पाहिला बॉ एकदाचा! अंमळ उशिरच झाला म्हणायचा बघायला. खरं तर बघायचा प्लन पण नव्हता आजिबात, असच टिपिकल स्टोरी असेल जरा चांगली गाणी असलेली म्हणून फार लक्ष नाही दिलं. पुढे थेट्रात पुढे जाऊन पबलिक नाचतय वगैरेचे व्हॉट्स अॅप विडियो यायला लागले आणि मसालाच आयटम दिसतोय असं मनोमन अधोरेखित झालं आणि नाद सोडून दिला.
मग आत्ता काही दिवसांपुर्वी माझे बेकरी फ्रेंड फारएण्ड ह्यांनी टिपापा ह्या ठिकानी येऊन नव्यानं एकदा सैराटच्या कौतूकाचं खातं उघडलं तेव्हा माझे कान परत वर गेले. मग पुढे बाकी इतर फ्रेंडांनी पण तीच री ओढली आणि ते टाकत असलेल्या पोस्टींमुळे माझ्या डोक्यात वातावरण तयार होऊ लागलं. निव्वळ ह्या पोस्टींमुळे मी सैराटची गाणी एकायला आणि पिकचर बघायला घेतला!
२-३ दिवसांपुर्वी सुरवातीची फक्त २० मिनिटं हा सिनेमा बघितला आणि मला त्या सिनेमानी खिशात घातलं! कित्येक दिवसांनी किंवा वर्षांनी एखाद्या पिकचरची झिंगं चढली असं झालं!!!
कुठल्या शॉट बद्दल अन कुठल्या गाण्याबद्दल किंवा कुठल्या एक्स्प्रेशननांबद्दल बोलावं अन किती बोलावं हेच समजेनासं झालय. लोकं आपापल्या अँगलनी सिनेमे बघतात, त्यांना त्यातून बरच वेगळं काही काही सापडतं आणि वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा सिनेमा त्यांना आवडतो.
एक सिनेमा म्हणून स्वतंत्रपणे तो पिकचर छान असला तरी माझ्याकरता तरी ह्या पिकचरनी काही केलं असेल तर कॉलेजच्या दिवसांपासूनचा पुढचा काही काळ मला अक्षरशः परत जगवून आणलय!
सुरवातीच्या मंजुळेंच्या कॉमेंट्री पासून जी काही एकेक प्रसंगांना सुरवात होते, माणूस त्यात हरवूनच जातो!
काय त्यांची ती कॉमेंट्री अन ते रखरखलेल्या उन्हातलं मैदान अन ते पॅविलियन, ते ढोल तडम ताशे वाले अन सरवात महत्वाचं म्हणजे मॅच सुरु असलेल्या दरम्यान त्या प्लेयरांचं एकेक बोलणं!
लंगड्याच्या "हे हलगथ कोन पाठवलं रे ." " मंग्या मंग्या आरं नीट खेळ मंग्या नीट खेळ!अरं बॉल बघाय आधी बॅट नगं न फिरवू" पासून पुढे परत मंगेश मोहिते पाटलांनी बॉल हुकवल्यवर त्याच्या संतापाचा अक्षरशः अंत होतो तेव्हा " मला खेळायचच नै जा..." म्हणून बॅट सोडून ऑल्मोस्ट तो चालायलाच लागतो हा प्रसंग त्यातली लंगड्याची तळमळ किती लोकांनी अनुभवलेली आहे? कधी आपण लंगड्याच्या बोटीत शिव्या घालत असतो तर कधी कधी मंग्याच्या सुद्धा बोटीत कारण "अर किती फाष्टाक्तोय बघ्तोन तू?" असाही प्रसंग येऊन गेला असेलच (तुम्ही अगदी स्टार बॅट्समन नसाल तर नक्कीच येउन गेला असेल).
मधल्यामध्ये बिली बाऊडींग अन शकुना आत्याचा सीन पण खल्लास आहे! किती वेळा पोरं आया, आज्या बोंबल्त आल्याकी बॉल बॅट हातात जे असेल ते टाकून पळायचे. फोर सिक्सच्या अॅक्शन पण कहर आहेत! एकदम किडमिडीत अंगकाठी अन त्यावर बनियन, डोक्याला आधी फडकं अन मग त्यावर कॅप! पुर्वी अंपायर लोकं खुप वेळा तसं करायचे! निरिक्षण सॉलिड आहे मंजुळेंचं किंवा ज्यानी कोणी डिटेलिंग केल्य त्याचं.
पर्श्यानी आधी फोर सिक्स मारल्यावर लंगड्याच्या एकेक शिवीसुचक हातवारे (काही न बोलता नेमकी काय शिवी दिली हे लगेच कळतं ) अन पुढे म्याच जिंकून दिल्यावर आडम तिडम मुद्दाम हारलेल्या टीम समोर केलेला नाच!
इतकं बारिक आणि चोख निरिक्षण म्हणजे काय चेष्टाय का राव? अन त्यापेक्षाही ते बरोबर शॉट मध्ये उतरवणं म्हणजे फार भारी! नागराज मंजुळेकी जय!
पुढे तात्यासाहेबांचं भाषण ज्यात खरं एक पुढे होऊ घातलेल्या काही गोष्टींना किती महत्व आहे हे अधोरेखित करणारं वाक्य आहे. "अहो तालुक्याचं राहुद्या आधी आपल्या बायका संभाळा म्हना ह्यांना..." असं ते म्हणतात.
थोडक्यात घरातल्या बाया/मुली ह्यांच्याशी स्वतःची अन घराण्याची इज्जत बांधलेली आहे ह्या टाईपची विचारसरणी असलेलं घर आहे. आणि हे बोलताना त्या सोनलताई का कोण असतात त्या शेजारीच बसलेल्या असतात.
(ह्याच संदर्भात अजून एक गंमत म्हणजे तात्यासाहेबांच्या बंगल्याचे नाव अर्चना असतं))
नंतर विहिरीचा सीन. तिथे आर्चीची हापिशियल एंट्री होते अन क्या बॉस एंट्री बोले तो एंट्री आहे पोरीची! अर काय एक्स्प्रेशन अन काय तो कान्फिडन्स अन काय तो हेल बोलण्याचा! झन्नाट! ती ज्या पद्ध्तीनी येऊन विहिरीवर एक पाय ठेवून वाकून खाली बघते त्यातच सगळं येतं! पाटलाची पोरगी असल्याचा शुद्ध माज!
अय रत्ताळ्या निग्ग्कीरं भैर... आत्तागंबया भैरा बिराएकाकाय.... अय अय खुळखुळ्या उभाssssर!!!!
खलाssssस... अरे लेडी गब्बर वाटते ती इथे!!! (थांबा अजून! पुढे मी अजून तिचे अन तिच्या अॅक्टिंगच्या तारिफांचा पूल बांधणारच आहे. ही नुसती सुरवात आहे! )
त्यानंतरची होते ती लंगड्याची होलपट तर निव्वळ कमाल आहे! त्याचे ते तसं चालणं असल्यामुळे ते आण्खिनच विनोदी झालय सगळं. ह्याउपर काय दिसतं ते म्हणजे मैत्री. येवढा पायानी अधू असून सुद्धा लगबगीनी (साबण अंगावर असताना) जाऊन आधी परश्याला सांगतो. (ते कसं सांगतो ते वाचण्यापेक्षा बघण्यातच मजा आहे). पण मी पवायला गेल्तो तिकडं आर्चिनं मला हाकल्ला हे सांगताना मला हाकल्ला ह्याचं तुसभर सुद्धा दु:ख किंवा लाज नाहीचे कुठे! नसतेच. सगळ्यात महत्वाचं काम त्यावेळी असतं ते मित्राला त्याचं सामान (आवडणारी मुलगी) कुठेतरी येऊन उभी आहे हा मेसेज जाणं! त्यात आपली इज्जत गेली तरी बेहत्तर पण मित्राचं झ्यंगाट हे जमवून दिलच पाहिजे, ते परम कर्तव्य असतय लगा!!
परश्याला स्वप्न पडतं तो प्रसंग आणि त्या भोवतीचे डायलॉग तर हसून हसून पुरेवाट आहेत. "कुठं दिवस भर कुत्री मारत हिंडत असतं कै म्हाईत" इति पशाचा बाप. ते नगं घरचे उठतीन आर्चे म्हणताना परश्याचा आवाज अशक्य दबलेला, चिरका अन लाडिक होतो! (स्वप्नात किस सुरु असतो ना?) स्वप्न पडतात त्यात सुद्धा घरच्यांची भिती असतेच हे टीनेजर असताना काही आजिबात नवीन नसावं!
आता परशाची एंट्री!! म्हणजे सैराट एंट्री ह्या अर्थानं. फायन्ली लंगड्याची तगमग एकदाची "तिथं आर्चि आली आर्चि....." म्हणत कानावर पडल्यावर मग खरी जादू सुरु होते. याड लागलं! भन्नाट म्युजिक, बॅकड्रॉप अन सिनेमॅटोग्राफी! खरं डोळे मिटले आणि फक्त म्युजिक एकलं तर असं वाटेल की एखादा हॉलिवूडमधल्या जबरी म्युजिकलच सुरु असावं. मागची सीनरी जब्बरदस्त जमलीये. डिस्नी म्युजिकल सारखं ग्रँड वाटावं असं म्युजिक पण त्यात आपली माती, गवत, पक्षी अन आपला गावरान परश्या पण अगदी लिलया फिट्टं बसतात! कशाला बॉलिवूडवाले उगच झकमारी करत स्विझरलंडला जाऊन त्या हिरोंना गरम कपड्यात अन हिरवणींना स्लीव्लेस ब्लाऊजांमध्ये बरफात नाचायला लावतात देव जाणे!
पुढे आवरुन सावरुन भांगपट्टी करुन आलेला परशा कपडे अन सँडलांसकट जी उडी मारतो आगा ना पिच्छा बघत व्हिरीत त्यावर मी तर थेट्रात पैशे फेकले असते! ह्याला मंतेत जिगर! आधी उडी मारली, बघून घेतलं आर्चिला आता पुढचं पुढं बघू!
आत्तगंबया हे कुठून पड्लं व्हिरीत यून!
अssय निघ भायेर..
सॉरी सॉरी,
हss सॉरी सॉरीच्या लाडक्या.. आधी निघ भायेर..
मला मैतीच नवतं, बघितलच न्हाईमी..
बरं डोळं झाकून पडला रं हिरीत... आता बघितलं ना? हो भाएर..
आता खरं सीन बाय सीन कौतूक करत बसलो तर तो पर्यंत मंजुळेंचा दुसरा पिच्चर यायचा एखादा! त्यापेक्षा जरा फॉरमॅट बदलून, ज्या गोष्टी मला जास्त आवडल्या त्या बद्दलच लिहितो.
सैराट झालं जी:
ह्या गाण्यानी नुसतं वेड लावलय. खरं खुप सारे फॅक्टर्स आहेत ते गाणे आवडण्यामागे. एक तर आर्ची, परशा आणि त्यांचं एकेक प्रसंगातून फुलणारं प्रेम ह्या गाण्यात एकदम tempo धरतं (मालवहातुक वाला टेंपो नाही, गाण्यातला टेंपो असतो तो!).
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि त्याला साजेसं तेवढच अत्यंत ग्रँड ग्रँड पण थोडा गावाकडला टच असलेलं म्युजिक! (ढोलांचा वापर आणि ग्रामिण बाज असलेली भाषा)
खरंही वाटत नाही की हे करमाळ्याचं वगैरे शुटिंग आहे! काय एकसे एक अॅंगल घेतले आहेत!
गाण्यातले काही मोमेंट्स पण मस्त टिपले आहेत.
अगं झन्नानलं काळंजामंदी
अन हत्तामंदी हात आलं जी....
सैराट झालं जीssss
सैराट झालं जीssss
ह्या शॉट मध्ये आधी परशा आर्चिला गोल फिरवतो आणि नंतर आर्चि खाली वाकून खळाळून हसताना दाखवलीये.
ही हसतानाची आर्चि माझ्या करता कायमची स्मरणात गेलीये.
नंतर गाण्यातच आर्चि परशाच्या बहिणीला स्कुटरवरुन घेऊन जाताना दाखवलीये आणि पुढे आर्चि मंदिरातून बाहेर गाभार्यात येते आणि तिथे तिच्या रंगीत चपलांमध्ये गुलाबाची फुलं ठेवलेली असतात. ती इकडे तिकडे बघते शोधत कोणी ठेवले असतील आणि तिला दोन खांबांमधून बसलेला परशा दिसतो, तो पाया पडल्या सारखं करुन मग हाथ जोडतो, मी ठेवले आहेत हे सांगत. मग आर्चि ती फुलं उचलून त्याचा वास घेते आणि मग छातीशी कवटाळते. पुढे आर्चि आणि सपनी, परशा, सल्या अन लंगड्या बसलेले असतात त्यांच्या शेजारून जातात तेव्हा लंगड्या सपनीवर फुल फेकल्याची अॅक्शन करतो! आणि त्या पुढे गेल्या की मग आल्या अन लंगड्या दोघंही बाबा प्रेमीपरशांच्या पाया पडतात की काय बॉ आय्ड्या काढली लगा बाबांनी!!! पोरगी फिदाssss...
(हा शॉट सुरु असताना मला वाटतं मागे आधी वायोलिन आणि नंतर बासरी आणि सॅक्सोफोन आहे. अप्रतिम जमून आलाय शॉट, म्युजिक, चित्रिकरण, सगळ्यांचे एक्स्प्रेशन्स सगळ्याच दृष्टिनी!! टोटल गुंडाळून खिशात जाणार हे असले शॉट दाखवले की आशिक दिलाचा प्रेक्षक!)
नंतर घोडेस्वारीच्या शॉट मध्ये लंगड्या, सल्या आणि आनी असतातच. बघताना गंमत वाटते पण आपल्याकडे तरुण मुलं मुलींना घोडेस्वारीच काय एकांतात कुलफ्या पण खाऊ देतील कोणी तर शपत. आपल्याला नेमून दिलेली कामं सोडून तरुण मुलं मुलींच्या एकांतात व्यत्यय आणण्यात पोलिस, गावातली इतर लोकं वगैरे अशी सगळी बिन प्रेम करताच कुटुंबवत्सल झालेली मंडळी अगदी तरबेज असतात. सतत बिचार्या प्रेमींना आपलं लक्ष ठेवावं लागतं, कोणी पाहतय का, किंवा मग असं मित्रांना तरी राखणाला ठेवावं लागतं.
(असं कसं? असं आडनिड्या वयातल्या मुलं मुलींना एकांतात कसं काय सोडायचं, नाही? उद्या काही वेडंवाकडं झालं तर? आपल्या इज्जतीचं काय होईल? अहो आम्ही पण बरीच वेडीवाकडी कामं करतोओ पण ते बंद दरवाज्या आड, तिथे कोणाला कळतय?)
कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं च्या वेळेस जेव्हा परशा हवेत किस सोडतो तेव्हा लंगड्याचा "आयो.." वासताना स्लो मोशन मध्ये स्पष्ट दिसतो!!
पुढच्या कडव्यात रंगा खेळतात तो प्रसंग आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे खरं? आपल्या इथे ग्रामिण परिसरात असतात तशी दगड मातीच्या भिंती असलेली घरं, आजूबाजूला उगवलेलं कोरडं गवत, त्या दगडमातीच्या घरांमधून असलेल्या धुळीच्या वाटा! ह्या असल्या बॅकग्राऊंड असताना सुद्धा आधी बिल्ड केलेल्या वातावरणामुळे आणि म्युजिक, सिनेमॅटोग्राफी मुळे काय जब्बरदस्त भाव खाल्लाय ह्या प्रसंगानी?!
गाणं संपत असतानाचे शॉट्स (त्या कळसाच्या छोट्या गच्चीवर वगैरे) मला वाटतं ड्रोन वापरुन शॉट्स घेतले आहेत. सिंपली (अॅज इन सिंपल) इन्क्रेडिबल!
आर्चि:
आर्चि मला वाटतं एका पिकचर मधलं एक पात्र नसून एक फिनोमेनॉन होऊन गेली आहे. ह्यात खरं तिच्या अॅक्टिंगला दाद द्यावी की मंजुळेंच्या परफेक्ट कास्टिंगला हे समजत नाही कारण ती अॅक्टिंग करते असं मला वाटतच नाही इतकी ती फिट बसली आहे त्या रोल करता. ह्याच अर्थ इथे मी झुकतं माप मंजुळेंच्या कास्टिंग ला देइन, पण ते देत असताना तिनी ज्या प्रकारे रोल पेलला आहे त्याला जवाब नाही. हे मान्य की रिंकु राजगुरु रियल लाईफ मध्ये बरीचशी तशीच चालते बोलते पण पिकचर मध्ये फक्त तिचं चालणं आणि बोलणं नाहीये ना ? खुप ठिकाणी तिला स्ट्राँग इमोशन्स दाखवावे लागले आहेत, एका अल्लड पाटल्याच्या पोरी पासून पुढे हलाखीत दिवस काढून नंतर एकदम मचुअर, आत्मविश्वासानी संसार करणारी तरीही आई वडीलांच्या आठवणीनी झुरणारी आर्चि हे ट्रान्सफॉर्मेशन तिला पेलावं लागलेलं आहे and oh my god has she done it well!!!
आता खरं खुप काही लिहिता येइल पण एक शेवटचा माझ्या कायमचा लक्षात राहिल असा प्रसंग आहे त्या बद्दल लिहून आवरतं घेतो. हा प्रसंग खरं मंजुळेंचं डायरेक्शन, परशा आणि आर्चिच्या अॅक्टिंगमुळे अत्यंत रियलिस्टिक होऊन आपल्या अंगावर येतो अगदी.
त्या फोनच्या पासवर्ड वरुन आधीच परशा जरा उखडलेला असतो, दुसर्या दिवशी कामावर जायच्या आधी पण त्यावरुन खटका उडतो आणि आर्चि निघत असे पर्यंत सुरुच असतं भांडण.
"तिथं कामावर कोणी फोन बघू नये म्हनून बदल्लाय" इथे खरं परशा थोडा शरमल्या सारखा होतो, कारण त्याला स्वतःची चूक लक्षात येते बहुतेक पण तो पर्यंत डॅमेज झालेलं असतं.आर्चिचा संयम संपलेला असतो.
"कुडं चालली?"
"चालली मसनात! कुटं जाती रोज मी?" "तुझ्या ह्या असल्या सबावाचा लै वैताग आला मला"
"काय यवडा वैटे का मी?"
"मंग मी वाईटे का?"
"मी आसकुडं म्हनलं?"
"म्हनायची काय गरजे?"
"कामावर जावच लागल का?"
"लोडय कामाचा, सर वोरड्त्याल"
काम संपवून आर्ची परशाच्या डोसा टपरीवर येते.
परश्या अजून घुसाट्यातच असतो.
"परश्या..... ओ साह्येब... पिकचरला जायचं का?"
"कामय मला.."
"मी इचारतीकी सुमनताईला"
"दुसरं कामेमला"
"चल ना..."
"तुला एकदा सांगितलेलं कळतय का?"
"हळू बोल की मग येवडं वरडतो कशाला?"'
"लै गाजलेला पिच्चरय, तुझ्या आवडत्या हिरोचा"
"...."
"मी एकटी जाईना?"
"जां..."
"खरच एकटी जाईन"
"निग्की मग कशाला थामली!"
"लै इगोए तुला, बस तसाच..."
असं म्हणून आर्चि एकटी पिकचर ला जाते....
त्या प्रेमानी म्हणलेल्या ओ सायेबाला पुढे जी अत्यंत तुसडी वागणूक मिळते ती बघून आणि एस्पशली विहिरीवरची ७-८ पोरांना दमात घेऊन हाकलणारी आर्चि आठवून ह्रदयाला खिंडारं पडतात!
पाटलाची पोरगी म्हणून येवढा माज केलेली, तेवढच ह्या परशावर प्रेम करणारी अन त्याला वाचवताना स्वतःच्या वडिलांकडून मार खाणारी, आबावर गोळी झाडणारी पण नंतर परिस्थितीशी दोन हात करत पण प्रेमानी राहू बघणार्या आर्चिची वाताहत बघवत नाही. पुढे प्रकरण आण्खिन थोडं विकोपाला जाऊन नंतर शेवटी परत ती दोघं आपल्याला एक मेकांशिवाय कोणी नाही हे समजून परत एकत्र येतात.
परशा तसा चांगला दाखवलाय आणि पिकचर मध्ये आर्चिच्या घरचे खुप जास्त कडक दाखवले आहेत पण एकंदरितच हे सगळं आपल्याकडच्या बर्याच मुलीं/स्त्रियांबद्दलचं खुप बोलकं असं उदाहरण आहे.
पळून जाऊन लग्न केलेलं नसलं आणि घरच्यांनी करुन दिलेलं असलं तरी एकदा लग्न करुन दिलं की आपली जबाबदारी संपली आणि माहेरपणाला आनंदानी ये असं म्हणाले तरी टेकनिकली घरी परत जायचे दरवाजे बंद असतात. सो उद्या काही अनबन झाली तरी एक तर तुम्ही ते निभावून न्यायचं किंवा मग आपला आपण मार्ग बघायचा येवढच उरतं.
असो.....
अकरित घडलया
सपान हे पडलया
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजलं
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरलं
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…….
_/\_
ठिक आहे आपण काका वर सेटलमेंट
ठिक आहे आपण काका वर सेटलमेंट करुन टाकूयात
लाल शेरे प्रदिप आणि सल्याच्या दाखल्यावर पण मारले होते का?
त्यांना नंतर कॉलेज पूर्ण करता येते की आपापले उद्योग धंदे चालू करावे लागतात?
आर्ची घरुन पैसे दागिने घेऊन
आर्ची घरुन पैसे दागिने घेऊन पळून येते पण नंतर च्या घटनाक्रमामुळे त्यांना फक्त अंगावर कपड्यांनिशी काहीही न घेता पळावं लागतं.
आमच्या कॉलेजात एका भिन्न प्रांतीय आणि धर्मीय प्रेमात मुलगा मुलगी रोज कॉलेज बॅगेत बर्थ सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंट घेऊन यायचे.असंच अनप्लॅन्ड पळावं लागलं तर.(हे योगायोगाने काहीतरी मागितलं आणि 'घे माझ्या बॅग मधून' यातून कळलं.)मुलीचे वडिल शहरातले बिग शॉट होते.त्यांचं मोठं मेडिकल चं दुकान होतं.
आता घरच्यांच्या विरोधात लग्न करुन एका शहरात सुखाने ८-१० वर्षं जगत आहेत.
धाग्यावरच्या आधीच्या कॉमेंट्स
धाग्यावरच्या आधीच्या कॉमेंट्स वाचत होते. अगदीच राहावले नाही म्हणुन ही अवांतर कॉमेंटः
बिहारी टॉपरस चा आदर्श्य ठेवायचा ??
सैराट करमणूक म्हणून पहा पण आदर्श UPSC पास झालेल्या या बिहारी पोरांचा ठेवा .<<
आरचीचे बापाने तिचे लग्न ठरावण्या ऐवजी दोघाना विश्वासात घेऊन नीट मार्गदर्शन केले असते, परश्याच्या उच्चं शिक्षणाची सोय केली असती तर परश्या IAS झाला असता आणि आर्चि शेतीतज्ज्ञ. योग्य वेळी लग्न केले असते. चूक बापाची आणि त्याला असे करायला लावणाऱ्या समाजाची. विश्वास पाटलांनी या असल्या समाजाचे प्रबोधन करावे. आर्चि परश्याने तर शून्यातून विश्व उभे केले जे या समाजानेच कापून फेकले<< हे अगदीच पटल
नंतरच्या आई सोबत फोन वर
नंतरच्या आई सोबत फोन वर बोलतानाच्या सिन मधे घरातील सामान ही खूप कमी दाखवले आहे, त्यामुळे घर जास्त रिकामे आणि भकास वाटते. घरातील सामान ही विकावे लागते असे काही दाखवायचे असेल का?
शेती भाती वाले लोक आहेत, इतकी
शेती भाती वाले लोक आहेत, इतकी अवस्था नाही येणार, आर्चीशी संबंधित गोष्टी काढल्या असतील घरातून फोटो फेकले तसं.
ठिक आहे आपण काका वर सेटलमेंट
ठिक आहे आपण काका वर सेटलमेंट करुन टाकूयात >>>>>
नाय नाय असं कसं ...
काही काही वेळेस राजकारणी लोकं त्यांच्या वयात येणाऱ्या/ आलेल्या मुलांसोबत स्वतःचे विश्वासातले एक दोन लोक ठेवतात.
आबा त्यातला वाटतो, त्याचा वावर पण तसाच वाटतो सिनेमा मध्ये.
त्यात बरेच शोपीस, फोटो,
त्यात बरेच शोपीस, फोटो, भिंतीवर लटकवलेलं कायकाय हे सगळं आर्चीनं केलेलं असल्यामुळे तिच्या फोटोबरोबर या वस्तूपण फेकुन दिल्या असाव्यात.. घरातलं फर्निचर कमी नाही झालेलं..
घरातील सामान ही विकावे लागते
घरातील सामान ही विकावे लागते असे काही दाखवायचे असेल का?>>> असं काही नाही. नसावं.
घराचं नाही आलं लक्षात. पण नंतरच्या सभेवेळी उतरलेल्या चेहर्याचे तात्या बघवत नाहीत. वाईट वाटलं. आधीचे हॅन्ड्सम मग्रुर तात्या आठवतात.
स्पॉयलर . . . . . . . . . . .
स्पॉयलर
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
प्रिन्स आणि मंडळींच्या हातात पिशव्या/शर्टात काही दडवलेलं दाखवलं आहे का? जे शेवटी केलं ते करायला हत्यारं कशी आणतात्?हा भाग अप्रिय असल्याने बघत नाही कधी.
त्यात बरेच शोपीस, फोटो,
त्यात बरेच शोपीस, फोटो, भिंतीवर लटकवलेलं कायकाय हे सगळं आर्चीनं केलेलं असल्यामुळे तिच्या फोटोबरोबर या वस्तूपण फेकुन दिल्या असाव्यात.. घरातलं फर्निचर कमी नाही झालेलं.. >>>>
बरोबर, आर्ची संबंधित सगळ्या गोष्टी काढलेल्या दिसतात. अगदी बंगल्याला दिलेलं तिचं नावदेखील.
. प्रिन्स आणि मंडळींच्या
.
प्रिन्स आणि मंडळींच्या हातात पिशव्या/शर्टात काही दडवलेलं दाखवलं आहे का? जे शेवटी केलं ते करायला हत्यारं कशी आणतात्?हा भाग अप्रिय असल्याने बघत नाही कधी. >>>>
एकाच्या पाठीवर सॅक असते. त्यात असणार.
मीही माझ्या काकाला ए काका
मीही माझ्या काकाला ए काका म्हणुनच हाक मारते. अहो काका म्हणायला लागले तर दुरावा आला असे वाटायला लागेल
आर्ची असताना ती घरात गिरक्या घेत फिरतेय, तिच्या रुममध्ये तिचे मोठ्ठे फोटो लावलेत, मुली आरचीबरोबर बागडताहेत असे दृश्य दाखवलेय. तेच आर्ची गेल्यावर एकदम रिकामं दाखवलंय. रिकाम्या भिंती, घरात शांतता, स्वतः दबलेली आणि दबक्या आवाजात फोनवर बोलणारी आई इत्यादी.
आबाही तात्याएवढाच महत्वाचा
आबाही तात्याएवढाच महत्वाचा आहे. कोण आहे माहित नाही पण सुरवातीच्या फ्लेक्सवर तात्या आनि मिथुनानंद बुवांसोबत तोही आहे. म्हणजे त्याचीही काहीतरी किंमत असणार. तात्याचा मॅन फ्रायडे म्हणुन वावरत नसणार तो.
काही काही वेळेस राजकारणी लोकं
काही काही वेळेस राजकारणी लोकं त्यांच्या वयात येणाऱ्या/ आलेल्या मुलांसोबत स्वतःचे विश्वासातले एक दोन लोक ठेवतात.
आबा त्यातला वाटतो, त्याचा वावर पण तसाच वाटतो सिनेमा मध्ये.>>> चला बोललं कोणतरी.. तभी मै सोचु कि आबा म्हणजे एखादा विश्वासु सक्रिय कार्यकर्ता आहे हे कुणाच्याच डोस्क्यात का येउ नये..
त्यात बरेच शोपीस, फोटो,
त्यात बरेच शोपीस, फोटो, भिंतीवर लटकवलेलं कायकाय हे सगळं आर्चीनं केलेलं असल्यामुळे तिच्या फोटोबरोबर या वस्तूपण फेकुन दिल्या असाव्यात.. घरातलं फर्निचर कमी नाही झालेलं.. >>>>
बरोबर, आर्ची संबंधित सगळ्या गोष्टी काढलेल्या दिसतात. अगदी बंगल्याला दिलेलं तिचं नावदेखील. >>> +१०००
पण नंतरच्या सभेवेळी उतरलेल्या
पण नंतरच्या सभेवेळी उतरलेल्या चेहर्याचे तात्या बघवत नाहीत. वाईट वाटलं. आधीचे हॅन्ड्सम मग्रुर तात्या आठवतात.
नागराजने दाखवताना कुठलाही पैलु सोडलेला नाहीय. मुले पळून जातात कारण पालक लगेच दुसरीकडे लग्न लावुन द्यायची घाई करतात. पालक ही घाई का करतात तर मुले पळून गेल्यावर समाजात आपले काय धिंडवडे उडणार आहेत हे त्यांना पक्के माहित आहे. परशा आणि आर्ची - दोघांच्याही घराला भयानक त्रास भोगावा लागतो, इतर भावंडानाही त्रास होतो. ह्या अपमानाचे जहर इतके तिव्र आहे की त्यापुढे बहिणीची हत्या करणे सोपे वाटावे. मुळात सगळा समाजच किडका आहे. इथल्या मान अपमान, उच्च निच , बरे वाईट इत्यादी कल्पनांना कसलेही लोजिक नाही.
नागराजने दाखवताना कुठलाही
नागराजने दाखवताना कुठलाही पैलु सोडलेला नाहीय. मुले पळून जातात कारण पालक लगेच दुसरीकडे लग्न लावुन द्यायची घाई करतात. पालक ही घाई का करतात तर मुले पळून गेल्यावर समाजात आपले काय धिंडवडे उडणार आहेत हे त्यांना पक्के माहित आहे. परशा आणि आर्ची - दोघांच्याही घराला भयानक त्रास भोगावा लागतो, इतर भावंडानाही त्रास होतो. ह्या अपमानाचे जहर इतके तिव्र आहे की त्यापुढे बहिणीची हत्या करणे सोपे वाटावे. मुळात सगळा समाजच किडका आहे. इथल्या मान अपमान, उच्च निच , बरे वाईट इत्यादी कल्पनांना कसलेही लोजिक नाही >>>
++११११११
आणि त्या पळून जाण्याचेही कुठेही। ग्लाॅरिफिकेशन नाही. उलट आर्ची परशाचे हाल पाहुन पळुन जाण्याचा विचार। करणार्यांनी परत दहा वेळा विचार करावा.
नागराजने दाखवताना कुठलाही
नागराजने दाखवताना कुठलाही पैलु सोडलेला नाहीय. मुले पळून जातात कारण पालक लगेच दुसरीकडे लग्न लावुन द्यायची घाई करतात. पालक ही घाई का करतात तर मुले पळून गेल्यावर समाजात आपले काय धिंडवडे उडणार आहेत हे त्यांना पक्के माहित आहे. परशा आणि आर्ची - दोघांच्याही घराला भयानक त्रास भोगावा लागतो, इतर भावंडानाही त्रास होतो. ह्या अपमानाचे जहर इतके तिव्र आहे की त्यापुढे बहिणीची हत्या करणे सोपे वाटावे. मुळात सगळा समाजच किडका आहे. इथल्या मान अपमान, उच्च निच , बरे वाईट इत्यादी कल्पनांना कसलेही लोजिक नाही >>>>>+१
बुवा तुम्ही म्हणा बरं
बुवा तुम्ही म्हणा बरं एकदा,
अय झिरमाळ्यांनो, किती येळ लावला, ईतका यळं असतो व्हंय. हं हं तुम्हालाच म्ह्णतोय, लिव्हा.
माझ्या बाफचे फ्यान हैत तर, म्या ऊघडलाय, लिहून घ्यायचं.
हाबं सकाळी उठून बघतो तर ४९
हाबं

सकाळी उठून बघतो तर ४९ नवीन पोस्टी! एकत नाय बाफं आजाबात. चालू द्या... होल वावर इज आवर!
काल गाणी बघताना ह्य दोन
काल गाणी बघताना ह्य दोन गोष्टी लक्षात आल्या:
१. मोजडी मध्ये फूल वाल्या मंदि राच्या सीन मध्ये - त्या मंदिरावर " आईसाहेब" लिहलय .
२. होळी च्या सीन मध्ये , आर्ची ला रंग फक्त परश्या न आनी ने लावला...सल्या न बाळ्या परश्याला रं ग लावताहेन, वा नुसताच गु लाल उधळतात..
परश्या-आर्ची पळून जातात,
परश्या-आर्ची पळून जातात, तेंव्हा त्यांचा फोन आल्यावर पाटील मंग्याला "शेतात नेमकं कुठं?" असं विचारायला लावतो, ते बर्यापैकी मोठ्याने बोलतो. ज्याला माहिती हवी आहे, तो असं करेल का?
हाय्झेन आता झिरमाळ्या म्हणजे
हाय्झेन
आता झिरमाळ्या म्हणजे काय ?
पाटील मंग्याला "शेतात नेमकं कुठं?" असं विचारायला लावतो, >>> रिसिव्हर / माइक वर बोट ठेऊन म्हणतात ना पाटील ?
हाय्झेन आता झिरमाळ्या म्हणजे
हाय्झेन
आता झिरमाळ्या म्हणजे काय ?
पाटील मंग्याला "शेतात नेमकं कुठं?" असं विचारायला लावतो, >>> रिसिव्हर / माइक वर बोट ठेऊन म्हणतात ना पाटील ?
<<
हो अर्थात, हातानी कव्हर करून मग विचारतो.
बाकी इतकी काळजी घेतली आहे छोट्या सीन्समधेसुध्द्दा , मंजुळे अशा सीन मधे तर मुळीच घोळ घालणारच नाही
अजुन एक सीन आवडला, 'पैसे लय हायत माझ्याकडं ' म्हणत आर्ची घरऊन आणलेले पैसे दाखवते तेंव्हा ' तुझ्या माहेरचे पैसे नको मला' टाइप फिल्मी डॉयलॉग न झाडता उलट पैसे आहेत कळल्यावर मित्रांसकट पळतो , गरज आहे आपल्याला पैश्याची माहित असल्यामुळे.
'पैसे लय हायत माझ्याकडं '
'पैसे लय हायत माझ्याकडं ' म्हणत आर्ची घरऊन आणलेले पैसे दाखवते << होना मला ईतक बर वाटलेला पैसे आहेत पोरांक डे बघुन. निदान हाल तरी होणार नाहीत अस वाटल होत
झिरमाळ्या, खुळखुळ्या,
झिरमाळ्या, खुळखुळ्या, भुसनळ्या, नरसाळ्या, सुरमाळ्या, फुकनळ्या अश्या शब्दांचा अर्थ विचारू नये. बोलणार्याच्या चेहर्यावरचे भाव बघून ज्याच्यासाठी तो शब्द वापरला आहे त्याला त्याचा अर्थ आपोआप कळतो.
>>>झिरमाळ्या, खुळखुळ्या,
>>>झिरमाळ्या, खुळखुळ्या, भुसनळ्या, नरसाळ्या, सुरमाळ्या, फुकनळ्या अश्या शब्दांचा अर्थ विचारू नये. बोलणार्याच्या चेहर्यावरचे भाव बघून ज्याच्यासाठी तो शब्द वापरला आहे त्याला त्याचा अर्थ आपोआप कळतो.>>>
रताळ्या इसरला का?
हो, ते हाताने कव्हर करतो, पण
हो, ते हाताने कव्हर करतो, पण नीट नाही.. म्हणून तर ते फोन कट करतात ना?
क्रेक्टे हाब जाते की ती पण
क्रेक्टे हाब
जाते की ती पण बॅग पडून, ट्रेन पकडायच्या आधीच्या शॉट मध्ये.
शेतात नेमकं कुठे असं मंग्या
शेतात नेमकं कुठे असं मंग्या स्वतः का विचारेल? त्यांना थोडा अंदाज आला असेल की त्याच्या जवळ कोणीतरी आहे.
मुळात सल्याने फोन केला असल्याने मंग्या जवळ कोणी नाही अशा सिच्युएशन मध्ये रेडीमेड सापडणं कठीणच.
शिवाय मंग्या सरळ आहे, त्याला मदत करायची असती तर तो पुढे 'शेतात नेमकं कुठे? मी येतो खाऊ/काय पाहिजे ते घेऊन' नक्की म्हणाला असता.तो शेतात नेमकं कुठे म्हणून शांत बसतो तेव्हा अंदाज आला असेल.
Pages