाठी एकाच गार्डनमध्ये दोन स्वतंत्र कप्पे बनवता येणार नाहीत का?
एकेकाळी ज्या रम्य संध्याकाळी आम्ही फाइव्ह गार्डनच्या परीसरात उपभोगल्या तो अनुभव आता आमच्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही का.......???
असो, तर ज्यांना आपल्या आयुष्यातील या रम्य आठवणी निसंकोचपणे आठवायच्या आहेत आणि जे आताही अनुभवत आहेत अश्या सर्वांचे या धाग्यावर स्वागत आहे. फक्त मला एवढेच सांगा, जे शीर्षकात विचारले आहे... बागेत बसायला जागा कशी मिळवावी
यावरुन आठवलं.
यावरुन आठवलं.
उगीच आगावूपणा अधिक काहीतरी डेरिंग केल्याचा आभास.
आमच्या डिप्लोमा कॉलेजात रविवारि दुपारी झाडाखाली कट्ट्यावर भरपूर जोडपी बसायची.
आम्ही हॉस्टेल मधून कॉलेज ला ये जा करताना त्यांना आमची जड पुस्तकं सांभाळायला द्यायचो
हे काय समजले नाही?
हे काय समजले नाही?
पुस्तके त्यांना सांभाळायला द्यायचात तर कॉलेजात काय न्यायचा?
की कॉलेजच बागेत होते?
की कॉलेजचे बाक बागेत आणून ठेवले होते?
ते त्या जड पुस्तकांना सांभाळायचे कसे? म्हणजे ते एकमेकांच्या नजरेत नजर घालायचे की तुमच्या पुस्तकावर नजर ठेवायचे?
जर एकमेकांवरची नजर काढून तुम्ही त्यांना ती तुमच्या पुस्तकावर ठेवायला लावत असाल तर ही प्रेमाची हत्या नाही का झाली?
मुळात ते आपले कॉलेज सोडून तुमच्या कॉलेजच्या बागेत पुस्तके सांभाळायला यायचेच का?
त्यांचे कॉलेज ज्या बागेत होते तिथे बाक नव्हते का?
होते तर त्यांना मिळायचे नाही का?
कॉलेजच्या बागेतला बाक मिळवायला डोनेशन लागायचे का?
बरं मी बाक घेतला भरमसाठ डोनेशन भरून पण मला जोडीदारच नाही मिळाला तर तो बाक भाड्याने देता यायचा का?
का तिथे बसून जड पुस्तके सांभाळण्याचा व्यवसाय करावा लागायचा?
अहो काहीतरी समजवा...
अरारा
अरारा
थोडी उत्तरे देते.
इतके प्रश्न उत्तर देईपर्यंत माझे मुलच माहिती म्हणून या धाग्याचा वापर करेल
कॉलेज ते हॉस्टेल रस्ता होता.त्यावर झाडी आणि प्रत्येकी २ फरश्या वाला कट्टा होता.शनी रवी होस्टेल ची मुलं लायब्ररीत अभ्यासाला जायची.(हे आपलं उगा! हॉस्टेल ला दिवसा वीज बंद आणि रात्री अंधार पडल्यावरच वीज कनेक्शन चालू व्हायचे म्हणून.)
तर ही मुलं लायब्ररीत जाताना जड पुस्तकं घेऊन जायची.मग एखाद्या पंटर ला तिथूनच क्रिम रोल किंवा कचोरी खायला जायची लहर यायची.
मग आम्ही पूर्ण होस्टेल ला परत जाऊन पुस्तक ठेवण्या ऐवजी या जोडप्यांना 'अहो, तुम्ही अजून अर्धा तास इथे असाल तर हे पुस्तक इथे ठेवून जाऊ का' म्हणून विनंती करायचो.जोडपी भिडस्त असल्याने 'चल फूट' वगैरे न म्हणता शांतपणे पुस्तकं सांभाळायची.
देवा केवढी ती डेअरींग..
देवा केवढी ती डेअरींग..
कधी त्या टवळ्यांचे आपापसात बिनसले आणि रागाच्या भरात एकमेकांच्या तोंडावर तुमची पुस्तके कराकरा फाडली... किंवा त्यांची नियतच फिरली आणि चला विकूया म्हणत तुमची पुस्तके घेऊन पळाली.. भिती नाही वाटायची
परस्पर विश्वासावर दुनिया कायम
परस्पर विश्वासावर दुनिया कायम आहे
ऋन्मेष..अपग्रेड हो...
ऋन्मेष..अपग्रेड हो... बांद्राला जा...सीलिंक जवळच्या गार्डनजवळ..
लांब पडते. त्यापेक्षा आपले
लांब पडते. त्यापेक्षा आपले नरीमन पॉईंट बेस्ट. सायकलवर टांग मारली की पोहोचलो कडेकडेने..
नरीमन पॉईंटला कुठलं गार्डन
नरीमन पॉईंटला कुठलं गार्डन आहे??
अनु भारीच ग तुम्ही
अनु भारीच ग तुम्ही
नरीमन पॉईंटला कुठलं गार्डन
नरीमन पॉईंटला कुठलं गार्डन आहे??
>>>>>
समुद्र आहे ना. तो पुरतो आम्हाला. तरी बागच हवी झाल्यास राणीबागेत जाऊन यायचे..
व्यत्यय: कधी होतास खालसा ला?
व्यत्यय: कधी होतास खालसा ला? मी ११वी/१२वी तिथूनच केलय.
तेंव्हा पारसी काॅलनीतून फिरताना रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्या का हलायच्या हे एक कोडं होतं आम्हाला.

अरुण ते कोडे सुटायला पीके
अरुण ते कोडे सुटायला पीके प्रदर्शित व्हायची वाट बघावी लागली नाही ना
हाहाहाहा. सुदैवाने पीके
हाहाहाहा. सुदैवाने पीके प्रदर्शित व्हायच्या बरंच आधी ते कोडं सुटलं.

अवांतर - खालसा कॉलेजचा माझा
अवांतर - खालसा कॉलेजचा माझा एकदाच संबंध आला आहे. ट्रेनमध्ये रोज दिसणारी आणि नजरानजर होताच हसणारी, वडाळा स्टेशनला उतरून नक्की जाते कोणत्या कॉलेजला हे शोधायला एका मित्राला सोबत घेऊन तिला फॉलो केले होते. ती खालसा कॉलेजमध्ये शिरली आणि पाठोपाठ आम्ही दोघेही. तिचा अगदी क्लासही बघून आलो होतो जसे काही तिथेच एडमिशन घेऊन दररोज तिच्या क्लासबाहेर फिल्डींग लावणार होतो. असो, तर नंतर हा किस्सा मित्रांना कॉलेजमध्ये जाऊन सांगितला तेव्हा त्यांनी घाबरवले की ते सरदारजी लोकांचे कॉलेज आहे. त्यांच्या हाताला लागला असता तर बुकलून काढला असता. मग पुढे ती मुलगीही सरदार असल्याचे ध्यानात आले तसे आम्ही ट्रेनच बदलली. कारण मुलगी हसली तर फसली असा अर्थ काढणारया कितीतरी मुर्खांचे आयुष्य उध्वस्त होताना पाहिले आहे मी.. असो, हा विषय कधीतरी वेगळ्या धाग्यावर
समुद्र आहे ना. तो पुरतो
समुद्र आहे ना. तो पुरतो आम्हाला. तरी बागच हवी झाल्यास राणीबागेत जाऊन यायचे..>>>>
राणीच्या बागेत जाताना जरा जपुन. घराजवळ असलयाने शेजारचे आजोबा समोर येउन विचारतिल की हीच का रे संस्क्रुती आणि मग गफ्रे सोडुन जाईल.
(No subject)
चान्स मारो आजोबा का?
चान्स मारो आजोबा का?
नाही हो, राणीबागेत आम्ही
नाही हो, राणीबागेत आम्ही संस्कृती, सभ्यता, शालीनता वगैरे सारे काही जपतो. मुक्या प्राण्यांच्या बालमनावर परीणाम होऊ नये याची काळजी घेतो. किंबहुना घ्यावीच लागते. तिथले नियम फार कडक आहेत. लवबर्डसची जोडी दिसताच पकडून पिंजरयात टाकतात..
ऋ, काल गेलो होतो फाइव्ह
ऋ, काल गेलो होतो फाइव्ह गार्डनमधे.
मेनरोडसाईड ला सिनीयर सिटिझन, किंवा फ्र्रेंड ग्रुप बसतात बरेचदा.
बसायला बाक मिळालं. मेनरोडसाईडला.
राणीना डे नर्सरी च्या गल्ली साइडची बाकं भरलेली असतात.
सचिन काळे, डी एस, खालसा चा का
सचिन काळे, डी एस, खालसा चा का?
जेन्युइन उत्तर :१) फेसबुक ग्रुप काढणे, २) अशा जोडप्यांची नोंदणी करणे, ३) रिले सिस्टम चालू करणे.
आयला मी पण डी एस चा
आयला मी पण डी एस चा
ऋ अवांतर होतय पण-
ऋ अवांतर होतय पण-
१) वविला उपस्थिती रोडावतेय तर " तुमच्या आवडत्या लेखकाला { ऋ} भेटा गटग कसे वाटते?
२) डी एस/खालसा _ माबोकर गटग?
>>२) डी एस/खालसा _ माबोकर गटग
>>२) डी एस/खालसा _ माबोकर गटग?<<
हि डि एस शाळा सायनचीच का? आमच्या शाळेत ११वी नसल्याने काहिजण या शाळेत गेलेले म्हणुन लक्षात आहे. खालसा कॉलेज तर आमच्या वेळेस धत्तिंग/राडेबाजी साठी फेमस होतं...
डी एस सायनचीच, पण तिथे दहावी
डी एस सायनचीच, पण तिथे दहावी पर्यंतच शाळा आहे. अकरावीला खालसा मध्ये
सुरुवातीला ११वी होती, काहि
सुरुवातीला ११वी होती, काहि वर्षांनंतर बंद करण्यात आली असावी...
कित्येक होतकरू प्रेमी युगुल
कित्येक होतकरू प्रेमी युगुल या धाग्यावर आशेने नजर ठेवून आहेत आणि तुम्ही लोकं कसल्या अरसिक चर्चा करत आहात
>>कित्येक होतकरू प्रेमी युगुल
>>कित्येक होतकरू प्रेमी युगुल<<
अरे बाबा, त्या बावा कॉलनीतल्या फाय्गार्डन्सला काय एव्हढं सोनं लागलंय? होतकरु युगुलांसाठी मुंबईत १७६० जागा आहेत, फाय्गार्डन्स सोडुन (चेंबुरच्या डायमंड गार्डन पासुन ओवल मैदाना पर्यंत). नविन धागा काढलास तर इथले मुंबईकर हातभार लावतील...
मिळाली का जागा तुला? तिकडे
मिळाली का जागा तुला? तिकडे एमा ला मिळाली वैशाली मध्ये.. तूच मागे राहिलंयस
सुरुवातीला ११वी होती, काहि
सुरुवातीला ११वी होती, काहि वर्षांनंतर बंद करण्यात आली असावी...>>
पुर्वी ११वी मॅट्रीक होती. १९७०-७५ मध्ये १०वी मॅट्रीक झाल्यावर ११वी बंद झाली.
डी एस चा अॅन्युयल स्पोर्ट डे खालसा मध्ये असायचा. नंतर काही मुले फाईव्ह गार्डनला जात.
सायन चा किल्ला होतकरु युगुलांसाठी छान जागा होती. आजुनही आहे का?
आहे अजून सायनचा किल्ला.
आहे अजून सायनचा किल्ला. त्यातल्या दोन बॅलकन्या /सज्जे पनवेल रोडकडे तोंड करून होते त्यात लपायला चार जागा होत्या प्रेमी युगुलांसाठी. पण नंतर तिकडे हायवे सोसायटी आली आणि प्राइवसी गेली. ऋ मुद्याचं लिहिलय. फेसबुक ग्रुप आणि रिले कसं काय वाटलं?
तसं खालसा कॅालेजचा तिसरा मजला - बॅाटनी लॅबकडचा याचसाठी होता. प्रवेशद्वारावर उंचावर मधमाशांचे पोळे होते त्यातून मध टपकायचा तो पहिल्या मजल्यावरच्या सज्जात हातात पडायचा. पण बिच्चाय्रा मधमाशांनी खरंच कुणाला त्रास दिला नाही.
फाइव गार्डन हे अमच्या लहानपणचे शनिरविवारचे विरंगुळा स्थान होते. टिव्ही नव्हते अन आम्ही हाफचड्डीत होतो.
पुढे कधी मुंबई लवहेरिटेज वाक निघाल्यास या जागा दाखवण्यात याव्यात असं मी याठिकाणी जाहिर करतो. बान्द्रा ( बॅनड्रा) बँडस्टँड,शिवाजीपार्क,चौपाटी तरणतलावाकडची भिंत ही स्थानकंही असतीलच. धाग्याची मिठी {नदी} नाही करणार.
Pages