'मला काय हवं आहे' ह्याचा थांग बहुतेकांना मर्यादित स्वरुपातच लागत असतो. ह्या 'बहुतेकां'पैकीही बहुतेकांची मजल व्यावसायिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या काय हवं आहे, अश्या विशिष्ट क्षेत्रांपुरतीच मर्यादित असते. स्वत:ची भावनिक गरज नेमकी काय आहे, हे समजून येण्यात उभं आयुष्य निघून जातं. अनेकदा अगदी शेवटपर्यंतसुद्धा हे समजून नाही तर नाहीच येत.
संपले आयुष्य पण ना समजले माझे मला
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?
असा हा जटील प्रश्न फार कमी लोकांना सुटत असतो. त्यामुळे साहजिकच आपण सगळेच कमी अधिक प्रमाणात एक गोंधळलेले - कन्फ्युज्ड - आयुष्य जगत असतो. भारतीय चित्रपट वास्तववादाकडे जसजसा अधिकाधिक सरकत चालला आहे, तसतश्या चित्रपटाच्या कथानकात अश्या 'गोंधळलेल्या' व्यक्तिरेखा वारंवार येत आहेत. इम्तियाझ अली तर अजूनही हा एकच विषय स्वत:चं पूर्णपणे समाधान होईल इतपत मांडून मोकळा होऊ शकलेला नाहीय बहुतेक. 'जब वी मेट', 'रॉकस्टार', 'तमाशा' असे त्याने विविध प्रयोग ह्या एका शोधाला सादर करण्यासाठी केलेले आहेत. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'दिल धडकने दो' मधून झोया अख्तरनीही अश्याच व्यक्तिरेखांना सादर केलं आहे आणि तनू वेड्स मनू, कट्टी-बट्टीसुद्धा ह्याच पंगतीत बसवता येतील.
सुरुवातीला बाष्कळ प्रेम कहाण्या दाखवणाऱ्या करण जोहरने नंतर हळूहळू जरासे परिपक्व भावनिक द्वंद्व 'कभी अलविदा ना कहना' आणि 'बॉम्बे टॉकीज' मधून दाखवले होते, पैकी 'बॉम्बे टॉकीज' तर खूपच धाडसी आणि चांगला प्रयोग होता. 'ऐ दिल हैं मुश्कील' द्वारे जोहरने 'आपली भावनिक गरज काय आहे', हे समजण्या, न समजण्यामधल्या द्वंद्वात गुंतलेल्या काही मनांचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रयत्न जमला की फसला, हा पुढचा भाग. तो प्रामाणिक होता का, हा पहिला. तर हो. प्रयत्न प्रामाणिक आहे. पण 'मुल्ला की दौड मस्जिद तक़' ह्याचाही प्रत्यय दिला आहेच !
ह्या कथानकातल्या सपशेल कन्फ्युज्ड व्यक्तिरेखा आहेत, अयान (रणबीर कपूर) आणि सबा (ऐश्वर्या राय बच्चन). पैकी बच्चनसूनेला सहाय्यक विभागात मोडेल अशी, दुय्यम किंवा तिय्यम भूमिका असल्याने ती काही महत्वाची नाही. मुख्य भूमिका रणबीर आणि अनुष्का शर्माच्याच आहेत. अनुष्काने साकारलेली 'अलीझेह' त्यातल्या त्यात 'सुज्ञ' वगैरे म्हणता येईल अशी आणि अयान मात्र अगदीच सुदूरबुदूर ! ह्या सगळ्या ओढाताणीच्या धाग्याचं एक टोक 'अली' (फवाद खान) च्या हातीही आहे. मात्र त्याला जराही पकड वगैरे घेण्यासाठी वावच ठेवलेला नाहीय.
हे कथानक लंडन, पॅरीस, व्हिएन्ना अश्या परदेशी लोकेशन्सना घडतं. का, ते विचारायचं नसतं, कारण चोप्रा, जोहर वगैरेंकडे अमाप पैसा आहे. हा पैसा सिनेमात ओतताना त्याचा विनियोग तांत्रिक बाजू सुधारणे, पटकथेला धार आणणे, चांगलं संगीत बनवणे वगैरे फुटकळ गोष्टींसाठी खर्च करणे, अजून तरी पूर्णपणे आपल्या मुख्य धारेतल्या सिनेमाकर्त्यांना पटत नसावेच. नाही म्हणायला, काही काळासाठी कथानक थोडंसं लखनऊमध्ये सांडतं. पण पुन्हा एकदा 'तिथेच का' ह्या प्रश्नाला काहीही उत्तर नाही. म्हणजे अमुक कथानक अमुक शहरातच का घडावे किंवा कथानकाचा विशिष्ट भाग तमुक ठिकाणीच का घडावा, ह्याचा तर्कसंगत विचार करणे हा वेळेचा अपव्यय आहे, हे समजून घ्यायला हवं !
'अयान'च्या भूमिकेत रणबीरने पुन्हा एकदा जबरदस्त काम केलं आहे. पण गोंधळलेल्या प्रेमिकाची व्यक्तिरेखा साकारून आता त्याला कंटाळा येण्यास हरकत नसावी. ऋषी कपूर स्वत:च्या एका विशिष्ट छबीत अडकल्याने त्याच्यातल्या सक्षम अभिनेत्याला फार क्वचित बाहेर येता आलं आहे. बापासारखं पोराचं होऊ नये. यह जवानी है दिवानी, तमाशा, रॉकस्टार, बचना ऐ हसीनो ह्या सगळ्यातून रणबीरने आधीच कन्फ्युज्ड तरुण साकार केला आहे. 'ऐदिहैंमु' त्याच सगळ्याला उजाळा मिळत जातो.
एकेका सिनेमागणिक अनुष्का शर्मा मला अधिकाधिक आवडायला लागली आहे. तिची 'अलीझेह' इतकी मस्त झाली आहे की तिच्या प्रेमात का पडू नये', हाच प्रश्न पडावा ! अगदी सहज वावर, बोलके डोळे व चेहरा आणि जबरदस्त आत्मविश्वास, ह्याचं एक परफेक्ट मिश्रण मला अनुष्कात जाणवतं. 'आत्मविश्वासाने वावरणारी स्त्री' ही सौंदर्याची सर्वश्रेष्ठ मूर्ती असावी. ती झलक अनुष्कात ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन नेहमीच दिसत असते. तिची 'अलीझेह' इतकी सुंदर दिसते की एका प्रसंगात जेव्हा ती 'सबा'च्या (ऐश्वर्याच्या) सौंदर्याची भरभरून स्तुती करत असते, तेव्हा 'हा उपरोध आहे की काय' असा संशय येतो !
ऐश्वर्या आजपर्यंत जितकी चांगली दिसत आली आहे, तशीच दिसते. ना जास्त, ना कमी. खरं तर, तिच्या भूमिकेच्या दृष्टीने पाहिलं, तर तिने मध्यमवयीन दिसणं अपेक्षित होतं, पण ती पुरेशी वयस्कर दिसत नाही. तिची एन्ट्री झाल्यावर सिनेमाच्या गाडीचा ट्रॅक काही वेळासाठी बदलतोच. तेव्हाचे बोजड डायलॉग्स तिच्यासोबतच्या अयानला करतात, त्यापेक्षा जास्त आपल्याला बोअर करतात. 'सबा' कवयित्री का दाखवली आहे, ह्यालाही काही सबळ कारणमीमांसा नाहीय. किंबहुना, ती कवयित्री नसती दाखवली, तर जे कमाल पकाऊ डायलॉग इच्छा नसतानाही पाहाव्या लागणाऱ्या जाहिरातींप्रमाणे आपल्यावर आदळत राहतात, ते तरी टळले असते.
मी सिनेमा पाहण्याची दोन प्रमुख कारणं होती. ट्रेलरमध्ये ऐकवलेला 'एकतर्फा प्यार..' वाला डायलॉग आणि 'चन्ना मेरेया' हे गाणं. तो डायलॉग कुठल्या प्रसंगी आहे आणि ते गाणं कसं चित्रित केलं आहे, ह्या दोन गोष्टींची मला खूप उत्सुकता होती. दोन्हींनी मला निराश केलं. धक्कादायक गोष्ट अशी की, 'एकतर्फा प्यार..' वाला तो डायलॉग मुख्य व्यक्तिरेखेच्या तोंडी नाहीच ! (कुणाच्या तोंडी आहे, हे सांगणार नाही. स्वत:च जाणून घ्यावे !) आणि 'चन्ना मेरेया' हे गाणं 'क्युटीपाय' ह्या भिकार धांगडधिंग्याला लागूनच सुरु होतं. दोन्ही गाण्यांच्या मेलडीचा, पट्टीचा एकमेकांशी दुरान्वयानेही संबंध नसल्याने हा बिनडोकपणा सहनच होत नाही. मुळात, ती 'क्युटीपाय' नामक टुकारकी अकारणच घुसडलेली आहे. एकंदरीत संगीताबद्दल बोलायचं झालं तर 'चन्ना मेरेया' आवडलंच आहे. शीर्षकगीतही चांगलं जमलं आहे. पण बाकी सगळा आनंदीआनंद आहे. पार्श्वसंगीत तर निरर्थक कल्लोळ माजवतं, बाकी काहीच नाही.
व्यक्तिरेखांच्या मनांतले भावनिक गोंधळ मांडण्यात करण जोहर दोन-तीन भाग वगळले, तर बऱ्यापैकी प्रभावी ठरला आहे. सगळ्यात जास्त माती खाल्ली आहे शेवटाकडे. शेवटचा मेलोड्रामॅटिक ट्विस्ट 'सगळं मुसळ केरात'वाला आहे. त्या सगळ्या फिल्मीगिरीनंतर शेवटी सिनेमा त्याच वळणावर संपतो, जिथे तो साधारण अर्ध्या तासापूर्वी पोहोचलेला असतो. 'बॉम्बे टॉकीज'मधल्या कहाणीच्या हाताळणीतली परिपक्वता इथे असती, तर सिनेमा 'जोहरचा सर्वोत्तम' म्हणता आला असता. शेवट वगळता, इतर सादरीकरणातही 'तेच ते'पण जाणवत राहतं.
जोहरच्या सिनेमांत श्रीमंतीचं प्रदर्शन असतं. ते झोया अख्तरच्याही सिनेमांत दिसतं, पण दोन्हींत फरक आहे. जोहरच्या प्रदर्शनात क्रिएटिव्हिटी जरा कमीच वाटते. मोजकीच पात्रं असलेलं कथानक असल्याने, ते आटोपशीर असायला हवं होतं. 'तेच ते'पण आल्यामुळे ते जरासं लांबलंच आहे. बट अगेन, अडीच, पावणे तीन तासाचा पसारा मांडल्याशिवाय चोप्रा, जोहर प्रभूतींना पोटभरीचं झाल्यासारखं वाटत नसावंच बहुतेक !
कुणी काहीही म्हणो, करण जोहरचंही एक फॅन फॉलोईंग आहे. त्यांना 'ऐदिहैंमु' नक्कीच आवडेल.
रणबीरच्या चाहत्यांनाही 'ऐदिहैंमु' आनंद देईल. अनुष्कासाठी पाहायचा असेल, तर नक्कीच पाहावा.
रणबीर-अनुष्कामध्ये ती 'सिझलिंग केमिस्ट्री' का काय म्हणतात, ती पुरेपूर जाणवते.
ऐश्वर्यासाठी जर कुणी पाहणार असेल किंवा तिच्या व रणबीरच्या तथाकथित गरम दृश्यांबद्दल उत्कंठा असेल, तर नक्की निराशा होईल.
आणि सिनेमाला होणाऱ्या विरोधाचा विरोध म्हणून जर कुणी मुद्दाम पाहणार असेल, तर त्यांनाही अगदीच वेठीस धरल्यासारखं वाटणार नाही, असं मला वाटतंय. त्यांनी फक्त 'ऐ दिल, यह हैं बॉलीवूड' इतकं लक्षात ठेवावं म्हणजे झालं !
रेटिंग - * * *
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/10/ae-dil-hain-mushkil-movie-review....
ठाम निर्णय घेणार्या नायिका
ठाम निर्णय घेणार्या नायिका >> यात दोन्हीही नायिका या ठामच आहेत. नायकच गोंधळलेला आहे. उलट नायिकेंचे खुप चांगले चित्रिकरण आहे.
आजचे तरुण तरुणी काही इतके गोंधळलेले
मला वाटत नाहीत. >> हे मात्र चूक वाटते. आजचे तरूण तरूणी जास्ती गोंधळलेले आहेत. जिज्ञासा म्हणती ते बरोबर आहे जास्ती स्वातंत्र्य + जास्त पर्याय = जास्त गोंधळ +१
हे वाचा:
https://madaboutmoviez.com/2016/10/31/ae-dil-hai-mushkil-karan-johar-re-...
मला या सगळ्या सिनेमाच्या
मला या सगळ्या सिनेमाच्या डीस्कशन मधे 'आजची पीढी, आजचे तरुण तरूणी' हे का आणि कुठून आलंय हे समजत नाहीये.
सिनेमा कुठेही 'आजच्या पीढीवर भाष्य करत नाही किंवा आजच्या पीढीचे विचार वगैरे दाखवत नाही.
आणि कुछ कुछ होता है (१९९८) मधे देखील 'तेव्हाचे' तरूण तरूणी देखील इतकेच गोंधळलेले आणि कनफूज्ड दाखवले होते की फ्रेंडशीप, लव्ह, रीश्ता या बाबतीत.
'आजची पीढी, आजचे तरुण तरूणी'
'आजची पीढी, आजचे तरुण तरूणी' हे का आणि कुठून आलंय हे समजत नाहीये. >>> हे बाकी खरं , अनुष्का शर्माच्या ओठांचे कैक अवतार बदलुन कन्फ्युज झाले तरी ती आजची पिढी कशी काय ?
आयत्या वेळी लग्नास नकार देणे
आयत्या वेळी लग्नास नकार देणे हे तर खूप सभ्य झालं. लव्ह आज कल मध्ये तर लग्न झाल्यावर पहिल्या रात्री डिव्होर्स मागते बाई, ते पण राहुल खन्नाला... पण हे ठाम नसणे काही कुठल्या पिढीचा दोष नाही, चोरी चोरी बघा अज्जिबात ठाम निर्णय नाही!
जास्ती स्वातंत्र्य + जास्त
जास्ती स्वातंत्र्य + जास्त पर्याय = जास्त गोंधळ >> नॉट नेसेसरी. हल्ली जास्त माहिती व जास्त रिसोर्सेस पण आहेत. पूर्वी काय 'रिलेशनशिप अडव्हाईस' हवा असेल तर मैत्रिण-आप्त इ पर्याय होते. हल्ली कुठल्याही फोरमवर कोतबो करता येते. पण गोंधळाचीच चटक लागलेल्या लोकांना काय म्हणणार, वो तो वैसे भी काम के नही थे...
>> ते पण राहुल खन्ना
>> ते पण राहुल खन्ना ला
लग्नसंस्थेचेच वीकनेसेस आहेत हे असंही म्हणता येईल
करण जोहार काळाच्या पुढे जाऊन
करण जोहार काळाच्या पुढे जाऊन पिक्चर बनवतो.
त्याचा कभी अलविदा ना कहना आता कुठे भारतीय मेंटेलिटीला हळूहळू पटायला लागला आहे.
मग परत कसा येतो ?
मग परत कसा येतो ?
आज काल असं नाही, तर हे नेमके
आज काल असं नाही, तर हे नेमके कधीपासून झाले ते विचारायचे होते.
मराठीत पण मुंबई-पुणे-मुंबई २ ( हेच नाव होते ना ?) मधे तेच होते. नायिका गोंधळलेली.. सगळा चित्रपट त्यातच खर्च होतो.
सल्ला देणारे पण ठाम काही सांगत नाहीत, दिल कि सोच... असे काही तरी सांगतात. बरं गोंधळलेले असताना, अर्धवट होकार तरी का देतात ? माझा निर्णय नाही झाला, मला वेळ पाहिजे असे न सांगता, सगळा मांडवाचा /वर्हाडाचा / वाजंत्र्यांचा / कपड्यादागिन्यांचा / सजावटीचा खर्च करायला का लावतात ??
हे लग्नाच्या बाबतीत गोंधळलेले
हे लग्नाच्या बाबतीत गोंधळलेले नायक/ नायिका बघताना मला अजून एक प्रश्ण नेहमी पडतो. जर नायक/ नायिका गोंधळलेले आहेत तर त्यांच्या आई वडिलांना त्यांचं हे confusion लग्नाआधी जरासं सुद्धा जाणवत नाही का? आणि जर जाणवतं असेल तर मग ते आई-वडिल साग्रसंगित लग्नाचा घाट का घालतात? आपल्या मुलाला/ मुलीला सरळ register लग्न करायला का सांगत नाहीत?
रजिस्टर लग्न करायचं ठरलं असेल आणि लग्नाच्या आदल्या रात्री मुलगी पळून गेली तर लग्न cancel करणं सोपं पडणार नाही का?
Opps....दिनेश, तुमची post
Opps....दिनेश, तुमची post वाचायच्या आधीच मी माझी post टाकली.
मग परत कसा येतो ? >>
मग परत कसा येतो ? >>
'देवदास'चा नायक किंवा 'चोरी
'देवदास'चा नायक किंवा 'चोरी चोरी'ची नायिका गोंधळलेले नव्हते काय?!
अरे काय सिनेमा आहे कि चेष्टा
अरे काय सिनेमा आहे कि चेष्टा

, स्टोरीची डिमांडही नाही तशी !
चोप्रा जोहर जुन्या सिनेमाचे डॉयलॉग्ज आणि म्युझिक ट्युन्स , रणबीर आणि अनुष्काचा अति लाउड अति भयानक अभिनय (!)???
हे दोघे इतकेssssss वाइट अॅक्टींग करतात माहित नव्हत , अनुष्का तर अति भयाण असह्य... कभी खुषी मधली काजोल सुध्दा कमी लाउड आणि कमी ओवह्रअॅक्टींग तिच्यापुढे.
एक तास उलटून गेलाय सिनेमा पाहून अजुन ऐश्वर्याची एंट्रीही नाही !
हुश्श ..आला फवाद आला सव्वा तासानी, अता निदान काहीतरी पहाणेबल तरी असावं !
..............................................................................................................................................................
बापरे , अशक्य बकवास सिनेमा.
कसा पाहिला शेवटपर्यंत
काय ती रिसायकल स्टोरी , फालतुपणाचा कळस !
रणबीर सोडून सगळी कॅरॅक्टर्स पाकिस्तानी कशासाठी दाखवली आहेत मुळात
कै च्या कै उगीच..
रणबीर अनुष्का बळेच सगळ्या सिनेमाचे डॉयलॉग्ज अत्यंत प्रेडीक्टेबल सीन्स मधे मारतात.
राहुल नाम तो सुना होगा, माय नेम इज खान, मग काय चान्दनीच्या साड्या , वाट्तच अता कोनियाक शराब नही होती येणार, अरे काय त्रास !
सिनेमाभर नुसते रणबीर अनुष्का माथी मारलेत .. अॅश आणि फवाद खान नुसते येतात आणि जातात , त्यांच्याजागी कोणीही चाललं असतं
लॉजिक जाउचदे, कतमणूक सुध्दा शून्य , बोअरिंग आणि पकाऊ !
अर्धा स्टार फार झाला सिनेमाला !
>> ते पण राहुल खन्ना ला
>> ते पण राहुल खन्ना ला
चित्रपट बघितला नाही बघणार ही
चित्रपट बघितला नाही बघणार ही नाही. ही असली करुन सवरुन कम्फुज पात्र डोक्यात जातात.
कभी खुषी मधली काजोल सुध्दा कमी लाउड आणि कमी ओवह्रअॅक्टींग तिच्यापुढे.>>>> अरे भरुन पावले मी. माझ्याशिवाय आणि कुणीतरी आहे ज्याना कखुकग मधली काजोल लाउड आणि ओवह्रअॅक्टींग आणि इरीटेटींग आणि बळंबळं वाटली.
अरे भरुन पावले मी.
अरे भरुन पावले मी. माझ्याशिवाय आणि कुणीतरी आहे ज्याना कखुकग मधली काजोल लाउड आणि ओवह्रअॅक्टींग आणि इरीटेटींग आणि बळंबळं वाटली.
>>>>>
काजोल असे काही तरी करू शकते म्हणून शाहरूखच्या पिक्चरमध्ये तिचीही नोंद घेतली जाते हे लक्षात घ्या
अजून एक उदाहरण कुच कुच होता है.
जुही चावलाही याच प्रयत्नांत असायची.
चेन्नई एक्स्प्रेसमध्ये आपली दिपिका एक..
तुम्ही संयत अभिनय कराल तर तो तुम्हाला झाकून टाकणार..
तुम्ही संयत अभिनय कराल तर तो
तुम्ही संयत अभिनय कराल तर तो तुम्हाला झाकून टाकणार
>>>>>>म्हणजे?
लाउड आणि ओवह्रअॅक्टींग आणि इरीटेटींग आणि बळंबळं या गोष्टीमंध्ये का?
पण चेन्नै एक्सप्रेस मधे
पण चेन्नै एक्सप्रेस मधे दीपिका लाऊड असणेच अपेक्षित होते व तेच शोभूनही दिसले!
मला वाटते की लाऊड अभिनय हीही (अंगप्रदर्शना प्रमाणेच! :-)) एक कथेचीच मागणी असते.
आंबटगोड, कमर्शिअल चित्रपटांना
आंबटगोड, कमर्शिअल चित्रपटांना कथा अशी असते कुठे जे मागणी घालतील. कॅरेक्टर डेवलप केलेली असतात बस्स. जर शाहरूखसमोर हिरोईनलाही फूटेज मिळावे असे वाटतेय तर मग याला पर्याय नाही.
आशूचॅम्प, तसे म्हणू शकता. पण ती एनर्जी आणि जिंदादिली त्याची स्ट्रेंथ आहे.
नंदिनी तुझी पोस्ट आवडली.
नंदिनी तुझी पोस्ट आवडली. मस्तच सालं काढलीयेस
काजोल? आणि लाऊड? मला तरी
काजोल? आणि लाऊड?
मला तरी नाही वाटली. कथेप्रमाणे तिने तसा अभिनय केला आहे, पण लाउड, ओव्हर अक्टिंग चा किताब निव्वळ ह्रितिक रोशन आणि करीना कपूर ला मिळू शकतात. (मुझसे दोस्ती करोगे, आणि मै प्रेम की दिवानी हू)
काजोल असे काही तरी करू शकते
काजोल असे काही तरी करू शकते म्हणून शाहरूखच्या पिक्चरमध्ये तिचीही नोंद घेतली जाते >>> आवरा, शारुकचा फॅन असलास म्हणुन त्याने हास्यास्पद अभिनय केला तर तु हास्यास्पद विधाने केलीच पाहीजेत का?
तुम्ही संयत अभिनय कराल तर तो
तुम्ही संयत अभिनय कराल तर तो तुम्हाला झाकून टाकणार..>>>
हे बाकी खरं हो. त्याच्या एवढं लाउड आणि ओवह्रअॅक्टींग कुणाला जमणार.
पण मला खरंच ते हिरवीणीचं कायच्या काय मासुम का काय ते आणि बब्ली का का काय ते असणं झेपत नाही.
म्हणुन काजोल सारखी हिरवीण जेव्हा तुस्सी बडे मजाकिया करते आणि कुणाच्याही पार्टीत खुळ्यागत गाते/ नाचते तेव्हा ते आवडत नाही. तशीच जब वी मेट मधे करीना (बोंबला :-))
दिपीका चे ए मधे आजिबात लाउड ओव्हरअॅक्टींग वाटत नाहीये. शाखाच जास्त तिच्यापेक्षा.
लाउड आणि ओवह्रअॅक्टींग आणि
लाउड आणि ओवह्रअॅक्टींग आणि इरीटेटींग आणि बळंबळं याला एनर्जी, जिंदादिली आणि त्याची स्ट्रेंथ म्हणलं जाणार असेल तर हरलोच मी
डीजे नक्की पिक्चर पाहिलास ना
डीजे नक्की पिक्चर पाहिलास ना की उगीच गप्पा ? तिकडे सगळी लोकं लखनऊ मधली दाखवलीत आणि तू लगेच त्यांना पाकिस्तानात नेऊन सोडलंस ? की आता लखनऊ पण पाकिस्तानात येतं चौधरी चरणसिंग एअरपोर्ट सहीत ?
लग्नं फक्तं लखनौ मधे
लग्नं फक्तं लखनौ मधे दाखवलय.
कॅरॅक्टर्स पाकी आहेत असा उल्लेख नसला ( किंवा एडीट केला असला ) तरी केजोच्या म्हणण्यानुसार हिरॉइन्स कॅरॅक्टर्स पाकिस्तानी( ब्रिटीश पासपोर्ट बाळगणार्या) दाखवल्या आहेत असं नक्की वाचलं होतं !
काजोल आणि लाऊडन << lol
काजोल आणि लाऊडन

<< lol 'आणि ' ऐवजी = पाहिजे
आता अनुश्का तर म्हणते, ती
आता अनुश्का तर म्हणते, ती कॉलेजात होती लखनऊ ला म्हणून लग्न पण लखनऊ ला की जिथे अलीचे कझिन्स वगैरे असतील. बाकी पिक्चर मध्ये तरी इतर काही उल्लेख अढळला नाही. फक्त ब्रिटीश पासपोर्टांचा शॉट आठवतोय
कॅरॅक्टर्स पाकी आहेत असा
कॅरॅक्टर्स पाकी आहेत असा उल्लेख नसला ( किंवा एडीट केला असला ) तरी केजोच्या म्हणण्यानुसार हिरॉइन्स कॅरॅक्टर्स पाकिस्तानी( ब्रिटीश पासपोर्ट बाळगणार्या) दाखवल्या आहेत असं नक्की वाचलं होतं !|| >> आधी तशीच स्टोरी होती. दोनपैकी एक हिरॉइन पाकिस्तानी दाखवली जाणार होती. पण फवाद खानवरून इतका गोंधळ उठला की केजोने चूपचाप स्टोरीमध्ये एडीटींग केलंय
माझ्यामते अलिझेह पाकिस्तानी दाखवली असावी कारण सबाचं कॅरेक्टर पाकि दाखवणे म्हणजे परत दंगलींना आमंत्रण.
अजून एक फार खटकलेली गोष्ट.: अयान स्वतःला रफीचा फॅन म्हणवतो (नेक्स्ट महमद रफीच म्हणतो खरंतर) आणि तरीही "गाणं गा" म्हटलं की किशोरचं गाणं गातो.
दिनेशदा, तुम्ही उल्लेखलेल्या जब वी मेट, जवानी दिवानी, डीडीएलजे, बचना ए हसीनो या चित्रपटांमधली नक्की कुठले नायकनायिका लग्न ठरवून मग आपल्याच निर्णयाबाबत शंका घेणे, आयत्यावेळेस लग्न करण्यास नकार देणे, असेच सतत दिसते हे करताना दिसतात? जब वीमेटमध्ये तिचा प्रियकर लग्नाला नकार देत नाही त्र तो लग्नाला कधी तयारच नसतो. किंबहुना त्याच्यामते, त्यानं लग्नाची बात कधी केलेलीच नसते. जवानीदिवानीमध्ये नायक नायिकेचं ना लग्न ठरलेलं असतं, ना ते मोडतं. एक लग्न (कल्की) हे मुळात एकतर्फी प्रेमभंगावर ठरलेलं असूनही ती अतिशय समजूतदारपणे ते लग्न निभावताना दाखवलेली आहे. डीडीएलजे मध्ये तर अरेंज मॅरेज आहे.
यातला डीडीएलजेचा अप्वाद सोडल्यास सर्व नायिका स्वतःछ्या मतांवर, प्रेमांवर आणि निर्णयांवर अतिशय ठाम आहेत. याच नायिका त्यांच्या करीअरबद्दलही तितक्याच ठाम दाखवल्यात. केवळ प्रेम आणि संसार-नवरा यात गुरफटलेल्या नाहीत.
Pages